पोस्ट्स

मार्च ९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
अमृताश्रमस्वामी महाराज यांना श्रीसंत नरहरिनाथ महाराज जीवनगौरव पुरस्कार जाहीर  बीड, प्रतिनिधी....     अमृताश्रम स्वामी महाराज जोशी यांना श्रीसंत नरहरीनाथ महाराज जीवन गौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.       नवगण राजुरी बीडचे भूमिपुत्र, वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार, धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांना संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या नाथ परंपरेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा श्रीसंत नरहरिनाथमहाराज जीवनगौरव पुरस्कार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या वर्षी शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराजांच्या पुण्यभूमी श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये वैदिक व वारकरी संप्रदायातील विद्वज्जन विभूतींच्या मंगल उपस्थितीत दि २१ मार्च २०२५ रोजी सायं. ५:०० वा. श्री,प,पू मोहननाथ महाराज पैठणकर यांच्या हस्ते संत अमळनेरकर महाराज मठ श्रीक्षेत्र पैठण तेथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे.श्री जोशी महाराज यांना यापूर्वी समता रत्न पुरस्कार,बापू पुरस्कार,एकता पुरस्कार,वारकरी भूषण पुरस्कार,तथा महाराष्ट्र शासना चा कीर्तन प्रबोधन इत्यादी असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झ...
इमेज
  "तात्यायन"ला पुरस्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी - "लोकसत्ता"च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीतील वरिष्ठ प्रतिनिधी बिपीन देशपांडे यांनी वडिलांवर लिहिलेल्या "तात्यायन-एक सिद्धांत" या चरित्र ग्रंथाला पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने देण्यात येणारा २०२५ चा महात्मा ज्योतिराव फुले साहित्य पुरस्कार (चरित्र ग्रंथ गट) जाहीर झाला आहे. विविध पुरस्कारांची निवड ही या संदर्भातील समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक तथा उदगीर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे व अन्य सदस्यांच्या विचारातून करण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष समाधान दहिवाळ यांनी दिली. पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाच्या वतीने लवकरच दुसरे परिवर्तनवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून, त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे, असे समाधान दहिवाळ यांनी कळवले आहे.
इमेज
कृषी संस्कृती नष्ट करण्याचा सरकारचा डाव-विजय अण्णा बोराडे यांचा इशारा परळी / प्रतिनिधी...        शेतकरी अडचणीत असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. अगोदर शेतीला असलेली प्रतिष्ठा कमी झाली आहे. हे आपोआप होत नाही, तर शेतकऱ्यांना शेतीबाह्य करण्याचा, कृषी संस्कृती नष्ट करण्याचा हा सरकारचा डाव आहे. तो शेतकऱ्यांनी ओळखावा, असे आवाहन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. 'शेतकऱ्यांसमोरील आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत असलेली जनजागृती खूप मोलाची आहे, असे सांगून बोराडे पुढे म्हणाले की, आज कितीही प्रयत्न केला तरी खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नाही. शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी खत-बियाणे घरचेच असायचे, दरडोई शेती क्षेत्राचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे एखादे शेतीचे पीक फसले तरी खर्च नसल्याने ताण येत नव्हता. एका शेतीत नुकसान झाले तर दुसर्‍या शेतीतून ते भरभरून निघत होती. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. थोडीच शेती, त्यातच जास्त उत्पादन घेण्याच्या आशेने केलेला भरमसाठ खर्च आणि ते फसल्यानंतर येणारी हतबलता शेतकऱ्यांना निराशेकडे नेत आहे. ही प...

आपल्या चिमुकल्या मुलीला लिहलं अखेरचं पत्र....

इमेज
मन हेलावून टाकणारी घटना: विना अनुदानित आश्रम शाळेच्या शिक्षकाची कंटाळून आत्महत्या                 बीड शहरातील स्वराज्य नगर भागात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका शिक्षकानं भावनिक पोस्ट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बॅकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. त्यांनी लिहिलेली भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. त्यांचा कशाप्रकारे छळ केला जात होता, याची सविस्तर माहिती दिली आहे. धनंजय अभिमान नागरगोजे असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. ते बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी होते. ते मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 2019 मध्ये राज्य सरकारने या शाळेला 20 टक्के अनुदान घोषित केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. वेतन ...

