पोस्ट्स

जून १, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.....

इमेज
अकरावी प्रवेश प्रक्रिया – नवीन सूचना जाहीर, नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा! परळी वैजनाथ, ५ जून २०२५ – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची आणि दिलासादायक सूचना जाहीर करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही किंवा अर्ज अर्धवट राहिला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टपणे कळवले आहे की, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. प्रवेश प्रक्रियेसाठी काही अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 🔹 भाग १ लॉक करून भाग २ बाकी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी: ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून भाग १ लॉक केला आहे, पण भाग २ अद्याप भरलेला नाही किंवा लॉक केलेला नाही , अशा विद्यार्थ्यांना आता दुसरी संधी दिली जात आहे. ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून २०२५ दुपारी १२:३० या कालावधीत या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम अर्जाचा भाग २ भरून लॉक करता येणार आहे. मात्र, आधीच भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना या कालावधीत पसंतीक्रमात कोणताही बदल करता येणार नाही. 🔹 नोंदणी न केलेल्या किंवा अर्धवट अर्ज असलेल्या विद्या...

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
ह.भ.प. अमृताश्रम स्वामी महाराज यांना कीर्तन महर्षी पुरस्कार बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीचे भूमिपुत्र तथा बीड जिल्ह्याचे आध्यात्मिक वैभव अमृताश्रम स्वामी (अमृत महाराज जोशी ) यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.        शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे समाज प्रबोधनासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात करण्यात आले होते,यामध्ये महाराष्ट्रातील चार दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन झाली आहेत. त्यांत महाराष्ट्रातील जेष्ठ कीर्तनकार तथा संत साहित्याचे अभ्यासक अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी ) यांना यंदाचा कीर्तन महर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी याबाबत माहिती दिलीयं. या कार्यक्रमास शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प. राजेंद्र महाराज येप्रे तथा येप्रे साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ नरेगाव पुणे यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे.. या वेळी अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते ,प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्...

हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळा: बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना "माऊली सेवा समर्पण पुरस्कार" जाहीर परळी वैजनाथ, जि. बीड (प्रतिनिधी) – अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने २१ व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना  "माऊलीसेवा समर्पण पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.         सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, निस्वार्थी सेवा आणि समर्पण वृत्ती याची दखल घेत अ.भा. वारकरी मंडळाने यावर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची  निवड केली असल्याचे अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सांगितले आहे.श्री. धर्माधिकारी यांचे कार्य समाजासाठी एक दीपस्तंभ ठरलेले आहे. त्यांनी दाखवलेला सेवाभाव आणि सातत्यपूर्ण प्रयत्न प्रेरणादायी आहेत.हा पुरस्कार संत सेवा, समाजकार्य आणि भक्तिपंथातील सेवा,समर्पण व योगदानासाठी दिला जात असुन, यंदा पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यान...

समतोल: उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी हाताळला प्रश्न !

इमेज
परळीतील उड्डाणपूल दुरुस्तीची कामे आणि वाहतूक व्यवस्थापनाचा साधला समतोल – प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय परळी वैजनाथ – परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असुन, ही कामे सुरू असतानाही पंढरपूरच्या आषाढी वारीला जाणाऱ्या दिंड्या येउन जाईपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी यशस्वी प्रश्न हाताळला.पार  पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत या कामांबाबतचा कार्य आराखडा तयार करण्यात आला असुन, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचे ठरवण्यात आले आहे. वाहतूक सुरु ठेवण्यावर भर... परळीतील हा उड्डाणपूल म्हणजेच शहरात येण्यासाठीचा मुख्य प्रवेशद्वार आहे. शहरातील आणि परराज्यातील अनेक भागांतील वाहतूक या पुलावरून होते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीच्या कामांदरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणे शक्य नसल्याने, कामे ही मध्यरात्रीच्या सुमारास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, दिवसाच्या वेळात सामान्य वाहनचालकांना फारसा त्रास होणार नाही. जड वाहतुकीसाठी बायपास मार्ग दुरुस्तीच्या कामादरम्यान जड ...
इमेज
नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा  मुंबई | ५ जून २०२५ जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त भामला फाऊंडेशनच्या 'The Global Climate Change Campaign' या विशेष उपक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील पर्यावरणीय संकटांवर उपाययोजना जाहीर केल्या. मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाल्या, “राज्यातील ५५ नद्या प्रदूषित असून या स्थितीला रोखण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. पर्यावरण, शहरी आणि ग्रामीण विकास विभाग या उपक्रमात एकत्र काम करणार आहेत.” याचबरोबर, दूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी विस्तृत आराखडा तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. “मुंबईतील IIT आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने राज्यात जलशुद्धीकरण आणि पुनर्वापर योजनांना गती दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रसाठीही त्यांनी एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणि जनजागृती मोहिमेची माहिती दिली. पुण्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून कपड्याच्या पिशव्या उपलब्ध करून देणाऱ्या व्हेंडिंग मशीनची संकल्पना राबवल...

