पोस्ट्स

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

इमेज
सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्कही वाढवले कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळणार मुंबई दि.१३- सोयाबीनची 90 दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.      राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे, अशा मागण

निकटवर्तीयांना चुटपुट लावणारी ह्रदयद्रावक घटना

इमेज
आईच्या दहाव्या दिवशी मुलाचीही संपली जीवनयात्रा ! परळी/प्रतिनिधी - आईच्या दहाव्या दिवशीच मुलाचेही निधन झाल्याची चुटपूट लावणारी एक घटना परळीच्या संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्लीमध्ये शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी घडली. तारामती लक्ष्मण शिंदे (वय ८०) व बालाजी लक्ष्मण शिंदे (वय ५३), असे निधन झालेल्या माय-लेकराचे नाव आहे. बालाजी शिंदे हे गणेशपार भागात *बम्बईया* या टोपण नावाने परिचित होते. स्कूल ऑटो चालक म्हणून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते व्यवसाय करत होते. ऊन-पाऊस अथवा कितीही कडाक्याची थंडीही असली तरी पहाटे ५ वाजून ५ मिनिटाला शिंदे यांचा ऑटो सुरू व्हायचा. तीच त्यांची ओळख गल्लीतील रहिवाशांमध्ये ठसलेली होती. ऑटो चालवूनच त्यांनी मुलाला इंजिनिअर केले. मुलीलाही उच्चशिक्षित केले. बालाजी शिंदे हे ४ सप्टेंबरला वार्धक्याने इहलोकीची यात्रा संपवलेल्या आईच्या गंगापूजनाचे विधी १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने त्याची सर्व तयारी घरात करत होते. १४ व्या चा गोड जेवणाचा मुख्य विधी सावता महाराज मंदिरात करायचे निश्चित झाले होते. तसे स्थळ, वेळ सांगणाऱ्या छापिल मजकुराच्या व्हॉट्सॲप
इमेज
  परळी- नंदागौळ रस्त्यावर आढळला मृतदेह परळी वैजनाथ ,प्रतिनिधी          परळी - नंदागौळ रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असुन  या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.            एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ३५-४० असलेल्या इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. तो वेडसर असून मागील काही दिवसापासून वैद्यनाथ मंदिर परिसरात फिरत होता. तरी त्याचेबाबत अगर नातेवाईकबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन परळी शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इमेज
  धर्मापुरीकरांना दिलेला शब्द धनंजय मुंडेंनी केला पूर्ण, शादीखाना बांधकामास 1 कोटी रुपये निधी मंजूर परळी वैद्यनाथ (दि. 13) - परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातील धर्मापुरी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, धर्मापुरी येथे शादीखाना उभारण्यास शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने मंजुरी दिली असून, मुंडेंच्या मागणीनुसार या कामासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात दिलेले शब्द पूर्ण करण्यावर व पायाभूत सुविधांच्या निर्माणवर अगदी सुरुवातीपासूनच भर दिला आहे.  मागील सुमारे पावणे पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात तीर्थक्षेत्र विकास, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पशु वैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध सुविधा, राष्ट्रीय महामार्गाचे नावन्यपूर्ण निर्माण, शहर बायपास यांसारखी अनेक कामे पूर्ण केली आहेत. त्यातच आता दिलेला शब्द पूर्ण करत धर्मापुरी येथील शादीखान्याचीही भर पडली आहे.  याबद्दल धर्मापुरीचे ज्येष्ठ नेते ऍड.गोविंद फड व

अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

इमेज
अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      श्री क्षेत्र हनुमान मंदीर अंबलटेक, अंबाजोगाई, जि. बीड येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.              गुरुवार, दि.१२.०९.२०२४ रोजी प्रारंभ होणार असुन बुधवार, दि.१८.०९.२०२४ कथेची सांगता होणार आहे.दररोज सायं. ७.०० ते १० पर्यंत कथेची वेळ असणार आहे.कथाकार श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या सुमधूर वाणीतून कथा होईल. या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, अंबलटेक ता. अंबाजोगाई, जि. बीड यांनी केले आहे.
इमेज
  अष्टांग-योगाच्या अनुष्ठानाने जगात सुख- शांतता नांदेल ! वैद्यनाथ" मधील ‘ग्रंथ चर्चा’ उपक्रमात प्रा. डॉ.आचार्य यांचे विचार                  *परळी, दि.११-*                         सद्ययुगात वाढत चाललेल्या सर्व समस्यांवर अष्टांगयोगाचे अनुष्ठान  हाच  उपाय असून योगतत्वांच्या आचरणाने जगात सुख शांतता नांदेल.यासाठी मानवाने नेहमी योगसाधनेला जीवनाचे अंग बनवावे, असे आवाहन अभ्यासक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी व्यक्त केले.                      ‌.                      येथील वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने काल (दि.१०) "ग्रंथचर्चा" हा अभिनव उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफतांना प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आचार्य बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण होत्या. तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ.व्ही.बी. गायकवाड, नॅक समन्वयक डॉ. व्ही. जे. चव्हाण, ग्रंथपाल डॉ.एस. ए.धांडे उपस्थित होते.                ‌.                      श्री आचार्य यांनी बी. के. एस. अय्यंगार यांच
इमेज
  मन, वचन व शरीराने इतरांना त्रास न देणे हा खरा यज्ञ, तर मानवाला सुखी ठेवणे हाच खरा धर्म   श्रीमद् भागवत कथेतून स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे प्रतिपादन. प्रतिनिधी । परळी दि. १२ सप्टेंबर २०२४ दृष्टी व मन शुद्ध करा. मनाला ईश्वराचे स्मरण होण्यासाठी जपाशिवाय अन्य साधन नाही. कर्म हे चित्तशुद्धी साठी आहे तर भक्ती ही मनाच्या एकाग्रतेसाठी असते. चित्त शुद्ध झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा जाणवते. ज्याचे मन निर्मळ असेल, दृष्टी शुद्ध असेल, जो निस्वार्थ मनाने कर्म करत असेल त्याच्यासाठी जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सृष्टीत वावरताना प्रत्येक जिवाला सुखी करणे हाच मानवाचा धर्म आहे. हाच आदर्श वराभ भगवंतांनी आपल्या आचरणातून मानवाला शिकवला आहे. मन, वचन व शरीराने कोणालाही त्रास न देणे हाच खरा यज्ञ आहे तर मानवाला सुखी ठेवणे हा खरा धर्म आहे असे विचार संत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथाकार स्वामी डॉ.तुळशीरामजी गुट्टे महाराज यांनी तालुक्यातील नंदनंज येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या पुष्पात बोलताना मांडले. जीवनात ज्ञानाची प्राप्ती करणे ही गोष्ट कठीण नाही. ज्ञानप्राप्

श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून हरिहर तिर्थाची तयारी पाहणी

इमेज
  श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून हरिहर तिर्थाची तयारी पाहणी   परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-परळी शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  नगर परिषद व पोलिस प्रशासन यांनी श्रींच्या विसर्जन ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तिर्थाची पाहणी करत यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हवी याबाबत पाहणी केली.  यावेळी शहरातील विविध ठिकाणहून गणेशमूर्तींच्या मिरवणुका व विसर्जन मार्गाची पाहणी केली. श्रींच्या विसर्जनासाठी असलेल्या हरिहर तिर्थात मुबलक पाणी उपलब्ध आहे याच नेहमी प्रमाणे गणेश मुर्तींचे  विसर्जन करावे असे आवाहन ही गणेश मंडळ व घरगुती गणेश भक्तांना प्रशासनाने केले आहे.  नगर परिषदेचे मुख्याधिकारी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गुरुवार दि.12 सप्टेंबर रोजी श्रींच्या विसर्जन ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तिर्थाची पाहणी करत यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हव्या याबाबत उपाययोजना करिता पाहणी केली.          यावर

● असा उलगडला गुन्हा... पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे यांच्या पुर्वानुभवाने सापडला चोर

