23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या


परळी (प्रतिनिधी)

       मागील काही दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिक नासल्याने व  बॅंकेचे कर्मचारी कर्जवसुलीसाठी दारात आल्याने चिंताग्रस्त झालेल्या 50 वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरातील गंगासागर नगर येथे घडली.

         परळी व तालुक्यात मागील आठ दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिके उध्वस्त होत आहेत.परळी शहरातील गंगासागर नगर भागातील रहिवासी असलेले धनंजय रामकृष्ण राऊत वय ५५ यांना लोणी शिवारात तीन एकर जमीन असुन त्यांच्याकडे दोन बॅंकांचे कर्ज आहे.पावसाने पिक वाया गेलेले असताना दोन्ही बॅंकेचे कर्मचारी दि.4 सप्टेंबर रोजी शेतकरी राऊत यांच्या घरी वसुलीसाठी आल्याने आपण हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्यांनी दि.4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.ही बाब घरातील नातलगांना समजताच त्यांनी धनंजय यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात हलविले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वा.रा.ति.रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविले असता रात्री 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला.गुरुवार दि.5 सप्टेंबर रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर परळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.राऊत यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?