पोस्ट्स

मे ४, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Opretion Sindoor Close!

इमेज
  भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक - शरद पवारांची प्रतिक्रिया भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली — कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवर वा सामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचा हेतू नव्हता. ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरघोड्यांना संयमाने आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारताने ती जागतिक शांततेच्या भानासह पार पाडली आहे. भारत हा नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक राहिला आहे. आणि त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे. मात्र दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलणं हेदेखील आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे. शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल — हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं.

शस्त्रसंधी होणार का ? युद्ध खरच टळणार का?

इमेज
  भारत-पाक तणाव निवळणार! ट्रम्प यांचा महत्त्वाचा दावा; काल रात्रभर झालेल्या चर्चेत काय घडलं?         भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला संघर्ष संपण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावा केला आहे. दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचं ट्रम्प यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.        गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पाश्वभूमीवर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या या एक्स हँडलवरून एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ युध्दविरामास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न राष्ट्रं आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास त्याचे परिणाम जगावर होऊ शकतात. त्यामुळेच अमेरिकेनं यामध्ये मध्यस्थी केली. याबद्दल ट्रम्प यांनी एक पोस्ट केली आहे. 'अमेरिकेनं काल रात्रभर मध...

दहशतवादावर The End च्या दिशेने पाऊल !

इमेज
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गेल्या काही वर्षांपासून  सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवाया हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरले आहे. हल्लीच २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दोन्ही देशांकडून एकमेकांवर विविध हत्यारांद्वारे हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे भारताच्या भूमीवरही कुठलाही दहशतवादी हल्ला हे भारताविरोधातील युद्धाची कारवाई मानली जाईल, तसेच त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.गेल्या महिन्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधी दहशतवादी तळांवर हल्ले करत पाकिस्तानला जबर दणका दिला होता. तेव्ह...

बीड पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन...

इमेज
  भारत- पाकीस्तान युध्दाच्या अफवाबाबत स्पष्टता व नागरीकांसाठी सुचना ! अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे ! पाकीस्तान पुरस्कृत दहशतवादयांनी पहलगाम येथे दिनांक 22/04/2025 रोजी केलेल्या भ्याड हल्याचा भारताने निषेध केला आहे., पाकीस्तान मधील नागरी वस्तीची सुरक्षीतता अबाधीत ठेवुन ऑपरेशन सिंदुर राबविले आहे त्यामध्ये दहशतवादी तळ उधवस्त केले आहेत त्यामुळे पाकिस्तान सिमावर्ती भागात हल्ले करत आहे. भारताकडुन त्यांचे सर्व हल्ले सक्षमपणे हाणून पाडण्यात भारतास यश येत आहे. परंतु तरीसुध्दा पाकिस्तानकडुन भारतामध्ये काही अफवां पसरवुन गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सोशल मिडीया हॅक करुन खोटया अफवा पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने सर्व नागरीकांना खालील मुद्दयावर बीड पोलीस दलातर्फे अहवान करण्यात येत आहे! 01) भारत एक संघ आहे, सर्वांना भारत एकसंघ असल्याची प्रचिती दाखवण्यासाठी एकजुटीने आपले देशाप्रतीचे कर्तव्याचे पालन करावे. 02) अफवांवर विश्वास ठेवु नका, कोणतीही माहिती केवळ अधिकृत शासकिय स्त्रोतांकडुनच स्विकारा. 03) सोशल मिडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करु नका अफवा पसरवणे कायदयान...

19 जोडपी झाली विवाहबद्ध, मान्यवरांची उपस्थिती

इमेज
  जे. के. कन्स्ट्रक्शनचा मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात 19 जोडपी झाली विवाहबद्ध, मान्यवरांची उपस्थिती गरीब कुटुंबांना आधार दिल्याबद्दल समाजाकडून जाफर खान, राजा खान यांचा सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मुस्लिम समाजातील गोरगरिबांची सोय व्हावी म्हणून येथील जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने आयोजित केलेल्या मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 19 जोडपी विवाहबद्ध झाली. अतिशय उत्साहात आणि थाटात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. गरीब कुटुंबांना आधार दिल्याबद्दल समाजाच्या वतीने विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक तथा जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, हाजी राजा खान यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.     मलकापूर रोडवरील भव्य दिव्य अशा जे. के. फंक्शन हॉल येथे  रविवार दि. 4 मे रोजी सकाळी 11 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा थाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खोट्या प्रतिष्ठा आणि रूढी परंपरा यामुळे अनेक गरीब कुटुंबांना कर्ज काढून लग्न करावे लागते. समाजातील गोरगरीब यांची होणारी अडचण लक्षात घेऊन जे. के. कंट्रक्शनच्या वतीने ...

