पोस्ट्स

मार्च १६, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
शाहु, फुले, आंबेडकर, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा शाहू फुले आंबेडकर १६५ अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना VJNT शाळासहिंता लागू करून नियमित वेतनश्रेणी प्रमाणे १०० टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवणे बाबत. 21 मार्च शुक्रवार रोजी शाहू फुले आंबेडकर,अनु.जाती आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत्तर संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री यांना जिल्हाधिकारी सोलापूर समाज कल्याण सोलापूर यांच्यामार्फत संघटनेकडून निवेदन देण्यात आले.       शाहु, फुले, आंबेडकर १६५ आश्रमशाळा योजनेत असलेल्या बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे सरांनी १८ वर्षापासून वेतन नसल्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. नागरगोजे सरांना श्रद्धांजली. मृत शिक्षकांच्या कुटुंबाला रू.१०,००,०००/-(दहा लाख रूपये) ची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.शासनाकडून या शाळांना न्याय मिळावा अशी भावना ययेथे व्यक्त करत आहे गेल्या अनेक वर्षापासून शाहू फुले आंबेडकर १६५ निवासी आश्रमशाळा गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात.अनेक वर्ष...
इमेज
  १४ एप्रिलपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी नसेल तर दूध, साखर, भाजीपाला बंद ! शेतकऱ्यांचा एल्गार पुणे (प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिलच्या जयंतीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, तर साखर कारखान्यांकडून बाहेर पाठवली जाणारी साखर तसेच शहरांना मिळणारे दूध आणि भाजीपाला यांचा पुरवठा बंद करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात प्रत्येक तालुक्यात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला जाईल, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या पूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आणि राज्यातील पहिले आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव कर्पे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी संघटनेने पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाला घेराव घातला होता. यावेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय किसान संघाचे अध्यक्ष जसबिरसिंग भाटी, हरियाणाचे शेतकरी नेते देवसिंह आर्य, कर्नाटकचे माजी मंत्री नाईक, प्रदेश उप...

वैद्यनाथ कॉलेज: ‘बुक टॉक’ कार्यक्रम

इमेज
  “चार्ल्स डार्विनच्या ग्रंथाची चिकित्सा – विद्यार्थ्यांना नवदृष्टी-डॉ. टी ए गित्ते वैद्यनाथ कॉलेज ‘बुक टॉक’ कार्यक्रम उत्साहात संपन्न   परळी ......परळी जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज, परळी येथे दि. २० मार्च २०२५ रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘बुक टॉक’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. टी. ए. गित्ते  (विभागप्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, वैद्यनाथ कॉलेज) यांनी चार्ल्स डार्विन यांच्या ‘On the Origin of Species’ या ग्रंथावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य महोदय, तर उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड विशेष उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. एम. जी. लांडगे यांनी केले.   डॉ. गित्ते  यांनी आपल्या व्याख्यानात डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताची संकल्पना, त्याचे विज्ञान व समाजावरील परिणाम, तसेच जीवसृष्टीतील नैसर्गिक निवडीचा महत्त्वाचा सिद्धांत स्पष्ट केला. उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी यावेळी डार्विनचे महत्त्वाचे सिद्धांत उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच सर्वच प्राण्यांच्या अस्तित्वरच्या प्रश्नाव...
इमेज
  परळी लोकन्यायालयात प्रकरणे 122 प्रकरणे तडजोडीने निकाली परळी वैजनाथ.....  परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली.          दिनांक 22  मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व व दाखल प्रकरणे मिटले 122 आणि रक्कम वसुली 1 कोटी 38 लाख 18 हजार 244 रुपयांची बँक पतसंस्था यांची वसुली झाली आहे .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या एस बी गणाप्पा न्या डि व्ही गायकवाड ॲड सायस मुंडे ॲड प्रविण फड  यांनी काम पाहिले. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड ॲड आर व्हि देशमुख .ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे .ॲड दिलीप स्वामी  ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड दस्तगीर सचिव ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड.नागापूरकर ॲड जीवनराव देशमुख ॲड अनिल मुंडे ॲड गजानन पारेकर...

सदेह वैकुंठगमन सोहळा ठरला नेत्रदीपक

इमेज
  तुकाराम तुकाराम नाम घोषाने देहूनगरी गेली दुमदुमून  सदेह वैकुंठगमन सोहळा ठरला नेत्रदीपक ----------------------------------   ✍️ बब्रुवान.ज.शेंडगे पाटील ,     ( संस्थापक अध्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान)  ---------------------------------- या वर्षीची बीज जगद्गुरु तुकाराम महाराज यांना 375 वर्षे पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमांनी देहू नगरीमध्ये साजरी झाली. 375 वर्षांनी पुन्हा एकदा भंडारा डोंगराची अनुभूती आली. सदेह वैकुंठ गमनाचे औचित्य साधून भंडारा डोंगर येथे या कार्यक्रमाचे निमंत्रण ह भ प ज्ञानोबा माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली दिनांक आठ तीन 2025 ते 17 3 2025 या कालावधीमध्ये भव्य दिव्य गाथा पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह   जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा व महाराष्ट्रातील ख्यात किर्त कीर्तनकारांची सेवा संपन्न झाली.        या अनुपम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याची भाग्य आम्हाला याची देही याची डोळा पहावयास मिळाली या कार्यक्रमाच्या संदर्भात हा शब्द प्रपंच आपल्या लोकप्रिय दैनिकासाठी करीत आहे प्रचंड भाव...
इमेज
  सोमवारी ईपीएस-1995 पेन्शनसाठीचे  जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार  अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- सर्व ईपीएस सभासदांना कळवण्यात येते की दि. २४ / ३ / २०२५ सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता बीड येथे जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालया समोर समोर उपस्थित राहून तिथे आपणा सर्वांना आपल्या पेन्शनच्या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान साहेब यांना जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत द्यावयाचे ठरले आहे तरी आपणा सर्वांची उपस्थिती महत्वपूर्ण असून ज्यांच्याजवळ टी-शर्ट आहे त्यांनी टी-शर्ट  घालून घ्यावे तसेच सध्या मोठया प्रमाणात ऊन्हाचा तडाखा असल्यामुळे डोक्यावर संरक्षण म्हणून गमजा देखील सोबत  आणावा तसेच सर्वांनी वेळेवर हजर राहावे व या कार्यक्रमासाठी मदत करावी अशी विनंती कमांडर साहेब यांनी केली असून आदेश दिल्यामुळे आपणास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा अध्यक्ष दादा देशमुख यांनी केले आहे.
इमेज
श्री. शंकर विद्यालयात जागतिक वन दिनानिमीत्त कार्यक्रम घाटनांदुर (प्रतिनिधी )           ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शंकर विद्यालय घाटनांदुर येथे २१ मार्च जागतिक वन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही एल गिते तर प्रमुख पाहूणे म्हणून वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ वृक्षप्रेमी सुधाकर देशमुख , वनपरिमंडळ अधिकारी शिंगटे मॅडम , वनरक्षक व्ही एम दौंड, गुट्टे मॅडम, मुंडे तसेच पक्षिमित्र तथा साहित्यीक, कवि नागनाथराव बडे आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती . यावेळी सुधाकर देशमुख यांनी या दिनाचे महत्व विषद करून वनसंपदा जतन करण्याचा सल्ला दिला . त्यांनी तालासुरात गायिलेल्या उजाड झाले डोंगर माथे, उजाड झाला गाव, एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड लाव या कवितेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली . प्रास्ताविक शिंगटे मॅडम यांनी केले . यावेळी नाना बडे यांनीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले . अध्यक्षीय समारोप प्राचार्य व्ही . एल . गिते सर यांनी केला . सुत्रसंचलन अंकुश माले, परसराम फड यांनी तर आभार गोस्वामी य...
इमेज
सख्ख्या मावस भावानेच तेरा वर्षाच्या अल्पवयीन मावस बहिणीला पळवून नेले केज :- मावशी व काका हे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चक्क नात्याने सख्खा मावस भाऊ असलेल्या नराधमाने त्याच्या तेरा वर्षाच्या मावस बहिणीला फुस लावून पळवून नेले आहे. केज तालुक्यातील एका वस्तीवर आई -वडिलां सोबत राहत असलेल्या तेरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे दि. २० मार्च रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी बाहेर गावी गेले होते. ही संधी साधून त्या अल्पवयीन मुलीचा मावसभाऊ त्यांच्या घरी आला. त्याने दि. २१ मार्च रोजी मध्यरात्री २:३० वा. च्या सुमारास चहा प्यायला म्हणून अल्पवयीन मावस बहिणीला त्याने आणलेल्या गाडीत घेवून गेला. मात्र तो परत घरी आला नाही. मुलीच्या नातेवाईकांनी  दोघांचा शोध  घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. म्हणून दि. २१ मार्च रोजी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून अल्पवयीन मावस बहिणीला अज्ञात कारणासाठी पळवून नेले म्हणून मुलीच्या मावसभावा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ११३/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा त...
