पोस्ट्स

शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमात झाली होती चोरी....!

इमेज
परळी शहर पोलीसांच्या तत्पर तपासामुळे चोरी गेलेले अडिच लाखांचे सोन्याचे दागिने परत परळी (प्रतिनिधी): परळी वैजनाथ शहरातील हलगे गार्डन येथे शिव महाकथेच्या कार्यक्रमात महाप्रसादाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चैन चोरीला गेले होते. याप्रकरणी फिर्यादी कमलाबाई मोतीलाल बांगड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर १७६/२४ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक आर. के. नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे गोविंद भताने, पोहे घटमळ, पो ना/पांचाळ यांनी तपास करत बीड व धाराशिव येथे आरोपी महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले एक मनी मंगळसूत्र व सोन्याची चैन जप्त करण्यात आलीअसुन, आज फिर्यादी महिला कमलाबाई यांचा मुलगा मनोज कुमार मोतीलाल बांगड यांच्याकडे २५ ग्रॅम वजनाची, सुमारे ₹२,५०,०००/- किमतीची चैन परत करण्यात आली आहे.चोरी गेलेले दागिने परत मिळाल्यामुळे फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय यांनी पोलीस विभागाचे आभार मानले आहेत.

अन्न ग्रहण न करता रस व पाण्यावर अनुष्ठान

इमेज
  श्री १०८ गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे श्रावण मास मौन व्रतअनुष्ठान सुरू परळी  :लातूर जिल्ह्यातील खरोळा (ता. शिरूर अनंतपाळ) येथील श्री शंकरलिंग शिवाचार्य मठ संस्थानाचे प्रमुख श्री १०८ गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे १६वे श्रावण मास मौन अनुष्ठान परळी येथील बेलवाडी  श्री गुरुलिंग स्वामी मंदिरात २६ जुलैपासून सुरू झाले आहे. हे अनुष्ठान येत्या १६ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अनुष्ठान काळात शिवाचार्य महाराज कोणतेही अन्न न घेता, केवळ लिंबाच्या पाल्याचा रस व पाणी ग्रहण करीत आहेत. शुक्रवारी या अनुष्ठानाचा सातवा दिवस झाला. दररोज श्री गुरुलिंग स्वामी मंदिरात आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. आरतीवेळी अनेक भाविक शिवाचार्य महाराजांचे दर्शन घेत आहेत. या अनुष्ठान प्रसंगी गुरुलिंग स्वामी मठ ट्रस्ट, वक्रेश्वर देवस्थान विश्वस्त, वीरशैव लिंगायत समाज, तसेच विविध भजनी महिला मंडळे व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. : श्री शंकर लिंग शिवाचार्य महाराजांच्या अनुष्ठानास शनिवारी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या...

घरच्यांच्या त्रासातून वैतागलेला पती बेपत्ता .....!

इमेज
धक्कादायक: माहेरहून१५ लाख आण, दीरासोबत नांद म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      परळी शहरात पुन्हा एकदा सासरकडील छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.वडार कॉलनीतील एका विवाहीत  तरुणीने परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या सासरच्या लोकांविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे.         पिडितेच्या आरोपानुसार तिची सासू लक्ष्मीबाई, सासरे आसाराम आणि दीर शुभम हे गेल्या अनेक महिन्यांपासून तिचा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळ करत आहेत. त्यांच्याकडून सातत्याने माहेरून १५ लाख रुपये घेऊन ये असा दबाव टाकला जात होता. या मागणीस नकार दिल्याने  अनेक वेळा मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे तर तू तुझ्या दीरासोबत नांद अशी बळजबरी  तिच्यावर सातत्याने  करण्यात  आली आहे. दोन दिवसांपूर्वी तिला सासू-सासरे आणि दीर यांनी मिळून मारहाण केली.पैसे नाही आणलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे. या सर्व प्रकरणात तिचा नवरा दोन दिवसांपासून गायब आहे. तो अजूनही घरी परतलेला नाही.       या प्रकरणी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये ...

अभिष्टचिंतन विशेष लेख: संतोष जुजगर, परळी वैजनाथ.......

