पोस्ट्स

मे २५, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख...

इमेज
  अष्टपैलू बडे नाना: एक माणुसकीचं झाड   ज्यांनी आपल्या अष्टपैलू प्रतिभेने आणि निरपेक्ष वृत्तीने अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत असे व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ(नाना)बडे. नाना हे केवळ एक नाव नाही, तर ते उत्तम शिक्षक, उपक्रमशील केंद्रप्रमुख, तरल कवी, भावस्पर्शी कथाकार, हरहुन्नरी कलावंत, एक चांगला माणूस, कुशल संघटक, पक्षीमित्र, आदर्श पिता, पती, पुत्र, सासरा, आजोबा, बंधू, सुहृदयी मित्र आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचं झाड आहेत. त्यांच्या या विविध भूमिकांमधून त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवर आपला अमिट ठसा उमटवला आहे. *प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक:* महाराष्ट्राला ठाऊक असलेलं नाव नागनाथ बडे, हे नाव महाराष्ट्राला प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक म्हणून परिचित आहे. मराठवाड्यात नवसाहित्यिकांची एक मोठी पिढी ज्यांच्यामुळे उभी राहिली, त्यात नानांचं नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखनात एक सोज्जवळ व सात्विक वृत्तीचा अभ्यासक दडलेला दिसतो. समाजातील आपला भवताल सुखी, समृद्ध आणि समाधानी रहावा यासाठी नाना नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. आपल्या स्नेह्यांना सर्व प्रकारची ...

उड्डाणपूल दुरुस्तीही अत्यंत गरजेची...!

इमेज
प्रशासकीय नियोजन पुर्ण: मध्यरात्री १२ वा.पासुन ५ जुलैपर्यंत उड्डाणपूलावरून वाहतूक राहणार बंद ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम  करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून उड्डाणपूलावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी अधिकृतपणे सांगितले असुन प्रशासकीय नियोजन पुर्ण झालेले आहे त्यामुळे ५जुलैपर्यत वाहतूक बंद ठेवून तातडीने उड्डाणपूल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.     डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केली होती.त्यानुसार काम सुरु होणार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग लातूर यांनी संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब वरील डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची तांत्रिक दुरावस्था लक्षात घेता त्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामास ...
इमेज
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती:आज राष्ट्रसेविका समितीच्या वतीने वैद्यनाथ मंदिरात सघोष मानवंदना  परळी वैजनाथ।प्रतिनिधी...       राजमाता पुण्यश्लोक साध्वी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.       अहिल्यादेवी होळकर यांची आज दि. 31मे रोजी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना राष्ट्रसेविका समिती, देवगिरी प्रांत तर्फे सघोष मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधव आणि भगिनी यांनी  सकाळी 9.30 वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिर, परळी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे पुतळ्या समोर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिरासह अन्य सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांचा जिर्णोद्धार करणाऱ्या शिवभक्त पुण्यश्लोक साध्वी अहिल्यादेवी होळकर यांची त्रीशताब्दी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहान...

इतर भेटवस्तू देण्यापेक्षा कापडी बॅगाच द्या - कार्यकर्त्यांना केले आवाहन

इमेज
चला, प्लास्टिकमुक्ती करू या ; एकल प्लास्टिक वापरबंदी व प्रदूषणाबाबत ना. पंकजा मुंडेंची पुण्यात जनजागृती मोहीम इतर भेटवस्तू देण्यापेक्षा कापडी बॅगाच द्या - कार्यकर्त्यांना केले आवाहन 'कापडी पिशवी वाटप मशीन' चेही केले उद्घाटन पुणे । दिनांक ३०। पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी राज्यात सध्या "नो प्लास्टिक" मोहीम सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात आज त्यांनी 'एकल प्लास्टिक वापरबंदी व प्रदूषणाबाबत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्या हस्ते कापडी पिशवी वाटप मशीन'चेही उद्घाटन करण्यात आले. कोणत्याही कार्यक्रम अथवा प्रसंगात मला अन्य काही गिफ्ट देण्यापेक्षा कापडी बॅगा गिफ्ट करा, म्हणजे इतरांना त्याचा उपयोग होईल असे सांगत चला प्लास्टिकमुक्ती करुयाचे आवाहन ना. पंकजा मुंडे यांनी केले.         पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 'एकल प्लास्टिक वापरबंदी व प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम' आज नूतन मराठी विद्यालय, पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेचा उद्देश रोजच्या...

