पोस्ट्स

इमेज
  भगवान महावीर जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी  शहरातुन निघालेल्या शोभायात्रेचे भाविकांनी घेतले दर्शन  परळी (प्रतिनिधी)     शहरातील गणेशपार भागातील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त गुरुवार दि.१० एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.भगवान महावीरांच्या प्रतिमेची रथात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी भाविकांनी स्वागत करत दर्शन घेतले.     भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त गुरुवारी गणेशपार भागातील दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी सात वाजल्यापासुन पारायण,भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी 10 वाजता आकर्षक  रथामध्ये जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची जैन मंदिर येथुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी चढावा घेत महावीर संघई व सौ.मनिषा संघई यांनी घेत शोभायात्रा निघालेल्या भगवान महावीर यांच्या रथामध्ये मान मिळविला. सदरील शोभायात्रा अंबेवेस,नेहरू चौक,राणी लक्ष्मीबाई टॉवर,मोंढा मार्केट,जैन स्थानक,बाजार समिती,मोंढा, राणी लक्ष्मीबाई टॉवर,गणेशपार मार्...

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख>>>>>तृतीय रत्न: शतकानुशतके घुमणारा ज्ञानाचा एल्गार!

इमेज
तृतीय रत्न: शतकानुशतके घुमणारा ज्ञानाचा एल्गार महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे केवळ एक युगपुरुष नव्हते, तर ते एक अत्यंत प्रभावी समाजसुधारक, विचारवंत आणि लेखकही होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील रूढ अंधश्रद्धा, जातीय भेद आणि अन्यायकारक प्रथांवर कठोर प्रहार केले. ‘तृतीय रत्न’ हे त्यांचे 1855 मध्ये प्रकाशित झालेले महत्त्वपूर्ण सामाजिक नाटक याच प्रयत्नांचा ज्वलंत भाग आहे. हे नाटक तत्कालीन सामाजिक वास्तवाचे भेदक चित्रण करते आणि ब्राह्मणी पुरोहितशाहीच्या शोषणावर व समाजाला पोखरणाऱ्या अज्ञानावर कठोर टीका करते. ‘तृतीय रत्न’चा चिकित्सक अभ्यास करणे आजच्या परिस्थितीतही अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या नाटकाने उपस्थित केलेल्या अनेक सामाजिक समस्या आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या समाजात अस्तित्वात आहेत.  ‘तृतीय रत्न’ या नाटकाचा चिकित्सक अभ्यास करून त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि समकालीन महत्त्वाचा शोध घेणे कालसुसंगत आहे. *नाटकाचा सामाजिक-ऐतिहासिक संदर्भ:-* ‘तृतीय रत्न’ ज्या काळात साकारले, तो काळ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासातील एक निर्णायक टप्पा होता. पेशवाई...
इमेज
  किसान पुत्र आंदोलन: ४ मे रोजी एक दिवसिय शिबीराचे आयोजन --------अमर हबीब................   अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-  ४ मे २०२५ हा दिवस राखून ठेवा. त्या दिवशी आपण समजावून घेऊ, नव्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या. कोणते कायदे गळफास आहेत, याची माहिती. शिवाय शेतकरी स्वातंत्र्यासाठी काय करावे लागेल यावर विचारविमार्श. किसानपुत्र आंदोलनाचे एक दिवसाचे शिबीर ४मे रोजी आंबाजोगाईच्या पत्रकार कक्ष (नगर पालिका कार्यालय परिसर) येथे होणार आहे. त्यासाठीची नाव नोंदणी सुरू केली आहे. फक्त ५० शिबिरार्थी भाग घेऊ शकतात. २० जणांनी नावे नोंदवली आहेत. या पुढे फक्त ३० नावे घेतली जातील. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे उशीर करू नका.  शिबीर सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल व सायंकाळी पाच वाजता संपेल. सकाळी व संध्याकाळी चहा दिला जाईल. दुपारी साध्या जेवणाची व्यवस्था केली आहे. शिबिरात पूर्णवेळ सहभाग घेतलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.अमर हबीब 8411909909 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी.पूर्ण नाव- गाव, तालुका, जिल्हा-मोबाईल नंबर-शिबिरात सहभागी होण्याचे कारण-एवढी माहिती पाठवली की न...

गुरुचरित्र सारामृत पारायण व कथामृत सोहळ्याची सांगता !