4 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार थाटात विवाह सोहळा

इमेज
 जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहोळ्याचे आयोजन 4 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार थाटात विवाह सोहळा गरजवंत जोडप्यांनी लाभ घ्यावा- जाफर खान, हाजी राजा खान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बांधकाम क्षेत्रात नामांकित असलेल्या जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याचा गरजवंत जोडप्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, हाजी राजा खान यांनी केले आहे.        दिनांक 4 मे रोजी जे. के. फंक्शन हॉल, मलकापूर रोड येथे सकाळी 11 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा थाटात आणि उत्साहात संपन्न होणार आहे. समाजातील प्रतिष्ठा आणि रूढी परंपरा यामुळे अनेक गरीब कुटुंब कर्ज काढून लग्न करतात. अनावश्यक खर्च केला जातो. होतकरू आणि गरजू कुटुंबासाठी मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी दिनांक 25 एप्रिलपर्यंत मुफ्ती सय्यद अशफाक (9850565541), एजाज खान उस्मान खान (9822513513), मॅनेजर शेख शफीक (9834507201) यांच्याकडे नाव नोंद...
इमेज
  परळी व अंबाजोगाई तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत 933  लाभार्थ्यांना ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी वितरीत आ.धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो बेघर, बेसहारा अनाथांच्या डोळ्यातील पुसले अश्रु! परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदार संघाचे आ.धनंजय मुंडे व मंत्री पकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एकल पालकांच्या मुला-मुलांनी व दिव्यांगांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्था श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ व अंबाजोगाई यांची निवड झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत 933  लाभार्थ्यांना 3 कोटी 10 लक्ष रूपयांचा निधी खात्यात जमा करण्यात आला. आ.धनंजय मुंडे ...

उद्योजक भरत गिते यांचे औद्योगिक क्षेत्रातील कार्य नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी

इमेज
 खा.शरद पवार यांची उद्योजक भरत गिते यांच्या तौरल इंडिया प्रा.लि. कंपनी येथे गौरवपूर्ण सदिच्छा भेट “शरद पवारांची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत” — भरत गीते उद्योजक भरत गिते यांचे औद्योगिक क्षेत्रातील कार्य नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी चाकण / पुणे (प्रतिनिधी) :-        तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या ॲल्युमिनियम मॅन भरत गिते "भरत गीते यांचा संघर्ष आणि प्रकल्प तरुणांसाठी प्रेरणादायी आहे" चाकण औद्योगिक वसाहतीमधील तौरल इंडिया प्रा. लि. या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन प्रकल्पास  खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री गित्ते यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान भरत गित्ते यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. या कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केले आहे. ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांनी औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. येणाऱ्या काळात उद्योजक भरत गिते यांचे औद्योगिक क्षेत्रातील...
इमेज
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा मुंबई, 9 मे भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे... - प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा. - ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्ग...
इमेज
लष्करप्रमुखांना पुढील 3 वर्षांसाठी सर्वाधिकार, संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट जारी; गृहमंत्र्यांचीही तातडीची बैठक नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांचा जोर असून गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी नुकतीच प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने (Defence) सैन्य दलाला महत्त्वाचे अधिकार दिले असून पुढील 3 वर्षांपर्यंत हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तिनही सैन्य दलाच्या (Indian army) प्रमुखांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. टेरिटोरियल आर्मी नियम 1948 च्या नियम 33 नुसार भूदल प्रमुखांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, टेरिटोरियल आर्मीच्या सर्वच अधिकारी आणि सैनिकांना आवश्यक सुरक्षा ड्यूटी नियमित सेना के समर्थन में सक्रिय सेवेत (एंबॉडीमेंट) बोलवू शकतात. सध्या 32 टेरिटोरियल आर्मी इन्फँट्री बटालियनमधील 14 बटालियन देशाच्या विविध सैन्य दलांना, साउदर्न कमांड, ईस्टर्न कमांड, वेस्टर्न कमांड, सेंट्रल कमांड, नॉर्दर्न कमांड, साउथ-वेस्टर्न कमांड, अंदमान व निकोबार कमांड आणि आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) येथे तैनात ...

पोलीसांचा सर्व पातळ्यांवर तपास.....!

इमेज
नवा ट्विस्ट; दोन दिवसांपूर्वी परळीत एकाला उचलले; अपहरणाचा गुन्हाही दाखल मात्र खरच अपहरण की अन्य काही कारण ? परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            गेल्या दोन दिवसांपूर्वी परळीच्या मुख्य रस्त्यावरून सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास एका इसमाला चार ते पाच लोकांनी पांढऱ्या इनोव्हा गाडीत उचलून घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी अपहरण करण्यात आल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परळी पोलिस याचा तपासही करत आहेत. मात्र आपहरण करण्यासाठीच्या जवळपास सर्वच पैलूंची पडताळणी केली असता ठोस मुद्दा समोर आलेलाच नाही त्यामुळे आता खरोखरच हे अपहरण झाले की अन्य काही प्रशासकीय  तपास, पोलीस प्रक्रिया आदी कारणांसाठी घेऊन गेले असे तर्क वर्तवण्यात येत आहेत. तसेच असेच काहीतरी असण्याची शक्यता आहे का यादृष्टीनेही  पोलीस आता तपास करीत आहेत.             दिनांक 06/05/2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याचे सुमारास राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून पिडीत इ...

कंत्राटदाराची हलगर्जी भोवली- परळीकरांनी आठ दिवस निर्जळी !

इमेज
भोंगळ कारभार थांबवा; पाईपलाईन फुटीसारखे प्रकार थांबवून पाणीपुरवठा सुरळीत करावा -अश्विन मोगरकर परळी वैजनाथ,प्रतिनिधी...        महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे परळी शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने गणेशपार सह गावभागात आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वारंवार होणाऱ्या पाईपलाईन फुटीच्या घटना त्वरित थांबवून किमान उन्हाळ्यात तरी पाणीपुरवठा सुरळीत रहावा व पाईपलाईन फोडणार्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्याकडे केली आहे.          परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाण धरणात मुबलक पाणीसाठा असूनही नियोजना अभावी व वारंवार होणाऱ्या पाईपलाईन फुटीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. थर्मल कॉलनी जवळील रस्ते महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणी हलगर्जीपणामुळे परळी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने आठ दिवसांपासून गावभागाला पाणीपुरवठा बंद आहे. यापूर्वीही अनेकवेळा विविध ठिकाणी पाईपलाईन फुटल्याच्या घटना घडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. ...
इमेज
  खळबळजनक: सायंकाळी पांढर्‍या रंगाची इनिव्हा आली अन् उचलले: परळीतून रस्त्यावरुन एकाचे अपहरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       बीड जिल्ह्यातील अपहरणांच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून गाजत असतांनाच आता परळीतील एका नागरिकाचे भरस्त्यावरुन उचलून घेऊन जात अपहरण झाल्याची घटना आज(दि.६) सायंकाळच्या सुमारास घडली.याप्रकरणी रात्री उशीरा ११.१७ वा.परळीच्या संभाजीनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 06/05/2025 रोजी सायंकाळी 1745 वाजण्याचे सुमारास राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून आपहरणाची घटना घडली आहे. यातील पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास  अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन त्याचे अपहरण करुन घेवुन गेले आहेत. अशी फिर्याद शेख जमीर शेख आमीर  रा. खुदबे नगर परळी वै. यांनी दिली आह...
इमेज
एसपींची दोघांवर कारवाई: गांजाफुक्या सुरक्षारक्षक व वाळू माफियाला मदत करणारा शिपाई बडतर्फ ! बीड  — दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये गांजाफुक्या व वाळू तस्करीत मदत करणाऱ्या पोलीसांचा समावेश आहे.  पोलीस अधीक्षकांच्या घरात गांजा ओढत बसलेल्या बाळू गहिनीनाथ बहिरवाळ तसेच वाळू माफियाला पळून जाण्यास मदत करणारा रामप्रसाद शिवनाथ कडूळे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी ही कारवाई केली.             बाळू गहिनीनाथ बहिरवाळ हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आला होता. तो एका खोलीत गांजा ओढत बसलेला असताना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पकडला गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बहिरवाळ विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच रामप्रसाद कडूळे हा कर्मचारी पिंपळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले होते. याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले ह...
इमेज
  बीड जिल्हा ग्राहक पंचायत व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थे कडून 12  परीक्षेत यशाबद्दल सत्कार            गेवराई ( प्रतिनिधी ) आर बी अट्टल कॉलेज येथील विद्यार्थी कल्पेश कल्याण मुळे यांनी बारावी परीक्षांमध्ये (91.5) टक्के गुण घेऊन आर बी अट्टल कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. त्याचा सत्कार नगरपरिषद ज्येष्ठ नागरिक कार्यालय विरंगुळा केंद्र येथे करण्यात आला.    कल्पेश कल्याण मुळे यांनी इयत्ता बारावी परीक्षेमध्ये 91.5 गुण घेऊन यश संपादन केले आहे .  त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाक्याची कठीण असून  त्यांचे वडील कल्याण मुळे यांना खाजगी नोकरीआहे.    कल्पेश यांनी अथंग  परिश्रम करून सातत्य पूर्ण अभ्यास करून यश संपादन केले आहे. कल्पेश यांनी लहानपणीपासून विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे.      कल्पेश याच्या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन वर्षाव होत आहे. त्याच्या यशाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बीड जि...
इमेज
  बीडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; नाशिकच्या पीडितेची सुटका चालकाला बेड्या : बीड शहर पोलिसांची कारवाई बीड : शहरातील गजबजलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सारडा कॅपिटलमधील एका तळघरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय चालू होता. ही माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कारवाई केली. यामध्ये चालकाला बेड्या ठोकल्या असून नाशिकच्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. प्रमोद सदाशिव शेळके (रा.नेकनूर ता.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. बीड शहरातील सारडा कॅपिटल परिसरात एका कोपऱ्यातील तळघरात ब्लीस नावाचे स्पा सेंटर आहे. याच ठिकाणी मागील काही दिवसांपासून वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती होती. मंगळवारी सायंकाळी बीड शहर पोलिसांनी डमी ग्राहकाला एक हजार रूपये देत स्पा सेंटरमध्ये पाठविले. आतमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारला. यात एका पीडितेची सुटका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्य...
इमेज
  युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी 1.प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यांत यावा. सायरन दोन मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी गॅस लाईन बंद करून इमारतीच्या खाली येवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. 2. सायरन एकाच आवाजामध्ये 2 मिनिटे वाजल्यानंतर धोका संपल्याची सूचना मिळत असते, त्यावेळी सर्व नागरीकांनी ज्या ज्या ठिकाणी आश्रय घेतला आहे त्याठिकाणावरून सुरक्षित बाहेर पडून आपल्या सर्व परिसराची पाहणी करून तसा अहवाल प्रशासनाच्या नियंत्रण केंद्रास देण्यात यावा की जेणेकरून आपल्याला त्वरीत मदत उपलब्ध करता येईल. 3. सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असताना आपल्यासोबत पिण्याच्या पाण्याचा साठा, कोरडे अन्न (ड्रायफुड), तसेच औषधे सोबत ठेवावेत. 4. युध्दजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्यासोबत रेडिओ, मोबाईलचा वापर करा की जेणेकरुन प्रशासनानी वारंवार दिलेल्या सुचनांचे आपणांस पालन करता येईल. 5. प्रकाशबंदी (Bla...
इमेज
  सह्याद्री भुषण पुरस्कार - 2025 चा वितरण  सोहळा उत्साहात  सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघाचा ५ मे रोजी प्रथम वर्धापनदिन सोहळा साजरा  केज (बीड) प्रतिनिधी  दि. 5 मे रोजी केज येथे सह्याद्री मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त  आयोजित "सह्याद्री भुषण पुरस्कार 2025" वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी केज तालुक्यातील  जेष्ठ नेतृत्व  व  ज्यांनी आजवर आपल्या कारकीर्दीत विविध समाजोपयोगी पदे भुषविले  असे थोर मार्गदर्शक मा. श्री अँड राजेसाहेब देशमुख यांना सह्याद्री भुषण जिवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर  नाव्होली येथील भुमिपुत्र   मा . सि  .ए . इनामदार (माजी नायब तहसीलदार) तथा कृषी व सामाजिक  प्रश्नांवर आपला संघर्ष  अविरत सुरू ठेवणारे यांना कृषी व सामाजिक क्षेत्रातील कार्याबददल  सह्याद्री भुषण पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले व केजच्या मातृभुमीत अक्षर बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक  शैक्षणिक कार्यात सतत अग्रभा...

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या वर्षी पाच लाख मेट्रिक टनाचे गाळप करणार !

इमेज
  अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या वर्षी पाच लाख मेट्रिक टनाचे गाळप करणार ! हंगाम २०२५-२०२६ चे हंगामा करिता तोडणी वाहतूक यंत्रणा कराराचे चेअरमन रमेश आडसकर यांच्या हस्ते पुजन  अंबाजोगाई(वसुदेव शिंदे)- अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा.  यावर्षीचा २०२५-२०२६ चा गळीत हंगाम वेळेच्या आत चालू करण्यात येणार असून, यावर्षी कोणत्याही परिस्थितीत पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन  रमेशराव आडसकर यांनी दिनांक ५ मे २०२५ रोजी सोमवारी गळीत हंगाम २०२५-२०२६ च्या करिता तोडणी वाहतूक यंत्रणा कराराचे पुजन प्रतिपादन केले, यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक  विठ्ठल नाना देशमुख, संचालक अँड लालासाहेब जगताप, कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड , संचालक राजाभाऊ औताडे, मुख्य शेतकी अधिकारी सचिन बागल,उस पुरवठा अधिकारी आनंद शिंदे, केन यार्ड सुपरवायझर शिवराज चव्हाण यांच्या यांच्यासह वाहतूक तोडणी ठेकेदार, मुकादम, अँग्रीओव्हरसिअर, अँग्री सुपरवायझर, अँग्रीआसिंटट सह बहुसंख्येने कामगार उपस्थित होते.

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
  बारावी - वैद्यनाथ महाविद्यालयाचा ९४.८१ टक्के निकाल कु.नंदजा लड्डा प्रथम, कु.अनन्या सूर्यवंशी द्वितीय, तर कु. साक्षी फड तृतीय         परळी वैजनाथ दि.६---                        नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत येथील वैद्यनाथ महाविद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून यावर्षीचा सर्व विद्याशाखीय  निकाल सरासरी  ९४.८१%  इतका लागला आहे. सर्वात अधिक  बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.९२%  इतका लागला आहे. तर त्याखालोखाल निकाल बारावी वाणिज्य शाखेचा ९७.४३% इतका लागला आहे.  बारावी कला शाखेचा निकाल ८३.०९%  आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाचा निकाल ८३.३३%  इतका निकाल लागलेला आहे.                    यात बारावी विज्ञान शाखेतून कु. नंदजा रामजीवन लड्डा (८७.३३%) ही प्रथम आली असून कु. अनन्या शेषराव सूर्यवंशी (८४.५०%)द्वितीय तर कु. साक्षी कैलास फड (८४.३३%) ही तिसरी आली आहे. बारावी वाणिज्य शाखेतून कु. सोनम र...

निवडणुका घ्याव्याच लागणार !

इमेज
मोठी बातमी: लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मागच्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या. उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. “आधीच्या परिस्थितीनुसार १९९४ ते २०२२ च्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील. राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबरच्या आत निवडणूक घ्यायची आहे” असं वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं.कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांचा कारभार चाललेला. याविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वो...

पांगरीकरांसाठी आनंदाचा 'दुग्धशर्करा' योग !