बंजारा होळी: स्पेशल रिपोर्ट: गजानन चौकटे

इमेज
काकी ये दीदी ,रसमत करजो होळी, बंजारा समाजाचा अनोखा होळी उत्सव बंजारा होळी: स्पेशल रिपोर्ट: गजानन चौकटे  हिं दु संस्कृतीमध्ये होळी, धुलिवंदन सण उत्साहात साजरे केले जातात तर बंजारा समाजामध्ये या सणला अनन्यसाधारण असे महत्व आहे. एक महिण्यापासून या सणाची जय्यत तयारी बंजारा समाजातील महिला, पुरूष करतात. शहरी भागासह ग्रामीण भागात होळी, धुलिवंदन सणाला एक वेगळे महत्व आहे. धुलिवंदन साजरा करण्याकरीता बंजारा समाजामध्ये एक वेगळी परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजतागायत सुरूच आहे. या सणाला नातेवाईक व मित्रपरिवार एकत्र येउन आनंदाने हा सण साजरा करतात.  काकी ये दीदी रसमत करजो होळी बोलच ये भांड, आजी काकी तुम्ही रागवू नका होळीचा आम्हाला भांडायला सांगते असा याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे बंजारा समाजामध्ये होळीला दिवाळीला व नागपंचमीला घरचा पितुराना मनोभावे पूजले जाते.व होळी निमित्त सकाळी उठवून वळवट व भात करून शुद्ध तुपामध्ये अग्नी मधे देऊन पूजन करतात त्यास आपकार असे म्हणतात याचा अर्थ चुलीमधे अग्नी ला घास देणे असा होतो बंजारा समाजामध्ये होळीला एक विशेष असं महत्त्व मानला जातो बंजारा समाजामध...
इमेज
  राष्ट्रीय एकात्मता की, ऐतिहासिक संदर्भ नेमके काय महत्त्वाचे हे ठरविण्याची वेळ आली आहे - सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) भारत देशातील सद्य:परिस्थिती पाहता देश जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, गरीबी श्रीमंती या भेदभावाच्या आधारावर उभ्या फुटीच्या मार्गावर जात आहे. इतिहासाचा उपयोग करून संधी साधू राजकारणी आपला मतलब साध्य करण्यासाठी विविध जाती धर्मांमध्ये भांडण लावण्यासाठी ऐतिहासिक संदर्भांचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची की, इतिहासामधील ऐतिहासिक संदर्भ महत्त्वाचे याचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी केले. ते सेंट ऍंथनी स्कूल मधील वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी उदघाटक मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फादर प्रदीप कुमार, मेजर दिलीप निकम, प्राचार्य नन आरोग्यम यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन डॉ.राजेश इंगोले व मेजर दिलीप निकम यांच्याहस्ते क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ...

शेतकरी कीर्तन महोत्सव.....

इमेज
  द्वेषाच्या वणव्यात प्रेमाचा गारवा! अनंत राऊत यांच्या कावितेने शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन  सिरसाळा (प्रतिनिधी): आज सर्वत्र जात्यंधता, धर्मांधतेचा वणवा पेटलेला पहायला मिळतोय. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पहातो आहे, अशा कळात संत विचाराच्या वर्षावाने प्रेमाचा गारवा निर्माण करण्याचे काम शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. संत विचारातून सामाजिक सलोखा निर्माण होईल, असा आशावाद प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केला. शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  कन्नापूर येथील बस स्थानकाजवळ जगद्गुरू तुकाराम महाराज बीजेनिमित्त शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन अनंत राऊत यांच्या उपस्थितीत झाले. काॅ. डी. एल. कराड हे अध्यक्ष स्थानी होते. जागतिक कीर्तीचे पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर आणि कैकाडी महाराज यांचे वंशज, कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव यांच्या हस्ते मृदंग आणि वीणा पूजन झाले. यावेळी बोलताना अनंत राऊत म्हणाले की, संतांच्या विचारधारेतून गावखेड्यातील सामाजिक सलोखा भक्कम होता. आमच्या गावच्या महादेवाच्या मंदिरातील हरिनाम सप्ताहात पठाण चाच्या कीर...

शेतकरी कीर्तन महोत्सव...