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली....!

इमेज
ॲड.गोविंद फड यांना मातृशोक ;कौशल्या विनायकराव फड यांचे निधन परळी वै. / प्रतिनिधी...       धर्मापुरी ता.परळी वैजनाथ येथील सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. गोविंद विनायकराव फड यांच्या मातोश्रींचे शुक्रवारी दि. 30 मे 2025 पहाटे वृद्धापकाळाने  निधन झाले.त्यांचा अंत्यविधी  धर्मापुरी येथे झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलं, तीन मुली,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.          फड कुटुंबाचा आधारवड, मायेचा सागर, आपुलकीचे छत्र हरपल्याने भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा मायाळू व प्रेमळ स्वभाव  होता.जिव्हाळ्याने, आपुलकीने सर्वांच्या सुखदुःखामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी गोरगरिबांना  सदैव मदत केली. अनाथांची ,साधू, संतांची, वारकऱ्यांची सेवा केली. लहान मोठ्यांना आदर,  सन्मान देऊन सर्वांच्या हृदयात 'काकू' या नावाने आदराचे घर निर्माण केले. त्यांच्या निधनाने फड  कुटुंबीयांवर  कोसळलेल्या या दुःखात  एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.       राख सावडण्याचा विध...

ना. पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त

इमेज
  पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन पशुवैद्यकीय दवाखाना स्वच्छता, शेळ्या मेंढ्याचे लसीकरण, मेंढपाळांना मार्गदर्शनासह विविध उपक्रम राबवले जाणार मुंबई, दि. ३० - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून दि. ३१ मे २०२५ रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणा-या स्त्रीशक्तीचे प्रतिक आहेत. त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, न्यायप्रविष्ठ प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक असून, ते महाराष्ट्र राज्याच्या प्रगत व उन्नत वाटचालीसाठी नेहमीच पथदर्शी ठरले आहे. यास अनुसरुन “पुण्यश्लोक...
इमेज
 ◆ जनहिताच्या मागण्या पूर्ण करा- किसान सभा मागण्या पूर्ण न झाल्यास सिरसाळ्यात निदर्शने परळी / प्रतिनिधी पीक विमा, कर्ज माफी व गायरान जमिनीवर राहती घरे नावावर करणे यासह इतर मागण्याकरिता बीड जिल्हा किसान सभेकडून सोमवार दि 2 जून रोजी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनाबाबत किसान सभेने परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पिकविम्यापासून सर्व वंचित शेतकऱ्यांना ताबडतोब पिक विमा वितरित करण्यात यावा,सर्व शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण पीककर्ज माफ करावे, गायरान जमिनीतील राहती घरे नावावर करणे व कसणाऱ्या जमिनी धारकांच्या नावे करण्या बाबत व गायरान जमिनीतील सोलारसाठी राहती घरे उठवून लोकांना भूमिहीन व बेघर करण्याचा घाट घातला जात आहे तो त्वरित बंद करावा व उलटपक्षी लोकांची घरे व जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात या मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभेकडून तालुक्यातील सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत.वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला दिलासा ...
इमेज
  जगदीश कदम यांची कविता: स्वरूप आणि आस्वाद' - सामाजिक व कृषी संस्कृतीचा मौल्यवान ठेवा आपल्या लेखणीतून ग्रामीण जीवनाचे, तेथील मातीचे आणि माणसांचे वास्तव चित्रण करणारे साहित्यिक म्हणून प्रा. गणेश मोताळे सर्वपरिचित आहेत. त्यांनी केवळ शब्दांनी नव्हे, तर अनुभवांनी आणि संवेदनशीलतेने ग्रामीण साहित्यात  कवी, लेखक आणि संशोधक म्हणून मोलाची भर घातली आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दात ग्रामीण संस्कृती आणि मूल्यांचे जतन करण्याची त्यांची तळमळ दिसून येते.त्यांचे कार्य हे केवळ साहित्य निर्मितीपुरते मर्यादित नसून, ते ग्रामीण भागातील नवोदितांना प्रेरणा देणारे आणि त्यांना योग्य दिशा देणारे आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख तथा प्रसिद्ध कवी-गीतकार साहित्यिक प्रा.डॉ.दासू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गणेश मोताळे यांनी एम. फील. पदवी संपादित केली आहे. त्याच शोध प्रबंधिकेचे हे ग्रंथरूप होय. प्रा.गणेश मोताळे यांनी साकारलेलं  'जगदीश कदम यांची कविता: स्वरूप आणि आस्वाद' हे पुस्तक कवी जगदीश कदम यांच्या समग्र कवितेचा अभ्यासपूर्ण परिचय क...
