इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक

चाकरवाडीतील शिवमहापुराण कथेला ना. पंकजा मुंडेंची भेट ; कथा श्रवणासोबत आरतीत घेतला सहभाग


माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक


केज ।।दिनांक ०८।

विसाव्या शतकातील महान संत, ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त चाकरवाडीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा सोहळ्याला आज प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री  पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन, कथाश्रवण व शिवमहापुराण कथेच्या आरतीत  सहभाग घेतला.

        ना.पंकजाताई मुंडे यांनी या दिव्य सोहळ्याला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले, तसेच पं. प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी शैलीतील शिवमहापुराण कथेतील आरतीत सहभागी होत, हजारो भाविकांबरोबर भक्तिभावाने या वातावरणात रममाण झाल्या.या वेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी पंकजाताईंचे या सोहळ्यात औपचारिक स्वागत केले. २० व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर  महाराजांच्या विचारांचे स्मरण करताना पंकजाताईंनी सांगितले की, बीड जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक आणि अध्यात्मिक परिवर्तनाचा जो मार्ग दाखवला, तो आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांच्या कार्यामुळे समाजाला दिशा मिळाली आणि एकात्मतेचा संदेश पसरला.ही श्रद्धा आणि भक्ती हीच आपल्या संतपरंपरेची खरी ताकद आहे. अशा सोहळ्यांमधूनच समाजाला सकारात्मकता आणि एकोप्याचा संदेश मिळतो असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

      शिवमहापुराण कथेचे कथाव्यास पं. प्रदीप मिश्रा यांचे दर्शन घेऊन पंकजाताई मुंडे यांनी आरतीमध्ये सहभाग घेतला.या कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थित होते.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या