पोस्ट्स

एप्रिल २७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने भजनी मंडळ स्पर्धा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 894 व्या जयंती निमित्तशिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने भजनी मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.      शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना परळी वैद्यनाथ च्या वतीने रविवार दि 04:05:2025 रोजी सकाळी 09:00 वाजता क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 894 व्या जयंती निमित्त भजनी मंडळ स्पर्धा 2025 चे आयोजन श्री संत गुरुलिंगस्वामी मठ संस्थान, बेलवाडी या ठिकाणी केले असुन स्पर्धेतील प्रथम,द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात येणार आहेत तरी या कार्यक्रमास जास्ती जास्त भजनी मंडळाने सहभाग नोंदवावा व कार्यक्रमासाठी समाज बांधवानी  तसेच भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  आयोजक शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना,परळी वैजनाथ यांनी केले आहे.
इमेज
खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या-पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी जालना ।दिनांक ०३। खरीप हंगामातील पेरण्या सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते व पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा  मुंडे यांनी यावेळी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती मुंडे या बोलत होत्या. यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुषकुमार नोपाणी, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रिता मैत्रवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, विभागीय कृषी सहसंचालक पी.आर. देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांची प्रमुख उपस्थिती ...
इमेज
कवयित्री अपर्णा कुलकर्णी यांचा अनोखा उपक्रम यावर्षी अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव म्हणून सन्मान मिळाला म्हणून महिलांनी हळदी कुंकवाबरोबरच दिले पुस्तक भेट अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)-        हा महिना घरोघरी चैत्र व गौरीचा.... त्या  निमित्त महिला मोठ्या प्रमाणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात त्यानिमित्ताने विचारांची आदान प्रदान होते गौरी समोर आरास केले जातात. अंबाजोगाई शहरातील कल्याणनगर मधील  कवयित्री अपर्णा कुलकर्णी यांनी यावर्षी पुस्तकाचे आरास देखावा केला होता गौरी गणपती समोर केला  या वर्षी अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव हा सन्मान मिळाला त्या आनंदा प्रित्यर्थ यावर्षी त्यांनी पुस्तकाची आरास करून विविध महामानवाचे चरित्र ग्रंथ ठेवून पुस्तकाने गौरीला सजविले व त्यानिमित्त महिलांना पुस्तक भेट दिले  हा अनोखा उपक्रम राबवुन अंबाजोगाई नगरी पुस्तकाची ही जननी आहे यामुळे पुस्तके जास्तीत जास्त वाचली जावीत पण घराघरात पुस्तकाची जागा मोबाईलने घेतली आहे त्यामुळे वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे वाचन नसल्यामुळे समाजात अविवेकीपणा वाढत आहे त्यामुळे समाजात वाढत आहे त्यामुळे समाजा...
इमेज
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समतेचे तत्त्वज्ञान काळाची गरज - डॉ. बळीराम पांडे तिरुका, प्रतिनिधी: "आज भारतीय समाजात विज्ञाननिष्ठा रुजणे अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. मात्र, ज्यांच्या हाती हे तंत्रज्ञान आहे, ते सामान्य माणसांच्या विकासासाठी त्याचा योग्य वापर करत नाहीत. यामुळे समाजात नव्याने विषमतेचे विष पेरले जात आहे. या परिस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वज्ञानाला शरण जाणे ही काळाची गरज आहे. केवळ त्यांचे विचार डोक्यावर घेऊन फिरण्यात अर्थ नाही, तर ते प्रत्यक्षात आचरणात आणणे महत्त्वाचे आहे," असे विचार प्रख्यात वक्ते तथा विचारवंत डॉ. बळीराम पांडे यांनी व्यक्त केले.       ते तिरुका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक बालाजी धोंडीराम पाटील होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवा...

