पोस्ट्स

मे ११, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"अगा जे घडलेचि नाही........!"

इमेज
परळीतील 'त्या' आपहरण प्रकरणी 'नवा ट्विस्ट' आला समोर ! 'किडनॅपिंग नव्हे  कोम्बिंग ऑपरेशन': किडनॅपर नव्हे ते निघाले पोलीस ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      गेल्या अकरा दिवसांपूर्वी परळीच्या मुख्य रस्त्यावरून सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास एका इसमाला चार ते पाच लोकांनी पांढऱ्या इनोव्हा गाडीत उचलून घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी अपहरण करण्यात आल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परळी पोलिसांनी याचा युद्धपातळीवर तपास केला. यातून या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ते किडनॅपिंग नाही तर पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन होते हे आता स्पष्ट झाले आहे.       राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून दि. 06/05/ 2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याचे सुमारास पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन घेवुन गेले अशी फिर्याद देण्यात आली.  यावरुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे तात्काळ ...
इमेज
सिमेंट रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न -ॲड. जीवनराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनाची चेतावणी परळी (प्रतिनिधी)   परळी शहरात नगरपालिकेच्या वतीने सिमेंट रस्त्यांवरील खड्डे डांबर टाकून बुजवण्याचा प्रकार सुरू असून, यामागे केवळ पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील रस्त्यांची डागडुजी दाखवून मलिदा लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे करण्यात आला आहे. शहरात तीर्थक्षेत्र विकास, नगरोत्थान योजना आणि विविध योजनांतून कोट्यवधी रुपये आले असतानाही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. विशेष म्हणजे, सिमेंट रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, हे केवळ पालकमंत्र्यांसमोर शहराची प्रतिमा चांगली भासावी म्हणून केले जात आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांवरील डांबर स्पॅचिंगसाठी बिल काढून पुन्हा आर्थिक बोजा टाकण्याची तयारी सुरू असल्याचा आरोपही या पक्षाकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष अ‍ॅड. जीवन देशमुख यांनी मागणी केली आहे की, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी सदरील प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. ...
इमेज
  शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरण: पिडिताचा नोॅदवला जबाब, वीस आरोपींवर गुन्हा;सात जण ताब्यात परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        तालुक्यातील टोकवाडी परिसरामध्ये काल शिवराज दिवटे या युवकाला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. या महाराणीचे व्हिडिओ व फोटो संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर जखमी झालेल्या शिवराज दिवटे या युवकावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणात दहा नावे व दहा अनोळखी अशा 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सात आरोपी ताब्यात घेतले आहेत अन्य आरोपीचा तपास सुरू आहे दरम्यान या प्रकरणात जातीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.     याबाबत शिवराज दिवटे याने दिलेल्या जबाब म्हटले आहे की,  "दि 16/05/2025 रोजी सकाळी 11.30 वा चे सुमारास जलालपुर येथे हनुमान मंदिरात पाहुण्याचा सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने माझ्या सोबत जयदीप मुंडे असे आम्ही गेलो होतो, जेवण करत असतांना तेथे ...
इमेज
  जनसेवेचे वैद्यकीय रूप – डॉ. विवेक दंडे परळी वैजनाथ – श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही परळी वैद्यनाथ नगरी आरोग्यसेवेसाठीही ओळखली जाते, आणि त्या ओळखीला समर्पितपणे आकार देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. डॉक्टर हा पेशा व्यवसायापेक्षा अधिक समाजसेवेचा आहे, हे त्यांनी आपल्या कामातून वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज 17 मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस असून, या विशेष दिनानिमित्ताने त्यांचे समाजकार्य, वैद्यकीय योगदान आणि सामाजिक बांधिलकी यांचा घेतलेला हा सन्मानार्थ लेख आहे. डॉ. विवेक दंडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ आणि आदरणीय डॉक्टर होते. त्यांनी केवळ औषधोपचार नव्हे, तर माणुसकीची सेवा केली. तोच आदर्श डॉ. विवेक दंडे यांनी आत्मसात केला. आज त्यांच्या रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण केवळ उपचारच नव्हे, तर मायेचा स्पर्श अनुभवतो. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते आर्थिक क्षेत्रातही सामाजिक भान जपत कार्यरत आहेत. सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका आज बँकिंग क्षेत्रातही आदर्श ...
इमेज
परळीत अवैध पिस्तूल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद :दोन विक्रेत्यांवरही गुन्हा, त्यांचा शोध सुरु बीड, प्रतिनिधी....               जिल्हयातील अवैध व्यवसायांच्या विरुध्द करण्यात येणाऱ्या कारवायांचा एक भाग म्हणून अवैध शस्त्रे बाळगणा-यांविरुध्द पोलीस अधिक्षक  नवनीत काँवत यांनी मोहिम उघडलेली आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करुन बीड जिल्हयात कोणत्याही प्रकारे अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याची खबरदारी घेऊन जे कोणी अवैध शस्त्रे बाळगतील अशांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे.            त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशन परीसरात दोन इसम येत असून त्यांच्याजवळ अवैध गावठी कट्टा आहे. या माहितीच्या आधारे दि. १६ मे रोजी सकाळी परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लाऊन दोन इसम नामे अमोल रा...

