इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्याला यश

अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी:मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई......

      गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लागला आहे. या निर्णयानुसार अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे.

      अखेर सुकळीतील दोनशे कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे, यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील गुणवंती प्रकल्पाच्या खाली १५० मीटरवर सुकळी गाव वसलेलं आहे. गावातल्या प्रत्येक घरांमध्ये सातत्यानं ओलावा येत होता. घरात आणि परिसरात असणाऱ्या ओलाव्यामुळे साप, विंचू यांसारखे प्राणी आढळण्याबरोबरच ग्रामस्थांना सतत आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे या गावाच्या पनुर्वसनाची सातत्यानं मागणी होत होती. सुकळी गावच्या पुनर्वसनासाठी २००७ साली मान्यता देण्यात आली होती. मात्र विलंबामुळे या पुनर्वसनाच्या प्रकल्पाची किंमत वाढल्याने हा प्रश्न अडकून पडला होता. मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन यातील त्रुटी दूर केल्यानंतर अखेर गावचे पुनर्वसन होणार आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!