इमेज
  परळी वैजनाथ ही आदिगुरूंची भूमी: येथील साधनेची अनुभूतीच वेगळी ! प्रत्येक जीव 'दत्त स्वरूप' माना;जीवनाचे कल्याण होणारच- परभणी दत्तधाम पिठाधिपती प.पू.मकरंद महाराज परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       सृष्टीतील  प्रत्येक जीव भगवत स्वरूप असतो. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत 'हर कंकर- शंकर' अशी संकल्पना असुन प्रत्येक जीवमात्र हे दत्त स्वरूप माना असे आवाहन करत परळी वैजनाथ ही आदी गुरूंची भूमी आहे. या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामींनी अनुष्ठान केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या साधनेची एक वेगळीच अनुभूती प्रत्येक साधकाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन दत्तधाम परभणीचे पिठाधीपती प.पू. मकरंद महाराज यांनी परळी वैजनाथ येथे केले.        वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुतत्त्व प्रदीप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री संतदास गणू रचित गुरुचरित्र सारामृत पारायण व गुरुचरित्र कथामृत सोहळ्याचा आज अतिशय उत्साहात व मंत्रून  टाकणाऱ्या वातावरणात समारोप झाला.भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार मांणल्या जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्...
इमेज
माजी सैनिकाच्या विविध प्रश्नाबाबत महत्वपूर्ण बैठक पडली पार       गेवराई  :-(प्रतिनिधी)  आज दिनांक 10 /4/25  गुरुवार रोजी माजी सैनिक यांच्या विविध प्रश्नाबाबत नगरपरिषद गेवराई वाचनालयात जवळील ज्येष्ठ नागरिक कार्यालयात बैठक संपन्न झाली.                                      यामध्ये गेवराई येथील माजी सैनिकाचे विविध प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्याला गती देण्यासाठी बैठक आयोजित केली होती.            या बैठकीसाठी सतीश कोटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष तथा श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था गेवराई अध्यक्ष अनिल बोर्डे यांना व गेवराई ग्राहक पंचायतचे विश्वास चपळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीत सर्वप्रथम किसन भारती साहेब यांच्या पत्नी व छत्रभुज सानप यांच्या सुनबाई यांचे अकस्मित निधन झाल्यामुळे दोन मिनिटाचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.      ...
इमेज
जालना:अकोल्यात आगीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ! पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश ; आगीच्या घटनेची माहिती जाणून घेत व्यक्त केल्या संवेदना जालना ।दिनांक १०। अकोला  (ता. बदनापूर) गावातील मठवाडी परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य पिकांचे तसेच जखमी पशूंचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी असे आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत पालकमंत्र्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली आहे.    अकोला गावातील गट क्रमांक ४१ मधील मठवाडी परिसरात आज दुपारी पोलवरील विजेच्या  तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली. या आगीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या धान्याचे तसेच चारा, गाडी बैल, पशू खाद्य, मोटर पाईपलाईन याचे मोठे नुकसान झाले. शेतात असलेली काही जनावरे देखील आगीत होरपळली.  आग लागल्याचे कळताच  तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आ...
इमेज
 डॉ. अशोक नारनवरे: एका विद्यार्थ्याच्या हृदयातून उमटलेले कृतज्ञतेचे स्वर आदरणीय डॉ. अशोक नारनवरे सर, मी तुमचा विद्यार्थी याचा मला सार्थ अभिमान आहे.विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा हाडाचा शिक्षक कसा असू शकतो हे मी तुमच्या रूपात अनुभवलेले आहे.आपल्यासाठी   पुस्तक म्हणजे जीव की प्राण ! पुस्तकावर अगाध  प्रेम करणारा अवलिया.! साहित्यांचे गाढे अभ्यासक म्हणून तुमची एक स्वतंत्र ओळख आहे.डोळसपणा बरोबरच सर्वस्तरातून निर्माण होणाऱ्या अवस्थेची जाणीव साहित्यात यायला हवी ,असा आपला नेहमी आग्रह असतो. आपल्या माणसाच्या  भावनेचा व अस्तित्वाचा सखोलतेने , संवेदनशीलतेने विचार करणारे तुमचे व्यक्तिमत्व ख-या अर्थाने मराठी साहित्य व समाजाची बांधिलकी अभिव्यक्त करते. सर ,तुम्ही आमच्यासाठी महान आहात. आपण माझ्या सारख्या गरीब, निराधार ,विद्यार्थ्याला नवी दिशा दिलीत आणि त्याला माणूस बनवलत; म्हणून तर आमचा जीवनप्रवास सुखकर झाला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पदवी शिक्षण घेताना मला आपला सहवास लाभला, पुढे तर आवडता विद्यार्थी म्हणून विशेष प्रेम व आपुलकी मला मिळाली, पुस्तक वाचनाची आवड निर्म...