इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

 अष्टांग-योगाच्या अनुष्ठानाने जगात सुख- शांतता नांदेल !

वैद्यनाथ" मधील ‘ग्रंथ चर्चा’ उपक्रमात प्रा. डॉ.आचार्य यांचे विचार


                 *परळी, दि.११-*                         सद्ययुगात वाढत चाललेल्या सर्व समस्यांवर अष्टांगयोगाचे अनुष्ठान  हाच  उपाय असून योगतत्वांच्या आचरणाने जगात सुख शांतता नांदेल.यासाठी मानवाने नेहमी योगसाधनेला जीवनाचे अंग बनवावे, असे आवाहन अभ्यासक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी व्यक्त केले.                      ‌.                      येथील वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने काल (दि.१०) "ग्रंथचर्चा" हा अभिनव उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफतांना प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आचार्य बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण होत्या. तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ.व्ही.बी. गायकवाड, नॅक समन्वयक डॉ. व्ही. जे. चव्हाण, ग्रंथपाल डॉ.एस. ए.धांडे उपस्थित होते.                ‌.                      श्री आचार्य यांनी बी. के. एस. अय्यंगार यांच्या *योगदीपिका* या पुस्तकावर आधारित *"योग हा शाश्वत सुखाचा मार्ग"* या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले-  योग म्हणजे मनाच्या विविध वृत्तींना व इंद्रियांच्या दोषांना दूर सारून त्यांना श्रेय मार्गाकडे जोडणे व पवित्र तत्वांचा अंगिकार करणे होय. योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगांचे  मनोभावे अनुष्ठान करून त्यातील सत्य मूल्यांवर आचरण करणे इष्ट ठरते. यांच्या अभावी आजच्या युगातील माणूस स्वैर होत चालला असून विपुल प्रमाणात  सुखसाधने मिळूनही त्याची दुःखांकडे वाटचाल सुरू आहे. आपल्या भाषणात त्यांनी योगाच्या मंत्रयोग, लययोग, हठयोग, राजयोग यांपैकी महर्षी पतंजली प्रतिपादित राजयोग सर्वोत्तम असल्याचे सांगितले. समग्र योगाच्या आचरणातून मानवाने आपले मानसिक, शारीरिक, बौद्धिक व आत्मिक संतुलन कसे राखावे , यासंदर्भात  समर्पक उदाहरणे देऊन योगाचे महत्व उलगडले.                    ‌.                       प्राचार्या डॉ. ए.आर. चव्हाण यांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी ग्रंथचर्चा हा उपक्रम अतिशय स्तुत्य व मौलिक स्वरूपाचा असून यामुळे वाचनापासून दुरावत चाललेल्या प्राध्यापक व विद्यार्थी घटकाला ग्रंथाकडे वळण्याची सत्प्रेरणा मिळू शकते, असे सांगितले व  इतरांनीही याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


       कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार  या उपक्रमाचे संयोजक ग्रंथपाल डॉ. एस. ए. धांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. एम. जी. लांडगे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या