परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मोठ्या संख्येनं उपस्थित रहाण्याचे मुंडे परिवाराचे आवाहन

 राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव येथे ह.भ. प. नाना महाराज कदम यांचे कीर्तन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तळेगाव येथे ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ पंचक्रोशितील नागरिकांनी कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

         राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले असे थोर संत श्री भगवान बाबा यांची जयंती गेल्या १९ वर्षांपासून तळेगाव येथे साजरी करण्यात येते. त्यानिमित्ताने मित्ती पौष क्र.१ शके १९४५ शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम (सद्गुरू बंकट स्वामी संस्थान नेकनूर) यांचे दुपारी १ ते ३ कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ व पंचक्रोशितील ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी कदम महाराज यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी परळी ते बीड रोड तळेगाव , ता.परळी वैजनाथ येथे उपस्थित रहावे असे आवाहन दगडूबा बळीराम मुंडे, रमेश दगडूबा मुंडे, कुंडलिकराव बळीराम मुंडे, गणेश कुंडलिक मुंडे, अंकुश कुंडलिक मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!