पोस्ट्स

स्वच्छतेकडे गंभीर दुर्लक्ष- नागरीकांच्या आरोग्याला धोका!

इमेज
परळी शहरात व्हायरल आजारांचा प्रकोप; सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्णांची वाढती गर्दी परळी वैजनाथ/ प्रतिनिधी      परळी शहरात सध्या व्हायरल आजारांचा प्रकोप वाढत असून, स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.जुलाब, उलटी,  ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, आणि थकवा अशी लक्षणे घेऊन अनेक नागरिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात सुमारे ५०० हून अधिक रुग्णांनी विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये संसर्गजन्य आजारासंदर्भात उपचार घेतले आहेत. काही रुग्णांना डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या तापाच्या प्रकारांचीही लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.स्थानिक  रुग्णालयांच्या अनेक डाॅक्टरांनी सांगितले की, “पावसाळ्यापूर्वी हवामानात होणाऱ्या बदलामुळे अशा आजारांमध्ये वाढ होते. सध्या तापाचे प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.” शहरातील अनेक औषध दुकानांमध्ये जुलाब, उलटी, ताप व सर्दीच्या औषधांची मागणी वाढली आहे. तसेच, विविध आरोग्य ...
इमेज
विहिरीवर पोहायला गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू केज :- केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत पोहायला गेलेली ९ वर्ष वयाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे.      दि.९ जून रोजी दुपारी भरत साधु मोरे यांची मुलगी कु. अंजली भरत मोरे ही ९ वर्षाची मुलगी जवळच असलेल्या विहिरीत पोहायला गेली असता पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहिरी काठोकाठ भरलेली असताना प्रेत वर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या विहिरीवर पाण्याच्या मोटारी लावून पाणी कमी झाल्या नंतर रात्री ९:०० वा. च्या सुमारास प्रेत पाण्यभर काढण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव यांनी विहिरीत बुडून मृत्य झालेल्या कु. अंजली मोरे हिचे प्रेत केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीत तपासणी व शव विच्छेदनासाठी आणले आहे.

ड्रायव्हर केबिन जवळ बसलेली वृद्ध महिला ओरडली आणि मग झाली पळापळ !