इमेज
  बसमध्ये बिस्कीट आणि पाणी देऊन आणली गुंगी: महिलेचे साडेतीन लाखाचे दागिने पळवणारा चोर जेरबंद ! परळीच्या संभाजीनगर पोलीसांनी महिनाभरात उलगडला चोरीचा गुन्हा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी वैजनाथ येथून बस मध्ये प्रवास करत असताना दगडवाडी जवळ बसमधील एका महिलेला एका अनोळखी इसमाने चहा बिस्कीट दिले. त्यानंतर या महिलेला गुंगी आली. त्यानंतर या इसमाने महिलेच्या अंगावरील साडेतीन लाख रुपयांचे दागिने पळून नेल्याची घटना गेल्या आठ ऑगस्ट रोजी घडली होती. या अतिशय गुंतागुंतीच्या व तपासाच्या दृष्टीने क्लिष्ट असलेल्या गुन्ह्याचा परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी महिन्याच्या आत तपास केला व हा गुन्हा उलगडला असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील  एका चोराला मुददेमालासह जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.           याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार कमल ज्ञानोबा सुरवसे वय 50 वर्ष रा. बसवेश्वर कॉलनी परळी ता. परळी जि.बीड महिला दि.-08/08/2024 रोजी सकाळी 7:30 वा च्या सुमारास परळी बसस्थानक येथून नांदेड येथे जाण्यासाठी परळी ते नांदेड बस मधून प्रवास करत असताना बसमध्ये एका अनोळखी इसमाने या महिलेला बिस्की

श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न

इमेज
  परळीत संतश्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सवास भाविकांची लक्षणीय उपस्थिती श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  वीरशैव समाज परळीच्या वतीने संतश्री गुरूलिंग स्वामी यांचा 123वा पुण्यतिथी महोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह 7 सप्टेंबरपासून भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात सुरू झाला आहे. आज बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाच्या प्रारंभात श्री संतश्री गुरूलिंग स्वामी व संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन श्री व सौ अविनाश शंकरअप्पा चौधरी व दैनिक महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे उपसंपादक श्री व सौ आशिष शंकरअप्पा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली असून, प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा अशा पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम 13 सप्टेंबरपर्यंत आयोजित केले जातील. श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत दत्ताप्पा ईटके गुरूजी व समस्त विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली

आपल्या हक्काचा माणूस-आपल्या कामाचा माणूस : राजेश गित्ते

इमेज
  आपल्या हक्काचा माणूस-आपल्या कामाचा माणूस : राजेश गित्ते               परळी तालुका हा राजकिय जागृती असलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात गाजत असलेल्या अनेक नेते घडले. स्थानिक पातळीवरील राजकारणात या नेत्यांची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.अशा काही मोजक्या नेतृत्वापैकी स्वकर्तृत्वाने राजकारण, समाजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले व शेतकरी,कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन त्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरुन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावणारे व परळीच्या ग्रामीण भागाची ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणजे भाजपनेते, वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक राजेश गित्ते हे होय.राजेश गित्ते यांचा वाढदिवस त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मागील २५ वार्षा पासुन राजेश गित्ते करित असलेल्या राजकिय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात राजेश गित्ते यांनी केलेले कार्य डोळ्या समोर आल्या शिवाय राहत नाही.          कै.प्रा.एच.पी.गित्ते यांचे शैक्षणीक क्षेत्रातील योगदान व शिस्त यामुळे गित्ते परिवार पुर्वीपासुनच परळी तालुक्यात परिचित होता.शैक्षणीक वारशाच्या या घरात जन्मलेल्या राजेश गित

परळीतही मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून फडणवीसच टार्गेट !

