इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

मोठ्या संख्येनं उपस्थित रहाण्याचे मुंडे परिवाराचे आवाहन

 राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव येथे ह.भ. प. नाना महाराज कदम यांचे कीर्तन




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तळेगाव येथे ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ पंचक्रोशितील नागरिकांनी कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

         राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले असे थोर संत श्री भगवान बाबा यांची जयंती गेल्या १९ वर्षांपासून तळेगाव येथे साजरी करण्यात येते. त्यानिमित्ताने मित्ती पौष क्र.१ शके १९४५ शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम (सद्गुरू बंकट स्वामी संस्थान नेकनूर) यांचे दुपारी १ ते ३ कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ व पंचक्रोशितील ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविक भक्तांनी कदम महाराज यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी परळी ते बीड रोड तळेगाव , ता.परळी वैजनाथ येथे उपस्थित रहावे असे आवाहन दगडूबा बळीराम मुंडे, रमेश दगडूबा मुंडे, कुंडलिकराव बळीराम मुंडे, गणेश कुंडलिक मुंडे, अंकुश कुंडलिक मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या