इमेज
  जनतेच्या मनाचा संपादक:श्री. राजेंद्र दादा आगवान आज २ ऑगस्ट! हा दिवस म्हणजे पत्रकारिता, समाजकार्य, सहकार, शिक्षण, कृषी, राजकारण आणि माणुसकीच्या नात्यांची जपणूक करणाऱ्या एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा – सायंकाळी प्रसिद्ध होणाऱ्या सायं 'दैनिक रणझुंजार'चे संपादक, माझे मार्गदर्शक, आदरणीय श्री. राजेंद्र दादा आगवान यांचा जन्मदिन! राजेंद्र दादांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका संपादकाचा जन्मदिन नसून, पत्रकारितेच्या निर्भीडतेचा आणि समाजाशी नाळ जोडणाऱ्या लेखणीच्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक, विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते, नवोदित पत्रकार, शेतकरी, शिक्षक, राजकीय कार्यकर्ते, सहकारी संस्था, महिला कार्यकर्त्या – सगळ्यांसाठी हा दिवस एक प्रेरणादायी पर्वणी आहे. लेखणीला लोकशक्तीची धार देणारे संपादक राजेंद्र दादा हे पत्रकारिता क्षेत्रात केवळ एक संपादक म्हणूनच नव्हे, तर निर्भीड आणि सजग जनतेचा प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांनी दैनिक रणझुंजार या सायंकाळी प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राद्वारे स्थानिक प्रश्नांना हक्काचं व्यासपीठ दिलं. अन्यायाविरोधातील त्यांची भूमिक...

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

इमेज
  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – श्यामची आई शाहरुख खान आणि राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री (प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, मराठवाडा विशेष प्रतिनिधी) :- मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा  दिल्ली येथे करण्यात आली आहे. कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून यंदा शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला आहे. तर, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे… सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – केरला स्टोरी – सुदीप्तो सेन सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान ( जवान ) आणि विक्रांत मॅसी ( 12th Fail ) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ...

ट्रकचे टायर बदलतांना कारने धडक दिली....जागेवर मृत्यू!

इमेज
  परळी-सिरसाळा रोडवर भीषण अपघात : ट्रक मालक सय्यद मगदुम यांचा मृत्यू परळी (प्रतिनिधी) – परळी-सिरसाळा रस्त्यावर आज रात्री 11.45 वा.सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रक मालक सय्यद मगदुम सय्यद जफर (वय अंदाजे 45, रा. पेठ मोहल्ला, परळी वै.) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिरसाळा जवळील रस्त्यावर सय्यद मगदुम रस्त्याच्या कडेला  पंक्चर झालेला आपल्या ट्रकचा टायर बदलत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करत त्यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.         घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक, नागरिकांनी मोठी गर्दी केली.दरम्यान धडक दिलेली कार सिरसाळा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांची जलदगती कामगिरी !

इमेज
संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांची जलदगती कामगिरी एक महिन्याच्या आत तपास व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून १लाख ६० हजारांचा मुद्देमाल फिर्यादीस केला परत परळी वैजनाथ, प्रतिनिधी....              बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कामकाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा करत अनेक उपक्रम राबवले. या अनुषंगानेच जलद गती तपासाबाबत ही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क केले. त्यामुळे आता गुन्ह्याचा तपास दिरंगाईने व  विलंबाने न होता जलद होताना दिसत आहे. अशाच प्रकारची कामगिरी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व त्यांच्या टीमने केली असुन परळी बस स्थानकातून जुन महिन्यात एका नागरिकाच्या गळ्यातील चैन चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा जलद गती तपास करून, याबाबतचा मुद्देमाल जप्त करून, त्याची सर्व न्यायालयीन प्रक्रियाही पूर्ण केली आणि चोरीस गेलेला मुद्देमाल संबंधित नागरिकास सहीसलामत परत देण्यात आला. ही जलदगती कामगिरी एक महिन्याच्या आत करण्यात आली. या कामगिरीबद्दल संभाजीनगर पोलिसांचे अभिनंदन होत आहे.         स...