इमेज
शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखा- कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांचे शेतकऱ्यांना आवाहन  परळी / प्रतिनिधी      रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेतीचा पोत खराब होत असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतील. हे टाळायचे असेल तर शेतकरी बांधवांनी शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखावा, असे आवाहन बीड जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांनी केले. शेतकरी कीर्तन महोत्सवात 'शेतकरी योजना, शेती उद्योग आणि शेंद्रीय शेती ' या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रासायनिक खत, पवारण्या याच्या अती वापरामुळे शेतीमधील कीटकांची जीवन साखळी विस्कळीत झाली आहे. शेतीमध्ये काही जीव जंतू हे शेतीला लाभदायक असतात तर काही हानीकारक असतात. हानीकारक किकांना खाण्याचे काम काही किचकट करतात.  त्यातूनच शेतीचा समतोल राखला जाती. कधी कधी हानीकारक असणाऱ्या कीटकांची संख्या वाढते तेव्हा किटक नाशक फवारणीचा पर्याय असतो. पण अलिकडे किती गरज आहे याचा विचार न करता भरमसाठ किटक नाशक फवारले जातात. परिणाम उपयुक्त आणि हानीकारक दोन्ही तऱ्हेचे किटक संपत आहेत. त्यातून नैसर्गिक जीवन साखळी विस्कळीत होत आहे...
इमेज
पीओपी मूर्ती संदर्भात अभ्यासगट स्थापन - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि. १२:   प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन केला आहे. तसेच यासंदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य चंद्रकांत नवघरे, वरूण सरदेसाई यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे जलस्रोतामध्ये करण्यात येणाऱ्या विसर्जनामुळे  जलप्रदूषणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशासनुसार  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण  मंडळाने पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने पीओपी मूर्तीं उत्पादन, विक्री आणि विसर्जनास बंदी घातली आहे.  पीओपी मूर्ती मधील प्रदूषणकारी घटक कमी करणे शक्य होईल का याची पडताळणी करण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्...

आपघात.....

इमेज
  आपघात: मोटरसायकल - आयशर धडकेत युवक ठार  माजलगाव दि.१२(प्रतिनिधी)         तालुक्यातील पिंपळगाव शिवारात माजलगाव गडी रोडवर  मोटरसायकल व आयशरची समोरासमोर धडकून २६ वर्षीय  युवक ठार झाल्याची घटना बुधवारी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यातील सुर्डी नजिक तांडा येथील रहिवासी असलेला गोपाळ रूपसिंग पवार हा युवक माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या ब्रह्मगाव येथुन आपल्या मित्राला भेटून आपल्या गावी सुर्डीला जात होता. केसापुरी वसाहत जवळ असलेल्या सौभाग्य मंगल कार्यालयासमोर समोर आयशरला धडक झाल्याने हा युवक जागीच पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  या युवकास जवळच असलेल्या  नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गोपाळ पवार यास  पत्नी,एक मुलगा, आई वडील असा परिवार आहे. त्याच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पर्यावरणस्नेही होळीच्या शुभेच्छा

इमेज
निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा...! संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा...! पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिल्या  मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पर्यावरणस्नेही होळीच्या शुभेच्छा मुंबई, दि. 12 - होळी व धुलीवंदना निमित्त सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी या उपक्रमाच्या अनुषंगाने आज पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना पर्यावरणपूरक पाच रंगाचा समावेश असलेले पॅकेट देऊन पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या. होळी व धुलीवंदन तसेच रंगपंचमी हा सण राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केले जाते. रंग खेळताना ते पर्यावरण व नैसर्गिक असावेत, यासाठी जनजागृती आवश्यक आहे. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक होळी, धुलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनीही पर्यावरण पूरक होळी, रंगपंचमी व धुलिवंदन साजरी करण्याचे आवाहन केले आहे. याचाच एक भाग म्हण...
इमेज
कोरो एकल महिला सघटनेचा नाविन्यपूर्ण उपक्रम:जागतिक महिला दिनानिमित्त अंबाजोगाई येथे महिला कबड्डी स्पर्धा उत्साहात  अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)... ..     अंबाजोगाई येथील मानवलोक च्या प्रांगणात कोरो एकल महिला संघटनेच्या माध्यमातून आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  स्मृतिदिना निमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना अभिवादन करून महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धाचे उदघाटन करण्यात आले.  या महिला कबड्डी स्पर्धेत सावित्री संघाने पहिला क्रमांक पटकावला पाच हजार रुपये मेडल व प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले तर द्वितीय  संगम राडी तांडा संघाने तीन हजार रुपये मेडल व प्रमाणपत्र,व ट्रॉफी देण्यात आले आणि  तिसरे बक्षीस सखी संघ अंबाजोगाई ने दोन हजार रुपये मेडल प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले .  या स्पर्धेसाठी एकूण आठ संघ कबड्डी स्पर्धेत उतरले व महिलांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत खेळ खेळल्या  या कार्यक्रमाचे उद्धघाटक लाभलेल्या मानवलोक च्या  मा. कल्पना ताई लोहिया, मा. अनिकेत (भैय्या) लोहिया,.मा.सविता पाटील- कबड्डी खेळाडू...
इमेज
आखिल भारतीय पेशवा संघटनेच्या धारूर तालुका अध्यक्ष पदी धनंजय कुलकर्णी अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- आखिल भारतीय पेशवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री , सचिन वाडे पाटील यांच्या आदेशानुसार व बीड जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी व तालुक्यातील समाज बांधवाच्या व महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत धनंजय कुलकर्णी यांची धारूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.  आखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने सर्व राज्यात सर्व ब्राह्माण समाज एकत्रीकरणं करून समाजातील विविध घटकातील परिवाराच्या विविध प्रकारच्या समस्या शिक्षणात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी सर्व समाजाला सोबत घेऊन सामान्य कुटूंबाना वावरताना होणाऱ्या त्रासास योग्य न्याय मिळून देणे असे या संघटनेच्या माध्यमातून विविध कार्य सुरु आहे  राज्यातील सर्व जिल्ह्यात तालुक्यात या संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून समाजासाठी कार्य सुरु आहे त्याच माध्यमातून  दि . ९मार्च २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी किल्ले धारूर येथील धनंजय कुलकर्णी यांच्या निवास्थानी बैठक घेऊन त्यांची धारूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली  ...
इमेज
  मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे तर उपाध्यक्षपदी प्रा शैलजा बरूरे व सचिवपदी गोरख शेंद्रे यांची बिनविरोध निवड अंबाजोगाई :- (वसुदेव शिंदे):- मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे  यांची तर उपाध्यक्षपदी  प्रा. डॉ. शैलजा बरुरे , तर सचिवपदी गोरख शेंद्रे यांची बिनविरोध निवड झाली.मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्यानूतन कार्यकारिणी- २०२५ ते २०३० या कालावधीसाठी नूतन पदाधिकारी यांच्या निवडीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अँड. आर.आर.निर्मळे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.       यात डॉ. राहुल धाकडे (अध्यक्ष), प्रा. डॉ. शैलजा बरुरे  (उपाध्यक्ष),मंजुषा कुलकर्णी (कोषाध्यक्ष), गोरख शेंद्रे (सचिव,) भागवत मसने (सहसचिव), तर कार्यकारिणी सदस्य म्हणून विद्याधर पांडे (मुकुंदराज कवी संमेलन) , अनिरुद्ध चौसाळकर (मासिक मैफल), प्रा. सतीश घाडगे (विशेष उपक्रम,) प्रा. संतोष मोहिते (प्रसिद्धी व तंत्रज्ञान),प्रा. रोहिणी अंकुश (भाषा दिन),प्रा. डॉ. कल्पना बेलोकर-मुळावकर(दिन विशेष) या उपक...

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

इमेज
उद्योगांमधील  प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करणार पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मुंबई, दि. ११: राज्यामध्ये उद्योगांमधून विविध प्रकारचे प्रदूषण होत असते.  प्रदूषण कमी करण्यासाठी शासन उपाययोजना करीत असते. उद्योगांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल.  या समितीच्या अहवालानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येतील. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नियम 94 अन्वये उपस्थित केलेले अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार, सदस्य देवराव भोंगळे यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेच्या उत्तरात मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण कमी करण्यासंदर्भात आमदारांची समितीही गठीत करण्यात येईल.  चंद्रपूर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक आहे. केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात 21 मार्च 2...
इमेज
  जागतिक महिला दिन: संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने महिला होमगार्डांचा सत्कार   परळी : जागतिक महिला दिनानिमित्त परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने महिला होमगार्ड निकिता मारोती कोटंबे व आरती चंद्रकांत त्रिभुवन यांचा पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश मिसाळ ,सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सौंदणकर,पोलीस हवालदार गोपीनाथ डाके, शिवाजी मुंडे , होमगार्ड इन्चार्ज सूर्यकांत बुदधे आदी उपस्थित होते
इमेज
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: पंचशील नगर कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी प्रा.विजय मुंडे  तर उपाध्यक्षपदी प्रवीण घाडगे व बंटी क्षीरसागर यांची एकमताने निवड परळी /प्रतिनिधी दि...11मार्च        भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीची कार्यकारणी पंचशील नगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या बैठकीत एक मताने जयंती उत्सवाचे अध्यक्ष म्हणून परळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती प्रा.विजय मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण घाडगे व बंटी क्षीरसागर यांची निवड करण्यात करण्यात आली.       पंचशील नगर येथील बौद्ध विहारात मिलिंद क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राजन वाघमारे,जि.प.सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू शेठ),युवा नेते राहुल कराड, कैलास डुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली सचिवपदी बंटी आचार्य, तर कोषाध्यक्षपदी अण्णासाहेब सरवदे,  संरक्षण प्रमुख पदी अक्षय ढगे, किरण जगताप मिरवणूक प्रमुखपदी अनिल सरवदे, सचिन सरवदे तसेच   जयं...
इमेज
  आळंदीत परळीच्या कन्या विजयाताई दहिवाळ यांचा महिला दिनी सन्मान आळंदी, प्रतिनिधी...     ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने राज्यातील सोनार समाजातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला याच शानदार सोहळ्यात परळीच्या कन्या विजयाताई दहिवाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,फेटा विशेष प्रमाणपत्र देऊन जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले.      ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या राज्यात सोनार समाजाच्या शाखा आहेत त्या सर्व शाखांना एकत्रित करून सोनार समाजातील विविध क्षेत्र उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान केला जातो गेली दहा वर्षापासून ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा साजरा करत असते यावेळी यावेळी परळीच्या कन्या सुप्रसिद्ध चित्रकार स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय दहिवाळ गुरुजी यांच्यात विजयाताई दहिवाळ यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात व सोनार समाजासाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून श्री क्षेत्र आळंदी येथे ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मान चि...
इमेज
परळी औष्णिक विद्युत केंद्रात महिला दिन उत्साहात वीज निर्मितीत महिलांचा सक्षम सहभाग- मुख्य अभियंता सुनिल इंगळे परळी वैजनाथ, प्रतिनिधी वीज निर्मितीत महिलांचा सक्षम सहभाग असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांनी केले.ते परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीत  जागतिक महिला दिनानिमित्त   आयोजित कार्यक्रमात बोलत होते.शक्तीकुंज येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस सुरुवातीला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनिल इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, चार्टर्ड अकाउंटंट संकेत मंत्री, अनिता इंगळे, अनिता महाजन आणि मनीषा अवचार उपस्थित होते. विचारपीठावर उपमुख्य अभियंता महेश महाजन, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड आणि सुरक्षा अधिका...

संपूर्ण मुंडे कुटुंब धनंजय मुंडे यांच्या पाठीशी - बंधू अजय मुंडे

इमेज
संपूर्ण मुंडे कुटुंब धनंजय मुंडे यांच्या पाठीशी - बंधू अजय मुंडे कौटुंबिक विषयात चुकीचे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र - अजय मुंडे यांची स्पष्टोक्ती आ.सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबात नाराजी असल्याच्या केलेल्या वक्तव्याचे बंधू अजय मुंडे यांच्याकडून खंडन बीड (प्रतिनिधी) - आमचे बंधू तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी येथील पंढरी निवासस्थानाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले असल्याने मागील काही महिन्यांपासून ते आमच्या नाथ्रा या जन्मगावी असलेल्या घरी राहण्यासाठी आई व कुटुंबासह स्थलांतरित झालेले असून, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र तरीही आता कोणत्याही आरोप करायला शिल्लक राहिलेले नसल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबात नाराजी आहे धनु भाऊंच्या आई नाराज होऊन गावी गेल्या, त्यांचे भाऊ नाराज आहेत, अशा प्रकारच्या वल्गना करत धादांत खोटे व निराधार आरोप केले असून, संपूर्ण मुंडे कुटुंब हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीला केवळ बदनाम करण्यासाठी आज पर्यंत कुटुंबापर्यंत कधीही कोणीही आरोप केलेले नाहीत असे वक्तव्य, धनंजय मुंडे यांचे बंधू तथा ज...
इमेज
लग्नाचे आमिष दाखवून पाच महिने अत्याचार; एका युवकाविरोधात गुन्हा परळी (प्रतिनिधी)  लग्नाचे आमिष दाखवुन व मोबाईलमध्ये असलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत साडेसोळा वर्षाच्या मुलीवर पाच महिने बलात्कार केल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी एका युवकाने  १६ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत व माझ्याकडे तुझे फोटो असुन ते आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ऑगस्ट २०२४ ते २४ जानेवारी २०२५ या काळात सतत बलात्कार केला.याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दि.१० मार्च रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज रामकिसन कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जाधवर हे करत आहेत.

