पोस्ट्स

एप्रिल ६, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

इमेज
32 लाख 51 हजार रु. किंमतीचे तेल भरलेले टँकर घेऊन निघाला , रस्त्यात आपघाताचा बनाव केला : २०.४१० टन तेलाचा केला आपहार ! परळी ग्रामीण पोलीसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      लातूरहून 32 लाख 51 हजार रु.किंमतीचे तेल भरलेले टँकर घेऊन निघाला, परळी जवळील धर्मापुरी ते गुट्टेवाडी रस्त्यात आपघात झाल्याचे सांगितले. मात्र तसे काहीच घडले नाही तर सोयाबीन रिफाईन्ड तेलाची ने-आण करणाऱ्या एका टँकरचा आपघात झाला व तेल रस्त्यावर सांडून गेले असा बनाव या टँकरच्या चालकाने केला व स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी २४.९३० टन सोयाबीन रिफाईन्ड तेलापैकी तब्बल २०.४१० टन तेल विक्री करत आपहार केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, संजय ज्ञानोबाराव फुके वय-५२ वर्षे व्यवसाय-व्यापार रा घर नं ७९ गजानन कृपा निवास पंचमुखी हनुमान मंदिराच्या पुढे, गणेश नगर नांदेड जि नांदेड या व्यापाऱ्याकडील तेलाची ने-आण करणाऱ्या  टँकरवर राजेंद्र शिवाजी म...
इमेज
क्रीडा भारती अंबाजोगाई चा स्थापना दिवस उत्साहात साजरा अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- क्रीडा भारती अंबाजोगाईच्या वतीने श्री हनुमान जयंती तथा क्रीडा भारती स्थापना दिवस उत्साहात संपन्न झाला. श्रीराम नगर अंबाजोगाई येथील केशरीनंदन हनुमान मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा भारतीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने बलोपासनेची देवता श्री महाबली हनुमान जन्मदिनाच्या निमित्ताने पुजा व आरती करण्यात आली. यावेळी क्रीडा भारती चे योग शिक्षक उत्रेश्वर पांचाळ गुरुजी यांनी व्हिएतनाम येथील हनोई येथे वर्ल्ड योगा स्पोर्ट्स फेडरेशन तर्फे नुकत्याच संपन्न झालेल्या वर्ल्ड आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवून सिल्व्हर मेडल प्राप्त केल्याबद्दल क्रीडा भारती अंबाजोगाई च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अंबाजोगाई तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक रमणजी सोनवळकर, पत्रकार ज्ञानेश मातेकर, सतिश बलुतकर,सह क्रीडा भारती चे. सदस्य तथा क्रीडाप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
इमेज
परळीत 'जगमित्र' कार्यालयात  तोबा गर्दी; धनंजय मुंडेंच्या जनता दरबारात जागेवरच अनेकांचे प्रश्न मार्गी ! परळी वैजनाथ- प्रतिनिधी...           राज्याचे माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी परळीत जगमित्र कार्यालयात प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र आज बघायला मिळाले. धनंजय मुंडेंच्या जनता दरबारात नागरिकांचे जागेवर अनेक प्रश्न मार्गी लागले.          माजीमंत्री आ. धनंजय मुंडे हे नागरिकांच्या तसेच मतदारसंघातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या समस्या, मागण्या व कामे समजून घेत ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. या दृष्टीने नेहमी जनता दरबारात प्रचंड गर्दी असते.या जनता दरबाराच्या माध्यमातून अनेकांची कामे जागच्या जागी मार्गी लागतात, असा आजवरचा अनुभव आहे.याच अनुषंगाने आज धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून धनंजय मुंडे हे जगमित्र कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठीसाठी थांबले होते एक मित्र कार्यालयात त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर अनेक प्रश्न जागची जागी मार...
इमेज
  परळीत वाहनातील बॅटऱ्या चोरणारांना पकडलं; मुद्देमालही केला हस्तगत !  परळी वैजनाथ,प्रतिनिधी...       शहरात ठीक ठिकाणी लावलेल्या मोठ्या वाहनांमधील बॅटऱ्या काढून चोरून घेऊन जाणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली होती. या चोरांपर्यत पोहोचण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. मोठ्या ट्रक मधील बॅटऱ्या काढून चोरून घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना शहर पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून तीन ट्रक मधील 63 हजार रुपये किंमतीच्या सहा बॅटऱ्या हस्तगतही करण्यात आल्या आहेत.         याबाबत परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील पार्क केलेल्या ट्रक व अन्य मोठ्या वाहनातील बॅटऱ्या चोरीचे प्रकार समोर येत होते. या संदर्भाने तीन ट्रक मालकांनी अंबाजोगाई रस्त्यावर लावलेल्या ट्रक मधील बॅटऱ्या काढून चोरीस गेल्या बाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या अनुषंगाने तातडीने तपास करत बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा शोध पोलिसांनी घेतला. या तपासात शहर पोलिसांनी रेहान शेख मुस्तफा व अन्वर खान जलाल खान पठाण दोघेही राहणार गौतम...