इमेज
  साधा दिसणारा असाधारण माणूस : उपप्राचार्य प्रा.एन.जी. गायकवाड सर छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रा. नंदकिशोर गायकवाड सर, हे दि. ३१ मे २०२५ रोजी आपल्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या गौरवशाली वाटचालीचा समारोप म्हणून, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्व सेवागौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा केवळ एक औपचारिक समारंभ नव्हता, तर ते त्यांच्या ऋषितुल्य कार्याला, त्यांच्या त्याग आणि समर्पणाला वंदन करणारे  एक हृद्य आणि प्रेरणादायी संमेलन होते. याप्रसंगी विद्यार्थी, पालक तसेच समाजातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि शासनाच्या प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने गायकवाड सरांच्या जनमानसातील अढळ स्थानाची प्रचिती दिली. एक संवेदनशील माणूस म्हणून, एक समर्पित शिक्षक म्हणून, एक निस्सीम मित्र म्हणून आणि एक सक्षम प्रशासक म्हणून त्यांच्या कार्याचा झालेला गुणगौरव उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला. आजच्या धावपळीच्य...
इमेज
  गांजाची विक्री करणारा पकडला: ५५ हजारांचा गांजा हस्तगत सिरसाळा,प्रतिनिधी...       अवैधरित्या अंमली पदार्थ असलेला गांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत सिरसाळा पोलीसांनी ५५ हजारांचा गांजा हस्तगत  केला आहे.    याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, आरोपी अजहर सादेक खान पठाण, वय 28 वर्ष रा. जामा मज्जीद जवळ, रोहीला गल्ली सिरसाळा ता. परळी जि.बीड याच्या राहत्या घरातून पोलीसांनी गांजा पकडला आहे. पोलीसांनी छापा मारला असता त्याच्या ताब्यात प्लॉस्टीकच्या पिशवीत अंमली पदार्थ गांजा एकुन 5.542 किलो वजनाचा किमती 55420 रु किंमतीचा बेकायदेशिर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कबजात बाळगुन अवैध विक्री करताना मिळुन आला म्हणुन पो.स्टे.सिरसाळा येथे गुरन 146/2025 कलम 8 (B), 20(B) NDPS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरकनाथ बाबासाहेब दहीफळे हे करीत आहेत.

अंबाजोगाई येथील बाराखांबी सह खोलेश्वर मंदिरास भरघोस निधी

इमेज
धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश; धर्मापुरी किल्ल्ला संवर्धनासाठी ३ कोटी ३९ लाख अंबाजोगाई येथील बाराखांबी सह खोलेश्वर मंदिरास भरघोस निधी मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून आज पर्यटन विभागाकडून परळी मतदारसंघातील प्रसिद्ध धर्मापुरी किल्ल्याच्या संवर्धन व जतन कामासाठी तीन कोटी 39 लाख रुपयांच्या निधी खर्चनास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.  धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने मागणी केली होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी धर्मपुरी किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी एकूण नऊ कोटी रुपयांची मागणी केली होती त्यापैकी साधारण तीन कोटी 39 लाख रुपयांच्या निधी खर्च शासन निर्णयाद्वारे आज मान्यता देण्यात आले आहे.  त्याचबरोबर अंबाजोगाई शहरालगत असलेल्या पुरातत्व विभागांनी विशेष भाग म्हणून घोषित केलेल्या सकलेश्वर मंदिर अर्थात बाराखांबी नावाने प्रसिद्ध असलेल्या स्थळाच्या विकासासाठी सुमारे 35 लाख रुपये, तसेच सुप्रसिद्ध खोलेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी सुमारे 45 लाख रुपये निधी करतात शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रम

