पोस्ट्स

इमेज
  जि.प. शाळा कासारवाडी येथे अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी  साजरी! लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी साजरी झाली.  गावचे सरपंच श्री बंडू आत्माराम गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंदांनी साठे आणि टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.  उपस्थित सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल शाळेतील शिक्षक श्री सरोज कुमार तरुडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अण्णांचे शालेय शिक्षण, त्याचबरोबर त्यांचा साहित्याचा प्रवास, त्यांनी जीवनात सोसलेले दुःख, केलेली विविध कामे अशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देत शोषित समाजाला आपल्या साहित्यातून मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केल्याचं श्री तरुडे यांनी सांगितले व 'स्मशानातील सोनं' ही कथा सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली.  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी शाळेतील शिक्...
इमेज
महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीची नवोदयसाठी निवड परळी / प्रतिनिधी         परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु.तेजस्विनी नीलकंठ सलगरे हिची नवोदय विद्यालयाकरिता निवड झाली आहे.  महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. शाळेतील इयत्ता 9 वि वर्गात शिक्षण घेत असलेली कु.तेजस्विनी नीलकंठ सलगरे हिची नवोदय विद्यालयकरिता निवड झालेली असून तेजस्विनी सलगरे ही इयत्ता 5 वि आणि 8 वि वर्गाची स्कालरशिप परीक्षा, 8 वि वर्गाची एनएमएमएस या सर्व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. या शैक्षणिक वर्षात शाळेतील दोन विद्यार्थिनी नवोदय विद्यालय प्रवेशकरिता पात्र झाल्या असून स्कालरशिप, एमटीएस, एनएमएमएस यासारख्या विविध स्पर्धा परीक्षेत शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश  संपादन केले आहे. कु.तेजस्विनी सलगरे हिच...

Accident.....

इमेज
बसच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू ;संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड परळी वैजनाथ : प्रतिनिधी         तालुक्यातील पांगरी तांडा परिसरात एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक जागीच ठार झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण होऊन काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. मृत रिक्षाचालकाचे नाव श्रीनिवास शिवाजी राठोड (वय २३, रा. पांगरी तांडा) असे आहे. त्यांनी रिक्षातून काही प्रवाशांना कामाच्या ठिकाणी सोडल्यानंतर पांगरी रोडने तांड्याकडे परतत असताना शिवशाही बसने ( एमएच ०४ एफएल ०९८८ ) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा काही अंतर फरफटत गेल्याने श्रीनिवास  राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी एसटी बसच्या काचा फोडल्या. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांनीही घटनास्थळी उतरून मदतीचा हात दिला. दरम्यान, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, उपनिरीक्षक शेख, सहाय्यक फौजदार लक्ष्मण टोले, जमादार दत्ता उबाळे,  रमेश तोटेवाड, ...
इमेज
  प्राण्यांसाठीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिकेचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण प्राणीमित्रांची सेवा हेच मुख्य ध्येय ठेवून भविष्यातही हा उपक्रम अधिक व्यापक व्हावा मुंबई, दि. 31 :  'समस्त महाजन' या संस्थेच्या 'अर्हम अनुकंपा प्रोजेक्ट' अंतर्गत मुंबई आणि मुंबई उपनगर  परिसरातील गोमाता आणि इतर प्राण्यांच्या सेवेसाठी असलेल्या सुपर स्पेशालिटी प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.  या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त  गिरीश शहा, विश्वस्त परेश शहा, तसेच समस्त जैन समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  'समस्त महाजन' या संस्थेच्या अर्हम अनुकंपा प्रोजेक्टअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णवाहिका मुंबई, ठाणे, आणि पालघर या भागांतील गोमाता व इतर जखमी प्राण्यांवर उपचार करणार आहे.  समाजातील विविध गोशाळांमधील जखमी, आजारी गायी व इतर प्राण्यांना दवाखान्यात नेण्यासाठी हायड्रोलिक रुग्णावाहिका महत्त्वाचे ठरणार आहे. प्राणीमात...

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक वारशाचा गौरव..

इमेज
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती राज्यभर साजरी होणार मुंबई, ३० जुलै २०२५: महाराष्ट्र शासनाने संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंती वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने दिनांक १५ ऑगस्ट २०२५ , गोकुळ अष्टमी च्या दिवशी राज्यभरात उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदा यांनी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती पालखीतून मिरवून उत्सव साजरा करायचा आहे. हा निर्णय मा. मुख्यमंत्री महोदयांच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या निर्देशांनुसार घेण्यात आला असून, प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने याची प्रभावी अंमलबजावणी करावी , असे निर्देश देण्यात आले आहेत. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतांक २०२५०७३०१९०८३९७८२५ अंतर्गत उपलब्ध आहे आणि ते डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार , नगर विकास विभागाचे अवर सचिव अनिलकुमार रा. उग...

माजलगाव-केज व माजलगाव-परतूर महामार्ग रस्त्यावरील कामे....

इमेज
राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) : पॅकेज दुरुस्ती व रस्त्याच्या कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई | राष्ट्रीय महामार्ग ५४८ (सी) अंतर्गत माजलगाव ते केज (जि. बीड) आणि माजलगाव ते परतूर (जि. जालना) या मार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या संबंधित रस्त्यांच्या कामांची माहिती घेतली गेली. उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव ते केज आणि जालना जिल्ह्यातील परतूर ते माजलगाव या पॅकेजच्या दुरुस्ती व उर्वरित कामांना गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्व कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. तसेच माजलगाव शहरात अंमलात आणण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्याची चाचणी तातडीने घेण्यात यावी, असेही ते म्हणाले. बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रस्ते विकास महामंडळाचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर: पंतप्रधान किसान सन्मान निधी

इमेज
पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला वितरित होणार नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत २ ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या हप्तावाटप कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीला देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे (KVKs) , भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) , तसेच विविध कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू व अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही लघु व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. २० वा हप्ता वेळेत पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.