प्रेरणादायक उपक्रम....!

इमेज
देशासाठी, देशासोबत – परळी तालुका माहेश्वरी सभेचा देशहितासाठी आदर्श उपक्रम परळी (प्रतिनिधी) –       महेश नवमी च्या पावन दिनानिमित्त परळी तालुका माहेश्वरी सभेने समाजसेवेचा आणि देशसेवेचा आदर्श ठरवणारा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या देशहिताच्या कार्यात योगदान देण्यासाठी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून सभेने निधी संकलन मोहीम राबवली. या अंतर्गत परळीमधील माहेश्वरी कुटुंबांनी एकत्र येत रु. १५,००० (पंधरा हजार) इतका निधी संकलित केला.     संकलित निधी थेट नॅशनल डिफेन्स फंड (NDF) कडे सुपूर्त करण्यात आला असून, या माध्यमातून देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांना मदतीचा हात दिला गेला आहे. यामुळे परळी तालुका माहेश्वरी सभा सामाजिक कार्यासोबत देशभक्तीचा आदर्शही निर्माण करत आहे. या उपक्रमात सभेचे पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्या परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. समाजासाठी, देशासाठी काहीतरी देण्याची भावना प्रत्येक सदस्याच्या कृतीतून दिसून आली. परळी तालुका माहेश्वरी सभेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर सामाजिक संस्था आणि संघटनांसाठी हा उपक्रम प्रे...

#बेशरम_नगरपरिषद हा हॅशटॅग वापरत प्रशासनाच्या बेशिस्त कारभारावर थेट निशाणा

इमेज
  परळी नगरपरिषदेच्या बेशिस्त कारभारावर अश्विन मोगरकर यांचा हल्लाबोल अस्वच्छतेवरून पर्यावरण दिनी प्रशासनाची शेलक्या शब्दात  जोरदार कानउघाडणी परळी, दि. ५ जून – आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना, परळी शहरातील प्रशासन मात्र अजूनही झोपेत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी केली आहे. परळीतील स्वच्छतेची स्थिती ही परळी नगरपरिषदेच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण आहे, असे म्हणत मोगरकर यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. "स्वच्छतेसाठी अधिकार, निधी आणि जबाबदारी असूनही नगरपरिषद कोणतीच ठोस कारवाई करत नाही. नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे कानाडोळा करण्यात आला आहे," असे ते म्हणाले. परळी शहरातील अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधी व दूषित पाण्यामुळे आरोग्यधोके वाढत आहेत. "स्वच्छता ही फक्त नागरिकांची जबाबदारी नसून, प्रशासनानेही ती तितक्याच गांभीर्याने घ्यावी लागेल. प्रशासन जबाबदारीने वागले तर नागरिक नक्कीच साथ देतील," असे मोगरकर यांनी नमूद केले. याव...

विद्यार्थी आणि पालकांची मागणी: 'मुदतवाढ द्या!'