इमेज
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप -पंकजा मुंडे  ना. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत जबलपूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रम बेडाघाटावरील नर्मदा नदीच्या मध्यभागी केली शिवलिंगाची पूजा जबलपूर, (म.प्र.) ।दिनांक २९।  जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आणि संघर्ष आला तरीही त्यावर मात करून जनहिताची असंख्य कार्य करणारे महापुरुष हे आपले आदर्श आहेत. धर्मकार्य, संस्कृतीसंरक्षण, निकोप राजसत्ता आणि शौर्य गाजवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत .आपल्या राजकीय वाटचालीतही त्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत. धैर्य, शौर्य व अऔदार्य याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी मध्यप्रदेश येथे आयोजित पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती समारोहामध्ये केले.        लोकमाता पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर  यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्यप्रदेशातील राणीतल (जबलपूर) येथी...

खोटे आरोप, मीडिया ट्रायल, अडचणीत आणण्याचे षडयंत्र व प्रचंड मनस्ताप तरीही राखला संयम!

इमेज
धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मागील साधारण सहा महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती विणले गेलेले खोटे आरोपांचे जाळे, मीडिया ट्रायल यांसह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मधल्या काळात धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पालसी या दुर्मिळ आजाराने ग्रासले. विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही. चारही बाजूने धनंजय मुंडे यांना खोटे आरोप, मीडिया ट्रायल करून कात्रीत पकडले असताना देखील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन धनंजय मुंडे हे ...
इमेज
  वीज मंडळाने आपला कारभार सुधारून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार- डॉ. राजेश इंगोले  अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)     सध्या अंबाजोगाई शहरात वीज विभागाच्या गलथा न कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला, व्यापारी वर्गाला तसेच वैद्यकीय आस्थापनांना विनाकारण नाहक त्रास होत आहे. वीज विभागाच्या अनियमित सेवेमुळे लाईट कधी येईल आणि कधी जाईल याचे कसलेही अंदाज कुणालाच लावता येत नाहीत. त्यामुळे अंबाजोगाई शहर येथील नागरिक ,व्यापारी वर्ग ,डॉक्टर वर्ग त्रस्त झाल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे.     वीज विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे सोशल मीडियावर अनेकजण ही नाराजी व्यक्त करून दाखवत आहेत. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी यामुळे सर्वजण शांत आहे मात्र याप्रकरणी अंबाजोगाईचे माजी शिक्षण सभापती डॉ राजेश इंगोले यांनी लवकरच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या वतीने जाब विचारण्यात येईल असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.          याबाबत पुढे बोलताना डॉ इंगोले यांनी अंबाजोगाई हे एक शैक्षणिक शाळा कॉलेजेस, पतसंस्था, व्यापारी...
इमेज
अंबाजोगाईत ब्राह्मण सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात साजरा अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-      अंबाजोगाई येथील ब्राह्मण सभेच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा गुरूवार २९ मे रोजी शहराच्या देशपांडे गल्लीतील देवघर परिसरात मोठ्या उत्साहात  संपन्न झाला या सोहळ्यात १६ बटुंचे उपनयन संस्कार करण्यात आले सातत्याने गेल्या ४८ वर्षापासून उपनयन संस्कार सोहळ्याचा उपक्रम आर्थिक दुर्बल घटकांसाठी सातत्याने राबविला जात असल्याने या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होते.        या सोहळ्यासाठी माजी आ.पृथ्वीराज साठे,कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया,बबन लोमटे, मनोज लखेरा,प्रसाद चिक्षे,ऍड.मकरंद पत्की, महेश लोमटे,दिनकर जोशी,अतूल देशपांडे, गणेश पिंगळे, पत्रकार प्रशांत बर्दापुरकर,राहूल देशपांडे,अविनाश मुंडेगांवकर,दिलिप सांगळे,अनिरुद्ध चौसाळकर, प्रभाकर सेलमोकर,पद्माकर सेलमोकर,सागर दिक्षित,संजय लोणीकर,मुकूंद घाटे,आनंद गोस्वामी, सुधाकर विडेकर, ऍड. कल्याणी विर्धे,अनुपमा गोस्वामी, आरती सोनेसांगवीकर आदीसह शहरातील महिला, नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित...

नागरिकांच्या स्वाक्षरीने नगरपरिषदेला निवेदन सादर!

इमेज
पुरातन वारसा जपा: पडझड होत असलेल्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टॉवरचे जतन करावे - अश्विन मोगरकर परळी वैजनाथ । प्रतिनिधी....         परळी शहराची ओळख असलेले ऐतिहासिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरची देखभाली अभावी पडझड होत असून परळी नगरपरिषदेने या ऐतिहासिक वास्तूची पडझड रोखून मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता ही वास्तू जतन करावी अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी परळी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. परळी वैजनाथ शहरात मध्यवर्ती ठिकाणी किमान 50 वर्षांपूर्वी राणी लक्ष्मीबाई टॉवर उभे करण्यात आले होते. या वास्तुशी परळीतील संवेदनशील नागरिकांचे भावनिक नाते जुळलेले आहे. या राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या देखभाली अभावी पडझड होत आहे. पाच दशकांहुन अधिक वर्षांपूर्वी उभे केलेले टॉवर ही परळीची ओळख आहे. प्रत्येक परळीकर नागरिकाला या वास्तुविषयी आत्मीयता आहे. परळीचा हा वारसा टिकावा व जतन करण्यात यावा यासाठी नगरपरिषदेने त्वरित पाऊले उचलली पाहिजेत. जगात अनेक अश्या जुन्या वास्तुंना हेतुपुरस्सर जपले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या मूळ स्वरूपात ब...

आपघातात एकाचा मृत्यू...

इमेज
बस स्थानकात जातांना दोन्ही चाकाच्या मध्ये येऊन एकाचा मृत्यू अंबाजोगाई (प्रतिनिधी).....      अंबाजोगाई बस स्थानकामध्ये बस जात असताना आज गुरुवार दि २९ रोजी सकाळी अंकुश मोरे रा धानोरा बुद्रुक ,या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.            आज सकाळी लातूर हुन आलेली बस (क्र MH१४ MH१७०१) ही अंबाजोगाई बस स्थानकात जात असताना धानोरा येथील अंकुश मोरे हा ईसम बसच्या मागील बाजूस पडून दोन्ही टायरच्या मध्ये आल्याने त्याच्या पायावरून बसचे मागील चाक गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथीलच स्वा रा ती येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.ही घटना घडल्यानंतर बसचा चालक स्वतः अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला .            लातूर येथे मुक्कामी असलेली श्रीगोंदा डेपोची लातूर पुणे ही बस अंबाजोगाई बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या जवळच ही घटना घडल्याचे या बसच्या चालकाने पोलीसाना  सांगितले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोळवे  हे करत आहेत.              ...
इमेज
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी-       परळी वैद्यनाथ येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.    परळी येथे सावरकर प्रेमी तर्फे आज दि28 मे रोजी हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 142 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विश्वंभर देशमुख यांनी सावरकरांचा संघर्षदायी जीवन प्रवास व त्यांचे कार्बयद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी अॅड.अरुण पाठक, योगेश पांडकर, दीपक जोशी जयराम गोंडे, दिनेश लोंढे, विश्वंभर देशमुख, ऋषिकेश नागापुरे इत्यादी उपस्थित होते. योगेश पांडकर यांनी यावेळी आभार व्यक्त केले.

स्वागताला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.....!

इमेज
राष्ट्रसेविका समितीचे परळी वैजनाथ शहरातून सकाळी पथसंचलन ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      राष्ट्रसेविका समितीचे परळी वैजनाथ शहरातून उद्या दि.२९ रोजी  सकाळी पथसंचलन होणार आहे.या संचालनासाठी सर्व धर्मबांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन राष्ट्रसेविका समितीने केले आहे.     राष्ट्रसेविका समितीच्या वतीने दि.29 मे रोजी सकाळी 9 वा.पथसंचलन होणार आहे.या पथसंचलनाची सुरुवात अक्षदा मंगल कार्यालय येथून होणार असुन छत्रपती शिवाजी महाराज चौक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक- अग्रवाल लॉज- सरदार सायकल मार्ट -भवानीनगर - माता रमाबाई आंबेडकर चौक -सुभाष चौक- रोडे चौक- राणी लक्ष्मीबाई टॉवर- जिजामाता उद्यान समोरून - संत जगमित्र नागा मंदिर येथे समारोप होईल.अनेक ठिकाणी या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.या संचालनासाठी सर्व धर्मबांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन राष्ट्रसेविका समितीने केले आहे.

उड्डाणपूलाचे प्रस्तावित दुरुस्ती काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे!

इमेज
निदान आषाढी वारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंत तरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये-गोपाळ आंधळे परळी वै.(प्रतिनीधी)वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी आध्यात्मिक पर्वणी म्हणून ओळख असलेली पंढरपूरच्या आषाढी वारीला सुरूवात होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रात विदर्भ आणी इतर भागातून शेकडो दिंड्या मुक्कामी शहरात दाखल होत असतात.त्या सर्व वारकर्यांची गैरसोय होवू नये. या साठी शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाचे प्रस्तावित काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे. निदान आषाढीवारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंततरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये अशी मागणी न.प.चे माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.        वारकरी संप्रदायाचे व सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत.पंढरीचा पांडुरंग परमात्मा श्रीविठ्ठलाचा आषाढी वारीचा सोहळा अगदी कांही दिवसांनी सुरू होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्यामुळे खास करून विदर्भातील शेकडो दिंड्या या परळी शहरात मुक्कामी असतात. परंतु प्रस्तावित शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पुल वाहत...

शासकीय इतमामात आर.टी.देशमुखांना अखेरचा निरोप !

इमेज
मोह्याचे निर्मोही, सोज्वळ- सालस, स्नेहमयी 'जिजा' अनंतात विलीन ! हजारो स्नेही जणांनी साश्रुपूर्ण नयनांनी दिला अखेरचा निरोप! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         भारतीय जनता पक्षाचे माजलगाव मतदारसंघातील माजी आमदार व दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटवर्तीय आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे आज दि. 28 रोजी हजारो स्नेहीजणांच्या उपस्थितीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय सामाजिक व सर्व स्तरातील स्नेहीजनांच्या साश्रुपूर्ण नयनांनी लाडक्या जिजांना अखेरचा निरोप देण्यात आला.              दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटचे सहकारी राहिलेल्या माजलगाव चे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे दि.26 रोजी औसा रस्त्यावर अपघाती निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी आज (दि.२८) परळी येथील तहसील कार्यालया पाठीमागील त्यांच्या निवासस्थाना जवळील मैदानात करण्यात आला. सकाळीच दिवंगत आर.टी. देशमुख यांचे पार्थिव लातूरहून परळी येथे आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच अंतिम दर्शन ...

भावूक होत पंकजा मुंडेंनी वाहिली श्रद्धांजली!

इमेज
  जिजांनी सदैव लेकीसारखी माया आणि 'ताईसाहेब" म्हणत नेता म्हणून सन्मान केला: देशमुख परिवाराला कधीही अंतर देणार नाही - ना.पंकजा मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        स्व. आर.टी. देशमुख जिजा यांच्यासारखा जिवाभावाचा देवमाणूस आता पुन्हा होणे नाही. माझ्या संपूर्ण जीवनात एक परिवारातील सदस्य म्हणून त्यांनी सदैव माझ्यावर लेकीसारखी माया केली आणि मी नेतृत्व करताना 'ताईसाहेब' म्हणत नेता म्हणून माझा सन्मान केला. अशा सालस, सोज्वळ व निष्ठावान व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने खूप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या माघारी देशमुख परिवाराला मी कधीही अंतर देणार नाही अशा शब्दात श्रद्धांजली वाहून ना पंकजाताई मुंडे यांनी स्व.आर.टी. देशमुख यांना अखेरचा निरोप दिला.      माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या दुर्दैवी अपघाती निधन झाले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम व दौरै रद्द करून त्या या कुटुंबाला आधार देत तीन दिवस परळीतच थांबल्या. स्व.आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले...
इमेज
  वैद्यनाथ देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण ; पोलिसात तक्रार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-        परळी शहरातील चादापूर रोड भागातील वैद्यनाथ देवस्थानाच्या जागेवर काही जनाकडून अतिक्रमण करत असल्याची तक्रार आकाश पुजारी यांनी केली आहे. याबाबत कडक कारवाही करावी अशी मागणी होत आहे.           याबाबत दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, सर्व्हे नंबर ३२२/५ लागून असलेल्या वैद्यनाथ देवस्थान जमीनिवर  कलम १४५ सीआरपीसी  लागू असतानाही काही जन अतिक्रमण करत आहेत. वैद्यनाथ देवस्थानची इनामी जमीन आहे. सदर प्रकरणात तहसीलदार यांनी कलम १४५ सीआरपीसी कलम नुसार वादग्रस्त जमीनवर दोन्ही पार्टीला पायबद घालण्यात आला आहे. पुढील आदेश येई पर्यंत कोणीही हक्क गाजवू नये असे सांगण्यात आले असताना ही शेख खालील पाशा ऍटोवाला व इतर पाच ते सहा जण यांनी जीसीबीच्या सहय्याने  वादग्रस्त जागेवर अतिक्रमण करून कलम १४५ सीआरपीसी ची उल्लंघन केले आहे. सदरील जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी यासाठी परळी शहर पोलिस  ठाण्यात आकाश पुजारी यांनी तक्रार देऊन मागणी केली आहे.

व्यापारी महासंघाचा निर्णय

इमेज
आर.टी.देशमुखांना श्रद्धांजली: अंत्यसंस्कार होईपर्यंतच व्यापारपेठ ठेवणार बंद व्यापारी महासंघाचा निर्णय परळी / प्रतिनिधी – माजी आमदार आर. टी. देशमुख उर्फ जिजा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने परळीकरांनी एक जनसामान्यांचा आधारवड गमावला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून विविध स्तरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.       या पार्श्वभूमीवर बुधवार, दिनांक 28 मे रोजी सकाळी 11 वाजता अंत्यविधी पार पडणार आहे. या वेळी शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन विविध व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, मनमिळावू स्वभावाचा आणि सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाचा आदर म्हणून आज दुपारी 1 वाजेपर्यंत परळी शहरातील संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.शहरातील सर्व व्यापार्‍यांनी या निर्णयाला पाठिंबा देत देशमुख यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन व्यापारी संघटनांकडून करण्यात आले आहे.
इमेज
 ना.पंकजा मुंडे यांनी केले बनसोडे, स्वामी आणि मुंडे कुटुंबियांचं सांत्वन परळी वैजनाथ। दिनांक २७। परळी तालुक्यातील नागापूर येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. गणपत बनसोडे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले होते, आज परळी दौर्‍यात पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन करत धीर दिला. एक मनमिळावू व धडाडीचा कार्यकर्ता काळाने हिरावून घेतला, त्यांची उणीव भासत राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविलेले गणपत बनसोडे हे भाजपचे निष्ठावंत व सच्चे कार्यकर्ते होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी जवाबदारी निभावली होती. एक मनमिळावू, अनुभवी व सर्वांच्या मदतीला धावून येणारे अशी त्यांची ख्याती होती. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असा त्यांचा परिचय सर्वज्ञात होता. एक मनमिळावू व धडाडीचा कार्यकर्ता काळाने हिरावून घेतला, त्यांची उणीव भासत राहील अशी भावना पंकजाताई यांनी व्यक्त केली. तसेच नागापूर येथील शिवदास स्वामी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई स्वामी यांचे काही दिवसांपूर्वी वृद...