इमेज
  परळीतील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मराठे व ॲड. नागरगोजे यांचे धनंजय मुंडे यांनी केले अभिष्टचिंतन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी येथील जेष्ठ विधीज्ञ एडवोकेट मराठे व एडवोकेट नागरगोजे यांच्या जन्मदिनानिमित्त राज्याचे माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले         परळी वकिल संघाचे जेष्ठ सदस्य ॲड. मराठे  आणि ॲड. नागरगोजे या दोघांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे  यांनी जगमित्र कार्यालयात सत्कार करून त्यांना दीर्घायुषयाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी वकिल संघाचे सदस्य उपस्थित होते.
इमेज
परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासा साठी २५.७ कोटी रुपये निधी मंजूर परळी वैजनाथ,प्रतिनिधी...      बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५.७ कोटी रुपये निधी मंजूर  करण्यात आले आहेत.प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधा सह या भागातील दळणवळण सोयीस्कर व गतिमान होण्यास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.           राज्यातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.त्याअंतर्गत परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकाचाही समावेश करण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकास कामासाठी २५.७ कोटी रुपये निधी आता  मंजूर करण्यात आलेला आहे.रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे आ.धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांच्...
इमेज
  बाजीप्रभू नगर नगर, पंचवटी नगर येथील हनुमान मंदिरात उत्साहात हनुमान जन्मोत्सव परळी :शहरातील बाजीप्रभू नगर नगर, पंचवटी नगर येथील हनुमान मंदिरात सकाळी सहाच्या सुमारास हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला .         यानिमित्त माऊली भजनी मंडळाच्या महिलांनी भव्य ग्रंथ दिंडी , शोभायात्रा काढली या शोभा यात्रेमध्ये कलशधारी महिला व भगवे   पताका  हातात घेऊन महिला मुले सहभागी झाले होते. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तसेच श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त ज्ञानेश्वरी पारायण व काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले. सहा एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी पारायनास सुरुवात झाली. 13 एप्रिल रोजी सांगता होणार आहे .रविवारी 13 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ह भ प जनाबाई कोकाटे संगमकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .येथील श्री हनुमान मंदिर बाजीप्रभू नगर मध्ये होणाऱ्या  या काल्याच्या कीर्तनास उपस्थित राहावे असे आवाहन माऊली भजनी मंडळ व समस्त भाविकांनी केले आहे.      
इमेज
बीड जिल्ह्यातील नद्यांचे व पारंपारिक जलस्रोत यांचे पुनर्जीवन करून जिल्हा दुष्काळ मुक्त करावा - वनश्री मेजर एस पी कुलकर्णी   अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) - पंकजाताई च्या रुपाने बीड जिल्ह्यात पर्यावरण खाते मिळाले. त्यांच्याच काळात जलस्वराज्य योजना प्रभावीपणे राबवून शेतातील पाणी शेतातच रुजवण्याचा प्रयत्न झाला. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी त्यांच्या पुढाकारांनी जिल्ह्यात जेवढ्या नद्या ह्या मृतावस्थेत आहेत त्यांचे पुनर्जीवन करावे.  व प्रत्येक गावात पूर्वीच्या काळी गावातील पावसाचे पाणी गावातच रोखण्यात जायचे. प्रामुख्याने आड, विहिरी, बारव हे जलसाठे होते. या पाण्याने गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटायचा व ते पाणी काढण्यासाठी श्रम लागायचे तेव्हा पाण्याची महत्त्व लोकांना होते.  लोक पाणी जपून वापरत होते. परंतु कालांतराने आड, विहिरी, बारव याची जागा प्लास्टिकने व्यापून टाकली व लोकांनीही ते बुजवून टाकले. या परिसरात अतिक्रमण, सिमेंटची जंगले उभी राहिली ज्यामुळे पावसाचे पाणी मुरण्यास अडचण येते. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त झाला. आज टॅंकरने पाण्याचा पुरवठा गा...

