पोस्ट्स

पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प

इमेज
  पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला - महंत लक्ष्मण महाराज मेंगडे पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प चाकरवाडी  - दि ८ - (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या पुण्यतिथी उत्सवात पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला आहे असे प्रतिपादन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, श्री ह भ प नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, श्री ह भ प राम महाराज काजळे, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, तानाजी आबा कदम, यांच्यासह हजारो भावी भक्तांचे उपस्थिती होती.. बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभुती संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी समर्पित केले.. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या  समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ...

दु:खद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  तेल,पेंडींचे व्यापारी शंकरआप्पा उदगीरकर यांचे  निधन परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)           शहरातील जुन्या पिढीतील तेल पेंडींचे व्यापारी जेष्ठ नागरिक शंकरआप्पा वैजनाथआप्पा उदगीरकर (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी रविवारी (ता.०८) दुपारी ५ च्या दरम्यान दु:खद निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी (ता.०९) सकाळी ११ वाजता विरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.           शहरातील जुन्या पिढीतील तेल पेंडींचे व्यापारी जेष्ठ नागरिक शंकरआप्पा वैजनाथआप्पा उदगीरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शंकरआप्पा उदगीरकर हे शहरातील विविध धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होत असत. श्री शनैश्वर देवस्थान कमिटीचे सचिव, विश्वस्त श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी, संस्थापक अध्यक्ष श्री कोलूघाणा तेली सहकारी संघ, माजी संचालक जवाहर एज्युकेशन सोसायटी अशा विविध संस्थेत पदाधिकारी म्हणून काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. यातच वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्यावर येथील विरशैव स्मशानभूमीत सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्का...

नात्याला काळीमा फासणारी घटना.....!

इमेज
बापानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग परळी वैद्यनाथ, प्रतिनिधी.. आपण दोघे नवरा-बायको सारखे राहू असे म्हणून जन्मदाता बापाने आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना रामनगर ता-परळी या ठिकाणी घडली असून या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील बोंदरगाव ता-सोनपेठ येथील तारडे याचा परिवार मजुरी कामानिमित्त परळी तालुक्यातील राम नगर या ठिकाणी राहत असून दि २ जून रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास आरोपी नात्याने वडील असलेल्या मनोहर निवृत्ती तारडे यांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर हात-पाय टाकून तीस लज्जा वाटेल अशा प्रकारचे वर्तन करत आपण दोघे नवरा-बायको प्रमाणे घरात राहू असे सांगू लागला. दरम्यान घडलेला प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने शुक्रवार दि ६ रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन २५१/२०२५ कलम ७४ भारतीय न्याय संहिता व ८, १२ बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक करू...

माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक

इमेज
चाकरवाडीतील शिवमहापुराण कथेला ना. पंकजा मुंडेंची भेट ; कथा श्रवणासोबत आरतीत घेतला सहभाग माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक केज ।।दिनांक ०८। विसाव्या शतकातील महान संत, ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त चाकरवाडीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा सोहळ्याला आज प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री  पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन, कथाश्रवण व शिवमहापुराण कथेच्या आरतीत  सहभाग घेतला.         ना.पंकजाताई मुंडे यांनी या दिव्य सोहळ्याला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले, तसेच पं. प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी शैलीतील शिवमहापुराण कथेतील आरतीत सहभागी होत, हजारो भाविकांबरोबर भक्तिभावाने या वातावरणात रममाण झाल्या.या वेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी पंकजाताईंचे या सोहळ्यात औपचारिक स्वागत केले. २० व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर  महाराजांच्या विचारांचे स्मरण करताना पंकजाताईंनी सांगितले की, बीड जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक आणि अ...

आर.टी. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा

इमेज
स्व.आर.टी. जिजा संयम आणि निष्ठेचे प्रतिक होते -पंकजा मुंडे गंगापूजन कार्यक्रमात ना.पंकजा मुंडे यांनी दिला आर.टी. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा परळी वैजनाथ।दिनांक०८।  माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या गोडजेवण कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात त्यांनी देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देताना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.      ना. पंकजा मुंडे म्हणाल्या, संयम, निष्ठा, प्रेम आणि जिव्हाळा म्हणजेच आर.टी. देशमुख जिजा होते.  त्यांच्या अचानक निधनाने मला मोठा धक्का बसला. ते केवळ राजकीय सहकारी नव्हते, तर माझ्यासाठी एक भावनिक आधार होते. मी अनेक वेळा अडचणीत असताना त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही चिंता दिसली नाही. अत्यंत शांत, संयमी आणि आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही, ही खूप मोठी पोकळी आहे.     यानिमित्त  हभप यशवंत महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. त्यांनी ‘कर्तव्यनिष्ठ जीवनाची प्रेरणा’ या विषयावर भावस्पर्शी कीर्तन सादर केलं. की...

नेमकं आहे कुठे नगरपरिषद प्रशासन?- अश्विन मोगरकर

इमेज
बदलत्या हवामानात डासांचा स्फोट, परळीतील नागरिक त्रस्त! नगरपरिषदेच्या दिरंगाईचा धोका -आरोग्यावर; फवारणी कुठे? परळी, ता. ८ जून २०२५ — सध्या परळी शहरात डास व माश्यांचा प्रचंड प्रादुर्भाव पाहायला मिळत असून, त्यामुळे संपूर्ण शहरभर व्हायरल इन्फेक्शनचा उद्रेक झाला आहे. शहरातील जवळपास प्रत्येक घरात एक तरी सदस्य आजारी पडलेला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला हे आजारपणाने त्रस्त झाले आहेत. परळी शहरात मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून नदी-नाले व गटारांची सफाई नियमितपणे होणे अपेक्षित असताना, नगरपरिषदेने अद्याप कुठलीच ठोस पावले उचललेली नाहीत. परिणामी अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचले असून, तिथे डासांच्या पैदाशीला पोषक वातावरण तयार झाले आहे. डासांचा त्रास मोठ्या प्रमाणावर:        गणेशपार,भीमनगर,बंगला गल्ली, अंबेवेस, मोंढा,विद्यानगर या भागांतील रहिवाशांकडून सतत तक्रारी येत असून, रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे तर दूरच, घरातही डासांपासून सुटका नाही. माश्यांमुळे अन्न दूषित होत असून, त्यामुळे पोटाचे आजार वाढले आहेत. यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रांमध्ये जावे लागत असून,...

विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.....

इमेज
अकरावी प्रवेश प्रक्रिया – नवीन सूचना जाहीर, नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! परळी वैजनाथ, ५ जून २०२५ – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची आणि दिलासादायक सूचना जाहीर करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही किंवा अर्ज अर्धवट राहिला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टपणे कळवले आहे की, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी काही अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 🔹 भाग १ लॉक करून भाग २ बाकी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी: ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून भाग १ लॉक केला आहे, पण भाग २ अद्याप भरलेला नाही किंवा लॉक केलेला नाही , अशा विद्यार्थ्यांना आता दुसरी संधी दिली जात आहे. ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून २०२५ दुपारी १२:३० या कालावधीत या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम अर्जाचा भाग २ भरून लॉक करता येणार आहे. मात्र, आधीच भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना या कालावधीत पसंतीक्रमात कोणताही बदल करता येणार नाही. 🔹 नोंदणी न केलेल्या किंवा अर्धवट अर्ज असलेल्या विद्या...