पोस्ट्स

एप्रिल २०, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  प्रविण काळे महाराष्ट्र शासनाच्या 'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी' पुरस्काराने सन्मानित परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अधिकारी पदावर कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्री. प्रविण काळे यांची ओळख आहे. आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम प्रविण काळे करत असतात. काम करत असताना अडचणी येतात पण त्या कशा सोडवायच्या हे प्रविण काळे यांच्याकडून शिकावे. कारण कामाचा व्याप कितीही असला तरी सर्वसामान्यांची सेवा करणे हा एकच ध्यास उराशी बाळगणारे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून प्रविण काळेे यांचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्र शासनाने आदर्श ग्रामपंचायत अधिकारी या पुरस्काराने आज त्यांना सन्मानित केले आहे. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा जीवने साहेब व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके साहेब, प्रकल्प संचालक पाटील मॅडम व अन्य प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद बीड येथे त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रविण काळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची पावती त्यांना मिळाली असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. प्रविण काळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल...

गायींना गुंगीचे औषध देणाऱ्यांना तात्काळ अटक करा !

इमेज
परळीतील 'त्या' संतापजनक प्रकाराची ना. पंकजा मुंडेंनी घेतली दखल गायींना गुंगीचे औषध देणाऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना परळी वैजनाथ।दिनांक २५। गायींना गुंगीचे औषध देऊन त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसल्याचा प्रकार शहरात घडल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करावी अशा सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. संदर्भिय सविस्तर बातमी: ■ *खळबळजनक व संताप आणणारी घटना: गाडी घेऊन आले, मध्यरात्रीनंतर गाईंना खाऊ घातल्या गुंगीच्या गोळ्या आणि डांबून घेऊन जाण्याचा प्रयत्न!     शहरातील स्नेहनगर भागात काल रात्री गायींना खाण्याच्या पदार्थांमधून औषध देण्याचा संतापजनक प्रकार घडला. गायींना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न होता असा संशय स्थानिक रहिवाशांना आला, त्यांनी सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडला. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक...

