दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !

 वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू ! 



-------------------------------

माजलगाव, दि.२५ (प्रतिनिधी)तालुक्यातील लोनगाव येथील सबस्टेशनला गेलेली वीज वाहक तर अंगावर पडल्याने जाग्यावरच होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली निपाणी टाकळी येथे घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तर ही निपाणी टाकळी येथून गेलेली आहे. याच गावातील रहिवाशी बालासाहेब वैजनाथ पांडे (वय ६५ वर्षे) हे त्यांच्या शेतातून दैनदिन काम आटोपून आज दि.२५ गुरुवारी पहाटे घराकडे येत होते. या दरम्यान गावच्या स्मशानभूमी जवळ बालासाहेब पांडे आले असता सबस्टेशन गेलेली मुख्य वीज वाहक तर अंगावर पडली, त्यातच त्यांचा होरपळून मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने निपाणी टाकळी सह पंचक्रोशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


महावितरण दुरुस्ती बाबत गंभीर ?

---------------------------


माजलगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहक तार, खांब हे धोकादायक परिस्थितीत आहेत. ह्यांच्या दुरुस्ती बाबत शेतकरी, ग्रामस्थ ह्यांच्याकडून तक्रार महावितरणकडे करून दुरुस्ती करण्यात येत नाही. निपाणी टाकळी येथील ही घटना जीर्ण व धोकादायक असलेल्या वीज वाहक तारे मुळेच झाला असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....