पोस्ट्स

इमेज
  परळी शहरातील उदगीरकर व डुबे कुटुंबीयांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी वैद्यनाथ शहरातील उदगीरकर व डुबे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  शहरातील प्रसिद्ध व जुने व्यापारी शंकर अप्पा उदगीरकर यांचे नुकतेच निधन झाले होते, त्याचप्रमाणे प्रसिद्ध व्यापारी भगवानराव डुबे यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते. या दोन्ही कुटुंबीयांची धनंजय मुंडे यांनी आज भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करुन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव  धर्माधिकारी, जयपाल लाहोटी, चेतन सौंदळे, कुमार व्यवहारे, शंकर कापसे यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
इमेज
  खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना परळी मतदारसंघात खत पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - पेरणीच्या तोंडावर काही डीलर्स स्वतःकडे खताचा साठा असूनही तो लपवत असल्याचा व कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याच्या तक्रारी येत असून, कृषी विभागाकडूनही काही प्रमाणात खत येणे बाकी असून आवश्यक साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच स्थानिक डीलर्स कडे उपलब्ध असलेल्या साठ्याची आकडेवारी तात्काळ समोर आणावी, अशा सूचना आज माजी कृषमंत्री, आ. धनंजय मुंडे यांनी खत व्यवस्थापन प्रमुख तसेच स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांना केल्या आहेत.  जून अखेर परळी मतदारसंघात आवश्यक असलेल्या युरियासह, डीएपी व अन्य आवश्यक खतांच्या साठ्यामध्ये जो फरक आहे, तो फरक रेक लावून तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत सूचना केल्या.  खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणे तसेच प्रमुख मागण्या असलेली व नामांकित खते डावलून जाणी...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. जे. व्ही. जगतकर यांची नियुक्ती    परळीवैजनाथ, प्रतिनिधी... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. जे. व्ही जगतकर यांची नियुक्ती सेवाजेष्ठता नुसार संस्था व विद्यापीठाने केली आहे.       डॉ जे व्ही जगतकर यांना शिक्षण क्षेत्रातील व प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विविध परिषदा, शोध निबंधाचे वाचन त्यांनी केलेले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे व प्रदीर्घ अनुभवामुळे संस्थेने त्यांची प्राचार्य पदी नियुक्ती केलेली आहे.  या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे , परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार  श्री धनंजय मुंडे , जवहार शिक्षण संस्थेचे सचिव  श्री दत्ताप्पा इटके यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी डॉ. जे व्ही जगतकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन हो...
इमेज
"हर घर नर्स, घर घर नर्स" या मोहिमेतून लाखो नर्सिंग कर्मचाऱ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी — अनिल जायभाये बीडकर यांची  माहिती मुंबई (प्रतिनिधी): देशातील तसेच परदेशातील विविध शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी "हर घर नर्स, घर घर नर्स" ही भव्य मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जायभाये बीडकर यांनी दिली. या मोहिमेच्या अंतर्गत AIIMS, DMER, DHS सारखी शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम, ओल्ड एज होम, बेबी केअर सेंटर, होम केअर सेवा, ॲम्ब्युलन्स सेवा, व्यसनमुक्ती केंद्र, महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या, अंगणवाड्या, शाळा (मराठी व इंग्रजी माध्यम), आदिवासी शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, विद्यापीठे, बँका, मॉल्स, डि मार्ट, रेल्वे, मेट्रो, विमान सेवा, तसेच विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये नर्सिंग स्टाफसाठी रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ज्या ठिकाणी ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात अशा सर्व ठिकाणी एक नर्सिंग कर्मचारी असणे ब...
इमेज
"आज तू हवी होतीस.." या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा जल्लोषात  पुणे  – डॉ. सदाशिव रोकडे लिखित "आज तू हवी होतीस.." या नव्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अखंडित कल्याणकारी ग्रुप व काकडे देशमुख संस्था आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात जल्लोषात पार पडला. कात्रज, पुणे येथे भरलेल्या या संमेलनात कवी संमेलन, कथाकथन तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तकासाठी प्रा. कल्याण राऊत यांनी प्रस्तावना लिहिली असून, मानवी भावभावनांचा अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांमध्ये वेध घेणारा हा संग्रह रसिक वाचकांसाठी सादर करण्यात आला. प्रेम, विरह, मैत्री, निसर्ग, सामाजिक वास्तव, जीवनातील सुखदुःख, स्वप्नं आणि आत्मचिंतन अशा विविध विषयांवर आधारित या कवितांमधून मानवी जीवनाचे विविध पैलू शब्दबद्ध करण्यात आले आहेत. "आज तू हवी होतीस.." या संग्रहातील कविता केवळ भावनिक नात्यांचा आलेख नसून त्या वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या, विचारांना चालना देणाऱ्या आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला लावणाऱ्या आहेत. शब्दांचा गंध आणि भावनांचा गोडवा अनुभवण्यास मिळतो, असे मत यावेळी उपस...
इमेज
चि.रमण प्रदीप खाडे यांच्यावर वाढदिवसाच्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न आ.धनंजय मुंडे, अक्षय मुदडा, राजकिशोर मोदी, माणिकभाऊ फड, सुरेश (नाना) फड यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-        कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांचे चिरंजीव रमण प्रदीप खाडेच्या वाढदिवसाच्या निमित्त मित्रमंडळीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा व वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारांकडून साजरा करण्यात आला.दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व केक कापून तसेच प्रत्यक्ष भेटून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. दरम्यान आ.धनंजय मुंडे, अक्षय मुदडा, राजकिशोर मोदी, माणिकभाऊ फड यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या.             कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्था परळी वैजनाथ सहसचिव प्रदीप खाडे यांचे चिरंजीव रमण प्रदीप खाडे यांचा वाढदिवसनिमित्ताने अंबाजोगाई येथे आईसाहेब, फक्शन हॉल...

अमरावतीत भाजपचा 'संकल्प से सिध्दी' उपक्रम

इमेज
पंतप्रधान मोदींमुळे 'सुशासन' ही देशाची संस्कृती बनली - ना. पंकजा मुंडे अमरावतीत भाजपचा 'संकल्प से सिध्दी' उपक्रम : ना. पंकजाताईंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद अमरावती ।दिनांक १६। देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा गेल्या अकरा वर्षाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी याकाळात करण्यात आली असून सरकार म्हणजे सेवा या हेतूने काम केले जात आहे. मोदींमुळे सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे, असे सांगत त्यांच्या योजना सर्व सामन्यापर्यंत पोचवा असं आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्ष पुर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशात भाजपातर्फे 'संकल्प से सिद्धी' हा उपक्रम राबविला जात आहे, याचाच एक भाग म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या.   मोदी सरकारच्या लोक कल्याण कारी कामाचा लेखाजोखा मांडताना पंकजाताई पुढे ...