गुंगीची औषधे लावलेली खारीबुंदी, बिस्किटं ,शेंगदाणे व पाव घटनास्थळी आढळली

इमेज
खळबळजनक व संताप आणणारी घटना: झायलो घेऊन आले,मध्यरात्रीनंतर गाईंना खाऊ घातल्या गुंगीच्या गोळ्या आणि डांबून घेऊन जाण्याचा प्रयत्न परळीतील अनेक दिवसांपासून बहुचर्चित 'झायलो' गाडीचा 'झोल' आला समोर   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     परळी वैजनाथ शहरातील स्नेहनगर भागात मोकळ्या जागेत असलेल्या गाईंना डांबून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा खळबळजनक प्रकार दि. 25 रोजी मध्यरात्रीनंतर साधारण दोन वाजण्याच्या सुमारास घडला असुन या गाईंना गुंगीच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्याचेही पुढे आले आहे.दरम्यान याप्रकरणी आता स्नेहनगर मधील नागरिक संतप्त झाले असुन संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाई करून कडक शासन करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.            याबाबत प्राप्त माहितीनुसार ,परळी शहरातील स्नेहनगर या भागात मध्यरात्री दोन वाजल्यानंतर एक झायलो गाडी या भागात फिरत असताना दिसुन आली. ही गाडी एका मोकळ्या मैदानात थांबवून त्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानात काही लोक गाडीतून उतरले. त्यानंतर या गाडीतून उतरलेल्या लोकांनी चार गाईंना गुंगीच्या गोळ्या खाऊ ...
इमेज
  जिजामाता विद्यालय धर्मापुरी शाळेला मिळाले मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा चे पारितोषिक परळी (प्रतिनिधी )           इंद्रायणी प्रतिष्ठाण संचलित जिजामाता विद्यालय धर्मापुरी या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत रुपये एक लाखाचे नगदी रोख पारितोषिक मिळाले. या शाळेचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे .          शासनाच्या शिक्षण उपक्रमांतर्गत सन 2024 - 25 या शै . वर्षात जिजामाता विद्यालयाने सहभाग नोंदविला होता. या विद्यालयाला तृतीय क्रमांकाचे रू . १ लाखाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले .           वर्षभर शाळेमध्ये विविध कार्यक्रम - उपक्रम राबविण्या त आले . सुंदर परस बागेची निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा, शाळा परिसर स्वच्छता, गावातील रस्ते स्वच्छता अभियान, सुलभ प्रवेश प्रक्रिया, आरोग्य तपासणी, प्रबोधन कार्यक्रम, तक्रार पेटी ,पुस्तक पेढी, स्पर्धा परीक्षा, शासनाच्या विविध योजना, विज्ञान प्रयोग शाळा, सी सी टीव्ही कॅमेरे, स्वच्छता गृह यांसह शासन परिपत्रकानुसार सर्व बाबींची पूर्तत...
इमेज
विद्यार्थ्यानीवर बलात्कार प्रकरणी शिक्षकास 14 वर्षे सक्त मजुरी व 1 लाखाचा दंड सरकारी वकील ॲड. लक्ष्मण फड यांचा महत्वपूर्ण युक्तीवाद अंबाजोगाई, प्रतिनिधी.....       सन 2019 मध्ये अंबाजोगाई येथील एका शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील एका विद्यार्थ्यानीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.या प्रकरणाची अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.या प्रकरणात  पिडीतेस 1 लाख रू. नुकसान भरपाई देण्याचे  न्यायालयाने आदेश दिले असुन आरोपीस 14 वर्षे सक्त मजुरी व 1 लाख 2 हजार रूपयाच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.             या प्रकरणील हकीकत अशी की, अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्यालयातील शिक्षक आरोपी शाम वारकड याने त्याच शाळेतील एका विद्यार्थीनीवर बलात्कार केला अशा प्रकारची घटना सन 2019 मध्ये घडली होती. या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद देवुन तिच्या मुलीला क्रीडा शिक्षक आरोपी शाम वारकड याने जालना येथे स्पर्धेसाठी खेळावयास घेऊन जावुन अंबाजोगाईत आल्यानंतर तिच्यावर क्रीडा संकुल अंबाजोगाई येथे बलात्का...
इमेज
  पत्रकार अनिल भंडारी यांना पितृशोक;  मिलापचंद भंडारी यांचे निधन बीड : शहरातील सारडा संकुल येथील रहिवासी सेवानिवृत्त कंडक्टर मिलापचंद पारसमल भंडारी यांचे बुधवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ३:२० वाजता संथारा व्रताने निधन झाले. दुपारी बारा वाजेदरम्यान त्यांना प्रत्याख्यान देण्यात आले होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ८३ वर्ष होते‌. त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाम स्मशानभूमीत  गुरुवारी दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पक्षात दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे, चार भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. लोकमतचे उपसंपादक अनिल भंडारी, व्यापारी अभय भंडारी यांचे ते वडील होत. -----
इमेज
  नगर परिषदेचा कारभारच मनमानी: नागरिकांवर बेतली 'पाणीबाणी' ! पाणीपुरवठ्याचे नियोजन लावा अन्यथा तीव्र आंदोलन- रिपाई नेते माधव ताटे परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    परळी वैजनाथ नगर परिषदेचा मनमानी कारभार होत आहे मात्र भरपूर पणी असुनही नियोजनाच्या अभावाने कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी परळीकराची वणवण होत आहे.त्यामुळे पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन लावा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा रिपाई नेते माधव ताटे यांनी दिला आहे.  परळी वैजनाथ शहरातील पाणीपुरवठा नियोजन ठप्प झाले आहे.  वाण धरणामध्ये पुरेसे पाणी असतानाही पाण्यासाठी अनेक वस्त्यांमध्ये अवेळी पाणी येणे,  कधी 8 दिवसाला, कधी 6 दिवसाला, कधी 5 दिवसाला, कधी सकाळी, कधी दुपारी  कधी संध्याकाळी असे पिण्याचे पाणी सोडले जात आहे. ज्यांना बोरचे पाणी मिळत नाही अशांना याचा खूप त्रास होत आहे. पाणी विकत घ्यावे लागत आहे. सिद्धार्थनगर येथे तर पाण्याची कोणतीही एक वेळ नाही. मनाला येईल त्या कोण्या वेळेला पाणी सोडले जाईल याचा नेम नाही. याबाबत अनेक वेळा तोंडी,  फोन वर अधिकाऱ्यांना सांगूनही काही फरक दिसत नाही. यामुळेच य...
इमेज
ना.पंकजा मुंडेंचा भाजप प्रदेश कार्यालयात जनता दरबार: जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण राज्यभरातून नागरिकांची तोबा गर्दी ; प्रत्येकांची गाऱ्हाणी ऐकली  मुंबई।दिनांक २२। राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेला जनता दरबार अक्षरशः हाऊसफुल्ल झाला. राज्यभरातून आपापल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांनी यावेळी तोबा गर्दी केली होती. प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधत ना. पंकजाताईंनी त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.  भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला मंत्री महोदयांचा 'जनता दरबार' हा उपक्रम जाहीर करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पहिला जनता दरबार घेण्याचा मान ना. पंकजाताई मुंडे यांना मिळाला. आज दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान ना. पंकजाताईंनी जनता दरबार घेतला. राज्याच्या विविध भागातून आपल्या समस्या घेऊन लोकं आली होती. आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या, त्यांची गाऱ्हाणी ऐकली, निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या प्रश्नांचे जागेवर निरा...
इमेज
  रेल्वे पटरी जवळील पिंपळाच्या झाडाखालील मारुतीला दिवा लावायला गेलेल्या युवकास मारहाण ;जखमी केले, दातही पडला परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळीतील रेल्वेमार्गाच्या बाजूस असलेल्या काकरनगर जवळील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळून सिद्धेश्वरनगरमधिल फिर्यादी युवक व त्याचे साथीदार रेल्वे पटरी जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखालील मारुतीला दिवा लावायला जाताना हात उगारला व परत येताना मात्र त्याच्यावर भ्याड हल्ला करून चार ते पाच जणांनी मारहाण केली. दगड फेकून मारला  यात हा युवक जखमी झाला. या महाराणीत त्याचा दातही पडला असुन नावं माहित नसलेल्या अनोळखी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.              याबाबत पोलीस सरांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, यातील फिर्यादी समर्थ बाळासाहेब कदम वय 16 वर्षे  रा. सिद्धेश्वरनगर व त्याचे साथीदार काकानगर येथुन क्रिकेट खेळुन रेल्वे पटरीजवळील पिंपळाचे झाडाखालील मारुतीला दिवा लावण्यासाठी जात असताना आरोपीतांनी हात उगारला. तेथून परत येत असताना यातील अनोळखी पाच...