प्रासंगिक लेख...........

इमेज
  धन्य तुकोबा समर्थ ! ✍️ शब्दांकन:- बब्रुवान शेंडगे पाटील   ज गद्गुरु तुकाराम महाराज ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा २०२५ चे औचित्य साधून श्रीक्षेत्र देहू येथे सर्व वारकरी फडकरी श्रीक्षेत्र भंडार डोंगर संस्थान भामचंद्र डोंगर संस्थान घोरडा संस्थांचे पदाधिकारी पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दानशूर व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९/०३/२०२५ ते १७/०३/२०२५ रोजी भव्य दिव्य स्वरूपात अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (वैकुंठ गमन तुकाराम बीज) चे औचित्य साधून शांती ब्रह्म हभप गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर बाबा देहु संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे भंडारा डोंगर संस्थांचे अध्यक्ष ह भ प काशीद महाराज यांच्या शुभहस्ते भंडारा डोंगरासह तुकाराम महाराज मंदिर तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधना केली आहे त्या सर्व तपभूमीवर हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी करण्यात येणार असून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन ह भ प पांडुरंग महाराज घुले संस्थापक अध्यक्ष गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू यांनीही केले असून भंडारा डोंगराचा कार्यक्रम शंभर एकर मध्ये संपन्न होत आ...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यतिथी साजरी  परळी प्रतिनिधी...... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.       क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि  भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ अर्चना चाव्हण यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर...

मुला बाळांना सोडून जोडपे झाले सैराट

इमेज
दोन लेकरांची आई एका मुलाच्या बापा सोबत पळाली ! मुला बाळांना सोडून जोडपे झाले सैराट   केज :- प्रेमाला वय आणि बंधन नसते. असे म्हणतात पण मनाची नसेल तरी जनाची हवी ! केज शहातून एक जोडपे फरार झाले असून त्यातील दोघेही विवाहित आहेत. त्या महिलेला दोन मुले आणि त्याला एक मूल असताना दोघांनी आपल्या कुटुंबाचा किंवा मुला बाळांचा विचार न करता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली जोडप्यांनी धूम ठोकली. या बाबत केज पोलीस ठाण्यात ते दोघे हरवल्याची वेगवेगळी तक्रार दाखल झाली आहे. केज शहरात राहत असलेली २५ वर्षीय तरुणी आणि २९ वर्षाचा तरुण यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र ते दोघेही विवाहित असून त्या तरुणीला तिच्या पती पासून दोन मुले आहेत तर. तिचा प्रियकर सुद्धा विवाहित असून त्यालाही एक मूल आहे. मात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यांनी आपापल्या मुलांचा विचार न करता सोबत धूम ठोकून पळून गेले आहेत. या सैराट प्रकरणाची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र यामुळे दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होवू शकतात याची दोघांनी का जाणीव झाली नसावी ?  दोघांच्या कुटुंबातील लोकांनी केज पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल...
इमेज
  जागतिक महिला दिना निमित्त आरती सोनेसांगवीकर  आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)   अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने "जागतिक महिला दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अंजली कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून विधिज्ञ ऍड.कल्याणी विर्धे,सुजाता धर्माधिकारी,दत्त संगीत विद्यालयाच्या संचालिका लता पत्की,सेवानिवृत्त प्राचार्य दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते. अ.भा.पे.संघटना बीड शाखाध्यक्षा आरती मिलिंद सोनेसांगवीकर यांना या वर्षीचा "आदर्श महिला पुरस्कार" देऊन  गौरवण्यात आले.      महिला दिना निमित्याने घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा व अंताक्षरी स्पर्धेतील शिल्पा सेलुकर,प्रभावती राडीकर, अंजली देवगावकर,अमृता चिक्षे, यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. उज्वला कुलकर्णी यांच्या जन्मदिना निमित्ताने शुभेच्छा देण्यातआल्या. अखिल भारतीय पेशवा संघटनेचे पदाधिकारी संजय कार्याध्यक्ष सुधीर धर्माधिकारी, सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी,सोनेसांगवीकर,उपाध्यक्ष अभय जोशी,कोषाध्यक्ष भास्कर देशपांडे, उद्योजक विवेक वालेक...
इमेज
  महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकारणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प ना. पंकजा मुंडे यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत मुंबई, ।दिनांक १०। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या दिशेने नेणारा आणि महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकारणारा असून देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर नेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत पशुसंवर्धन, पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. विकासा बरोबरच रोजगार संधीवर भर देणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.     अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावर प्रतिक्रिया देतांना ना. पंकजाताई मुंडे यांनी हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीला चालना देणारा असल्याचे म्हटले आहे. शेती, शिक्षण, सिंचन, महिला, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, मनुष्यबळ विकास, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या स...

शेकडो विवाह इच्छुकांना लाभ

इमेज
  लिंगायत कोष्टी समाज संस्थेच्या वतीने वधू-वर पालक परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद वधू-वर परिचय मेळावे विवाह जुळवण्यासाठी उपयुक्त – डॉ. नंदकुमार वसवाडे अंबाजोगाई (प्रतिनिधी) – समाजातील वधू-वरांच्या विवाह जुळवण्यासाठी ओळख व संवाद होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा मेळाव्यांमुळे पालकांना आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळते. त्यामुळे वधू-वर परिचय मेळावे नियमितपणे आयोजित होणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे यांनी व्यक्त केले. संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 9 मार्च 2025 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, माळीनगर, अंबाजोगाई येथे वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेकडो वधू-वर पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. वसवाडे म्हणाले, "प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलामुलींना चांगला जीवनसाथी मिळावा. अशा मेळाव्यांमुळे योग्य जोडीदार शोधण्यास मदत होते आणि विवाह जुळवणीसाठी बाहेर फिरण्याचा त्...
इमेज
रोहित शर्माने रचला इतिहास रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आता इतिहास रचला आहे. आतापर्यंत जी गोष्ट रोहित शर्माला कधीच करता आली नव्हती, ती रोहित शर्माने या सामन्यात करून दाखवली आहे.रोहित शर्मा हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुरता अपयशी ठरला आहे, त्याचे पोटपुढे आले आहे, तो फिट नाही, अशी टीका त्याच्यावर होत होती. पण या टीकेला रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अशी देदिप्यमान कामगिरी केली की, सर्व टीकाकारांची तोंडं त्याने एकाच सामन्यात बंद करून दाखवली.रोहित शर्मा आतापर्यंतच्या चाही सामन्यात धडाकेबाज सुरुवात करत होता, पण त्यानंतर तो लवकर बाद होत होता. रोहित शर्माला या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये लौकिकाला साजेशी खेळी करता आली नव्हती. पण फायनलमध्ये रोहित शर्माने मात्र तुफानी फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि त्याने आपला फॉर्म कसा मोक्याच्या वेळी येऊ शकतो, हे दाखवून दिले. रोहित शर्माने फायनलच्या सामन्यात अशी दणकेबाज सुरुवात केली की, त्याची तो...
इमेज
खळबळजनक: आ.संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अंजली दमानियांचा नवा दावा   मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केवळ बीडच नाही, तर संपूर्ण राज्यभरात त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी होत आहे. बीडमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याचं मागील अनेक दिवसांत समोर आलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.अंजली दमानिया यांनी नवा दावा केला आहे. बीडमधील एका ख्यातनाम वृत्तपत्राच्या संपादकाने आपल्याला पुराव्यासह काही गोष्टी पाठवल्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात काही पुरावे सादर केले आहेत. पण त्यांनी ते पुरावे आपल्याला एका वृत्तपत्राच्या संपादकाने दिल्याचं म्हटलं आहे.अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यात काय म्हटलं? अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यात म्हटलंय, 'समोर आलेला व्हिडिओ १२ डिसेंबरचा आहे. या व्हिडिओमध्ये सतीश शेळके आणि गणेश भरणारे जय मल्हार बागल यांनी टाटा शोरू...