इमेज
अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आजच; अनेक विद्यार्थी अद्यापही प्रक्रियेबाहेर – मुदतवाढीची मागणी तीव्र परळी वैजनाथ| ५ जून २०२५ अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आज, म्हणजेच ५ जून २०२५ आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेतील नोंदणी २६ मेपासून सुरू झाली होती आणि ती सुरुवातीला ३ जूनपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांची वाढती गर्दी व नोंदणी अपूर्ण राहण्याच्या तक्रारी लक्षात घेऊन अंतिम तारीख ५ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे: नोंदणी व ऑनलाइन अर्ज : २६ मे ते ५ जून २०२५ तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर : ५ जून सकाळी ११ वाजता आक्षेप नोंदवणे आणि दुरुस्ती : ६ जून ते ७ जून अंतिम गुणवत्ता यादी : ८ जून सायंकाळी ४ वाजता अनेक विद्यार्थी अद्याप प्रक्रियेबाहेर अर्ज भरण्याची मुदत संपत आली असताना अनेक विद्यार्थी व पालक अजूनही नोंदणी करू शकलेले नाहीत. अनेक शाळांमध्ये अद्याप निकाल उशिरा लागल्याने किंवा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. काही ठिकाणी वेबसाईटवरील स्लो प्रतिसाद, OTP न येणे, किंवा दस्...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम

इमेज
एकल प्लास्टिकमुक्त मंत्रालय: सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा — पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप 📍 मंत्रालय, मुंबई | दिनांक: ५ जून २०२५ जागतिक पर्यावरण दिन २०२५ च्या निमित्ताने आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमाला पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,“एक दिवसापुरतं नव्हे, तर सातत्याने पर्यावरणपूरक निर्णय घेणे हीच काळाची गरज आहे. मंत्रालय एकल प्लास्टिकमुक्त व्हावे ही केवळ घोषणाच नव्हे, तर प्रत्येक कर्मचाऱ्याचा सहभाग असलेली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून यामध्ये योगदान दिले, तर हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल.” यावेळी मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि एकल प्लास्टिकच्या वापराच्या विरोधात संकल्प घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हण...

जागतिक पर्यावरण दिन...

इमेज
 ' पर्यावरण संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य' - पंकजा मुंडे पथनाट्य सादरीकरणातून जनजागृतीसह  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीत  राबवली स्वच्छता मोहीम   मुंबई।प्रतिनिधी... पंकजा मुंडे यांनी गिरगाव चौपाटीतील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला.  त्यांनी म्हटले की, "पर्यावरणाचे संरक्षण हे केवळ सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.  आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यांनी नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे, झाडे लावण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले.  "आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करून मोठा फरक निर्माण करू शकतो," असे त्यांनी सांगितले.  मोहिमेतील प्रमुख उपक्रम वृक्षारोपण आणि संवर्धन : मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी उपस्थितांना झाडे लावून त्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.  जनजागृती कार्यक्रम : "झाडे लावा, प्लास्टिक टाळा, पाणी वाचवा, सौरऊर्जा वापरा, सायकल वापरा" या संदेशांच्या माध्यमात...
इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन पुण्यात; उपस्थित रहा- ॲड.जीवनराव देशमुख    परळी वैजनाथ — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह, संभाजी पार्क जवळ, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण  खा. श्री. शरदचंद्र पवार उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पुढील काळासाठी पक्षाच्या कार्ययोजनेवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.         परळी वैजनाथ शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी या निमित्ताने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाचा उत्साहवर्धक वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन हा पक्ष...
इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन :मोठ्या संख्येने उपस्थित रहा- सय्यद फेरोज परळी वैजनाथ — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन पुणे येथे होणार आहे.वर्धापन दिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी वैजनाथ रा.काॅ.शरदचंद्र पवार पक्ष युवक शहराध्यक्ष सय्यद फेरोज यांनी केले आहे.           राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह, संभाजी पार्क जवळ, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण  खा. श्री. शरदचंद्र पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.या महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पुढील काळासाठी पक्षाच्या कार्ययोजनेवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.          य...
इमेज
बीड शहरातील साठे चौकात दोन गटात वाद मारामारीत कोयत्याचा वापर दोघेजण जखमी   बीड : बीड शहरातील अतिशय गजबजलेल्या साठे चौकामध्ये दोन गटात गुरुवारी रात्री नऊ वाजता मारामारी झाली.  यामध्ये कोयत्याचा वापर झाला असून यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या साठे चौकामध्ये एका वाहनांमधून मासे नेले जात होते. परंतु या वाहनातून गोवंशाच्या मासाची वाहतूक होत आहे का ? याचा संशय काहींना आला आणि त्यांनी हे वाहन थांबवले.. परंतु वाहनातील लोक व या वाहनाला थांबवणाऱ्या लोकांमध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली.. यानंतर थेट कोयत्याने मारामारी देखील झाली.. हा प्रकार परिसरात असलेल्या पोलिसांना लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तोपर्यंत या मारहाणीत दोघेजण जखमी झाले होते. त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिशय वरदळीच्या चौकामध्ये ही घटना घडल्याने मोठी गर्दी जमा झाली होती. दरम्यान आता या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

“संवेदनशील विषयांवर जबाबदारीने बातम्या द्या”

इमेज
843 ऊसतोड महिलांच्या गर्भाशय काढल्याची बातमी अर्धसत्य - आ.चित्रा वाघ  बीड | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोडणी कामगार महिलांची गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बातमी काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांतून वेगाने पसरत आहे. मात्र ही माहिती अर्धसत्य असून दिशाभूल करणारी असल्याचा दावा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी केला आहे. “एक स्त्री म्हणूनही ही बातमी मला खोलवर जिव्हारी लागली. पण सत्य शोधताना लक्षात आलं की ही माहिती पूर्णपणे तथ्याधारित नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. शासनाने 2019 पासून कडक नियम लागू केले चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं की, शासनाने 2019 पासून ऊसतोडणी महिला कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही नियम आखले असून आता कोणत्याही महिलेचे गर्भाशय फक्त वैद्यकीय गरज असल्यासच , आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पूर्वपरवानगीनेच काढले जाते. 843 पैकी 576 शस्त्रक्रिया 2019 पूर्वीच्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 267 शस्त्रक्रिया 2019 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत बीड जिल्हा रुग्णालयात झाल्या असून त्या सर्व वैद्यकीय गरजेनुसार, तपासणीनंतर,...
इमेज
पंकजा मुंडे ,आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आज पर्यावरण परिषद     मुंबई (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, दिनांक ५ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील बांद्रा येथील ताज लँड्स एंड हॉटेलमधील बॉलरूममध्ये भव्य पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, मुंबईचे पालकमंत्री  आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पर्यावरण परिषदेत पर्यावरण विषयक अभ्यासपूर्ण चर्चा, तज्ज्ञांशी संवाद आणि पर्यावरण रक्षणासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. फक्त विचारांपुरते मर्यादित न राहता, कृतीद्वारे पर्यावरण जपण्याची गरज अधोरेखित करत पंकजाताई मुंडे यांनी या कार्यक्रमाद्वारे जनजागृतीची नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे. "आता केवळ विचार नव्हे, कृतीने जनजागृती करायची वेळ आली आहे," असे स्पष्ट करत पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना आणि पर्यावरणप्रेमींना आवाहन केले की, त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित रा...
इमेज
गंगाखेड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन गंगाखेड (प्रतिनिधी) – माजी केंद्रीय मंत्री, संघर्षयोद्धा व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे  यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गंगाखेड येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. स्व. गोपीनाथ मुंडे  यांच्या कार्याचा आणि संघर्षशील जीवनाचा गौरव करताना अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे राज्याच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या विकासात मोठा वाटा उचलण्यात आला होता, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे , बाळासाहेब पारवे , सुनिल ठाकूर , विनोद शिंदे , रामदास भेडेंकर सर , सोपान चाटे , बाबर भाई , सचिन जोगदंड , राजपाल दुर्गे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व श्रद्धेने पार पडला. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत, सामाजिक कार्यात त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
इमेज
वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी अंबाजोगाई(प्रतिनिधी):-  बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांस काल अंबाजोगाई  पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने मुंबई येथील जेल मधून ताब्यात घेऊन येथे आणल्या नंतर आज दि ४ रोजी न्यायलयात हजर केले असताना अंबाजोगाई येथील न्यायालयाने  कासले यास 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.         सध्या महाराष्ट्राच्या वर्तुळात चर्चेत असलेले नाव म्हणजे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले. रणजित कासले याला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे, आंबजोगाई शहर पोलीस स्टेशन आणि सायबर विभागात त्याच्याविरोधात रविवारी आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मुंबईतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात रणजीत कासलेला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलीस त्याला कोर्टाबाहेर घेऊन जाताना कासलेने सरकार विरोधात घोषणाबाजी केली. बीड पोलीस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले...
इमेज
उड्डाणपुलावरील वाहतूकबंदी व परळीत येणाऱ्या आषाढी वारीच्या दिंड्या: उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलावली उद्या बैठक परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी वैजनाथ येथील मुख्य वाहतुकीचे प्रवेशद्वार असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामांसाठी उड्डाणपूलावरची वाहतूक बंद करण्याचा निर्णय जनतेला विश्वासात न घेता महामार्ग प्राधिकरणाने घेतलेला आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासकीय स्तरावर विरोध दर्शवत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. याच अनुषंगाने आषाढी वारीच्या परळी शहरात येणाऱ्या पायी दिंड्या व पालख्यांचा महत्त्वपूर्ण मुद्दाही पुढे आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर परळीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आता उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असुन या बैठकीत आढावा घेऊन याबाबतची पर्यायी व्यवस्था व निर्णय घेण्यात येणार आहे.       उड्डाण पुलावरील वाहतूकबंदी व परळीत येणाऱ्या आषाढी वारीच्या दिंड्या या विषयांच्या अनुषंगाने आषाढी एकादशी दिंडी/पालखी निमित्त सोई, सुविधा व इतर अनुषंगीक बाबी व डॉ. शामप्रसाद मुखर्जी उड्‌डाण पुलाच्या बांधकामामुळे परळी शहरात येणारी वाहतु...
इमेज
समुपदेशनाने बदल्या ; ना. पंकजा मुंडेंचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मानले आभार गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात भेटून अधिकाऱ्यांनी केले ऋण व्यक्त परळी वैजनाथ।दिनांक ०४। पशूसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पहिल्यांदाच समुपदेशनाने झाली, या निर्णयाने आनंदित झालेल्या अधिकाऱ्यांनी काल गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना आभारपत्र देऊन त्यांचे ऋण व्यक्त केले.     ना. पंकजाताई मुंडे यांनी  पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या नुकत्याच समुपदेशनाने बदल्या केल्या होत्या, या निर्णयामुळे प्रत्येकाला हवी ती पोस्टींग मिळाली. आनंदित झालेले सर्व अधिकारी कार्यशाळेच्या निमित्ताने परळीत एकत्र आले होते, या सर्वांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमास उपस्थित राहून ना. पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली व त्यांचे ऋण व्यक्त केले. *मुक्या जीवाच्या विभागाला ना. पंकजाताईंमुळे आवाज व पालकत्व* -------- अधिकाऱ्यांनी ना. पंकजाताई मुंडेंना दिलेल्या आभारपत्रात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची स्थापना २० मे १८९२ मध्ये झाली. तदनंतर प्रस्त...

वाढदिवसानिमित्त सत्कार!

इमेज
खा. संजय जाधव यांनी घेतलं वैद्यनाथ दर्शन    परळी (प्रतिनिधी) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे सोमवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास  शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षाचे )उपनेते व परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले.         या वेळी प्रा. पंढरीनाथ धोंडगे, शिवसेना (उद्धव ठाकरे पक्षाचे) चे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल,  सिराज उपस्थित होते.खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. नारायण सातपुते, भोजराज पालीवाल, राजा पांडे व सिराज , संजय खाकरे, गणेश कासार, रमाकांत  रेवडकर, मनोज रामदासी यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
इमेज
  परळी वैजनाथ: ( वैद्यनाथ) ओंकार साखर कारखान्यात चोरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        येथील पांगरी च्या ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड (जुने नाव- वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना) मध्ये चोरीची घटना घडली असुन याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, ओंकार साखर कारखाना प्रा. लि. पांगरी येथील मिल मधील साफसफाईसाठी मिल नं ४ जवळ काढुन ठेवलेले पितळी लाईनर कोणीतरी दोन अज्ञात चोरट्यांनी एक मिल जी.एम. बेरिंग लाईनर पितळेचे वजन अंदाजे ७० किलो किंमत ६०००० रु.चोरून नेले आहे. या प्रकरणी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी बालाजी दत्तराव मुंडे यांनी फिर्याद दिली असुन त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.२जुन रोजी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह तोटेवाड हे करीत आहेत.
इमेज
५ वर्षापासून रखडलेल्या परळी-मरळवाडी-मांडवा (परळी) रस्त्यांची व पुलांची कामे कधी होणार?- मांडवा, मरळवाडी ग्रामस्थांचा सवाल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       ५ वर्षापासून रखडलेल्या परळी-मरळवाडी-मांडवा (परळी) रस्त्याची व पुलांची कामे कधी होणार? असा संतप्त सवाल मांडवा, मरळवाडी येथील काही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.       याबाबत उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग परळी वैजनाथ यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ वर्षापासून आजपर्यंत परळी- मरळवाडी-मांडवा (परळी) रस्त्याची कामे तसेच भगवती, बोरणानदीवरील पुलावरील कामे काहीही झालेली नाहीत. तसेच ३१ मार्च २०२५ पर्यंत परळी-मरळवाडी-मांडवा (परळी) रोड अपुर्ण काम ठेवलेले आहे.अद्याप ही कामे सुरू केलेली नाहीत. ही कामे कधी सुरू होणार ? अशी निवेदनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे. निवेदनावर  प्रभाकर पिराजी फड (माजी सभापती) मांडवा, सटवाजी किसन फड (माजी पं. स. सदस्य) मांडवा, प्रभू राम आंधळे (चेअरमन) मरळवाडी, संदीपान रामकिशन आंधळे (माजी सरपंच) मरळवाडी, लक्ष्म...

Vaidyanath Mandir Security Alerts!

इमेज
वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट : दीड लाखाचा मोबाईल व ५० हजारांची रोकड असणारी विसरलेली बॅग भाविकाचा शोध घेऊन केली परत  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत असतात. मंदिर व परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकीही नेमण्यात आलेली आहे.या ठिकाणी भाविकांकडून कधी कधी आपले किंमती सामान, बॅगा,मोबाईल आदी विसरतात.असाच एक प्रकार आज(दि.४) सकाळी घडला.मात्र येथील सुरक्षारक्षक व पोलीस चौकीतील पोलीसाने या भाविकाचा शोध घेत बॅग सुपूर्द केली.    आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील महादेवी कोंडारेड्डी हे वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते.वैद्यनाथ मंदिरात त्या दर्शनासाठी गेल्या मात्र दर्शन घेऊन गाभाऱ्यातच त्या आपली हॅण्डबॅग विसरून बाहेर आल्या. मंदिर परिसरातून ते निघूनही गेले.दरम्यान या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या वैद्यनाथ मंदिरच्या सुरक्षा सेवेकरीकोंडा कांबळे,...
इमेज
  ना.पंकजा मुंडेंना उमाताई समशेट्टे परिवाराची अनोखी भेट लोकनेत्याच्या स्मृतिदिनी दिली गोमाता ; गोपीनाथ गड करणार गोमातेचा सांभाळ परळी वैजनाथ। दिनांक ०३। लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अकरावा स्मृतिदिन आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्ताने गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगानेच आज गोपीनाथ गडावर गोमातेची अनोखी भेट भाजपा शहराध्यक्षा उमाताई समशेट्टी यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना दिली. या गोमातेचा सांभाळ करण्याची जबाबदारी गोपीनाथ गडाने घेतली आहे.        दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याशी प्रत्येक कार्यकर्ता व व्यक्तीपरत्वे भावना जोडलेल्या आहेत. गोपीनाथ गड हे समर्थक व मुंडे प्रेमींसाठी एक देवालयच बनलेले आहे. गोपीनाथ गडावर तीन शक्तीपिठांचे एकत्र मंदिरही आहे. याठिकाणी गोमाता असावी या भावनेपोटी समशेट्टी परिवाराने  यांनी एक गोंडस गोमाता (कालवड)  गोपीनाथगडाला भेट देण्याचा निर्णय घेतला. उमाताई समशेट्टी यांनी ही गोमाता ना.पंकजाताई मुंडे यांना सुपूर्द केली. यावेळी नितीन समशेट्टी, आ...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विनम्र अभिवादन  परळी, प्रतिनिधी...       जवाहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या  अकरावे पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. ए आर चव्हाण होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के शेप यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याविषयी थोडक्यात विवेचन करून साहेबांना विनम्र अभिवादन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. ए आर चव्हाण यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते त्यांनी या शिक्षण क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरून निधी महाविद्यालयाला उपलब्ध करून दिला. साहेबांनी सामाजिक ,आर्थिक, राजकीय ,शैक्षणिक कार्यात महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्रातील असा एकमेव नेता होता की त्या नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची व समाजकारणाची इत्त्यंभूत अशी माहिती होती असं साहेबांच व्यक्तिमत्व होते असे मत याप्र...

देवाच्याच दारात 'वाकडंतिकडं' करण्याचा संतापजनक प्रकार!

इमेज
शिवभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या व  बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा-शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे परळी (प्रतिनिधी):  श्री क्षेत्र परळी वैजनाथ तीर्थ क्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत वैद्यनाथ मंदिर पूर्व द्वारास दर्शन सभा मंडपामध्ये कंत्राटदाराकडून मांसाहार शिजवत असल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. सदर घटने मुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्याने जनमानसात  संतापाची तीव्र लाट उसळली आहे. समाज विघातक कृत्य करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.            तीर्थ क्षेत्र विकास आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिर च्या विकास कामासाठी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. पण कंत्राटदाराकडून बोगस कामे करून विकास कामांचा निधी घशात घालण्याचा प्रकार सर्रास पने सुरू आहे. करोडोंचा भ्रष्टाचार करून ही भूक भागत नसल्याने बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदाराने आता थेट मंदिर परिसरात मांसाहार शिजवून तमाम शिवभक्ता...

गोपीनाथराव मुंडेंसारखे आता ऐसे कोणी पुढे होणे नाही-रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक

इमेज
लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथगडावर लोटला जनसागर ! कुटुंबापेक्षाही काकणभर अधिक प्रेम जनतेने दिले; त्याची उतराई होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन- ना. पंकजाताई मुंडे गोपीनाथराव मुंडेंसारखे आता ऐसे कोणी पुढे होणे नाही-रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक परळी वैजनाथ।दिनांक ०३। माझे पिता आणि आपले नेता लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे पुण्यात्मा होते. त्यांनी आयुष्यभर कोणाचेही वाईट चिंतले नाही. सदैव वंचितांचे वाली आणि वाणी होण्याचा त्यांनी मार्ग निवडला. त्यातूनच त्यांचे मोठेपण निर्माण झाले.आज त्यांच्या जाण्यानंतर अकरा वर्षांनीही हा विराट जनसमुदाय हेच दाखवून देतो. मुंडे साहेबांनंतर तुम्ही आम्हाला बळ दिलं. आमच्या परिवाराला शक्ती दिली. त्यामुळे कुटुंबापेक्षाही काकणभर अधिकचे प्रेम तुम्ही केलेलं आहे. त्या प्रेमातून उतराई होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात दिली. तर गोपीनाथराव मुंडेंसारखे आता ऐसे कोणी पुढे होणे नाही असे वर्णन रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांनी कीर्तन प्रसंगी ब...

अभीष्टचिंतन लेख:✍️ प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे

इमेज
मैत्रीची भावना जीवापाड जपणारे गोपाळ आंधळे मैत्रीची भावना जीवापाड जपणारे गोपाळ महाराज आंधळे यांच्या जन्मोत्सवानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा! आज आपल्या सन्मित्र गोपाळराव महाराज आंधळे यांचा जन्मोत्सव आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, गोपाळराव महाराज आंधळे हे या संत परंपरेचा समृद्ध वारसा आपल्या उक्ती आणि कृतीतून जपणारं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे. परळी वैजनाथ नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती असलेले गोपाळराव, मराठी लोकसाहित्य, आणि संत साहित्याचे एक गाढे अभ्यासक आहेत. त्यांची मैत्रीची भावना जीवापाड जपण्याची वृत्ती त्यांचा मंगल मैत्रभाव सिद्ध करते. 'मुकुंद पूजा विधी भांडार' च्या माध्यमातून सुगंधाची पेरणी करणारे एक सत्शील उपासक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे. धार्मिक, राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रांत त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे, ज्यामुळे ते एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पाचव्या ज्योतिर्लिंगाच्या, अर्थात परळी वैद्यनाथ श्रीक्षेत्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशावर त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून एक अनमोल ग्रंथ साक...
इमेज
परळी वैजनाथ: खामगाव येथील एका शेतकऱ्याची आत्महत्या परळी वैजनाथ।प्रतिनिधी          परळी तालुक्यातील खामगाव येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज(दि.३) सकाळी उघडकीस आली. प्रल्हाद अंकुश बडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.          मागील काही वर्षांपासून त्यांना सततच्या नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेत ते नेहमीच असत असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.दरम्यान प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या अर्थिक विवंचनेतून झाली असल्याचे बोलले जात आहे मात्र ...

३ जुन स्मृतीदिन कार्यक्रमाचे प्लास्टिक मुक्त आयोजन

इमेज
 'स्वयंसिद्धा' पंकजाताई- गोपीनाथगडावर 'नो प्लास्टिक' !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          भारतीय जनता पक्षाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज ३ जून रोजी गोपीनाथ गडावर पारंपारिक पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी कीर्तन व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप असुन गोपीनाथ गडावरील सर्व कार्यक्रम हे 'नो प्लास्टिक" या पद्धतीने असणार आहेत. गोपीनाथ गडावर प्लास्टिक मुक्त कार्यक्रम करण्यात येणार आहे.          राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरण पूरक उपक्रम व प्लास्टिकमुक्ती बाबत मोठी चळवळ महाराष्ट्रात उभी केली आहे. या अनुषंगानेच याची स्वतःही अंमलबजावणी करतांना त्या दिसत आहेत.त्यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रम संपुर्णत: पर्यावरणपूरक आयोजित केला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सर्वांनाच एका व्हिडिओद्वारे पंकजाताई मुंडे यांनी निमंत्रण दिले असुन हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा कार्यक्रम असल्याचे म्ह...

असे आहे पंकजाताई मुंडे यांचे ट्विट...

इमेज
  दरवळतो अजुनही इथे तुमच्या स्मृतीचा सुगंध...! पंकजा मुंडेंनी आपले पिता आणि नेत्याच्या काव्यपंक्तीतून जागवल्या स्मृती परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आज ३ जुन रोजी ११ वा.स्मृतीदिन.त्यानिमित्ताने लाखो जनसमुदाया कडून या लोकोत्तर लोकनेत्यांच्या स्मृती जागवल्या जात आहेत.याच अनुषंगाने गोपीनाथराव मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडेंनी अतिशय समग्र अर्थपुर्ण काव्य पंक्तीतूनआपले पिता आणि नेत्याच्या स्मृती जागवल्या आहेत.      राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कवितेच्या चार ओळी ट्विट करत आपले पिता व नेता गोपीनाथराव मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन चरित्रातील समग्र सार ध्वनित करणाऱ्या या अतिशय अर्थपुर्ण चार काव्यपंक्ती आहेत. असे आहे पंकजाताई मुंडे यांचे ट्विट... ---------------------- दरवळतो अजुनही इथे तुमच्या स्मृतीचा सुगंध... बरसतो अजूनही स्नेह, अमर्त्य अशा नात्याचा हा बंध... वंदनीय लोकनेते स्व.गोपीनाथराव जी मुंडे साहेब यांना ११ व्या...
इमेज
  सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासूर रोखायलाच हवा अन्यथा परिस्थिती गंभीर ; ना. पंकजा मुंडे यांची परळीत जनजागृती मोहीम वैद्यनाथ मंदिरात कापडी पिशवी वेडिंग मशीनचे उदघाटन; आनंदधाम येथे वृक्षारोपण तर मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे केले आवाहन परळी वैजनाथ।दिनांक ०२। पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळेच पर्यावरणाला घातक असणाऱ्या एकल प्लास्टिक वापराचा भस्मासूर आपल्याला रोखायलाच हवा, यासाठी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक उपयोग करावा त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी कचरामुक्त परिसरावरही लक्ष केंद्रित करून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा वृक्षारोपणाकडेही प्रत्येकाने लक्ष द्यावे. एवढेच नाही तर एक झाड आई-वडिलांसाठी तर एक झाड हे आपल्या सृष्टीमातेसाठी लावावे आणि त्याचे संवर्धन करावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे आज केले.      शहरातील आनंदधाम येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ...