23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्याला यश

अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी:मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई......

      गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लागला आहे. या निर्णयानुसार अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे.

      अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे, यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील गुणवंती प्रकल्पाच्या खाली १५० मीटरवर सुकळी गाव वसलेलं आहे. गावातल्या प्रत्येक घरांमध्ये सातत्यानं ओलावा येत होता. घरात आणि परिसरात असणाऱ्या ओलाव्यामुळे साप, विंचू यांसारखे प्राणी आढळण्याबरोबरच ग्रामस्थांना सतत आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या गावाच्या पनुर्वसनाची सातत्यानं मागणी होत होती. सुकळी गावच्या पुनर्वसनासाठी २००७ साली मान्यता देण्यात आली होती. मात्र विलंबामुळे या पुनर्वसनाच्या प्रकल्पाची किंमत वाढल्याने हा प्रश्न अडकून पडला होता. मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन यातील त्रुटी दूर केल्यानंतर अखेर गावचे पुनर्वसन होणार आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?