इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

 23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे




परळी वैजनाथ.....

          बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.

             महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कामगार सहभागी होणार आहेत. या आंदोलनात बीड जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने कामगार सहभागी होणार आहेत. कामगारांना दिवाळीसाठी 20000 रुपये अनुग्रह अनुदान द्यावे ,साहित्य खरेदी योजना सुरू करा व साहित्यासाठी दहा हजार रुपये द्या, 60 वर्षावरील बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, सुरक्षा संच, भांडी संच ऐवजी रोख रक्कम द्या, घर बांधणी योजनेचे अनुदान साडेचार लाख रुपये करा, सर्व योजनेचे लाभ अर्ज केल्यानंतर दोन महिन्याच्या आत द्या, बोगस कामगारांची नोंदणी रद्द करा, मृत्यू लाभासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अट रद्द द्या करा ,सर्व जिल्ह्यात मेडिक्लेम योजना सुरू करा, त्यात आई-वडिलांसह कुटुंब यांचा समावेश करा ,उपचारासाठी तालुक्यातील सर्व सुविधांचा लाभ असलेला दवाखाना निवडा आदी प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा .बी.जी.खाडे, सरचिटणीस जालिंदर गिरी, ओम पुरी, शेख जावेद, नवीद महाजन, गजू पटेल, अर्जुन सोळंके, कृष्णा कांबळे, बाबासाहेब रोडे, प्रकाश वाघमारे यांनी केले आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्यांनी 22 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता परळी रेल्वे स्थानकावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या