23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

आज हरितालिकेचा दिवस...जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी

 आज हरितालिकेचा दिवस... जाणून घ्या पूजाविधी आणि साहित्याची A to Z यादी

       भाद्रपद शुद्ध तृतीयेचे हरितालिका हे व्रत कुमारीकांनी मनासारखा पती मिळावा यासाठी तसेच सौभाग्यवतींनी पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून आवर्जून करावे, असे म्हणतात. हरितालिका हे देवी पार्वतीचेच एक नाव त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना वर स्वरुपात प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून हे व्रत केले जाते. 

       हिंदू पंचांगानुसार, आज हरितालिकेचा  व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरितालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरितालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर  आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरितालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात.

       हरितालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.

चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी, उपलब्ध फळं, फुलं अर्पण करावी. यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.

● हरितालिका पूजेसाठी लागणारे साहित्य 

तुम्ही जर हरितालिकेची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही वस्तूंची यादी असणं गरजेचं आहे. वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य तुम्हाला लागणार आहे. 

● पूजेची मांडणी 


• पूजेची जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडावे.


• रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. 


• चौरंगावर पांढरे सूती/रेशमी वस्त्र अंथरुन महादेवीची पिंड ठेवावी अथवा शंकरपार्वतीची प्रतिमा ठेवावी.


• महादेवाच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानांवर गणेश मूर्ती/सुपारी ठेवावी. गणेशमूर्तीसमोर वाटीत गूळखोबरे ठेवा.


• गणेशमूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवा.


• मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरितालिका व्रत कथेची पोथी ठेवा आणि पूजेभोवती रांगोळी काढा.

शुभमुहूर्त 

पंचांगानुसार, पुजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी सुरु होईल आणि 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत असणार आहे. म्हणजेच पूजेसाठी 2 तास 31 मिनिटांचा मुहूर्त असणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी पूजेसाठी संध्याकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून 6 वाजून 36 मिनिटांपर्यंत असेल.

● या गोष्टी लक्षात ठेवा


• महिलांनी फराळ करू नये केवळ फलाहार करावा.


• पूजा केल्यानंतर संध्याकाळी पूजेस धूपदीप ओवाळून दूधसाखरेचा नैवेद्य दाखवावा.


• दुसऱ्या दिवशी पूजेवरील निर्माल्य काढून पिंडींना गंध, भस्म, अक्षता, हळदी-कुंकू, फुले आणि बेलपत्र अर्पण करा. 


• धूप, दीप ओवाळून दही भाताचा नैवेद्य दाखवावा. 


• गणपती, हरितालिका आणि भगवान महादेवाची क्रमाने आरती करावी. 


• आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा आणि मंत्रपुष्पांजली म्हणून फुले-बेलपत्र अर्पण करा.


• विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही-भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जित करावी.


• 

(टीप : वरील सर्व बाबी एमबी न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एमबी न्यूज कोणताही दावा करत नाही.) 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?