इमेज
डाॅ.अक्षयच्या युपीएससीतील यशानंतर डाॅ.पवन वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत झळकला;पांगरीच्या भूमीपुत्राचा सुपरस्पेशालिटी नीटमध्ये डंका ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          परळी तालुक्यातील पांगरी या गावातील युवकांनी यशा मागून यश खेचून आणत पांगरी गावच्या वैभवात सातत्याने मानाचा तुरा खोवला आहे .काही दिवसांपूर्वीच यूपीएससीमध्ये डॉ. अक्षय मुंडे झळकला आहे. त्या यशाचा आनंदोत्सव अद्याप सुरू असतानाच पांगरी गावातील दुसऱ्या डॉ. पवन मुंडे या भूमिपुत्राने वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत घवघवीत यश मिळवून पांगरीकरांच्या आनंदात दुग्ध शर्करा योग घडवून आणला आहे. सुपर स्पेशलिटी नीट मध्ये डॉ. पवन मुंडे यांनी यश मिळवले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.     पांगरी गावचे रहिवासी असणारे डॉ. पवन बंडोपंत मुंडे नीट सुपर स्पेशालिटी 2025 परिक्षा घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत. या परिक्षेतभारतात 939 रँक त्यांनी मिळवला आहे.डॉ पवन मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड मध्ये झाले...
इमेज
  कै.शिवाजीराव खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण: भव्य दिव्य सोहळ्यात दोन दिवस कांदेवाडीत हरिनामाचा गजर ! नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे - ह.भ.प. प्रशांत मोरे महाराज देहुकर धारूर (प्रतिनिधी) :-           कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणनिमित्त दि.३० एप्रिल रोजी ह.भ.प.सोपान महाराज कनेरकर  व दि.१ मे रोजी ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांचे सुश्राव्य किर्तन झाले. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कै. शिवाजीराव खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरनार्थ दोन दिवस कांदेवाडीत हरिनामाचा गजर  झाला.जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.प्रशांत मोरे महाराज देहुकर यांच्या किर्तनाने समारोप झाला.नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे  असे ह.भ.प मोरे महाराज देहुकर यांनी सांगितले.       परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक...
इमेज
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी आकाश कुकर,उपाध्यक्ष वैजनाथ लांडे तर सचिव पदी मुंजा सरवदे यांची निवड परळी प्रतिनिधी /      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नुकतीच बैठक संपन्न झाली. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश कुकर यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी मुंजा सरवदे तर उपाध्यक्षपदी वैजनाथ लांडे, सहसचिव तुषार नाईकवाडे, कॅशियर नितीन सरवदे, आकाश सरवदे यांची निवड करण्यात आली. 31मे रोजी सकाळी 10 वाजता होळकर चौक येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे तसेच भव्य मोटरसायकल रॅली प्रभू वैद्यनाथ मंदिर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी निघणार आहे . त्यानंतर महाप्रसादाचे अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी आयोजन केले आहे. तर सायंकाळी 6 वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक होळकर चौक ते राणी लक्ष्मीबाई टाव...
इमेज
एक महिन्यापूर्वीच लग्न झालं, नवविवाहित पती-पत्नी जोडीने मंदिरात दर्शनाला गेले, पती दर्शन करून येईपर्यंत पत्नीच गायब !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           नवरा बायको मिळून जोडीने वैद्यनाथ मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर एक खळबळजनक घटना घडली आहे. गाभाऱ्यातून दर्शन घेऊन येईपर्यंत पत्नीच गायब झाल्याची घटना दि. पाच रोजी घडली आहे. याप्रकरणी आता पतीने पोलिसात धाव घेत पत्नी गायब असल्याची खबर दाखल केली असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील वडार काॅलनी भागातील रहिवासी २७ वर्षीय फिर्यादी हा ड्रायव्हर आहे. त्याचे एक महिन्यांपूर्वीच लग्न झालेले आहे.आपल्या नवपरिनीत पत्नीला घेऊन दि. 05/05/2025 रोजी सकाळी 08.30 वाजण्याचे सुमारास ते दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरात गेले होते.मंदीरामध्ये महीला व पुरुष यांची वेगळी दर्शन रांग आहे. पती पुरुष रांगेत तर पत्नी महिलांच्या रांगेतून दर्शनाला गेले. गाभाऱ्यात पोहचण्यात मागे पुढे झाले.दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गावर बघितले असता पत्नी दिसली नाही.दर्शन घेऊन बाहेर थांबली असे...
इमेज
हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांचा परळीत निषेध : तीव्र कारवाईची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        पुण्यातील पौड मुळशी येथील नागेश्वर मंदिरात देवतांची विटंबना व अतिशय घृणास्पद कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शासन करावे या मागणीबाबत सकल हिंदू समाज परळी वैजनाथ च्या वतीने आज निवेदन देण्यात आले. तसेच या समाजकंटकांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.    परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयात सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्र येत पौड मुळशी येथील हिंदू देवतेच्या विटंबनेचा व गैरकृर्त्याचा जाहीर निषेध केला. याप्रसंगी हिंदू देवदेवतांची विटंबना करून हिंदू समाजाची श्रद्धा व भावना दुखवल्याबद्दल या माथेफिरू युवक व त्याच्या या कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या त्याच्या बापावर गुन्हे दाखल करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते.   अन्यथा तीव्र आंदोलन करू...          दरम्यान, याप्रसंगी संतापलेल्या हिंदू धर्मीय समाज बांधवांनी पौड मुळशी येथील घडलेली घटन...