इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक

चाकरवाडीतील शिवमहापुराण कथेला ना. पंकजा मुंडेंची भेट ; कथा श्रवणासोबत आरतीत घेतला सहभाग


माऊली महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक


केज ।।दिनांक ०८।

विसाव्या शतकातील महान संत, ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त चाकरवाडीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा सोहळ्याला आज प्रारंभ झाला. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री  पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन, कथाश्रवण व शिवमहापुराण कथेच्या आरतीत  सहभाग घेतला.

        ना.पंकजाताई मुंडे यांनी या दिव्य सोहळ्याला भेट देऊन महाराजांचे दर्शन घेतले, तसेच पं. प्रदीप मिश्रा यांच्या प्रभावी शैलीतील शिवमहापुराण कथेतील आरतीत सहभागी होत, हजारो भाविकांबरोबर भक्तिभावाने या वातावरणात रममाण झाल्या.या वेळी महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी पंकजाताईंचे या सोहळ्यात औपचारिक स्वागत केले. २० व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर  महाराजांच्या विचारांचे स्मरण करताना पंकजाताईंनी सांगितले की, बीड जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक आणि अध्यात्मिक परिवर्तनाचा जो मार्ग दाखवला, तो आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांच्या कार्यामुळे समाजाला दिशा मिळाली आणि एकात्मतेचा संदेश पसरला.ही श्रद्धा आणि भक्ती हीच आपल्या संतपरंपरेची खरी ताकद आहे. अशा सोहळ्यांमधूनच समाजाला सकारात्मकता आणि एकोप्याचा संदेश मिळतो असे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

      शिवमहापुराण कथेचे कथाव्यास पं. प्रदीप मिश्रा यांचे दर्शन घेऊन पंकजाताई मुंडे यांनी आरतीमध्ये सहभाग घेतला.या कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थित होते.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....