ज्या गावात अडवले, तिथं ताईंच्या आगमनावर ग्रामस्थांच्या समाधानी नजरा

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी घेतली स्व. बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची भेट आगे परिवाराचे दुःख हे माझेही ; त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडली तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढू पत्नी व मुलीची घेतली जबाबदारी ; गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची मदत सुपूर्द माजलगांव।दिनांक ०३। राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज किट्टी आडगाव येथे जाऊन स्व. बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आगे परिवाराचे दुःख हे माझे दुःख आहे, एक चांगला कार्यकर्ता आपण गमावला आहे. आगे परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडली तर  सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ अशा शब्दांत धीर देत ना. पंकजाताईंनी आगे यांच्या आई, पत्नी व मुलीची जबाबदारी घेतली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या मदतीचा धनादेश यावेळी आगे परिवाराला देण्यात आला.     भाजपचे जिल्हा विस्तारक स्व बाबासाहेब आगे यांची काही दिवसापूर्वी हत्या झाली होती. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अजूनही या दुःखातून ते सावरले नाहीत. मध्यंतरी ना. पंकजाताई मुंडे बी...
इमेज
  प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांचे हक्काच्या पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन!  तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित  नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी जीव गेला तरी हरकत नाही - प्रा.टी.पी.मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी  नागापूरच्या वाण धरणाचे पाणी नदीपात्रात सोडू नये या मागणीसाठी नागापूर वाण धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांचे कैवारी तथा लोकनेते नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले. शेकडो नागरिक व शेतकऱ्यांनी धरणाच्या जलाशयात उतरून सुमारे दोन तास आंदोलन केले. दरम्यान धरणावर तगडा पोलीस बंदोबस्त प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. परळी तहसीलचे तहसीलदार श्री. व्यंकटेश मुंडे यांनी नदीपात्रात पाणी सोडले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.  प्रा. टी.पी.मुंडे सरांनी परिसरातील नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी व परळी शहराच्या नागरिकांसाठी आपला जीव गेला तरी हरकत नाही अशी ठाम भूमिका घेतली.त्यानंतर आंदोलन स्थगित झाले अशी घोषणा केली.   दरम्यान परिसरातील नागरिक नागापूर वाण धरणावर...
इमेज
श्री चिंतेश्वर विद्यालयात मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे उद्घाटन गेवराई: (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात *मुक्तछंद उन्हाळी शिबीराचे* उद्घाटन आज श्री अनिल बोर्डे यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रसंगी व्यासपीठावर स्थानिक समन्वय समिती कार्यवाह श्री दत्तात्रय पत्की,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री अक्षय कुलकर्णी शिशुवाटिका प्रमुख श्रीम.धनश्री ताई पत्की प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी माध्यमिक मुख्याध्यापक श्री अमोल गोरकर शिबिर प्रमुख श्रीम.राधा माने यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमासोबत सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने श्री चिंतेश्वर विद्यालय गेवराई येथे दिनांक 2 मे 6 मे या कालावधीमध्ये मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये सूर्यनमस्कार, योगा,ध्यान,स्व-संरक्षण, मेहंदी,रांगोळी, आर्ट अँड क्रॉफ्ट नृत्य,पपेट शो,दिर्घकथा,श्रीमद् भगवत गीता १५ वा अध्याय पाठांतर,झुंबा डान्स इ.विविध कौशल्यपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच त्यांची सर्वांगीण...

ब्राह्मण सभेच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिर उर्वरित विकास कामांसाठी २० लक्ष रु.निधी - ना.पंकजाताई मुंडे

इमेज
 ■ परळीत ब्राह्मण सभा आयोजित शानदार सोहळ्यात २० बटुंवर सामुदायिक  उपनयन संस्कार ! सात्विक समाज निर्मितीसाठी धर्मसंस्कार हाच जीवनाचा पाया : ना.पंकजाताई मुंडे अविरत ४५ वर्षांचा ब्राह्मण सभेचा उपक्रम कौतुकास्पद- आ.धनंजय मुंडे धर्माचरण व नैष्ठिक आचारासाठी उपनयन संस्कार- प.पु.मकरंद महाराज  धर्मशील समाज निर्मितीसाठी उपनयन  संस्कार - भागवतमर्मज्ञ ह. भ.प. बाळुमहाराज उखळीकर परळी वै.(प्रतिनिधी)-    धर्माचरणाचे संस्कार हे उपनयनासारख्या  संस्कारातून होतात. धर्माचरण व नैष्ठिक आचारासाठी उपनयन संस्कार गरजेचा असल्याचे प.पु.मकरंद महाराज यांनी सांगितले. धर्मशील समाज निर्मितीसाठी उपनयन संस्कार आवश्यक असल्याचे भागवतमर्मज्ञ ह. भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांनी सांगितले. तसेच धर्मसंस्कार हाच  जीवनाचा पाया असतो  असे ना.पंकजाताई मुंडे यांनी तर परळीत अविरत ४५ वर्षांचा ब्राह्मण सभेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आ.धनंजय मुंडे यांनी सांगितले.ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित शानदार सोहळ्यात विविध ठिकाणच्या २० बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार  करण्यात आले.  ...

● २० बटुंवर होणार सामुदायिक उपनयन संस्कार

इमेज
  मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ मे रोजी परळीत ब्राह्मण सभेचा ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा ! प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह संत व विद्वतजणांची लाभणार उपस्थिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...   परळी वैजनाथ येथे २ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित ४५ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा होणार असुन या सोहळ्यात २० बटुंवर वेदोक्त पद्धतीने सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. दत्तधाम परभणीचे पिठाधिपती प. पु. मकरंद महाराज, भागवतमर्मज्ञ ह.भ.प बाळुमहाराज उखळीकर यांच्यासह संत व विद्वतजणांची आशिर्वचनपर उपस्थिती तसेच मंत्री पंकजाताई मुंडे,आ.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.         ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित ४५ वा उपनयन सोहळा मिती वैशाख शु. ५ शके १९४७ शुक्रवार दि. २ मे २०२५ वेळ : सकाळी १०.३१ वा. प्रवचनमंडप, वैद्यनाथ मंदीर जवळ, परळी वैजनाथ येथे शानदार आयोजनाने पार पडणार आहे.या सोहळ्यात परभणीचे पिठाधिपती प. पु. मकरंद महाराज,प्रसिद्ध भागवताचार्य व किर्तनकार भागवतम...

न्यायालयाच्या इमारत बांधकामाचे थाटात भूमिपूजन

इमेज
  परळी न्यायालयाची नवीन इमारत पर्यावरणपूरक व्हावी - ना. पंकजा मुंडे न्यायालयाच्या इमारत बांधकामाचे थाटात भूमिपूजन सोशल मीडियातील फेक अकाउंटवर आळा घालण्यासाठी कडक कायदा होण्याची गरज परळी वैजनाथ । दिनांक ०१ । परळी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नूतन इमारत पर्यावरणपूरक व्हावी, यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आपण निश्चितपणे करू असं राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे सांगितले.  इमारतीसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात यावा. निर्माणाधीन इमारतीवर पाण्याचे रिसायकलिंग करण्याची व्यवस्था असावी. न्यायालयाच्या परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी असेही त्यांनी यावेळी म्हटले. परळी येथे ४१ कोटी रूपये खर्च करून बाधण्यात येणाऱ्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभ आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. बीडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर, बार कौन्सिल महाराष्ट्राचे सदस्य व्ही डी साळुं...
इमेज
  युपीएससी परीक्षेत यश मिळविल्याबद्दल डॉ.अक्षय मुंडे यांचा नगर परिषद कार्यालयात सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- युपीएससी परीक्षा या अतिशय प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश मिळविल्याबद्दल डॉ.अक्षय मुंडे यांचा नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.             यूपीएससीची परीक्षेत ६९९ रॅंक घेत मिळवले यश  मिळविल्याबद्दल डॉ.अक्षय मुंडे नगर परिषद कार्यालयात सत्कार करण्यात आला. पागरी सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले. या यशाबद्दल मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे व कर्मचारी यांनी सत्कार करून अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे

इमेज
  कांदेवाडी येथे कै.शिवाजीराव खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प.प्रशांत महाराज मोरे यांचे किर्तन भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रदीप खाडे  धारूर (प्रतिनिधी) :-           कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.३० एप्रिल रोजी ह.भ.प.सोपान महाराज कनेरकर  व दि.१ मे रोजी ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खाडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.        परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. । मनि होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा । अजूनही होता भास तुम्...
इमेज
 श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व समस्थ ग्रामस्थ आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जमोत्सव (सप्तशतकोत्त्तर सुवर्ण महोत्सव ) श्री क्षेत्र आळंदी देवाची आयोजित भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह मराठावाडा विभागातून भाविक भक्तांनी उपस्थित राहावे-मेंगडे महाराज  बीड,  प्रतिनिधी...        श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व समस्थ ग्रामस्थ आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा सप्तशतकोत्त्तर सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तन कारांची सेवा संत चरित्र चिंतन प्रवचन इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव शनिवार दिनांक ३-५-२०२५ ते १०-५-२०२५ या कालावधी मध्ये संपन होत असून पारायण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांची निवास भोजन व्यवस्था श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी च्या वतीने करण्यात येणार असून पारायनार्थी यांना पारायण करण्यासाठी संस्थान च्या वतीने ज्ञानेश्वरी देण्यात येणार आहे तेव्हा मराठवाड...

नाकावर टिच्चून चोरट्यांचे आव्हान......!

इमेज
  परळीतील गोवंश तस्करी: आता मात्र हद्दच झाली ! दोन दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल झाला आता त्याच भागातून त्याच ठिकाणाहून दोन गाड्यांमधून मध्यरात्री उचलल्या आठ गाई ! संपूर्ण प्रकार स्पष्टपणे सीसीटीव्हीमध्ये कैद परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.....           गोवंश तस्करीची मोठी संघटित टोळी परळी व परिसरात कार्यरत असल्याचे अनेक प्रकार वेळोवेळी पुढे आले आहेत. दोन दिवसापूर्वीच परळीच्या स्नेहनगर भागात गाईंवर विष प्रयोग करून गाईंची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पशुसंवर्धन मंत्र्यांनीही दखल घेऊन गुन्हा दाखल करायला लावला होता. मात्र आता या तस्करीची हद्दच झाली असुन एक प्रकारे सर्वच यंत्रणांना आव्हान देत पुन्हा त्याच स्नेहनगर भागातून दोन गाड्यांमधून आठ गाईंना क्रूरपणे मारून व डांबून त्यांची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार काल मध्यरात्री घडला. तस्करीचा हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणाने सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा गोवंश तस्करी, परळीतील गुन्हेगारी व पोलिसांची कार्यपद्धती हे मुद्दे ऐरणीवर आले आहेत.          परळी वैजन...
इमेज
  नगरपरिषद कार्यालय येथे महात्मा बसवेश्वर महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-             परळी शहरातील नगर परिषद कार्यालय येथे बुधवार दि. ३० एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान उपस्थित नगर परिषद कार्यालयातील मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला.                नगर परिषद कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती मोठ्या हर्षोल्हासात व अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व जनमानसांत समतावादी विचार रुजवणारे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे व उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण...
इमेज
बसवेश्वर काॅलनीत जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 920 जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी... जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 920 जयंती बसवेश्वर काॅलनी येथे अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.        आज दिनांक 30/ 4 /2025 बुधवार रोजी द्रोणाचार्य अँड लिटल स्टार इंग्लिश स्कूल व बसवेश्वर कॉलनीतील समस्त नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची 920 जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव पी .एल .बागल सर, महात्मा बसवेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजकुमार मुकदम, नगरपालिकेतील कर्मचारी बाळासाहेब डहाळे, गुरव, तलाठी रमाकांत गुजर, गणेश गायकवाड, विनायक गायकवाड ,अर्जुन अण्णा, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेश घेवारे, नाईकवाडे, संतोष गायकवाड ,कांबळे व नगरातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.
इमेज
समाजातील गरजूंना मदत होईल असे कार्य करून जन्मोत्सव साजरा करणे ही काळाची गरज - जगदीश पिंगळे पेशवा प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमाने भगवान परशुराम जन्मोत्सव  उत्साहाच्या वातावरणात साजरा अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-  येथील पेशवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान श्री परशुराम जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे म्हणाले की, समाजातील गरजूंना मदत होईल असे कार्य करून जन्मोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. विविध संघटना वेगवेगळे उपक्रम राबवितात परंतु पेशवा प्रतिष्ठान यांनी राबविलेले उपक्रम हे नेहमीच समाजपयोगी असतात.        यावेळी व्यासपीठावर  गणपतराव व्यास,  रामभाऊ कुलकर्णी, सौ रोहिणी पाठक यांची उपस्थिती होती. या प्रसंगी  मार्गदर्शन करताना व्यास गुरुजी म्हणाले की , तरुणांनी उद्योगाकडे वळावे,हि काळाची गरज असून सध्या सगळ्यांना नोकरी मिळणे शक्य नाही व व्यवसायात तरुणांना यश मिळण्यासाठी चिकाटी व प्रयत्न महत्वाचे आहेत. रामभाऊ कुलकर्णी ,रोहिणी पाठक...
इमेज
  भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी       पाटोदा /अमोल जोशी.. .     शहराचे  ग्रामदैवत  भामेश्वर मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा  ज्येष्ठ नागरिक अशोक दीक्षित यांच्या हस्ते  प्रतिमापूजन करून सकाळी 10 वाजता साजरा करण्यात आला.  याप्रसंगी माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार  विजय जोशी, जवाहरलाल कांकरिया , बाळासाहेब शिंदे, गणेश पांडव , सुनील कांकरिया, नीलेश पांचाळ,सुभाष कांकरिया ,  पत्रकार अमोल जोशी, सुनील लोमटे , हरिभाऊ राऊत,विकास जाधव ,  योगेश पंडित, रमेश पाथरकर, बॉबी पारगावकर , रमेश गोरे, यांच्यासह शहरातील  नागरिक उपस्थित होते .

Burning Truck @ Parli Vaijanath....

इमेज
थरारक : परळीत भर उन्हात, भर रस्त्यावर उभा ट्रक पेटला ;आगीचे व धुराचे लोट भिडले गगनाला ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          परळी वैजनाथ शहरातील बीड व परभणी कडे  जाणाऱ्या रस्त्यावरील  छत्रपती संभाजी महाराज चौक (इटके कॉर्नर) या ठिकाणी भर उन्हात, भरस्त्यावर दुपारी ४.३० वा.सुमारास उभ्या ट्रकला आग लागून हा ट्रक पेटला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने जवळपास पाऊण तास पेटलेल्या ट्रकचा थरार बघायला मिळाला. नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली आहे.           परळी शहरात असलेल्या इटके कॉर्नर वर बीडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक  एम एच  24 |7896 या क्रमांकाचा ट्रक उभा  होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक या ट्रक मधून आगीचे लोळ बाहेर येताना दिसले. बघता बघता या ट्रक वरून आगीचे लोट उठल्याचे दिसून आले. संपूर्णत: पेटलेला ट्रक नागरिकांना दिसला. तातडीने नागरिकांनी परळी नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला फोन केला. लगेचच  नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या  त्याचब...
इमेज
1 मे रोजी परळी न्यायालयाच्या नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ ! मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी,मंत्री पंकजा मुंडे,न्या.रविंद्र जोशी, जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर राहणार उपस्थित  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..     परळी वैजनाथ येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.       नुतन इमारतीचा कोनशिला समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे  न्यायमूर्ती नितीन भगवंतराव सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते व पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रविंद्र मधुसुदन जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड  आनंद लक्ष्मीचंद यावलकर हे भुषवणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन परळी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी दिपक रुस्तुमराव बोर्डे व परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड हरीभाऊ व्यंकटराव गुट्टे यांनी केले आहे.

दुर्दैवी घटना.....

इमेज
उन्हाळी सुट्टयांसाठी नातेवाईकांकडे आलेली शाळकरी मुलगी कॅनॉल मध्ये गेली वाहून : १२ तासानंतर सापडला मृतदेह परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          परळी जवळील नवीन औष्णिक विद्युत केंद्र परिसरात असलेल्या लोणी तांडा येथे उन्हाळी सुट्ट्यांसाठी आपल्या नातेवाईकांकडे राहायला आलेली दहा वर्षाची शाळकरी मुलगी जवळच असलेल्या कॅनलच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार काल (दि. 28) रोजी घडला. नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल 12 तास या मुलीचा शोध घेतला. दरम्यान आज (दि.२९ ) सकाळी उक्कडगाव ता. सोनपेठ जिल्हा परभणी जवळील कॅनाॅलमध्ये या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे.        सध्या जायकवाडी धरणातून कॅनॉल मध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. या कॅनॉलला आलेल्या पाण्यामध्ये कपडे धुत असलेली शाळकरी मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि 28 रोजी घडली. परळी नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुनील आदोडे,नितीन जगतकर निखील वाघमारे, निखील गोदाम, वाहनचालक विठ्ठल गित्ते आदींनी अथक प्रयत्न करून शोधमोहीम सुरु केली होती.काल रात्री उशिरा पर्यंतही या मुलीचा शोध लागला नाही...
इमेज
  भगवान परशुरामांनी शस्त्र व शास्त्राचा वापर मानव कल्याणासाठी केला - अश्विन मोगरकर परळी वैजनाथ,प्रतिनिधी.... भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुरामांनी शस्त्र व शास्त्राचा वापर मानव कल्याणासाठी केला असल्याचे प्रतिपादन अश्विन मोगरकर यांनी भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. गणेशपार भागातील सावळाराम मंदिर येथे भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांच्या जयंती मंगळवार, 29 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना अश्विन मोगरकर यांनी भगवान परशुराम यांच्या दैवी अवतारावर बोलताना पुढे सांगितले की, फक्त ऋषी म्हणून शास्त्र हाती एव्हढेच नव्हे तर गरज पडली तर शस्त्र हाती घेऊन भगवान परशुरामांनी अत्याचारी राजांना हरवून निशस्त्र केले. मानव कल्याणासाठी उन्मत्त सत्ताधार्यांनी जनतेवर केलेल्या अत्याचाराविरोधात शस्त्र हाती घेतले. प्रारंभी भगवान परशुरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी विजय जोशी, धनंजय आढाव, पद्माकर शहाणे, विरकुमार स्वामी, राजेश कौलवार, बालकृष्ण फुले, श्रीपाद चौधरी, गुरुनाथ हालगे, ...

अहो आश्चर्यम्.......!

इमेज
अखेर चोरालाच झाली उपरती:परळीच्या मुख्य डाकघरातील चोरी; जिथून साहित्य चोरले त्याच परिसरात पन्नास दिवसानंतर आणून टाकले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        गेल्या दीड महिन्यापूर्वी परळीच्या मुख्य डाक घरामध्ये आधार केंद्रातील संगणक, स्कॅनर व अन्य साहित्याची अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. मात्र आज(दि.२९) सकाळी सकाळी आश्चर्यकारक रित्या पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या बीएसएनएल कार्यालयाच्या मोकळ्या जागेत हे साहित्य एका पोत्यात आढळून आले आहे. तब्बल 50 दिवसानंतर या चोराला उपरती झाली असुन जिथून साहित्य नेले त्याच ठिकाणी परत हे साहित्य आणून टाकले असल्याचा प्रकार पुढे आला आहे. दरम्यान 50 दिवसानंतर हे साहित्य परत आणून टाकले तर हे साहित्य चोरण्यामागचा नेमका उद्देश काय होता? याबाबत आता तर्क वितर्क लढवले जात आहेत.        परळीतील मुख्य डाकघरातील चोरीस गेलेले आधार केंद्राचे साहित्य पोस्टाच्या बाजूलाच असलेल्या बीएसएनएल कार्यालय आवारात आढळले आहे.परळीतील मध्यवर्ती राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये पन्नास दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांने  आधार कें...
इमेज
  पहेलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर परळीत श्री भगवान परशुराम जयंतीची शोभायात्रा रद्द  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात भगवान श्री परशुराम जयंतीची शोभायात्रा काढण्यात येते. मात्र यावर्षी जम्मू-काश्मीर येथील पहेलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत काही देश बांधव मृत्युमुखी पडले तर काहीजण जखमी झाले आहेत. अशा दुर्दैवी प्रसंगात उत्सव साजरा करणे संयुक्तिक नाही. त्यामुळे यावर्षीची शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.        परळी वैजनाथ येथे दरवर्षी भगवान श्री परशुराम जयंती निमित्त भव्य दिव्य व मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात येते. मात्र यावेळी ही शोभायात्रा न काढण्याचा निर्णय घेण्यात असुन केवळ घराघरात श्री भगवान परशुराम प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाने श्री भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती सकल ब्राह्मण समाज परळीच्या वतीने देण्यात आली आहे.
इमेज
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मधिल २४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड परळी / प्रतिनिधी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे इयत्ता पाचवी व आठवीतील  विद्यार्थी  शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होत असतात,या ही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व प्रशालेतील तज्ञ शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे घेतलेले परिश्रम त्यामुळेच ईयत्ता पाचवीतील एकुण १३ तर ईयत्ता आठवीतील ११ असे २४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेसाठी निवड झाली असून सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी शुभेच्छा दिल्या.  सदर शिष्यवृत्ती परिक्षेसाठी ईयत्ता पाचवीतील कु.पार्थ सज्जनशेट्टी, कु.आदित्य कराड, कु.आर्या लिंबकर, कु.आयुशकुमार मुंडे, कु.अबुजर खान, कु.अक्षरा रंजन, कु.गायत्री मुंडे, कु.मेहेर सामत,कु.समृध्दी कराड, कु.सेजल सोनवणे, कु.श्रेयश तुपकरे,कु.वेद चाटे व कु.विश्वजा देसाई यांची निवड झाली आहे तर ईयत्ता आठवीतील कु.अनुष्का बनसोडे, कु.अरशान शेख, कु. अथर्व गित्ते,कु.धनराज दौंड, कु.पार्थ घाटे, कु.प्रणाली गव्हाणे, कु.रिध्दी अन्नेमवाड...
इमेज
  जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणे काढा: मागणीसाठी अभिजीत लोमटे यांचे २९एप्रील रोजी उपोषण  अंबाजोगाई --: (वसुदेव शिंदे)     अंबाजोगाई शहरातील जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणे काढावे या मागणीसाठी 29 एप्रिल पासून उपोषणास बसत आहेत.    अंबाजोगाई शहर हद्दीतील जयवंती नदी ही ऐतिहासिक व पौराणिक असून  पुरातन  काळापासून अंबाजोगाई शहरवासी यांचे धार्मिक कार्यक्रम या नदीकाठावर पूर्वपारपासून होत होते अंबाजोगाई शहराचे नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या जयवंती नदी ही शहरातील काही समाजकंटक यांनी पूर्णपणे गिळंकृत  करून कागदपत्राची हेराफेरी करत नदीस नाला घोषित केला आहे नदी पात्रात अनेक अनधिकृत बांधकाम करून धन दांडग्यांनी  संगमत करून स्वतः देखील अनधिकृत कब्जा करून नदी गिळणकृत केली आहे वास्तविक पाहता महसूल व शासनाकडे संपूर्ण रेकॉर्ड असताना देखील राजकीय दबावामुळे सदरच्या अतिक्रमाला विरोध केला जात नाही या उलट स्थानिक महसुली अधिकारी शांत बसून एक प्रकारे अतिक्रमाला खतपाणी देत आहेत तहसीलदार अंबाजोगाई यांनी सदरची अतिक्रमणे त्वरित दूर करावीत.  शिवाय राजकीय पाठबळाच्य...
इमेज
कलेक्टर ॲक्शन मोडवर: बीड जिल्हयातील अवैध बॅनर, होडींग व पोस्टर्स बाबत कार्यवाहीचे आदेश बीड, प्रतिनिधी....      नव्यानेच आलेले जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी जिल्ह्य़ातील अवैध बॅनर, होडींग व पोस्टर्स बाबत  कार्यवाहीचे आदेश काढले आहेत.   उच्च न्यायालयाचे  आदेश, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र व प्रधान सचिव (नवि-2) नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधील निर्देशानुसार कार्यवाही करणे बाबतचे पत्र बीड जिल्हाधिकारी यांनी आज (दि.२८) निर्गमित केले आहे.         जिल्हाधिकारी बीड यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात विविध सार्वजनिक सण उत्सव (रमजान ईद, रामनवमी, गुढीपाडवा, शिवजयंती, डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती इत्यादी जयंती यात्रा, ऊर्स, सप्ताह, जयंती, धार्मिक प्रवक्त्यांचे कार्यक्रम इत्यादी अनुषंगाने सर्व समाज व धर्माच्या लोक संघटना कडून आपापल्या परीने जिल्ह्यातील विविध चौकात, मुख्य रोडवर, सार्वजनिक ठिकाणी, मिश्र वस्तीत इत्यादी ठिकाणी विविध झंडे व त्यास अन...
इमेज
डाॅ.अद्वैत देशपांडे याचे राष्ट्रीय स्तरावरील एम.सी.एच परीक्षेत घवघवीत यश अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)- अंबाजोगाई येथील डॉ.अद्वैत सतिश देशपांडे यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील नीट अति विशेषोपचार एम सी एच पात्रता परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून, या परिक्षेत त्यांने ६०० पैकी ४६० गुण मिळवून संपूर्ण भारत देशातून १९० वा क्रमांक पटकावला आहे.         पुढे मुत्राशय विषयात उच्च शिक्षण व प्राविण्य मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी,जिद्द,परीश्रम तसेच श्रीदत्त,सर्वज्ञ दासोपंत कृपा,आई डॉ. अर्चना देशपांडे,वडिल डॉ.सतिश देशपांडे,बहिण डॉ. अपूर्वा देशमुख,काका, निवृत्त अभियंता विष्णु कुमार देशपांडे,निवृत्त प्रा.रत्नाकर देशपांडे, काकु,मामा,अनिल कुलकर्णी,इतर नातेवाईक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे डॉ.अद्वैत देशपांडे यांनी सांगितले.डॉ.अद्वैत यांनी मिळविलेल्या घवघवीत यशबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत  आहे.
इमेज
पहलगाम घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क: परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात तपासणी मोहीम व प्रतिबंधात्मक सतर्कता परळी वैजनाथ....       जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता पाळली जात आहे. याच अनुषंगाने बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र व दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात काटेकोर तपासणी मोहीम व सुरक्षाविषयक प्रतिबंधात्मक सतर्कता पाळण्यात येत आहे.       परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने कडक देखरेख व प्रतिबंधात्मक तपासणी मोहीम  राबविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल (RPF) कडून सुरक्षा बळकटी करणाच्या अनुषंगाने कडक देखरेख व प्रतिबंधात्मक तपासण्या करण्यात आल्या.या कारवाई दरम्यान पार्सल कार्यालय, गाड्यांमध्ये, तसेच स्थानक परिसरात तपासणी करण्यात आली. प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. संशयास्पद किंवा गुन्हेगारी कृती आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानक परिसरात आढळून आलेल्या अनधिकृत ...
इमेज
  चोऱ्या वाढल्या, नागरिक बेजार : दोन लाख सत्तर हजाराची घरफोडी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        सध्या चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले असुन नागरिक बेजार झाले आहेत. वाढलेल्या चोऱ्या आणि सर्व प्रकारच्या चोरट्यांचा धुमाकूळ  यामुळे चोऱ्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. बर्दापुर येथे धाडसी घरफोडी झाली असुन यामध्ये दोन लाख सत्तर हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे.      याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी महेबुब खयुम खुरेशी यांच्या  बर्दापूर येथील मावशी बाणु बाबामियाँ कुरेशी यांच्या घरी चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घरातील रूमचा दरवाजा खालच्या बाजुने तोडुन रूममधिल कपाटाचे लॉक तोडुन कपाटात बाणु बाबामियाँ कुरेशी यांनी ठेवलेले नगदी दोन लाख रूपये व सोन्याच्या पाच ग्रॅम च्या चार अंगठया असे एकुण २,७०,००० रू ऐवज चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी बर्दापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बर्दापुर पोलीस करीत आहेत.
इमेज
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रदिनी परळीत सद्भावना संकल्प सत्याग्रह  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       बीड जिल्ह्यातील जातीय विद्वेषाची धार कमी करुन सामाजिक सौहार्द निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा काढल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रदिनी(१मे) परळीत सद्भावना संकल्प सत्याग्रह करण्यात येणार आहे.      स्व.संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर काहिसा जातीय विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.यामुळे जनजीवन प्रभावित झाले.बीड जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द टिकून रहावे. आठरापगड जातीधर्मातील सामाजिक जनजीवन हे सलोखा व गुणागोविंद्याचे असावे या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाची राजकारण विरहित भूमिका आहे.या भूमिकेतूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा काढली होती.या यात्रेत बीड जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते.याच अनुषंगाने पुढचा टप्पा म्हणून परळी वैजन...