जांबुवंतांचे महाराष्ट्रातील एकमेव स्थान !

इमेज
जालना : जामखेडसह तेरा गावात हनुमानाचे मंदिरच नाही ! जांबुवंतांचे महाराष्ट्रातील एकमेव स्थान, पर्यटनदृष्ट्या उपेक्षितच छत्रपती संभाजीनगर : हनुमान जयंती शनिवारी सर्वत्र साजरी केली जात असताना जालना जिल्ह्यात असणारा जामखेड परिसर मात्र त्यास अपवाद ठरतो. जामखेड (ता.अंबड) परिसरातील तेरा गावात हनुमानाचे मंदिरच नाही. जामखेड हे जांबुवंतांचे स्थान असल्यामुळे या परिसरातील लोक जांबुवंताला दैवत मानतात. या भागात पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज आहे. छत्रपती संभाजीनगर अथवा जालन्यापासून साधारण एक ते  दीड तासाच्या अंतरावर हे स्थान आहे.  धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अंबडकडे जाणारा रस्ता आहे, तेथे जामखेड गाव वसलेले आहे.  जुन्या काळात दंडकारण्यात या भागाचा समावेश होता. डोंगरदर्‍यात असलेल्या या गावापासून दोन किमी अंतरावर असणार्‍या गुहेत जांबुवंत, नळ, नीळ यांचे मंदिर आहे. याशिवाय गणपती, महादेवाची पिंड आहे. रामायण, महाभारतकालीन संदर्भ या मंदिराला आहेत. जांबुवंतगढी असे नावाने हे स्थान ओळखले जाते. एकांताची इच्छा  रामायणात सीतेला शोधण्यासाठी प्रभू रामाच्या फौजेत जांबुवंत सल्‍लागार म्...

महात्मा फुले जयंती साजरी

इमेज
  महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणाचे जनक होते-प्रा.अतुल दुबे यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी परळी वैजनाथ/प्रतिनिधी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मांना शिक्षणाचे महत्व पटवून  देऊन त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुले केली. येणार्‍या काळात विद्यार्थ्यांनी व युवकांनी  या महापुरुषाचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक चळवळ उभा करणे गरजेचे असून हेच महात्मा ज्योतिबा फुले यांना खर्‍या अर्थाने अभिवादन ठरणार असे वक्तव्य यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  जयंतीनिमित्त अभिवादन करताना व्यक्त केले. नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा क्रांतीसुर्य महात्मा ज्येातीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र...

जबरी चोरी...पोलीसांना तपासाचे आव्हान !

इमेज
वयोवृद्ध जोडप्याचा बीड-परळी- सोनपेठ एसटीने प्रवास: बोरमाळ,गंठण,मोहनमाळ व नेकलेस असे सुमारे ९ लाखांचे सोन्याचे दागिने पळवले ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       बीडहून परळी आणि परळीहून सोनपेठ येथे एसटीने प्रवास करणाऱ्या सोनपेठ येथील रहिवासी वयोवृद्ध जोडप्याला मोठ्या बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागले असुन आयुष्यभर पै पै जमा करून कमविलेले सोन्याचे तब्बल ९लाखाचे दागिने चोरीला गेल्याची घटना दि.१० रोजी घडली आहे.याप्रकरणी आता परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला माधुरी सुर्यकांत परळकर वय ६० वर्षे रा.महाजनगल्ली सोनपेठ यांनी संपूर्ण हकिकत नोंदवली आहे.त्यानुसार फिर्यादी महिला व त्यांचे पती हे छ. संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते. दि. 10/4/2025 रोजी सकाळी 11.00 वा.  संभाजीनगर येथून एस.टी. बसने बीडला आले. बीड येथून  सोनपेठला जाण्यासाठी बीड- परळी बसने दुपारी 12.000 वा. बीड येथून निघून परळीला दुपारी सव्वा दोन ते आडीच वा. सुमारास...
इमेज
  वसंतदादा पाटील महाविद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी अमोल जोशी / पाटोदा -  येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. त्यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अतिथी प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर हजारे, डॉ. अनिल तळेकर, डॉ. सखाराम वांढरे, उपप्राचार्य प्रो. सतिश माउलगे, उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सोमनाथ लांडगे, प्रा. मनिषा गाढवे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. कुशाबा साळुंके, प्रो. प्रशांत पाटील, डॉ. पद्माकर ससाणे उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील गरीब व होतकरू अशा पदवीधर विद्यार्थिनीच्या विवाहासाठी कर्मचारी कल्याण समितीच्या निधीतून  २५००/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे...
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी  परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)   येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .    या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका छाया देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महात्मा फुलें यांच्या प्रतिमेला संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, प्राचार्या  डॉ .विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा . फुटके यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण विषयक व सामाजिक कार्याचा विस्तृत आढावा घेतला. कार्यक्रमास प्रा डॉ अरुण चव्हाण, डॉ राजश्री कल्याणकर,प्रा डॉ विलास देशपांडे,प्रा डॉ राजकुमार यल्लावाड,प्रा डॉ रंजना शहाणे, प्रा डॉ वर्षा मुंडे,  प्रा प्रवीण फुटके, प्रा प्रवीण नव्हाडे, विकास देशपांडे व कल्याणी पत्की आदिंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा फुटके यांनी केले....
इमेज
  आ. धनंजय मुंडे यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नातून अंबाजोगाई येथे शेतकरी भवन उभारणीस 1.52 कोटी रुपये निधी मंजूर सभापती ॲड राजेश्वर आबा चव्हाण यांसह संचालक मंडळाने राज्य शासनासह धनंजय मुंडे यांचे मानले आभार अंबाजोगाई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई येथे नवीन शेतकरी भवन उभारण्याच्या १ कोटी ५२ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास सहकार विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.  अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुसज्ज असे शेतकरी भवन उभारण्यात यावे, यासाठी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण यांच्या सह सर्व संचालक मंडळाच्या वतीने धनंजय मुंडे यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ही मागणी राज्य शासनाकडे करून पाठपुरावा करून सदर प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिली असून, याबद्दल अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण, उपसभापती श्री करनर यांच्या सह सर्व संचालक मंडळाच्या वतीने राज्य शासना...
इमेज
  विद्यार्थ्यांसह पालकांचे प्रबोधन काळाची गरज - प्रा. टी.पी. मुंडे  परळीत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थी प्रबोधन मेळावा उत्साहात  परळी ,प्रतिनिधी      आजची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांसह पालकांचे प्रबोधन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे यांनी केले.ते क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परळी येथे आयोजित विद्यार्थी प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक रानबा गायकवाड होते, तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथराव गायकवाड, ज्येष्ठ नेते माधवराव ताटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, विचारवंत अजयकुमार गंडले, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सावंत, लेखक-दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे, माजी नगरसेवक महेंद्र रोडे, फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाचे समन्वयक भगवान सा...
इमेज
अंबाजोगाई येथे २७० वा जागतिक होमिओपॅथी दिवस उत्साहात साजरा   अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)....  अंबाजोगाई होमिओपॅथी डॉक्टर संघटनेतर्फे २७० वा जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला, यामध्ये प्रामुख्याने अंबाजोगाई व परिसरातील डॉक्टरांची संख्या लाक्षणिय होती .होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हनेमन जयंती अंबाजोगाई येथे दरवर्षी  साजरी केली जाते. १० एप्रिल १७५५ रोजी जन्मलेल्या डॉ. हॅनिमन यांनी होमिओपॅथी उपचार  तत्त्वांनी वैद्यकशास्त्रात क्रांती घडवून आणली. जगभरातील होमिओपॅथिक तज्ञ आणि उत्साही लोक हा दिवस कृतज्ञतेने साजरा करतात. हा दिवस पर्यायी औषधांमधील त्यांच्या प्रचंड योगदानाची आठवण करून देतो, नैसर्गिक उपचार आणि वैयक्तिक काळजीवर भर देतो. या दिवशी, होमिओपॅथीच्या फायद्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि डॉ. हॅनिमन यांच्या शाश्वत वारशाला आदरांजली वाहण्यात आली.भविष्यात  होमिओपॅथी सेमिनार, मोफत वैद्यकीय शिबिरे आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्याचा  सर्व सदस्यांनी मनोदय व्यक्त केला.  प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ.सॅम्युअल ह...
इमेज
  अखिल भारतिय पेशवा सं घटनेच्या वतीने जालना येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने रविवारी दि २० एप्रिल २०२५ रोजी जालना येथे सर्वशाखीय ब्राह्मण समाज साठी राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी दि ९ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.      ब्राह्मण सभा कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला रमेश देहेडकर, ॲड सुनील किनगावकर,संतोष जोशी,विजय काजे,बंकटलाल खंडेलवाल,चंद्रकांत कुलकर्णी, लक्ष्मीकांत दडके यांची उपस्थिती होती. मुला मुलींचे विवाह न होणे हि एक मोठी समस्या होऊन बसली आहे. जालना शहरासह  ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे.      या बाबत अ भा पे संघटना महाराष्ट्रभर जनजागृती करून प्रबोधन करीत असून या पूर्वी छत्रपती संभाजीनगर,परभणी, पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावे घेण्यात आले आहेत हे मेळावे यशस्वी झाल्या नन्तर दि २० एप्रिल २०२५ रोजी जालना शहरात चौथ्यांदा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे....

पंकजा मुंडेंच्या निर्देशानंतर प्रशासन खडबडून लागले कामाला

इमेज
परळीतील पुरातन सरस्वती नदीवरील अतिक्रमण घाणीचं साम्राज्य: महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पहाणी पंकजा मुंडेंच्या निर्देशानंतर प्रशासन खडबडून लागले कामाला परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील सरस्वती नदीपात्रातील अतिक्रमणे व घाणीचे साम्राज्य पाहून प्रचंड संताप व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले होते.नगर परिषद प्रशासनाने त्यानंतर तातडीने अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. लगेचच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून तब्बल तीन तास नदीपात्रावर प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली असुन नगर परिषदेकडे याबाबतच्या आवश्यक कागदपत्रांची मागणीही करण्यात आली आहे.        परळी शहरातुन वाहत असलेल्या पवित्र सरस्वती नदीची प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या परभणी उपविभागीय अधिकार्यांनी पाहाणी केली.यावेळी अधिकार्यांनी नगरपालिकेच्या अनेक विभागातील कागदपत्रे मागवत या नदीसंदर्भात आकडेवारी घेत पाहाणी केली.यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असुन सध्या या नदीवर संरक्षण भिं...
इमेज
  भगवान महावीर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी  शहरातुन निघालेल्या शोभायात्रेचे भाविकांनी घेतले दर्शन  परळी (प्रतिनिधी)     शहरातील गणेशपार भागातील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त गुरुवार दि.१० एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.भगवान महावीरांच्या प्रतिमेची रथात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत करत दर्शन घेतले.     भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त गुरुवारी गणेशपार भागातील दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी सात वाजल्यापासुन पारायण,भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी 10 वाजता आकर्षक  रथामध्ये जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची जैन मंदिर येथुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी चढावा घेत महावीर संघई व सौ.मनिषा संघई यांनी घेत शोभायात्रा निघालेल्या भगवान महावीर यांच्या रथामध्ये मान मिळविला. सदरील शोभायात्रा अंबेवेस,नेहरू चौक,राणी लक्ष्मीबाई टॉवर,मोंढा मार्केट,जैन स्थानक,बाजार समिती,मोंढा, राणी लक्ष्मीबाई टॉवर,गणेशपार मार्...

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख>>>>>तृतीय रत्न: शतकानुशतके घुमणारा ज्ञानाचा एल्गार!

इमेज
तृतीय रत्न: शतकानुशतके घुमणारा ज्ञानाचा एल्गार महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे केवळ एक युगपुरुष नव्हते, तर ते एक अत्यंत प्रभावी समाजसुधारक, विचारवंत आणि लेखकही होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील रूढ अंधश्रद्धा, जातीय भेद आणि अन्यायकारक प्रथांवर कठोर प्रहार केले. ‘तृतीय रत्न’ हे त्यांचे 1855 मध्ये प्रकाशित झालेले महत्त्वपूर्ण सामाजिक नाटक याच प्रयत्नांचा ज्वलंत भाग आहे. हे नाटक तत्कालीन सामाजिक वास्तवाचे भेदक चित्रण करते आणि ब्राह्मणी पुरोहितशाहीच्या शोषणावर व समाजाला पोखरणाऱ्या अज्ञानावर कठोर टीका करते. ‘तृतीय रत्न’चा चिकित्सक अभ्यास करणे आजच्या परिस्थितीतही अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या नाटकाने उपस्थित केलेल्या अनेक सामाजिक समस्या आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या समाजात अस्तित्वात आहेत.  ‘तृतीय रत्न’ या नाटकाचा चिकित्सक अभ्यास करून त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि समकालीन महत्त्वाचा शोध घेणे कालसुसंगत आहे. *नाटकाचा सामाजिक-ऐतिहासिक संदर्भ:-* ‘तृतीय रत्न’ ज्या काळात साकारले, तो काळ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासातील एक निर्णायक टप्पा होता. पेशवाई...
इमेज
  किसान पुत्र आंदोलन: ४ मे रोजी एक दिवसिय शिबीराचे आयोजन --------अमर हबीब................   अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-  ४ मे २०२५ हा दिवस राखून ठेवा. त्या दिवशी आपण समजावून घेऊ, नव्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या. कोणते कायदे गळफास आहेत, याची माहिती. शिवाय शेतकरी स्वातंत्र्यासाठी काय करावे लागेल यावर विचारविमार्श. किसानपुत्र आंदोलनाचे एक दिवसाचे शिबीर ४मे रोजी आंबाजोगाईच्या पत्रकार कक्ष (नगर पालिका कार्यालय परिसर) येथे होणार आहे. त्यासाठीची नाव नोंदणी सुरू केली आहे. फक्त ५० शिबिरार्थी भाग घेऊ शकतात. २० जणांनी नावे नोंदवली आहेत. या पुढे फक्त ३० नावे घेतली जातील. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे उशीर करू नका.  शिबीर सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल व सायंकाळी पाच वाजता संपेल. सकाळी व संध्याकाळी चहा दिला जाईल. दुपारी साध्या जेवणाची व्यवस्था केली आहे. शिबिरात पूर्णवेळ सहभाग घेतलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.अमर हबीब 8411909909 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी.पूर्ण नाव- गाव, तालुका, जिल्हा-मोबाईल नंबर-शिबिरात सहभागी होण्याचे कारण-एवढी माहिती पाठवली की न...

गुरुचरित्र सारामृत पारायण व कथामृत सोहळ्याची सांगता !

इमेज
  परळी वैजनाथ ही आदिगुरूंची भूमी: येथील साधनेची अनुभूतीच वेगळी ! प्रत्येक जीव 'दत्त स्वरूप' माना;जीवनाचे कल्याण होणारच- परभणी दत्तधाम पिठाधिपती प.पू.मकरंद महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       सृष्टीतील  प्रत्येक जीव भगवत स्वरूप असतो. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत 'हर कंकर- शंकर' अशी संकल्पना असुन प्रत्येक जीवमात्र हे दत्त स्वरूप माना असे आवाहन करत परळी वैजनाथ ही आदी गुरूंची भूमी आहे. या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामींनी अनुष्ठान केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या साधनेची एक वेगळीच अनुभूती प्रत्येक साधकाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन दत्तधाम परभणीचे पिठाधीपती प.पू. मकरंद महाराज यांनी परळी वैजनाथ येथे केले.        वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री संतदास गणू रचित गुरुचरित्र सारामृत पारायण व गुरुचरित्र कथामृत सोहळ्याचा आज अतिशय उत्साहात व मंत्रून  टाकणाऱ्या वातावरणात समारोप झाला.भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार मांणल्या जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्...
इमेज
माजी सैनिकाच्या विविध प्रश्नाबाबत महत्वपूर्ण बैठक पडली पार       गेवराई  :-(प्रतिनिधी)  आज दिनांक 10 /4/25  गुरुवार रोजी माजी सैनिक यांच्या विविध प्रश्नाबाबत नगरपरिषद गेवराई वाचनालयात जवळील ज्येष्ठ नागरिक कार्यालयात बैठक संपन्न झाली.                                      यामध्ये गेवराई येथील माजी सैनिकाचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्याला गती देण्यासाठी बैठक आयोजित केली होती.            या बैठकीसाठी सतीश कोटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष तथा श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष अनिल बोर्डे यांना व गेवराई ग्राहक पंचायतचे विश्वास चपळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत सर्वप्रथम किसन भारती साहेब यांच्या पत्नी व छत्रभुज सानप यांच्या सुनबाई यांचे अकस्मित निधन झाल्यामुळे दोन मिनिटाचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.      ...
इमेज
जालना:अकोल्यात आगीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ! पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश ; आगीच्या घटनेची माहिती जाणून घेत व्यक्त केल्या संवेदना जालना ।दिनांक १०। अकोला  (ता. बदनापूर) गावातील मठवाडी परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य पिकांचे तसेच जखमी पशूंचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत पालकमंत्र्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे.    अकोला गावातील गट क्रमांक ४१ मधील मठवाडी परिसरात आज दुपारी पोलवरील विजेच्या  तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या धान्याचे तसेच चारा, गाडी बैल, पशू खाद्य, मोटर पाईपलाईन याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेली काही जनावरे देखील आगीत होरपळली.  आग लागल्याचे कळताच  तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आ...
इमेज
 डॉ. अशोक नारनवरे: एका विद्यार्थ्याच्या हृदयातून उमटलेले कृतज्ञतेचे स्वर आदरणीय डॉ. अशोक नारनवरे सर, मी तुमचा विद्यार्थी याचा मला सार्थ अभिमान आहे.विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा हाडाचा शिक्षक कसा असू शकतो हे मी तुमच्या रूपात अनुभवलेले आहे.आपल्यासाठी   पुस्तक म्हणजे जीव की प्राण ! पुस्तकावर अगाध  प्रेम करणारा अवलिया.! साहित्यांचे गाढे अभ्यासक म्हणून तुमची एक स्वतंत्र ओळख आहे.डोळसपणा बरोबरच सर्वस्तरातून निर्माण होणाऱ्या अवस्थेची जाणीव साहित्यात यायला हवी ,असा आपला नेहमी आग्रह असतो. आपल्या माणसाच्या  भावनेचा व अस्तित्वाचा सखोलतेने , संवेदनशीलतेने विचार करणारे तुमचे व्यक्तिमत्व ख-या अर्थाने मराठी साहित्य व समाजाची बांधिलकी अभिव्यक्त करते. सर ,तुम्ही आमच्यासाठी महान आहात. आपण माझ्या सारख्या गरीब, निराधार ,विद्यार्थ्याला नवी दिशा दिलीत आणि त्याला माणूस बनवलत; म्हणून तर आमचा जीवनप्रवास सुखकर झाला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पदवी शिक्षण घेताना मला आपला सहवास लाभला, पुढे तर आवडता विद्यार्थी म्हणून विशेष प्रेम व आपुलकी मला मिळाली, पुस्तक वाचनाची आवड निर्म...