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

इमेज
Video Viral: परळीत युवकाला बेदम मारहाण; आठ ते दहा जण मारतायत अन् 'तो' जीवाच्या अकांताने विव्हळतोय! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळीत एका टोळक्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ८ ते १० जणांनी मिळून एका तरुणाचं अपहरण केलं आणि जंगलामध्ये नेऊन अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.              टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ८ ते १० युवक लाकडी काठी,  बेल्टने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत आहेत. हा तरुण वेदनांनी विव्हळत आहे, पण एक एक करून हे तरुण त्याला लाथा बुक्याने मारहाण करत आहेत. यात एक तरुण हा मारहाण करताना चित्रीकरण देखील करत असल्याचं दिसून येत आहे. मारहाण झालेला तरुण लिंबोटा येथील शिवराज दिवटे असल्याचं समोर आलं आहे.या घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आले असुन या प्रकरणी अद्याप पोलीसात नोंद झालेली नाही.या मारहाण प्रकरणात गंभीर जखमी युवकाला परळीतील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवि...
इमेज
  परळीतील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांचे संरक्षण व संवर्धन करा ! माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन सादर केले निवेदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग स्थान परळी वैजनाथ येथील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त करुन संवर्धन करा अशा महत्वपूर्ण मागणीसाठी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.          केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची आज परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परळीचा महत्वपूर्ण प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे असलेले श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे पाचवे ज्योतिर्लिंग हे अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षणीय स्थान आहे. या शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, शहराजवळून पवित्र नदी घनशी आणि सरस्वती नदी वाहतात. त्याची स्थिती घाणीने, अतिक्रमण केलेल्या जागेमुळे बिघडली आहे,...

Congratulations!!!!

इमेज
शेख बंधूंचे दहावीत घवघवीत यश ! शेख फैजान फारुख 93.60 टक्के तर शेख रेहान अब्दुलनबी 90.40 टक्के उत्तीर्ण परळी वै, दि. 16 (प्रतिनिधी) :- अभिनव माध्यमिक विद्यालय परळी एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च २०२५ मध्ये शेख फैजान फारुख 93.60 % व फौंडेशन येथे शेख रेहान अब्दुलनबी 90.40 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. या घवघवीत  यशाबद्दल त्यांचे  नातेवाईक व आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या दोन चुलत भावाच्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचें कौतुक होत आहे. ते लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामागे  चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनव विद्यालय व फौंडेशन शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी यांचें अभिनंदन करत त्यांच्या  उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इमेज
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता राज्यातील सर्व शहरांमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ८ मे पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी १९ ते २८ मे पर्यंत अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. प्रवेशासाठी हेल्पलाइन क्रमांक व ईमेल आयडी देण्यात आले आहेत. साधारणतः ११ ऑगस्टला कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया यंदापासून पूर्णपणे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया ८ मेपासून सुरू झाली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा वेळ, त्यांचे श्रम आणि पैसा यांची बचत होणार आहे. ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार राबविण्यात येणार असल्याने पूर्णत: पारदर्शक असेल. प्रवेश प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा काय असतील ? सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे...
इमेज
प्रामाणिक पणे जगणे हीच खरी देवपूजा-डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे  श्री क्षेत्र दत्त धाम सारडगाव  येथे अनुष्ठान समारोप  परळी :मनापासून केलेली कोणतीही पूजा देवाला मान्य होते. परंतु प्रामाणिक पनाने जगणे हीच खरी देवपूजा होय असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रसिद्ध  विचारवंत, कीर्तनकार डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी त्यांच्या 7 दिवसाच्या अनुष्ठान समारोपा प्रसंगी केले.      भगवान  शंकराचार्य यांनी प्रति काशीचा दर्जा दिलेल्या दत्त धाम येथे मौन रुपी अनुष्ठान, रुद्राभिषेक पूजन, गुरू चरित्राचे पारायण,दत्त गुरूंना भिक्षा, गो माता पूजन असे दैनंदिन कार्यक्रमझाले. दत्त गुरू सर्वांना मार्गदर्शन करणारे असून त्यांच्या दर्शन पूजनाने सर्व प्रकारचे कल्याण होते. म्हणून दत्त गुरूंचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा दत्त गुरूंचे वर्णन केले आहे.जीवनात गुरू असावा. त्यांचे शिवाय जीवन समृद्ध होत नाही. असे मौन सांगता प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला  गंगाखेडचे  रामराजे फड, प्रभाकर दहिफळे, वैभव दहिफळे, ओमकेश दहिफळे, बालाजी घुले, प्रभाकर...

पैसे मिळणे तर दूरच पण मनस्ताप सहन करण्याची वेळ !

इमेज
सरकारी कारभार- नागरिक बेजार:एक वर्ष उलटले, विंधन विहीर अधिगृहणाचे पैसे द्या: हिवरा(गो) येथे ग्रामस्थांचे उपोषण गेल्यावर्षी अधिगृहण केलं, साडेतीन महिने पाणी वापरलं, पण आता 14 दिवसाचाच आदेश काढला; शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही नाही परळी वैजनाथ प्रतिनिधी....        सरकारी कारभार आणि नागरिक बेजार अशी नेहमीचीच अवस्था बघायला मिळते. प्रशासकीय प्रक्रियेत कधी कोणती कामे अडून बसतील आणि कधी कोणती कामे क्षणार्धात निपटली जातील हे प्रशासनातील कर्मचारीच कळू जाणे. असाच काहीसा प्रकार परळी तालुक्यातील हिवरा येथील काही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.           गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या काळात विंधनविहीर (बोअरवेल) अधिग्रहण केलेल्या तीन ग्रामस्थांना एक वर्ष उलटून गेल्यानंतर एक रुपयाही हाताला लागलेला तर नाहीच पण ग्रामपंचायत, तहसील, पंचायत समिती अशा चकरा मारून मनस्ताप सहन करण्याची वेळ मात्र नक्की आलेली आहे. या ग्रामस्थांनी आता गावातच ग्रामपंचायती समोर आपल्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.परळी वैजनाथ तालुक्यातील हिवरा ( गो.) या गावात...

Congratulations Vishakha!!!!!

इमेज
  विशाखा राजाभाऊ सुर्यवंशी हिचे दहावी परीक्षेत 95.20% गुण घेत घवघवीत यश              महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस. एस. सी. परीक्षेत परळी वैजनाथ येथील अभिनव विद्यालयाची    विद्यार्थिनी कु. विशाखा राजाभाऊ सुर्यवंशी हिने 95.20% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.      विशाखाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे विशाखा लहानपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार असून  अभ्यासातील चिकाटी, आई वडिलांची मेहनत व  मार्गदर्शन तसेच शिक्षकांचे मोलाचे योगदान या यशात आहे.  शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, विष्णु मुंडे यांच्यासह सर्व मित्र परिवार, आप्तस्वकीय यांनी तीचे अभिनंदन केले आहे.

इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश!

इमेज
ऐतिहासिक निर्णय : ना. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत  पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही  समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय भविष्यातही कायम राहील - ना. पंकजा मुंडे इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश! पुणे ।दिनांक १५। पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होतेयं याचा मला अतिशय आनंद होत आहे. अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून  भ्रष्टाचारमुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेत, आता चांगले आणि फ्रेश मनाने काम करा अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज अधिकाऱ्यांशी संवाद साधला.    राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यास...
इमेज
  जयवंती नदी जाय मोका पाहणीचा अहवाल न दिल्यास लोक आयुक्तांकडे तक्रार व जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा इशारा   अंबाजोगाई-(वसुदेव शिंदे)-       जयवंती नदीपात्रातील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी पत्रकार अभिजीत लोमटे यांचे  आमरण उपोषण चालू होते नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांनी मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले मात्र आठ दिवस होऊनही तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी संयुक्त जायमोक्या ची पाहणी केली नाही मंगळवार पर्यंत अहवाल प्राप्त न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी दिला आहे.   अंबाजोगाई शहरात धन दांडग्यांनी अतिक्रमण केल्याने नदीचा प्रवाह बंद झाला असून हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे नदीचा प्रवाह मोकळा करावा तसेच जावक क्रमांक 880 उपविभागीय अधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त यांच्या पत्राचा संदर्भ देत तहसीलदार व मुख्याधिकारी यांना जाय मोक्यावर जाऊन पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते या निर्देशाचे पालन करावे या मागणीसाठ...
इमेज
  परळीत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ आज भव्य तिरंगा रॅली, युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- अनिष अग्रवाल  परळीवैजनाथ,प्रतिनिधी... भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दाखवलेल्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाला सलाम करण्यासाठी परळी शहरात गुरुवार, 15 मे रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीत सर्व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सैन्याच्या शौर्याला मानवंदना द्यावी, असे आवाहन भाजपा सोशल मीडिया आय टी सेल प्रदेश उपाध्यक्ष अनिष अग्रवाल यांनी केले आहे. भारतीय सैन्याने ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर (PoK) मधील नऊ आतंकी ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या सटीक आणि संयमित सैन्य कारवाईत आपल्या सैन्याने मोठे यश मिळवले आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेना, थलसेना आणि नौसेनेने एकत्रितपणे ही कारवाई करत आतंकवादाला चोख प्रत्युत्तर दिले. या अभियानात पाकिस्तानातील अनेक आतंकवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली, ज्यामुळे देशभरात सैन्याच्या शौर्...

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची obc नां भावनिक पोस्टद्वारे साद !

इमेज
  " दशकांच्या लढ्याला यश, आता पहाट उजाडावी...!" केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केलीय. या घोषणेने ओबीसीच्या दशकांच्या लढ्याला यश मिळालंय. पण हे यश औटघटकेचं ठरू  नये, एवढीच अपेक्षा. नाहीतर तांड्यावस्तीवरचा भटका मागासवर्गीय समाज उपेक्षित असल्याचं ओझं घेऊनच मरेल. मंडल आयोग लागू झाल्यानंतर जातिनिहाय जनगणेनेची मागणी सुरू झाली. ही मागणी दिल्ली दरबारातील लोकांनी गांभिर्याने घ्यावी, यासाठी देशभरात अनेकांनी रस्त्यावच्या लढाईला हाक दिली. त्या लाखो कार्यकर्त्यांमधला मी एक शिपाई. जिसकी जितनी हिस्सेदारी, उसकी उतनी भागीदारी.. या मागणीसाठी अनेकांनी आपल्या शरीराची झीज केली. पण अजूनही हिस्सेदारीचा प्रश्न काही केल्या सुटला नाही.   तत्कालीन मनमोहन सिंह सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून दशकांचा काळ लोटल्यानंतर आता मोदी सरकारनेही जातिनिहाय जनगणनेच्या कळीच्या मुद्द्याला हात घातलाय. त्यामुळे आमच्या प्रतिनिधित्वाच्या लढाईचा एक टप्पा पूर्ण झालाय. मी महाविद्यालयीन काळातच यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर चळवळीत सक्रीय झालो. पण धनगर बांधवांप्रणामेच इतर भटक्या जातींचे प्र...
इमेज
Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतःला वेगळं करत स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. ते म्हणाले की, बलुचिस्तान पाकिस्तान नाही. त्यांनी हिंदुस्थान आणि जागतिक समुदायाकडून स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मागितला आहे.मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि लिहिले की, "आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवले आहे. पाकिस्तानची दहशतवादी व्यवस्था आता कोसळणार आहे. हिंदुस्थानी सरकारने बलुचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी." ते म्हणाले की, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी डेरा बुगतीच्या गॅस क्षेत्रांवर हल्ला केला आहे, जे पाकिस्तानच्या प्रमुख गॅस पुरवठ्याचे केंद्र आहे.मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांकडेही आवाहन केलं आहे की, संयुक्त राष्ट्रांनी ताबडतोब बलुचिस्तानात ...

भिषण आपघात.......

इमेज
  दुचाकीला वाचवताना एर्टिगा कार पलटून तीन ठार तर चार जण गंभीर जखमी अंबाजोगाई (प्रतिनिधी):-         दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एर्टिगा कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर चार जण गंभीरित्या जखमी झाल्याची  घटना आज दुपारी अंबाजोगाई आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली.         माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून एम एच 05 सी व्ही 9186 या इर्टिगा गाडी मधून अंबाजोगाई कडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक मुस्लिम कुटुंब येत असताना आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिर समोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात  चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि एर्टिगा जागेवर पलटी झाली.  गाडीतून प्रवास करत असलेले  शौकत अहमद शेख (वय 46) व खय्युम अब्बास अत्तार (वय 45) हे दोघे  जागीच ठार झाले असून आरेफ जागीरदार, नवाब मिया शेख, वाजेद आबेद मोमीन, खाजा अमीर शेख, शरीफ इस्माईल मोमीन हे पाच जण गंभीरित्या जखमी झाले असून सर्व जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ...

Congratulations Shital !!!!!!

इमेज
शितल अंगदराव भंडारे हिचे दहावी परीक्षेत 98% गुण घेत घवघवीत यश       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिकशालांत प्रमाणपत्र एस. एस. सी. परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शितल अंगदराव भंडारे हिने 98% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. शितलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे ,शितल लहानपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार असून तिने या यशाचे सर्व श्रेय तिची चिकाटी मेहनत व पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे, हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदानी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ महाराष्ट्र राज्य, श्रीनाथ सेवाभावी संस्था अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्या वतीने शितलचे अभिनंदन करत तिच्या उज्वल भविष्यासाठी रामेश्वर महाराज कोकाटे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या
इमेज
 ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा मुंबईत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांसमवेत ना. पंकजा मुंडेंचा सहभाग मुंबई।दिनांक १४।  भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी देशसेवा केलेल्या सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी आणि जवानांची लक्षणीय उपस्थिती होती. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत काढलेल्या या तिरंगा यात्रेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑगस्ट क्रांती मैदानातील स्तंभाला अभिवादन करुन  तिरंगा यात्रेला सुरुवात झाली आणि गिरगाव चौपाटी येथील हुतात्मा तुकाराम ओंबाळे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करुन या यात्रेचा समारोप झाला.     या तिरंगा यात्रेत भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिषजी शेलार, म...

Congratulations Samiksha !!!!!

इमेज
समिक्षा वाघमारेचे शालांत परीक्षेत 92 टक्के गुणांसह दैदिप्यमान यश परळी / प्रतिनिधी         परळीच्या भिमवाडी येथील रहिवासी व विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा धम्मपाल वाघमारे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 92. 80 टक्के गुण घेऊन दैदिप्यमान यश मिळवले आहे.      कु.समिक्षा धम्मपाल वाघमारे ही वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रा.दासू वाघमारे यांची पुतणी आहे. शहरातील विद्यावर्धिनी विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे.नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत तिने 92.80 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी, वाघमारे कुटुंबीयांनी व आदिंनी तिचे अभिनंदन केले आहे.

Congratulations Anushka!!!

इमेज
  97.20% गुण मिळवत कु. अनुष्का अशोक पवार हिचे दहावीत घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी कु. अनुष्का अशोक पवार हिने 97.20% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.      अनुष्काच्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे. तिच्या या यशामागे तिची अभ्यासातील चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे तिने सांगितले.न्यु हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी तीचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सर्व स्तरातून तीचे अभिनंदन होत आहे.
इमेज
परळीत 20 मे रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सीटू कामगार संघटनेचा मोर्चा परळी वैजनाथ:- महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समीतीच्या वतीने महाराष्ट्रव्यापी संप आहे. बीड जिल्हा सीटू कामगार संघटना संपात सह‌भागी होत आहे. त्या दिवसी परळी तालुक्यातील सीटूशी जोडलेल्या कामगार संघटना परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजता भव्य मोर्चा काढणार आहेत.      राज्य सरकार व केंद्र सरकारचे कामगार विरोधी थोरणामुळे प्रचंड बेरोजगारी निर्माण झालेली आहे. आशा वर्कर व अंगणवाडी कर्मचारी यांना सरकारी कामगारांचा दर्जा मिळावा, खाजगीकरण थांबवावे, सरकारने कंत्राटीकरण थांबवावे, कामगारासाठीच्या चार कामगार संहीता मागे घ्याव्यात, कामगारांना किमान वेतन 26000रु द्यावे: सर्व ६० वर्षावरील पेन्शन नसणाऱ्या  सर्व नागरीकांना 10000 रु पेन्शन द्यावी.परळी तालुक्यातील आशाचे सर्व प्रकारचे थकीत मानधन द्यावे,  घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाने घरेलू कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शिष्यवृत्ती द्यावी, बांधकाम कामगारांचे सर्व प्रश्न तालुक्यातील डब्लूएफसी केंद्राने सोडवावेत. ग्रामीण भागातील बांधकाम  कामगार...

Hundred Percent Marks:

इमेज
१० वी परिक्षा: अथर्वचे शतक: परळीतील या विद्यार्थ्यांने मिळवले 100 टक्के ! परळी वैजनाथ , प्रतिनिधी      नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत परळीच्या अथर्व कराड या विद्यार्थ्याने शंभर टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.       परळी वैजनाथ  येथील विद्यावर्धिनी विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या अथर्व जीवन कराड या विद्यार्थ्याने दहावी च्या परीक्षेत शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत.अथर्व जीवन कराड याने संस्कृत व गणित या विषयात शंभर पैकी 100 गुण संपादित केले आहेत.  यावर्षीच्या निकालात एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.त्यामध्ये परळीच्या अथर्व कराडने बहुमान पटकावला आहे.त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.दरम्यान शाळेच्या वतीने पालकांसह त्याचा सत्कार करण्यात आला.

नगर परिषदेला निवेदन....

इमेज
प्रभू वैद्यनाथ मंदिर : 241 वर्षांपूर्वीच्या पायऱ्या; पुरातन पवित्र दगडांचे जतन करावे : अश्विन मोगरकर परळी वैजनाथ (प्रतिनिधी)      ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात अनेक कामे चालू आहेत. त्यापैकी मंदिराच्या पूर्व घाटावर आवश्यकता नसतानाही व प्रशासकीय मान्यता नसताना मंदिराच्या पूर्व घाटावरील पायऱ्या काढून नव्या दगडात पायऱ्या टाकण्यात येत आहेत. त्या पुरातन पायऱ्यांच्या पवित्र दगडांचे जतन करावे अशी मागणी भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.       पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवीसन १७८४ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा पूर्व घाट बांधलेला होता. २४१ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या घाटाच्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत होत्या. या पायऱ्यांचे पौराणिक महत्व खूप मोठे आहे. पूर्व पायऱ्यांचे दर्शन घेऊन मगच वैद्यनाथाचे दर्शन घेण्याची प्रथा पाळली जाते. या पूर्व दिशेच्या पायऱ्यांवर कार्तिक महिन्यात सूर्यनारायण काढून पूजा करण्याची अनादी काळापासून परंपरा आहे. काढलेल्या सर...

Congratulations!!!!

इमेज
  91.60 टक्के गुण : सीबीएसई 10 वी परिक्षेत कु.समृद्धी देशमुखचे घवघवीत यश:मराठी विषयात शाळेत टाॅपर परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत कु. समृद्धी सुनील देशमुख हिने घवघवीत यश संपादन केले असुन परळीच्या दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल या शाळेत मराठी या विषयात सर्व द्वितीय येत ती टॉपर ठरली आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.         कु. समृद्धी सुनील देशमुख सिरसाळकर हिने नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.  तिने या परीक्षेत 91.760% गुण संपादित केले आहेत. परळी येथील दिल्ली वर्ल्ड  पब्लिक स्कूल मधून दहावी परीक्षा तिने दिली होत.  या परीक्षेत मराठी या विषयात शाळेतून टाॅपर राहण्याचा मान तीने पटकावल. तीने मराठी या विषयात 98 गुण मिळवले आहेत. तिच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, आप्तस्वकीय, परिवारजन आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.
इमेज
  98 टक्के गुण घेऊन मंथन लक्ष्मीनारायण मंत्री याचे दहावीत घवघवीत यश परळी  (प्रतिनिधी)_ इयत्ता दहावीच्या परीक्षेत चि. मंथन लक्ष्मीनारायण  मंत्री याने 98% गुण घेऊन न्यू हायस्कूल शाळेतून द्वितीय येण्याचा मान पटकावला.      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलचा  विद्यार्थी याने 98 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. चि. मंथनच्या  यशाबद्दल सर्वस्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.  पालकांचे  व  शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्याने सांगितले. न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी  शुभेच्छा दिल्या.

Congratulations!!!!

इमेज
बिलाल शाळेची निकालाची गौरवशाली परंपरा कायम: उर्दू माध्यमात तालूक्यातून प्रथम  परळी वैजनाथ: दिनांक 13 मे 2025 रोजी माध्यामिक शालांत प्रमाणपत्र या परिक्षेचा निकाल लागला त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले यामध्ये कुमारी अर्शिया सुलतान अली शेख या विध्यार्थीनिने 93.20% घेऊन तालूक्यात उर्दू माध्यमातून प्रथम येण्याचा मान पटकावला त्याच बरोबर निदाखान शेर खान 92.40 % घेऊन द्वितिय येण्याचा मान मिळवला शाळेतील विद्यार्थ्यांनी खूपच चांगले गुण मिळवून शाळेचे नाव लौकिक केले त्यामध्ये मारिया कुलसुम शहेबाज खान 86.60% घेऊन शाळेतून तिसरा क्रमांक मिळवाला त्याच बरोबर शेख अयमन रिदा मुदस्सर नदीम 83.00 % घेऊन शाळेतून चौथा क्रमांक पटकावला त्याच बरोबर अलफिया माहिन अखिल शेख 77.40% घेऊन शाळेतून पाचवा क्रमांक मिळवला. यासर्व  विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष शेख अब्दुल करीम साहेब, सचिव शेख तस्नीम फातेमा बाजी, कोषाध्यक्ष शेख मुदस्सर नदीम, शाळेचे मुख्याध्यापक शेख सुलतानअली व शाळेचे सर्व कर्मचारी यांनी विदयार्थ्यांचे मन:पुर्वक अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Congratulations!!!!

इमेज
ओंकार मुंडलीक याचे दहावीत घवघवीत यश;97.60 % गुण परळी / प्रतिनिधी        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलचा विद्यार्थी चि.ओंकार संतोष मुंडलीक  97.60 % गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.चि. ओंकारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. प्रवीण सुहाना मसाला कंपनीचे बीड जिल्हा मार्केटिंग मॅनेजर संतोष मुंडलीक याच्या मुलगा चि.ओंकार हा लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धेत मध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी आकांक्षाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Congratulations!!!!

इमेज
  १० वी परिक्षेत ९०.००% गुण; चि.अश्विन अनिल मस्के याचे घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत चि. अश्विन अनिल मस्के याने 89.60% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.      परळी वैजनाथ येथील अभिनव विद्यालयातून चि. अश्विन अनिल मस्के याने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत त्याने 89.60% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.
इमेज
ना.पंकजा मुंडेंचा ऐतिहासिक निर्णय: पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आता होणार समुपदेशनाने मुंबई,। दिनांक १३।  मोठ्या प्रमाणात असलेली  रिक्त पदे व बदली पात्र कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या यामुळे राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा व बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या  पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतला आहे.     समुपदेशनाने बदल्यांची  कार्यवाही दि. १५ व १६ मे २०२५ रोजी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना केल्यानंतर काही नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे एकत्रित पशुसंवर्धन विभागांतर्गत रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तीन हजार पेक्षा जास्त पदांचे मागण...
इमेज
  92.60% गुण मिळवत प्रतिक्षा वसंत मुंडे हिचे दहावीत घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा वसंत मुंडे हिने 92.00% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.        प्रतिक्षाच्या  उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे तिने सांगितले.रत्नेश्वर विद्यालय टोकवाडी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी तीचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इमेज
  95.80% गुण मिळवत आकांक्षा अमर दुबे हिचे दहावीत घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. आकांक्षा अमर दुबे हिने 95.80% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. आकांक्षाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून तिने विविध स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यू हायस्कूल चे प्राचार्य व सर्व शिक्षकवृंदांनी आकांक्षाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Congratulations!!!!!

इमेज
  १० वी परिक्षेत ९१.००% गुण; चि.आरव मधुकर गित्ते याचे घवघवीत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत चि.आरव मधुकर गित्ते याने 91.00% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.      परळी वैजनाथ येथील फाऊंडेशन स्कूल विद्यालयातून चि.आरव मधुकर गित्ते याने दहावीची परिक्षा दिली.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत त्याने 91.00% गुण संपादन करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. मिळवलेल्या या घवघवीत यशबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, आप्त,स्वकीय परिवारजन आदींनी अभिनंदन केले आहे.