23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

आपल्या हक्काचा माणूस-आपल्या कामाचा माणूस : राजेश गित्ते

 आपल्या हक्काचा माणूस-आपल्या कामाचा माणूस : राजेश गित्ते



 

            परळी तालुका हा राजकिय जागृती असलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात गाजत असलेल्या अनेक नेते घडले. स्थानिक पातळीवरील राजकारणात या नेत्यांची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.अशा काही मोजक्या नेतृत्वापैकी स्वकर्तृत्वाने राजकारण, समाजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले व शेतकरी,कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन त्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरुन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावणारे व परळीच्या ग्रामीण भागाची ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणजे भाजपनेते, वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक राजेश गित्ते हे होय.राजेश गित्ते यांचा वाढदिवस त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मागील २५ वार्षा पासुन राजेश गित्ते करित असलेल्या राजकिय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात राजेश गित्ते यांनी केलेले कार्य डोळ्या समोर आल्या शिवाय राहत नाही.

         कै.प्रा.एच.पी.गित्ते यांचे शैक्षणीक क्षेत्रातील योगदान व शिस्त यामुळे गित्ते परिवार पुर्वीपासुनच परळी तालुक्यात परिचित होता.शैक्षणीक वारशाच्या या घरात जन्मलेल्या राजेश गित्ते यांच्याकडे बालपणापासुनच नेतृत्वगुण वाढत गेले.विद्यार्थीदशेत अनेक उपक्रम,आंदोलनात सहभाग नोंदवत हे युवानेतृत्व फुलत गेले.सर्वांना सोबत घेवुन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे अगदी कमी वयात त्यांनी आपल्या बेलंबा गावचे सरपंच होण्याचा मान पटकावला.इतर सरपंचाप्रमाणे केवळ कार्यकाळ पुर्ण करण्यासाठी कार्य न करता सरपंच पदावरुन गावचा कसा विकास करता येतो हे त्यांनी दाखवुन दिले.याच काळात त्यांनी सरपंच पदावरुन काम करताना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर केलेल्या कार्यामुळे राजेश गित्ते यांना आजही "सरपंच " या नावानेच ओळखले जाते.या सरपंच पदाच्या कार्यकाळापासुन त्यांच्या सामाजीक,राजकिय कार्याची घोडदौड खर्या अर्थाने सुरु झाली.राजकिय पक्षातील अनेक पदे भुषवुन आपल्या नेतृत्वाचे आदेश शिरसावंद्य मानत कार्य केले.हे कार्य करत असताना स्वाभिमान व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी कधीच तडजोड केली नाही यासाठी प्रसंगी पक्षनेतृत्वाचा रोषही पत्कारला. स्वच्छ प्रतिमा,दिलेला शब्द पाळणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलने करणे याचा त्यांना अनेकवेळा त्रास झाल्याने बॅकफुटवरही जावे लागले परंतु काळ्या मातीशी असलेली नाळ व सर्वांना सोबत घेवुन जाण्याची वृत्ती यामुळे हे नेतृत्व अशा अडथळ्यातुन बाहेर आलेले आहे.यासाठी त्यांचे बंधु धनंजय,प्रा.अजय व बलभिम यांची मोलाची साथ लाभतेय नव्हे तर राजेश गित्ते यांची खरी ताकद ही एकसंघ कुटुंब आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी तालुक्यात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यपध्तीवर कार्य करत परळीच्या ग्रामीण भागातील प्रश्न गित्ते हाताळत आहेत.राजकिय,सामाजीक क्षेत्राबरोबरच धार्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.आपले वडील कै.प्रा.एच.पी.गित्ते सर यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त आपल्या बेलंबा या गावी अखंड हरिनाम सप्ताह,भागवत कथा,किर्तन,प्रवचन अशी धार्मिक क्षेत्रातील स्थानिक किर्तनकाराबरोबर महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार,प्रवचनकारांची उपलब्धतता केली.यामध्ये त्यांनी केवळ धार्मिकच नव्हे तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा गौरव,महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणुन शिलाई मशीन वाटप,पर्यावरणाचे संतुलन रहावे यासाठी हजारो रोपटे वाटप करुन सामाजीक बांधिलकी जोपासली आहे. 

         बालपणापासुन त्यांच्या मनावर राजकिय आणि सामाजिक सेवाचा ठसा उमठत गेला. आजोबा गावचे पहिले सरपंच ,मोठे चुलते सरपंच,छोटे चुलते पोलीस पाटील,वडील पंचायत समिती सदस्य या माध्यामातून घरात राजकिय आणि सामाजिक विषयांवर होणारे संभाषण त्यांच्या बाल मनावर रजु लागले.आपण समाजाचे काही तरी देणे लागतो हे वडिलधारी मंडळीची शिकवण त्यांच्या मनात घर करून गेली.तारूण्यात पदार्पण करताच त्यांनी,गावची सरपंच पदाची निवडणूक लढवली व सर्वात तरूण सरपंच होण्याचा मान मिळवला राजकिय आणिq सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कधीही पदाचा गर्व केला नाही व पद नसल्याचे शल्य हि कार्यातुन कधी दिसले नाही.आपण प्रत्येक पदावर काम करत असताना पदाचा उपयोग सामाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या फायदा कसा मिळवून देता येईल यासाठीच केला.

                 राजकिय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना जी उद्दिष्ट डोळ्या समोर ठेवली होती समाजातील प्रत्येक घटकास त्याच्या वाईट काळात मदत केली पाहिजे या पासुन कधी मागे हटताना ते दिसले नाहीत.वेळेप्रसंगी संघर्षाची भुमिका घेऊन तळागळातील सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन अनेक प्रश्न सोडविल्याचे सर्वांनी पाहिले आहे. एखाद्याची संधी हिसकावून घेऊ शकतो पण त्याची गुणवत्ता हिसकावून घेऊ शकत नाही.राजकिय जीवनात काम करत असताना आपल्याला अनेक वेळा योग्यता असताना हि संधी मिळाली नाही पण नाउमेद न होता . समाजसेवे पासुन कधीच विचलीत ना होता सामान्य माणसांशी जो आपली नाळ जोडेली गेलेली ती राजेश गित्ते यांनी टिकवून ठेवली सर्व सामान्य माणसांशी जोडला गेलेला माणूस म्हणुन आपली ओळख आहे.

       भाजपा राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या निकटचे सहकारी म्हणून राजेश गित्ते यांची ओळख आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर हरीसुख प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य मोठ्या प्रमाणावर अविरतपणे सुरूच असते. परळी तालुक्यातील एक उमदा, आढळ नेतृत्व करणारा व अवचलितपणाने कार्यरत, जनसामान्यांना आपल्या हक्काचा माणूस वाटणारा, आपला माणूस म्हणजे राजेश गित्ते आहेत. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने उत्तरोत्तर त्यांची प्रगती होवो व सर्व आशा ,आकांक्षा पूर्ण होवो हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना.!!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?