इमेज
  महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सह पतसंस्थेस मार्च २०२५ अखेरपर्यंत  रुपये तीन लक्ष एवढा निव्वळ नफा अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :-  अंबाजोगाई पंचक्रोशीतील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या उदात्त हेतूने केवळ महिलांनी महिलांसाठी  नऊ वर्षा पूर्वी सुरू करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेला ३१  मार्च २०२५ अखेरपर्यंत रुपये ३ लक्ष एवढा नफा झाल्याची माहिती  पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ . सुनीता राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.  .आपला भारत देश हा पुरुष प्रधान  देश आहे . या देशात  महिलांना जरी दुय्यम स्थान देण्यात आले असले तरीही आजची महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करणाऱ्याचा  प्रयत्न करत आहेत. त्यामुळे  नेहमी घर, चूल आणि मूल यामध्येच गुरफटून पडलेल्या  महिलांना काही प्रमाणात आर्थिक स्वायत्तता मिळवून देण्यासाठी व महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्याचा फायदा कुटुंबाला व्हावा याच पवित्र हेतूने केवळ महिलांसाठीच राजकिश...
इमेज
  रामनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीची कार्यकारणी जाहिर अध्यक्ष भास्कर सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण परळी/प्रतिनिधी  रामनगर लिबोनी बौद्ध विहार येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती उत्सव समितीची बैठक  राम नगर येथील जेष्ठ नागरीक आयु. सुभाष कांबळे, माणिक वाघमारे दिलीप जगताप मच्छिंद्र ठेंगे मारोती बदणे बालाजी ढगे रवि ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी मोठया उत्साहात  पार पडली.  यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची नविन कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्ष भास्करभाऊ सरवदे, उपाध्यक्ष किशोर चव्हाण, कोषाध्यक्ष सचिन ठेंगे, सचिव विशाल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तर मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत वाघमारे गोविंद सरवदे लालासाहेब वाघमारे  कुंडलीक कांबळे बिभीषन फड सुग्रीव फड लक्ष्मण कांबळे राजभाऊ बावणे बालाजी बावणे कृष्णा बावणे आनंत लटपटे गौतम जगताप अंकुश नाईकवाडे मनोज कांबळे नवनाथ आचार्य गोविंद  आचार्य निरंजन लटपटे वैजनाथ वाघमारे सुभाष लहाने तर सदस्यपदी रोहीत वाघमारे संतोष ठे...
इमेज
  उपजिल्हा रुग्णालय रस्त्यावरील वाहनांमुळे रुग्णवाहिकेस अडथळा -अश्विन मोगरकर  परळी वैजनाथ...     उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या कार, ऑटोरिक्षा मुळे रुग्णाला घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेलाच आत जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने गंभीर रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. बेजबाबदार वाहनचालक व गायब असलेले वाहतूक पोलीस यासाठी जबाबदार ठरवण्यात यावेत व त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळ असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची कायम गर्दी असते.  जवळच स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस असल्याने या परिसरात कायम गर्दी असते. बँकेत, पोस्टात जाणारे अनेक ग्राहक रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन लावत असतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी झाली आहे. बुधवार दि 9 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास एक रुग्णवाहिका रुग्णास घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आलेली असताना रुग्णालयात जाण्याच्या वाटेत एक कार व ऑटोरिक्षा उभी असल्याने रुग्णवाहिकेस दवाखान्यात लवकर जाता आले नाही. उपस्थित नागरिकांनी रिक्षा...

आज समारोप

इमेज
  गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ: परळी वैजनाथ ही स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची साधनास्थळी- प.पू.मकरंद महाराज  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हे दत्तात्रयाचे दुसरे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. परळी वैजनाथ क्षेत्रात त्यांनी काही काळ वास्तव्य केले. आंबा आरोग्य भवानीच्या सानिध्यात त्यांनी साधना केली. त्याचबरोबर दैवी लीलाही केल्या. याचे वर्णन गुरुचरित्र ग्रंथात आले आहे. यामुळे या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प.पू. मकरंद महाराज यांनी सांगितले.        वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन दिवसापासून परळी येथे दासगणू महाराज रचित गुरुचरित्र सारामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या सोहळ्यात सायंकाळच्या सत्रात परभणीच्या दत्तधाम चे पिठाधिपती प. पू. मकरंद महाराज यांचे गुरुचरित्रावरील कथामृत भाविक श्रोत्यांना ऐकायला मिळत आहे. गुरुचरित्राच्या विविध पैलूंवर अतिशय भावपूर्ण विवेचन प.पू. महाराजांच्या मुखारविंदातून  हे कथामृत श्रोत्यांना मिळ...
इमेज
नवसाला पावणाऱ्या बेनसुरच्या बेणाई देवीची गुरूवारी यात्रा  यात्रा विशेष /अमोल जोशी पाटोदा बिंदुसरा नदीचे उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील बेनाबाई ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून सुपरिचित आहे नव्हे तर बेनसुर गावचे नाव व मंदिराच्या मागील बाजूस उगम पावून बीड शहराचा  पाणीप्रश्न सोडविणाऱ्या नदीची बिंदुसरा म्हणून ओळख झालेल्या बेनाबाई देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदा आज  गुरुवार तारीख १० एप्रिल रोजी म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशी रोजी भरत आहे  माहूरच्या रणुकामातेचा अवतार म्हणून बेनाबाई देवीची ओळख आहे बेना नावाच्या रक्षासाचा वध केल्याने देवीचे हे नाव पडल्याची अख्यायिका आहे या देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात या यात्रे निमित्ताने चैत्र शुद्ध त्रयोदशी दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रम असतात यामध्ये देवीच्या परड्या , दर्शन,भंडारा व रात्री पालखीची मिरवणूक असे कार्यक्रम असतात या यात्रेप्रमाणेच नवरात्रात ही नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम असतात व श्रावणात पालखी असे भरपूर कार्यक्रम असतात नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असल्याने देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाव...
इमेज
  खाजगी रूग्णालयासारखी दर्जेदार सरकारी रूग्णालये बनविण्याची जबाबदारी कोणाची आहे..? सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांचा सवाल अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- सध्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरण खूप गाजत आहे. यामध्ये दोष कुणाचा, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, इथून ही चर्चा वाढत वाढत जाऊन सर्वसामान्य स्तरावर खाजगी रूग्णालये कशी पेशंटची अडवणूक करतात, त्यांना नको त्या तपासण्या करायला लावतात, अव्वाच्या सव्वा फीस आकारतात, डॉक्टर्स हे राक्षस झालेले आहेत. इथपर्यंत पोहचलेली आहे. येणारे काही दिवस ही चर्चा, मीडिया ट्रायल सगळं घडवून आणलं जाईल. लोकांमध्ये डॉक्टर्सविरूद्धच वातावरण तापविण्यात येईल आणि काही दिवसांनी हा विषय संपून राजकारण्यांना सोयीचा असलेला, राजकीय फायदा मिळू शकत असलेला दुसरा विषय पुढे आणण्यात येईल. या प्रकरणाच पुढे काय झालं, पीडितांना न्याय मिळाला का नाही ? याचा मागोवा सुद्धा घेण्याची तसदी काही काळानंतर आता बेंबीच्या देठापासून ओरडणारे घेणार नाहीत.  या विषयावर लिहायचं कारण असं की, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्वातंत्र्या...