कोल्हापूरचे श्वानप्रेमी शिंदे कुटुंब अन् या श्वानपिलांची काय आहे कहाणी....?

इमेज
प्राणीमात्रांचा जिव्हाळा अन् पशुसंवर्धन मंत्र्यांचं पशुधना विषयीचं मातृवत 'वात्सल्य' आलं समोर ! पंकजा मुंडेंनी स्विकारलं दोन गोड पिल्लांचे पालकत्व:'प्रिती व रोझी' च्या गृहप्रवेशाचं ह्रदयस्पर्शी स्वागत ! परळी वैजनाथ |विशेष प्रतिनिधी|दि.२८...     राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री  पंकजा मुंडे यांची संवेदनाशीलता सर्व परिचित आहे. त्याचबरोबर त्यांचे श्वानप्रेमही सर्वांना ज्ञात आहे.एक व्यासंगी, परखड वक्ता, अभ्यासू खंबीर लोकनेता अशी प्रतिमा असलेल्या पंकजा मुंडे यांच्या अतिशय संवेदनाशील व मातृवत वात्सल्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची अनुभूती अनेकवेळा येते.असाच काहीसा प्रसंग काल बघायला मिळाला. या प्रसंगातून व्यक्ती म्हणून पंकजा मुंडेंचा प्राणीमात्रांबद्दलचा जिव्हाळा अन् पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणून पशुधनां विषयीचे त्यांचे मातृवत 'वात्सल्य'  समोर आले आहे.          कोल्हापूर येथील श्वानपालक सोनाली शिंदे यांनी स्वतःच्या घरी लेकरं सांभाळावे या पद्धतीने आठ श्वानांच्या पिल्लांचा सांभाळ केलेला होता.यापैकी दोन पिल्लं त्यांनी पंकजा मु...