इमेज
  रामकृष्ण बांगर यांच्याकडून  ईफ्तार पार्टी  अमोल जोशी/पाटोदा.... पाटोदा येथे दरवर्षीप्रमाणे गेल्या 29 वर्षापासून सतत सहकार महर्षी रामकृष्ण  बांगर  वतीने पाटोदा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांसाठी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन दर्गावली मज्जिद राजमहंमद चौक येथे करण्यात आले होते . यावेळी हिंदू मुस्लिम बांधव यांची उपस्थिती जास्त प्रमाणात होती. यातूनच सामाजिक ऐक्य हे पाटोदा शहरातून सिद्ध  आहे. . यावेळी रामकृष्ण बांगर यांनी सर्व मुस्लिम बांधवाला रमजानच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी  पाटोदा तालुक्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
  वसंतदादा पाटील महाविद्यालयात अतिथी व्याख्यान उत्साहात  अमोल जोशी / पाटोदा - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २१ मार्च रोजी शारीरिक शिक्षण विभागामार्फत अतिथी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिरूर कासारच्या कालिकादेवी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. राजेश क्षीरसागर, बीडच्या सौ. केएसके महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भागचंद सानप उपस्थित होते. व्यासपीठावर कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. विनोदचंद्र पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी व्याख्यात्यांचा परिचय डॉ. विनोदचंद्र पवार यांनी करून दिला.  'शारीरिक शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्व' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. भागचंद सानप यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत शारीरिक शिक्षण मानवी जीवनाशी कसे निगडित आहे व इतर सर्व विषयांचा शारीरिक शिक्षण विषयाशी कसा परस्पर सहसंबंध आहे हे सविस्तर विषद केले. अध्यक्षीय समारोपात प्...
इमेज
प्रा.गोविंद जाधव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते होणार अंबाजोगाई येथे सन्मान अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :- राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा'आदर्श पत्रकार पुरस्कार' प्रा गोविंद जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराचे वितरण दिनांक २३ मार्च २०२५ रविवार रोजी प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉ. विठ्ठलराव लहाने व सुप्रसिद्ध अभिनेते सुनिल गोडबोले यांच्या हस्ते मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे. राजर्षी शाहू मल्टीपर्पज असोसिएशन लातूर व ढगेज् कोचिंग क्लासेस अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना प्रतिवर्षी आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते  त्यात आदर्श शिक्षक, समाजरक्षक, उद्योजक, पत्रकार आणि समाजसेवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रतिभावंत व्यक्तींना गौरविण्यात येते यंदाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रा गोविंद राजाराम जाधव यांना जाहीर झाला असून त्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार ...
इमेज
आत्महत्याग्रस्त शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियाला ॲड माधव जाधव यांनी केली २५ हजार रुपयांची मदत अंबाजोगाई (वसुदेव शिंदे): देवगाव ता.केज जिल्हा बीड येथील  रहिवासी असणारे शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी नुकतीच काही दिवसापूर्वी बीड येथील बँकेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली. १८ वर्ष शिक्षकाची नोकरी मोफत केल्यानंतर सुद्धा त्यांना  पगार चालू न झाल्यामुळे धनंजय नागरगोजे यांनी तीन वर्षाच्या लहान मुलीला उद्देशून फेसबुक वर पोस्ट टाकून स्वतःची जीवन यात्रा संपवली. मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना तीन वर्षाची एक लहान मुलगी व त्याचप्रमाणे त्यांची पत्नी ही सहा महिन्याची गरोदर आहे.घरामध्ये वृद्ध आई-वडील आहेत.अशा परिस्थितीमध्ये धनंजय नागरगोजे  यांनी अतिशय टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली.त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखामध्ये व संकटामध्ये आहे. ॲड माधव जाधव यांनी देवगाव ता.केज जिल्हा बीड येथे जाऊन मयत धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मयत धनंजय नागरगोजे यांचे वडील भानुदासराव नागरगोजे व भाऊ गणेश नागरगोजे यांच्याकडे जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान मार्फत २५०००-०० रुपया...

दोघा बाप-लेकावर गुन्हा दाखल

इमेज
  रस्त्यात मोटार सायकल उभी का केली म्हणून शेतकऱ्यास गजाने बेदम मारहाण ! दोघा बाप-लेकावर गुन्हा दाखल केज :- सौंदणा ता. केज शिवारात एका शेतकऱ्यास दोघा बापलेकाने गजाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनगट फॅक्चर झाले असून गंभीर जखमी झाले आहेत. तर पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर सुज आली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.        सौंदणा ता. केज येथील शेतकरी चंद्रकांत कविदास ढोबळे वय (४८ वर्ष) हे बनसारोळा येथे वास्तव्यास असून त्यांची सौंदणा शिवारात शेती आहे. हनुमंत श्रीरंग काकडे व त्यांच्यात वाटेवर गाडी लावण्या वरून कुरबुर झाली होती. दोन दिवसांनी १८ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पिकाला पाणी देण्यासाठी चंद्रकांत ढोबळे गेले असता हनुमंत काकडे व त्याचे वडील श्रीरंग काकडे या दोघांनी आता कुठे जातोस ? त्या दिवशी गाडी बाजूला का काढायला लावलीस. असे म्हणत काठीने व गजाने चंद्रकांत ढोबळे यांच्या मनगटावर, पोटरीवर, डोक्यावर, पाठीवर मार दिला.  या मारहाणीत त्यांचे मनगट फॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर मारल्...
इमेज
  सेवानिवृत्त गटविकास अधिकारी काशिनाथ रापतवार यांचे निधन अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) :- अंबाजोगाई येथील सेवा निवृत्त गट विकास अधिकारी काशिनाथ रापतवार  वय ८५ यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि २१ रोजी दुःखद निधन झाले आहे.  त्यांच्यावर दासोपंत परिसर येथिल स्मशानभूमीतदुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या सेवकाळात ते एक मनमिळाऊ पण शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात्य तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर ज्यामध्ये राजकीय, सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. काशिनाथ रापतवार हे जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे काका तर शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांचे वडील होते. यावेळी श्रद्धांजली अर्पण करतांना अनेक मान्यवरांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
इमेज
धुनकेश्वर अर्बनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सह ११ जणांवर गुन्हा चाळीस लाख रूपयांची आर्थिक फसवणुक माजलगाव: शहरातील धुनकेश्वर अर्बन निधी लि. माजलगाव या संस्थेत ठेवलेल्या ४० लाख २५ हजार ३६३ रूपयांच्या ठेवी मिळत नसल्याने त्रिंबक म्हतारबा यादव यांच्या फिर्यादीवरून धुनकेश्वर संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाखाधिकारी व इतर अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धुनकेश्वर अर्बनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी ज्यादा व्याजदराचे अमिष दाखवत ठेवी ठेवण्यास सांगीतले व तुम्हाला गरज पडतील त्यावेळेस वापस देउ असे आश्वासन दिले. त्यामुळे त्रिंबक यादव यांनी घरगुती व्यवहारातील पैसे आठ लाख ८४ हजार ५६२ रुपये ,चार लाख रूपये, दोन लाख रूपये, तीन लाख रूपये, चार लाख रूपये असे विवीध ठेव पावती क्रमांकाने एकुण एकविस लाख ८४ हजार ५६२ रूपयांच्या ठेवी जमा केल्या. पत्नी कौशल्या त्रिंबक यादव यांच्या नावे आठ लाख तीन हजार १२९, मुलगी कावेरी अनंत खेत्री यांच्या नावे ३७ हजार ६७२, पाच लक्ष रूपये, पाच लक्ष असे एकुण १० ला...
इमेज
अंबाजोगाई येथील पत्रकार दादासाहेब कसबे यांना पितृशोक   अंबाजोगाई( वसुदेव शिंदे) अंबाजोगाई शहरातील जेष्ठ पत्रकार व अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब कसबे यांचे वडील आश्रुबा नामदेव कसबे (वय 80) यांचे दीर्घ आजाराने गुरुवार दि २० मार्च रोजी रात्री ८:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दासोपंत मंदिर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.       आश्रूबा नामदेव कसबे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्वतः धम्मकार्याला वेळ दिला तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा आणि शांतीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्याचे काम केले. मिलिंद नगर भागात उभारण्यात आलेल्या नालंदा विहार च्या उभारणीमध्ये अश्रुबा कसबे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. स्वतः भाजी विक्रीचा व्यवसाय ते सदर बाजार नाका या ठिकाणी करत होते. व्यवसायाची तमा न बाळगता सामाजिक कार्यात त्यांनी बहुमोल असे योगदान दिले.अश्रुबा नामदेव कसबे हे गेल्या महिनाभरापासून आजारी होते त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामान...
इमेज
सारडगाव येथील दत्तधाम गोपाळपुरा येथे प्रवचन; भगवान दत्तात्रेय हे दिशादर्शक : डॉ. तुळशीराम गुट्टे परळी वैजनाथ:          भगवान दत्तात्रेय हे दिशादर्शक असून सर्वांच्या जीवनाचे कल्याण करणारे आहेत असे विचार  संत साहित्याचे अभ्यासक आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी येथे  आपल्या प्रवचनात मांडले.                          तालुक्यातील सारडगाव येथील दत्तधाम गोपाळपुरा (परळी-धर्मापुरी रोड) येथे भंडारा (महाप्रसाद) व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने संत साहित्याचे अभ्यासक आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी प्रवचन करताना या दत्तधामाचे महत्त्व विशद केले. यावेळी परळी  येथील दत्तप्रसाद तोतला , वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आघाव, सारडगावचे उपसरपंच संदीप तांदळे, पंचायत समितीचे अधिकारी नीलकंठ दराडे आणि वैद्यनाथ बँकेचे अधिकारी विठ्ठल आघाव यांसह अनेक भाविक या प्रसंग...

✍️ ज्ञानेश्वर खंदारे , औरंगाबाद यांनी लिहलेला विशेष श्रद्धांजलीपर लेख

इमेज
परिवर्तनवादी, समतेच्या विचारांनी चालणारा चारठाणकरांचा वाडा पोरका! मरावे परी, कीर्ती रुपी उरावे I आपण आयुष्य किती जगलो, यापेक्षा कसे जगलो. कुणासाठी जगलो, याला जीवनात अत्यंत महत्त्व असते. नानासाहेब देशपांडे चारठाणकर हे जुन्या पिढीतील एक नामांकित नाव. त्यांचं निधन 19 मार्च 2025 रोजी झाले. त्यांच्या निधनामुळे चारठाणा परिसरातील, पंचक्रोशीत तर दुःख झालेच, पण अख्खा परभणी जिल्हा हळहळला. अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याची अनेक कारणे आहेत. ते ब्राह्मण समाजातील उच्च वर्णीय होते. पण मी ब्राह्मण आहे. उच्चवर्णीय आहे. असं त्यांनी कधीच मनात आणलं नाही. ब्राह्मण समाजापेक्षा त्यांच्या वाड्यावर महार , मांग,  चांभार , कुंभार , सुतार या समाजाचा वावर जास्त असायचा. त्यांच्या वाड्याच्या दारापासून ते देवघरापर्यंत अस्पृश्य समाजाची लोक बिनधास्तपणे वावर करीत असत. गावात कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही समाजाचे तंटे असो की भांडणे असो त की अन्यवाद-विवाद असो त नानासाहेबांच्या वाड्यावर च मिटत असत. त्यांच्या विचाराची गावात किंमत होती. त्यांच्या शब्दाला मान होता. म्हणून त्यांनी जो निर्णय दिला, न्या...

भावपूर्ण श्रद्धांजली......!

इमेज
  "नानासाहेब – एक विचार, एक युग" परभणी जिल्ह्याच्या मातीला सुवर्णस्पर्श देणाऱ्या नानासाहेबांचे देहावसान झाले असले, तरी त्यांचा विचार, त्यांची शिकवण, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाया आजही पंचक्रोशीत जिवंत आहे. नानासाहेब म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. त्यांच्या शब्दाला न्यायालयाचा कौल असायचा आणि त्यांच्या सल्ल्याला राज्यकर्त्यांच्या निर्णयाइतकं महत्त्व असे. गावात एखादा प्रश्न निर्माण झाला, की पोलिस ठाण्याऐवजी लोक नानासाहेबांच्या दारात गर्दी करत. न्याय, समजूत आणि संस्कार यांची त्रिसूत्री त्यांच्या प्रत्येक वर्तनात दिसायची. नानासाहेबांचं मन म्हणजे समजूतदारपणाची एक खोल नदी होती. कोणाचंही मन दुखावू नये, कोणालाही अन्यायाची छाया स्पर्श करू नये, ही त्यांची वृत्ती होती. त्यांच्या बैठकीत जे एकदा बसले, ते मार्गदर्शन घेऊनच उठत. त्यांचा दरारा असला तरी त्यांच्या बोलण्यात नेहमी मृदुता आणि आपलेपणाचा स्पर्श असायचा. म्हणूनच पंचक्रोशीत त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. राजकीय मंडळींच्या यशस्वी वाटचालीत नानासाहेबांचा आशीर्वाद आणि सल्ला नेहमीच मोलाचा ठरला. मला ज्...
इमेज
  गेल्या 30 वर्षापासून जलसाक्षरतेसाठी जनआंदोलन उभे करणारे जलदूत :मेजर एस.पी. कुलकर्णी अबांजोगाई (वसुदेव शिंदे)... जल हे जीवन आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही. ते सर्वांचे पोषण करते. राष्ट्राची भरभराट करते .म्हणून जगाच्या उज्वल भविष्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे , जिरवणे व मुरवणे हाच खरा राष्ट्रधर्म आहे . बीड जिल्हा दुष्काळग्रस्त आहे .आज पाणी आहे परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते तेव्हा लोकांनी आता पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब वॉटर बँकेच्या माध्यमातून वाचवला पाहिजे .म्हणजेच प्रत्येकाने पाण्याचा साठा करणे ही काळाची गरज आहे. आमच्या लहानपणी प्रामुख्याने १९७०च्या दशकात पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे गावातील आड , विहीर, बाराव हेच भागवायचे. पावसाळ्यात पाण्याचा साठा करण्यासाठी या साधनांच्या साह्याने पाणी साठवले जायचे. गावातील लोक पोहराच्या साह्याने पाणी काढायचे. त्यात श्रम लागायचे त्यामुळे आपोआपच लोक पाण्याचा वापर जपून, काटकसरीने ,नियोजनपूर्वक करायचे . त्यांना पाणी आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे .त्यामुळे पाण्याची किंमत आपोआपच त्यांना कळायची. म्हणून पाण्याचा वापर ते जपू...
इमेज
दुसरा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर... बीडमधील शिक्षकांचा आक्रोश, थेट सरकारलाच दिला इशारा  बीड येथील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आत्महत्या केली. नागरगोजे हे १८ वर्ष बिन-पगारी काम करत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट निर्माण झाली. दरम्यान पुन्हा धनंजय नागरगोजे होऊ द्यायचा नसेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा असे म्हणत धनंजय नागरगोजे यांच्या सहकारी शिक्षकांनी आवाज उठवला आहे."धनंजय नागरगोजे ज्या संस्थेमध्ये कार्यरत होते, तेथे काम करणाऱ्या अन्य शिक्षकांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी विनाअनुदानित शिक्षत आक्रमक झाले आहेत. धनजंय नागरगोजे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. त्याशिवाय त्यांच्या पत्नीला नोकरीमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी सहकारी शिक्षकांकडून केली जात आहे."  '१८ वर्ष काम करुन घरी फुटकी कवडी देखील दिली नाही. लेकरा-बाळांना आम्ही काय उत्तर द्यायचं' असे म्हणत सहकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शाहू फुले आंबेडकर निवा...
इमेज
बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांचा देशव्यापी लाक्षणिक संप :परळीतही सहभाग  ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुकारलेल्या 20 मार्च 2025 रोजी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी लक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या संपातील प्रमुख मागणी सर्व वर्गात पुरेशी नोकर भरती हीच आहे. बँकेच्या शाखामध्ये कमी स्टाफ असल्यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देणं बँक कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे तसेच कर्मचाऱ्यांना अतिरीक्त ताण तणाव सहन करावा लागत आहे. संघटनेच्या मागण्या मधे पीटीएस ची पुरेशी कायमस्वरूपी भरती करणे, सब-स्टाफ आणि लिपिक संवर्गात पुरेशी नोकर भरती करणे, कराराप्रमाणे विशेष सहाय्यक पदे भरणे, द्विपक्षीय संबंध पद्धतीची पुन्हा स्थापना करणे, संघटना कार्यालये संघटनांना पुन्हा उपलब्ध करून देणे, डी-ज्यूरे कराराचे काटेकोर पालन करणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. या संपा मध्ये बँकेचे कर्मचारी भाग्यश्री साखरे, मीना जोशी, दीपक घाडगे, शिवरत्न आघाव, सुंदर गायकवाड सामील झाले आणि संप यशस्वी केला.
इमेज
  पोलीस ठाण्याच्या आवरातच महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेतले ! केज :- परीक्षेला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेलेल्या घटनेला दीड महिना लोटला तरी तपास लागत नसल्याने संतप्त मुलीच्या आईने युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील बारावीच्या वर्गात शिकत असलेली ऋतुजा व्यंकट माने ही अल्पवयीन मुलगी ही दि. ५ फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आपेगाव येथे तिच्या मामाच्या मुली सोबत प्रात्यक्षिक परीक्षेला गेली होती. त्यावेळी तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ हरीभाऊ काळे आणि आत्या मिरा हरीभाऊ काळे यांनी तिच्या सोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून दि. १५ फेब्रुवारी रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ काळे आणि मिरा काळे या दोघा विरुद्ध गु. र. नं. ५०/२०२५ भा. न्या. सं. १३७(२), ३(५) दाखल करण्यात आलेला आहे. ...
इमेज
  मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेवून बिल काढण्यासाठी ५० हजार रु. मागितले सरपंच पतीचा पंचायत समितीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न ! केज :- घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे शोषखड्डे व सार्वजनिक शौचालय बांधकाम या कामांची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन बिल काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला सरपंचाकडे ५० हजार रुपयेची मागणी केली. त्या पैकी त्यांना २० हजार रु. देऊनही ३० हजार रु. न दिल्यामुळे त्यांनी बिल काढले नसल्याने व्यथित होऊन संतप्त झालेल्या सरपंच पतीने केज पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला.  केज तालुक्यातील डोका येथील महिला सरपंच कमल गोरख भांगे यांनी गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी नियोजन यासाठी आणि सार्वजनिक शौचालय याची कामे केलेली आहेत. सर्व कामे पूर्ण होऊन देखील त्याची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन त्यांच्या बिलासाठी त्यांनी वारंवार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कागद-पत्रांनिशी मागणी केली. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता आंधळे, कनिष्ठ अभियंता चव्हाण आणि शाखा अभियंता वंदना साळवे या दोघांनी सरपंच पती गोरख भांगे यांच्याकडे ५० हजार रु. ची...
इमेज
  प्राचार्य आबासाहेब हांगे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान  अमोल जोशी  / पाटोदा - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांना नुकताच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत बीड जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार घोषित करण्यात आला होता. १८ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाचा विभागीय पुरस्कार वितरण सोहळा देवगिरी महाविद्यालयात थाटात संपन्न झाला. याच सोहळ्यात प्राचार्य आबासाहेब हांगे यांना सदरील पुरस्काराचे वितरण करून गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर तेजनकर, करिअर कट्टा बीड जिल्हा प्रमुख प्राचार्य प्रोफेसर  विधाते, पुण्याच्या मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर मदने उपस्थित होते.
इमेज
अठरा वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या गेवराई, प्रतिनिधी.. गेवराई- अठरा वर्षीय युवकाने घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी बीडच्या गेवराईत घडली.दरम्यान आत्महत्या कशामुळे केली याचे कारण आद्याप तरी स्पष्ट झाले नाही.     शिवराज निलेश शेरे रा.रांजणी ता.गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.सध्या सुगीचे दिवस असल्याने कुटुंबीयातील सर्व सदस्य गहू कापणी करीता शेतात गेले होते.दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शिवराज शेरे याने घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली.शाळेतून त्याचा धाकटा भाऊ घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार पाहता  शेतात कुटुंबीयाकडे धाव घेत घटनेची माहीती दिली. गेवराई पोलिसांना माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शिवराज याच्या मृतदेहाचे रात्री आठ वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रांजणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.    दरम्यान, शिवराज हा अकरावीचे शिक्षण घेत होता.अवघ्या अठरा वर्षात पदार्पण केलेल्या शिवराज याने कशामुळे हे टोकाचे पाऊल उचलले याचे कारण समोर आ...
इमेज
  बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी विशाल साळुंके यांची फेरनिवड :गजानन मुडेगावकर नवे कार्याध्यक्ष मुंबई : बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी विशाल साळुंके यांची फेरनिवड करण्यात आली आहे.तर नवनिर्वाचित कार्याध्यक्ष म्हणून अंबाजोगाई येथील पत्रकार गजानन मुडेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी आज ही घोषणा केली. बीड जिल्हा पत्रकार परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपली आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी नवी कार्यकारिणी निवडण्यात आली असून.आज काही पदांच्या नियुक्तया जाहीर करण्यात आल्या असल्या तरी उर्वरित पदाच्या नियुक्तया नवी कार्यकारिणी परिषदेशी चर्चा करून जाहीर करण्यात येईल. नियुक्तया करताना नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून गजानन मुडेगावकर,  सरचिटणीस म्हणून गेवराई येथील सुभाष सुतार आणि कोषाध्यक्ष म्हणून परळी येथील धनंजय आरबुने यांची तर उपाध्यक्षपदी पाटोदा येथील सचिन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी ...

शाहु-फुले-आंबेडकर आश्रमशाळांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार!

इमेज
केज तालुक्यातील 'त्या' मयत आश्रमशाळा शिक्षकाच्या कुटुंबाला खा. सुप्रिया सुळे यांनी दिला कृतिशील आधार ! दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच मातेला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न पुणे : पगार नाही म्हणून आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. याबरोबरच त्यांना कायम रोजगार मिळावा यासाठीही त्या प्रयत्न करणार आहेत. केज तालुक्यातील केळगाव येथे आश्रम शाळेत तब्बल अठरा वर्षे काम करूनही पगार मिळत नसल्याने आपल्या अवघ्या तीन वर्षीय लेकीला पत्र लिहून माफी मागत या शिक्षकाने आत्महत्या केल्याने उभा महाराष्ट्र हळहळला होता. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेबाबत संवेदनशीलता दाखवत खासदार सुळे यांनी या कुटूंबाला पूर्णपणे आधार द्यायचा निर्णय घेतला आहे. केळगाव येथील आश्रमशाळेत धनंजय नागरगोजे हे गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत होते. वारंवार पगार मागूनही त्यांना पगार दिला गेला नाहीच उलट 'तू आत्महत्या कर' असा जीवघेणा सल्ला संस्था चलकांकडून दिला गेल्याचे स्वतः नागरगोजे यांनीच आपल्या लेकीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांसाठी...
इमेज
जीवनात मिळालेल्या प्रत्येक संधीचे रूपांतर यशात करा - डॉ.राजेश इंगोले अंबाजोगाई (वसुदेव शिंदे) वाट पाहणाऱ्या लोकांना जीवन संधी नाही तर संकटांची भेट देते त्यामुळे वाट पाहणाऱ्या लोकांच्या वाट्याला प्रयत्न करून नेणाऱ्या विजेत्यांनी जेवढे सोडलं आहे. त्यावरच समाधान मानावे लागत. त्यामुळे आयुष्यामध्ये वाट पाहण्यापेक्षा संधी निर्माण करून, मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या जीवनामध्ये प्रगतीकडे, यशाकडे वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले. अंबाजोगाई येथील व्यंकटेश नर्सिंग स्कूल येथे लॅम्प लाईटनिंग व विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवेची शपथग्रहण सोहळ्यामध्ये नर्सिंग कॉलेजच्या मुलांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर संस्थेचे प्राचार्य धनंजय शिंदे तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुष्यात कष्ट करण्याची तयारी विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे तरच जीवनामध्ये यश मिळते वैद्यकीय सेवांमध्ये व्यक्तिमध्ये सेवा, समर्पण, त्याग, साहस , प्रसंगवधान, बलिदान, प्रेम, सहकार्य, बंधुत्व हे गुण अ...

आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात मांडला प्रश्न...

इमेज
  रामराज्यात श्रीराम देवस्थानाची जमीन सुरक्षित नाही ! मौजे चकलांबा ग्रामपंचायतीच्या अतिक्रमणाचा प्रश्न आ. विजयसिंह पंडित यांनी सभागृहात मांडला मुंबई, दि.१९ (प्रतिनिधी) ः- अतिक्रमण दूर करण्याचे काम ग्रामपंचायत करते मात्र चकलांबा ग्रामपंचायतीने श्रीराम देवस्थान मालकीच्या जमीनीवर अतिक्रमण करून कचरा डेपोचे काम सुरु केले आहे. महायुतीच्या काळात ‘रामराज्य' सुरु असल्याचे लोक सांगतात मात्र या रामराज्यात श्रीराम देवस्थानाची जमीन सुरक्षित नाही अशी खंत आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत व्यक्त केली. गेवराई तालुक्यात सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना आ.विजयसिंह पंडित विधानसभेत बोलत होते. जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार आणि चकलांबा ग्रामंपचायतीने श्रीराम देवस्थान मालकीच्या जमीनीवर केलेले कचरा डेपोचे अतिक्रमण या दोन विषयाला आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत वाचा फोडली. यावेळी बोलताना आ.विजयसिंह पंडित म्हणाले की, जलजीव...

आवादाचे केबल कट......!

इमेज
चोरट्यांनी आवादा एनर्जीच्या स्टोअर मधून पाच लाख रु. च्या केबलची चोरी ! केज :- संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी संबंधित असलेले खंडणी प्रकरण आणि हत्या यामुळे चर्चेत असलेल्या आवादा एनर्जी या पवन चक्की उभारणाऱ्या कंपनीच्या मस्साजोग येथील स्टोअर मधून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख रु  किंमतीचे केबल वायर कापून नेले आहे. या बाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे खंडणी प्रकरणाशी निगडीत असल्याने चर्चेत आलेल्या आवादा एनर्जी या पवन चक्कीचे केज-बीड महामार्गावर असलेल्या मस्साजोग येथे कंपनीचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या प्रांगणात पवनचक्की उभारणीसाठी लागणारे साहित्य ठेवलेले आहे. ११ मार्च रोजी कंपनीचे इंजिनियर रमेश कुमार सैनी हे सर्व साहित्य चेकिंग करीत असताना त्या साहित्य पैकी तेथे ठेवलेले कॉपर वायर गुंडाळलेल्या दोन नेसलचे वायर कापून चोरून नेल्याची निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या कॉपर वायरची किंमत ५ लाख ६ हजार रु एवढी आहे. या चोरीची माहिती कंपनीचे असीस्टंट सिद्धेश्वर कलम यांनी कंपनीचे असिस्टंट मॅनेजर आशुतोष सिंह यांना दिली. त्या नुसार दि.१८ मार्च रोजी असिस्टंट मॅनेजर आशुतोष...