इमेज
  केज- कळंब रस्त्यावर दी बार्निंग बसचा थरार ! ड्रायव्हर केबिन जवळ बसलेली वृद्ध महिला ओरडली आणि मग झाली पळापळ ! केज :- :- आगीत भस्मात झालेल्या एसटी बसने प्रवास करीत असलेली एक वृध्द महिला ही ड्रायव्हर केबिनचा जवळ बसलेली असताना अचानक बसने पेट घेतला. त्यावेळी आगीच्या ज्वाळा त्या वृद्ध महिलेच्या पाठीला चटका बसताच ती मोठ्याने ओरडली. त्यामुळे चालक, वाहक आणि प्रवाशांचे लक्ष गेले. त्या नंतर चालकाने बस बाजूला घेऊन थांबविली. वाहकाने सुद्धा संकटकालीन दरवाजा उघडला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दि. ९ जून रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास कळंब आगाराची केज- कळंब (एम एच- ११/बी एल- ९३७५) ही कळंब आगाराची एसटी बस केज कडून कळंबकडे जात असताना केज ते साळेगाव दरम्यान चिंचोली पाटी जवळ असलेल्या शेख फरीद बाबा दर्ग्या जवळ या बसच्या ड्रायव्हर केबिनच्या पाठीमागे खाली बसलेली एक वृध्द महिला तिच्या पाठीला आगीचा चटका बसताच मोठ्याने ओरडली. त्यामुळे चालकाने पाहिले असता गाडीच्या बॉनेटने अचानक पेट घेतला असल्याचे निदर्शनास आले. अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून एसटी बस चालक अनिल बारकुल आणि वाहक भांगे यांनी बस रस्त्य...
इमेज
नांदुरवेस परिसरातील गटार व रस्त्याची कामे तातडीने पुर्ण व्हावीत – मा.नगरसेवक अनिल अष्टेकर परळी वैजनाथ – प्रभाग क्र. 15 चे मा. नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या मागणीनुसार नांदुरवेस परिसरातील रस्ते, गटार व सरस्वती नदी स्वच्छतेच्या कामाची नगरपरिषद मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी पाहणी केली.    पावसाळ्यात साचणाऱ्या घाण पाण्याच्या समस्येवर चर्चा झाली. रस्ते व गटार खोदून उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली.मुख्याधिकारी कांबळे यांनी स्वच्छता निरीक्षकांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले.नगरसेवक अष्टेकर यांनी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मा. नगरसेवक रमेश चौंडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.        नांदुरवेस भागातील लादण्या व रस्त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात घाण पाणी साचते. ही समस्या दूर करण्यासाठी रस्ता व गटार किमान दोन फूट खोदून काम करावे, अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे  करण्यात आली.यावेळी नगरपरिषदचे विक्रम स्वामी, शिवसेनेचे सचिन स्वामी, युवा नेते चंद्रप्रकाश हालगे व लहु ह...
इमेज
वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात विसरलेली बॅग केली परत – प्रामाणिकपणाचा उत्तम प्रत्यय परळी वैजनाथ – वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सुनिता जाधव आणि अनिता जाधव या भाविकांची हॅन्डबॅग मंदिराच्या गाभाऱ्यात विसरली होती. बॅगमध्ये रोख पाच हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन होता. गाभाऱ्यात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचारी बबली वाघमारे यांनी ही बॅग आढळल्यावर तात्काळ ती मंदिरातील पोलीस चौकीत जमा केली. पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि. राजाराम शेळके यांनी तत्परतेने शोध घेऊन संबंधित भाविकांशी संपर्क साधला व त्यांना बॅग परत केली. या प्रामाणिक व तत्पर कृतीमुळे भाविकांनी पोलीस विभागाचे आभार मानले असून, बबली वाघमारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे. ही घटना भाविकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणारी असून, प्रामाणिकतेचा उत्तम आदर्श ठरली आहे.
इमेज
आषाढी वारी परळीत येणार्‍या दिंड्या : वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय:उपविभागीय अधिकाऱ्यांचा केला सत्कार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त पंचम ज्योतिर्लिंग श्री वैजनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या संतांच्या पालख्यांना अडथळा येऊ नये म्हणून परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याचा सकारात्मक निर्णय घेणाऱ्या उपविभागीय अधिकारी श्री. अरविंद लाटकर यांचा आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उड्डाणपुलाचे काम दिनांक 26 मे 2025 पासून सुरू करण्यात आले होते. हे काम पालखी मार्गावरच असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते व माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. उपविभागीय अधिकारी श्री. लाटकर यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत नगरपरिषद परळी येथे विशेष बैठक घेऊन काम तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संत...

सचोटी,निष्ठा व सरळमार्गी व्यवसायाचे तत्व जपणारे व संस्कारात करणारे व्यक्तिमत्व हरवले!

इमेज
  उदगीरकर परिवाराचा खऱ्या अर्थाने आधारवड कोसळला! अ ण्णा म्हणून ज्यांना उदगीरकर परिवार संबंधतो ते श्री शंकर वैजनाथअप्पा उदगीरकर हे माझे मोठे मामा. त्यांना स्वतःला धरून पाच भाऊ आणि चार बहिणी. ते शालेय वयात असताना घरची परिस्थिती जेमतेम होती. जेव्हा वडिलोपार्जित व्यवसायात म्हणजे खाद्य तेल व पेंडीचे उत्पादनात लक्ष घातले तेव्हा त्यांच्या बुद्धीची चुणूक दिसून आली. त्यांनी आपल्या कौशल्याच्या आधारे अगदी काही वर्षांतच भरारी घेतली आणि परळी शहरात या व्यवसायातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून नाव कमावले.  निश्चितच त्यांच्या सर्व बंधूंनी या यशात त्यांच्या मेहनतीचे योगदान दिले; परंतु सर्वांनीच अण्णा जे सांगतील तसेच केले आणि अण्णांनी घालून दिलेल्या तत्त्वांनी, मार्गाने जाणे पसंद केले. त्यांच्यासह चार भावांच्या मुला-मुलीची लग्न होईपर्यंत हा परिवार एकत्र नांदत होता आणि ती संख्या जवळपास पन्नास सदस्यांची होती! आज चारपेक्षा अधिक सदस्य एकत्र राहू शकत नाहीत; त्याकाळी अण्णांनी ते कसे शक्य करून दाखवले याचे नवल वाटते!  मी जेव्हा सातवी आठवीत शिकत होतो तेव्हा दिवाळी साजरी करण्यासाठी आईसोबत मामाच्या घरी...