युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प

 पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला - महंत लक्ष्मण महाराज मेंगडे

पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प


चाकरवाडी  - दि ८ - (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या पुण्यतिथी उत्सवात पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला आहे असे प्रतिपादन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, श्री ह भ प नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, श्री ह भ प राम महाराज काजळे, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, तानाजी आबा कदम, यांच्यासह हजारो भावी भक्तांचे उपस्थिती होती..


बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभुती संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी समर्पित केले.. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या 


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।

तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ ।

तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।

तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।

जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥


या अभंगावर चिंतन मांडले पुढे बोलताना महाराज म्हणाले..रौप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात इंद्राला लाजवेल अशी व्यवस्था केली. स्वर्ग आम्ही पाहिलेला नाही. मात्र आज श्रीक्षेत्र चाकरवाडीत साक्षात स्वर्ग अवतरला आहे. या ज्ञानगंगा मध्ये नाहून निघण्याच्या संताच्या आशीर्वादातून परम भाग्य मिळाले..


हा अभंग सूत्रात्मक आहे. सूत्र छोटे असते मात्र यामध्ये खूप मोठा गहन अर्थ दडलेला असतो..वेदाची महावाक्य छोटी आहे. त्यात आध्यात्मिक हित दडलेले आहे.माणसाच्या आदर्श जीवनाची सूत्र संत साहित्यात आहे.

काहीवेळा काम शिल्लक राहते आयुष्य संपते, तर काहीवेळा काम संपून जाते आयुष्य शिल्लक राहते.. संत नामदेव महाराज यांनी अभंग रचनेची प्रार्थना केली. पण आयुष्य संपले. म्हणून पुन्हा जगतगुरु तुका अवतार नामयाचा..तुकाराम महाराज पुन्हा अभंग रचना करताना पहिला अभंगहा लिहिला या अभंगात मंगल केलेले. मंगलाचे विविध प्रकार आहेत यामध्ये आशीर्वादात्मक वस्तू निर्देशनात्मक आणि नमस्कारात्मक या अभंगात वस्तू निर्देशनात्मक आणि आशीर्वादात्मक मंगल आहे..वारकरी संप्रदायाने जातीयता निर्मूलन करण्याचे काम जोग महाराज यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या