मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प

 पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला - महंत लक्ष्मण महाराज मेंगडे

पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प


चाकरवाडी  - दि ८ - (प्रतिनिधी) संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या पुण्यतिथी उत्सवात पुण्यभूमी श्रीक्षेत्र चाकरवाडीत स्वर्ग अवतरला आहे असे प्रतिपादन महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प महंत महादेव महाराज तात्या चाकरवाडीकर, श्री ह भ प नारायण भाऊ महाराज उत्तरेश्वर पिंपरी, श्री ह भ प राम महाराज काजळे, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प सुरेश महाराज जाधव, आदर्श पोलीस पाटील नानासाहेब काकडे, तानाजी आबा कदम, यांच्यासह हजारो भावी भक्तांचे उपस्थिती होती..


बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभुती संत ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी समर्पित केले.. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या 


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।

तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ ।

तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।

तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।

जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥


या अभंगावर चिंतन मांडले पुढे बोलताना महाराज म्हणाले..रौप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात इंद्राला लाजवेल अशी व्यवस्था केली. स्वर्ग आम्ही पाहिलेला नाही. मात्र आज श्रीक्षेत्र चाकरवाडीत साक्षात स्वर्ग अवतरला आहे. या ज्ञानगंगा मध्ये नाहून निघण्याच्या संताच्या आशीर्वादातून परम भाग्य मिळाले..


हा अभंग सूत्रात्मक आहे. सूत्र छोटे असते मात्र यामध्ये खूप मोठा गहन अर्थ दडलेला असतो..वेदाची महावाक्य छोटी आहे. त्यात आध्यात्मिक हित दडलेले आहे.माणसाच्या आदर्श जीवनाची सूत्र संत साहित्यात आहे.

काहीवेळा काम शिल्लक राहते आयुष्य संपते, तर काहीवेळा काम संपून जाते आयुष्य शिल्लक राहते.. संत नामदेव महाराज यांनी अभंग रचनेची प्रार्थना केली. पण आयुष्य संपले. म्हणून पुन्हा जगतगुरु तुका अवतार नामयाचा..तुकाराम महाराज पुन्हा अभंग रचना करताना पहिला अभंगहा लिहिला या अभंगात मंगल केलेले. मंगलाचे विविध प्रकार आहेत यामध्ये आशीर्वादात्मक वस्तू निर्देशनात्मक आणि नमस्कारात्मक या अभंगात वस्तू निर्देशनात्मक आणि आशीर्वादात्मक मंगल आहे..वारकरी संप्रदायाने जातीयता निर्मूलन करण्याचे काम जोग महाराज यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....