इमेज
मराठ्यांचा विरोध करणाऱ्यांना पाडणार म्हणजे पाडणारच - मनोज जरांगे पाटील यांचा इशारा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी           आम्हाला राजकारण करायचे नाही मात्र मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर नक्कीच यांना मराठ्यांची ताकद दाखवून देऊ. फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या काड्या करणे कमी करा नाहीतर हा मराठा समाज तुमच्यामुळे भाजपाला महाराष्ट्रात बी पुरतेही ठेवणार नाही असा गंभीर इशारा मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील  यांनी परळी येथील घोंगडी बैठकीत बोलताना दिला. दरम्यान काल मध्यरात्रीच धनंजय मुंडे यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीवर ते काही भाष्य करणार का? याची उत्सुकता होती. मात्र परळीतील संपूर्ण भाषणात त्यांनी धनंजय मुंडे अथवा अन्य कोणत्याही भेटीच्या या विषयावर भाष्य केले नाही.          मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक परळी येथे आयोजित करण्यात आली होती. हलगे गार्डन मंगल कार्यालयात झालेल्या या घोंगडी बैठकीला मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांचे परळी येथे आगमन होताच त्यांची भव्य दिव्य रॅली काढून सभास्थळी आणण्यात आ

धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं?

इमेज
  धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं? परळीत आज घोंगडी बैठक: मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली पहाटे ३ वा. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट परळी वैजनाथ:  शनिवारी ७ जुलैच्या मध्यरात्री कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. अंतरवली सराटी येथे जाऊन मुंडे यांनी ही भेट घेतली. मुंडे आणि जरांगे यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलनाता जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या बैठकीत काही विशेष चर्चा झाली नसून फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.            आज सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मध्यरात्री मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील माहिती दिली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आमच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

इमेज
  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार परळी वैजनाथ:सरस्वती नदीच्या पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना तातडीने मदत द्यावी अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातूनच होत होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही तातडीने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन दिलासा दिला होता. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या भागात फिरून तातडीने मदतीची मागणी केली होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या पूरग्रस्त नागरिकांना नाथ प्रतिष्ठानकडून 10 व शासकीय मदत पाच हजार अशी पंधरा हजार रुपयाची  मदत जाहीर केली. याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करून नाथ प्रतिष्ठानचेही कौतुक केले आहे.  परळी शहरातील सरस्वती पाणी वस्त्यातील घरामध्ये शिरल्याने प्रचंड नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते .कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी तर केली पण अजून ही तातडीची मदत केली नसल्याचे सांगुन गणेश उत्सवाच्या काळात तात्काळ मदत करायला हवी. पूरग्रस्तांच्या डोळ्यातल

वीस वर्षीय युवतीचा विनयभंग

इमेज
  वीस वर्षीय युवतीचा विनयभंग  परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर शिक्षण घेत असलेल्या केज तालुक्यातील वीस वर्षीय युवतीचा भावकीतील एकाने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी घडली.  केज तालुक्यातील वीस वर्षीय युवती परळी बसस्थानकासमोरील समर्थ हॉस्पिटल येथुन शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता वैद्यनाथ हॉस्टेलकडे निघाली असता चंद्रमणी आश्रोबा तुपारे याने रस्त्यात अडवून तु माझ्याशी लग्न कर अशी हुज्जत घालू लागला.सदरील युवतीने नकार देताच शिवीगाळ करत मारहाण करुन विनयभंग केला.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील

इमेज
परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या घोंगडी बैठकीस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा- अमित घाडगे पाटील परळी (प्रतिनिधी): मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभा, रॅली, काढलेल्या आपण पाहिलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात घोंगडी बैठकांचे आयोजन केलेले आहे. याच अनुषंगाने मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक परळी मतदार संघात होणार आहे. आज दि.8 सप्टेंबर रोजी सकाळी 11वा. परळी शहरातील हालगे गार्डन येथे होणार आहे. बैठकीला लाखो समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मराठा सेवक अमित घाडगे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकार केले आहे. परळी वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या हालगे गार्डन परळी विधानसभा मतदार संघाची भव्य दिव्य अशी घोंगडी बैठक मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. सरकारने लगेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी न केल्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेप्रमाणे उमेदव

प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार

इमेज
  परळीत सरस्वती नदीच्या पुराने बाधित झालेल्या 550 हुन अधिक कुटुंबांना धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येकी 10 हजारांची मदत तातडीच्या आपत्ती निधीतूनही प्रशासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 5 हजारांची मदत; रविवारी धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत एकत्रित होणार वितरण प्रत्येक बाधित कुटुंबाला मोफत धान्याच्या किटही देणार परळी वैद्यनाथ (दि.07) - परळी वैजनाथ शहरात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरस्वती नदीला आलेल्या पुरात 550 पेक्षा अधिक कुटुंब बाधित होऊन त्यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य धान्य आदींचे नुकसान झाले होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 550 पेक्षा अधिक कुटुंबांना प्रतिक कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत रविवारी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तातडीच्या आपत्ती निवारण निधीतून देखील प्रशासनाच्या वतीने या प्रत्येक बाधित कुटुंबाला नियमाप्रमाणे प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे तातडीची मदत देखील धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार व्यंक

केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले

इमेज
  लोकनेते मुंडे साहेबांनी जनतेसाठी पाहिलेली प्रत्येक स्वप्न सरकारी योजना बनवल्या केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले अहिल्यानगरच्या राहता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे आ. पंकजा मुंडेंच्या हस्ते थाटात उदघाटन ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह अनेकांची उपस्थिती शिर्डी ।दिनांक ०६।  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जनतेसाठी जी  स्वप्न पाहिली होती, त्या स्वप्नांच्या मी मंत्री असताना सरकारी योजना तयार केल्या आणि त्यातून विकासाची कामे मार्गी लावली. आम्ही केवळ नवीन इमारती बांधल्या नाहीत तर शासकीय योजनांच्या माध्यमातून माणसाला माणूस जोडण्याचे काम केले, जनसेवेचे हा वसा कधीही सोडणार नाही असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले.     सात कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज आ. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. आशुतोष काळे, माजी ख

मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

इमेज
  नाथ प्रतिष्ठानच्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवातील श्रींची सकाळी 11 वाजता निघणार मिरवणूक मान्यवरांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा परळी वैजनाथ: नाथ प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या 19 व्या वर्षीच्या महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन संपन्न होत असून तत्पूर्वी सकाळी ठीक अकरा वाजता श्रींची हनुमान मंदिर येथून स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडप जत्रा मैदान इथपर्यंत मिरवणूक निघणार आहे.  या मिरवणुकीनंतर स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभामंडपाच्या बाजूस उभारण्यात आलेल्या खास शामियानामध्ये श्रींची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. परळी शहरातील प्रसिद्ध डॉ.राजाराम मुंडे डॉ.गुरुप्रसाद देशपांडे , डॉ.सतीश गुठे डॉ.सुरेश चौधरी भिकूलालजी भन्साळी या मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.

परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी

इमेज
  धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान मार्फत यंदा 19 व्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास आज परळीत येणार कैलाश खेर, अभिलिप्सा पांडा, हेमा मालिनी, अजय-अतुल, आनंद शिंदे यांसह हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत परळीवासीयांसाठी दहा दिवसांची सांस्कृतिक मेजवानी परळी वैद्यनाथ (दि. 06) - राज्याचे कृषिमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी साजरा केला जाणारा व महाराष्ट्रभर ख्याती असलेला श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी 19 व्या वर्षात पदार्पण करत असून यावर्षी देखील श्री गणेश महोत्सवाचे परळी शहरात आजपासून दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे.  आज श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभमुहूर्तावर श्रींची स्व.पंडित अण्णा मुंडे सहभागृह, जत्रा मैदान, परळी येथे विधिवत स्थापना करून या गणेश महोत्सवास सुरुवात होईल.  या गणेश महोत्सवाच्या उद्घाटन

भेल संस्कार केंद्रात शिक्षक दिन उत्साहात

इमेज
  भेल संस्कार केंद्रात शिक्षक दिन  उत्साहात   (परळी.वै):      येथील भा.शि.प्र. सं.अंबाजोगाई संचलित संस्कारक्षम पिढी घडविण्यात आणि भारतीयत्वाचे शिक्षण देऊन जबाबदार नागरिक घडविणाऱ्या भेल संस्कार केंद्रात भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त " शिक्षक दिन " अगदी हर्षोल्लसात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.         या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री.शांतीलाल जैन यांनी भूषविले.सर्वप्रथम मान्यवरांकडून सरस्वती पूजन आणि डाॅ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी श्री.राहुल सुर्यवंशी सर आणि त्यांचा संघाने सरस्वती स्तवन सादर केले. " *शिक्षक हा समाजाचा आरसा असतो*" त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवत असतो.त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र हा शिक्षक दिन साजरा केला जातो. आज शाळेतील वातावरण सकाळपासूनच अगदी भारावून गेलेले होते.इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी " *स्वयंशासन दिन* साजरा करून संपूर्ण दिवस शाळा चालविण्याचा " *याचि देही याचि डोळा* अनुभव घेतला. पुढे आपाप

शिक्षणाधिकारी श भगवानराव फुलारी यांची सदिच्छा भेट

इमेज
  संस्कार प्राथमिक शाळा अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं कार्य करत आहे. - प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी संस्कार प्राथमिक शाळेत शिक्षक दिनी शिक्षणाधिकारी श भगवानराव फुलारी यांची सदिच्छा भेट परळी (प्रतिनिधी) : शहरातील पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळेत आज श्री.भगवानराव फुलारी साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, बीड) तसेच श्री कनाके साहेब (गटशिक्षणाधिकारी, परळी वै.), श्री गोविंद कराड साहेब (विस्तार अधिकारी, परळी वै.) तसेच श्री प्रकाश चाटे व श्री अशोक कराड यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे व सचिव श्री दीपक तांदळे यांनी यथोचित सत्कार केला.       यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भगवानराव फुलारी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांसमवेत शिक्षक दिन साजरा केला.       यावेळी त्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, "आज शिक्षक दिना दिवशी संस्कार प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन एक चांगला अनुभ

पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्याला यश

इमेज
अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी:मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई......       गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लागला आहे. या निर्णयानुसार अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे.       अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे, यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील गुणवंती प्रकल्पाच्या खाली १५० मीटरवर सुकळी गाव वसलेलं आहे. गावातल्या प्रत्येक घरांमध्ये सातत्यानं ओलावा येत होता. घरात आणि परिसरात असणाऱ्या ओलाव्यामुळे साप, विंचू यांसारखे प्राणी आढळण्याबरोबरच ग्रामस्थांना सतत आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या गावाच्या पनुर्वसनाची सातत्यानं मागणी होत होती. सुकळी गावच्या पुनर्वसनासाठी २००७ साली मान्यता देण्यात आली होती. मात्र विलंबामुळे या पुनर्वसनाच्या प्रकल्पाची किंमत वाढल्याने

आज हरितालिकेचा दिवस...जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी

इमेज
  आज हरितालिकेचा दिवस... जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी        भाद्रपद शुद्ध तृतीयेचे हरितालिका हे व्रत कुमारीकांनी मनासारखा पती मिळावा यासाठी तसेच सौभाग्यवतींनी पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून आवर्जून करावे, असे म्हणतात. हरितालिका हे देवी पार्वतीचेच एक नाव त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना वर स्वरुपात प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून हे व्रत केले जाते.         हिंदू पंचांगानुसार, आज हरितालिकेचा  व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर  आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात.        हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्र

अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या

इमेज
अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या परळी (प्रतिनिधी)        मागील काही दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिक नासल्याने व  बॅंकेचे कर्मचारी कर्जवसुलीसाठी दारात आल्याने चिंताग्रस्त झालेल्या 50 वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरातील गंगासागर नगर येथे घडली.          परळी व तालुक्यात मागील आठ दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिके उध्वस्त होत आहेत.परळी शहरातील गंगासागर नगर भागातील रहिवासी असलेले धनंजय रामकृष्ण राऊत वय ५५ यांना लोणी शिवारात तीन एकर जमीन असुन त्यांच्याकडे दोन बॅंकांचे कर्ज आहे.पावसाने पिक वाया गेलेले असताना दोन्ही बॅंकेचे कर्मचारी दि.4 सप्टेंबर रोजी शेतकरी राऊत यांच्या घरी वसुलीसाठी आल्याने आपण हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्यांनी दि.4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.ही बाब घरातील नातलगांना समजताच त्यांनी धनंजय यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात हलविले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वा.रा.ति.रुग्णालय अंबाजोगाई येथे हल