पर्यावरण वाचवा-वसुंधरा सजवा.....

इमेज
झाडे हीच आपली खरी जीवनवाहिनी : विद्यानिकेतन स्कूलने राबवला वसुंधरा दिनाचा आगळावेगळा उपक्रम !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     शहरातील विद्यानिकेतन स्कूलने जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबवून पर्यावरण विषयक जनजागृतीचा संदेश दिला.झाडे हीच आपली खरी जीवनवाहिनी हा संदेश यानिमित्ताने विद्यार्थी व पालकांना देण्यात आला.      परळी शहरातील विद्यानिकेतन स्कूल यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण विषयक जाणीव जागृती व्हावी या दृष्टिकोनातून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्यात जाणीव निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या पालकांमध्येही पर्यावरण विषयक संवेदना निर्माण करण्यासाठी विविध रोपट्यांचे वितरण करण्यात आले. परंतु हे वितरण करत असताना झाड आणि झाडापासून माणसाला प्राप्त होणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीचा संदेश दृढ व्हावा या दृष्टिकोनातून झाड आणि ऑक्सिजन किट प्रदर्शित करत  रोपट्यांचे वितरण करण्यात आले. पर्यावरण रक्षण करण्याचा एक आगळावेगळा संदेश या माध्यमातून देण्यात आला. विद्यानिकेतन स्कूलने वसुं...

उन्हाचा तडाखा वाढला...काळजी घ्या....!

इमेज
उष्माघाताने घेतला बळी!: भरउन्हात परळीच्या मोंढ्यातील हमाली करणारा युवक अचानक जागेवर कोसळला; जागीच मृत्यू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        सध्या उन्हाची प्रचंड तीव्रता असुन तापमान 41 -42 अंश सेल्सिअस वर जात आहे. भर उन्हात अनेक कष्टकरी, कामगार हे काम करत असतात. परंतु कधीकधी हे कष्टही जीवावर बेतण्याचा प्रकार घडतो. असाच काहीसा प्रकार परळीच्या मोंढा मार्केटमध्ये घडला आहे. भर दुपारच्या वेळी, भर उन्हात अचानक एका युवकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान चांदापूर येथील रहिवासी असलेल्या हा युवक मोंढ्यात हमाली व्यवसाय करत होता. या युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.         याबाबत प्राप्त अधिक माहिती अशी की, चांदापूर येथील रहिवासी असलेला सचिन बळीराम काळे वय 35 वर्षे हा युवक मोंढ्यात हमालीचे काम करतो. नेहमीप्रमाणे मोंढ्यात कामासाठी सकाळपासूनच तो आला होता.आज दिवसभरात उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला होता. या भर उन्हात त्याने कामही केले. अचानक त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. काही वेळातच तो जागेवरच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली.     ...

राज्यभरात राबवली जातेयं अभिनव संकल्पना

इमेज
पर्यावरण रक्षणासाठी ना. पंकजा मुंडे सरसावल्या ; पवई तलावाच्या स्वच्छता उपक्रमाने सुरू केली लोकचळवळ जागतिक वसुंधरा दिनी ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेण्याचे केले आवाहन राज्यभरात राबवली जातेयं अभिनव संकल्पना मुंबई, दि. 22 - पर्यावरण संवर्धनाचं वेड लागायला हवं, कारण त्यातून निर्माण होणारा ध्यास हा सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने 22 एप्रिल, 2025 जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई येथील पवई तलाव स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभ सोहळ्याचे आयोजन गणेश घाट पवई येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार दिलीप लांडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव...
इमेज
माजलगावचे ढाबाचालक महादेव गायकवाड खून प्रकरणातील तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात! ------------------------------------- माजलगाव दि.२२( प्रतिनिधी ) माजलगाव येथील गावरान ढाब्याचे मालक महादेव गायकवाड यांचा काल किरकोळ कारणावरून ग्राहकाशी वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर महादेव गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली होती. यात महादेव गायकवाड यांचा सोमवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे (सर्व रा. आनंदगाव) यांना मंगळवारी पहाटे आळंदी (पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली. माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बाजूलाच असलेली लाकडी ढिल्पी उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घालण्यात आली. तर महादेव गायकव...
इमेज
  बीडचे भूमिपुत्र भरत गिते यांची  ‘प्रासंगिक’ कार्यक्रमात बुधवारी सकाळी ११ वाजता बीड आकाशवाणी केंद्रावर मुलाखत बीड (प्रतिनिधी) :-           उद्योग क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणारे ॲल्युमिनियम मॅन बीड -परळीचे भूमिपुत्र उद्योजक भरत गित्ते यांची  ‘प्रासंगिक’ कार्यक्रमात बुधवारी दि. २३ एप्रिल रोजी बीड आकाशवाणी केंद्रावर मुलाखत ऐकण्यासाठी प्रसारण होणार आहे. तरी सर्वानी जरूर ऐकावी असे आवाहन कारण्यात आले आहे.           स्वतःच्या कामाप्रती निष्ठावंत राहून प्रामाणिकपणाने ध्येय उराशी बाळगून यशाला गवसणी घालणे शक्य आहे. मात्र त्यासाठी निराशा झटकली पाहिजे.  आपला दृष्टिकोन न्याय निवाडा करण्यापेक्षा सकारात्मक गोष्ट निवडण्यासाठीचा असावा. यातूनच कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दिला आहे.  परळीचा भूमीपुत्र असलेले उद्योजक भरत गिते यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. आशा अनेक उपयुक्त बाबी,  विविध आणि चौफेर म...
इमेज
ढाबा चालकाचा माजलगाव मध्ये खून माजलगाव दि. २० (प्रतिनिधी):- माजलगाव तालुक्यात गुंडगिरीने थैमान घातले आहे. एक घटना संपते ना संपते तोच दुसरी घटना चर्चेला उधाण आणते. अशीच एक घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग -६१ वरील माजलगाव पाथरी मार्गावर असलेल्या माजलगाव शहरा पासुन ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्र वरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड (५४ वर्षे) रा. मंजरथ रोड माजलगाव यांच्या वर २० एप्रिल रोजीच्या संध्याकाळी ७.३० ढाब्यावर बसलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकांनी बीला च्या कारणाने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ढाबा मालकाचा मुलगा (२२वर्षे) याच्या वर पण हल्ला केल्याची माहिती समजली आहे.       दरम्यान अत्यवस्थ महादेव गायकवाड यांना माजलगाव शहरातील डॉ. गिलबिले यांच्या बायपास रोड वर असलेल्या संजीवनी हॉस्पीटल मधे दाखल केले होते. त्यानंतर काही तासाने संजीवनी हॉस्पीटल चे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले यांनी शेवटच्या टप्प्यात सल्ला दिला की, महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे हलविले गरजेचे आहे, त्यावर महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे...