पोस्ट्स

पोलिसांचे आवाहन!!!!!

इमेज
  कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्यास पोलिसांच्या वतीने बक्षीस जाहीर केज :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्या आणि मकोका असे गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे.       मस्साजोग ता. केज जि. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ९ डिसेंबर रोजी टोल नाक्यावरून अपहरण करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्या गुन्ह्यातील सबंधित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. मात्र या गुन्ह्यातील कृष्णा शामराव आंधळे, वय (३० वर्ष), व्यवसाय-शेती व मुकादम, रा. मैदवाडी, ता.धारुर यांच्या विरुद्ध केज जि. बीड पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६३८/२०२५ भा. न्या. सं. १०३(२), १४०(१), १२६, ११८(१), ३४(४), ३२४(४)(५), १८९(२), १९० गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कृष्णा आंधळे हा आरोपी निष्पन्न असून तो खुना सारखा गंभीर गुन्हा केल्या पासुन फरार आहेत. त्यास पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस दलातर्फे चालु आहेत. पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, फोटो मधील आरोपीचे ठाव ठिकाण्याची कोणास माहिती कि...

व्याख्यान व निमंत्रितांचे कविसंमेलन !!!

इमेज
  स्व.श्यामराव देशमुख स्मृति समारोहाचे आयोजन 30 व 31 जानेवारीला  अरविंद जगताप यांचे व्याख्यान व निमंत्रितांचे कविसंमेलन याची मेजवानी परळी, दि. 22/01/2025 (प्रतिनिधी )        येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात येणारा यावर्षीचा स्मृतिसोहळा दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी आयोजित केलेला आहे.         दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भन्नाट अशा कार्यक्रमाची मेजवानी या स्मृतीसमारोहाच्या या सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी या सोहळ्याचे उद्‌घाटन सकाळी 11 वा. मा. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होईल.तर दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता परळीकर रसिकश्रोते ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत असतात असे सर्व रसिकश्रोत्यांच्या आवडीचे 'निमंत्रितांचे कविसंमेलन' संपन्न होणार आहे.त्यात प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई ) अरुण पवार (परळी वैजनाथ ) गोपाल मापारी (अकोला) दिवाकर जोशी (परळी व...

रा.से.यो. शिबीर!!!

इमेज
  युवकांनो  , आजच्या वर्तमानातील वर्तन हेच आपले भविष्य असते- प्रा. डॉ. माधव रोडे परळी : - दिं . २२ जानेवारी २०२५  तालूक्यातील  सिरसाळ येथील श्री . पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करेवाडी आयोजित विशेष युवक - युवती शिबीराचा समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे  प्रा. डॉ.  माधव रोडे हे म्हणाले युवकांनो  संपर्क नाही अन् त्यामुळे संवाद नाही भावना नाहीत त्यामुळे नाती नाहीत, नात्यामध्ये संवाद घडतो तेव्हा एकोप्याने निर्णय घेतले जातात . संवाद ही मनाची मुलभुत गरज आहे. युवकांनो  हे लक्षात ठेवा सौंदर्य कपडयात नाही कामात आहे , नटण्यात नाही विचारांमध्ये आहे , भपक्यात नाही साधेपणात आहे , बाहेर कशात नाही , तर आता मनात आहे. आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्यची निर्मिती करता आली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे मौनातून अभिव्यक्तीच्या दिशेने प्रवास   प्रगती करणे गरजेचे आहे. युवकांनी संवादातून नाती जापावी, थोर संत महात्म्याचे विचार आत्मसाथ करून स्वतःचा शोध द्यावा . आजच्या वर्तमानातील वर्तन हे आपले उद्याचे भविष्य आहे याची लक्षात ठे...

कलावार्ता :गौरवास्पद!!!!

इमेज
मराठवाड्याचा गौरव: भारंगम महोत्सवात 'ययाति' नाटकाचे विशेष सादरीकरण प्रख्यात रंगकर्मी गिरीश कर्नाड यांचे प्रसिद्ध नाटक 'ययाति' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग आणि बागबान थिएटर ग्रुपच्या संयुक्त प्रयत्नातून 7 फेब्रुवारी 2025 रोजी बंगळूर येथे कलाग्राम सभागृहात सादर होणार आहे. हे नाटक राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्लीच्या दरवर्षी होणाऱ्या भारंगम (भारतीय रंग महोत्सव) या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादर होणार असून, देशभर आणि परदेशातून येणाऱ्या नाट्यप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव देईल. भारंगम महोत्सवाचे महत्त्व भारंगम महोत्सव हा भारतातील सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवांपैकी एक मानला जातो. या महोत्सवात देशातील विविध भाषांमधील नाटके तसेच परदेशातील नाटक कंपन्यांची सादरीकरणे होत असतात. या वर्षी जर्मनी, तैवान, श्रीलंका, पोलंड, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक आणि रशिया सारख्या देशांतील कलाकारही भारंगममध्ये सहभागी होणार आहेत. हा महोत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून देण्यासोबतच देश-विदेशातील नाट्य कलाकारांना एकत्र आणून नाट्य क्षेत्रात नवीन संवाद निर्माण करतो. 'य...

प्रा. अभिषेक पी. धुमाळ यांचा विशेष ब्लॉग...>>>माती विना शेती

इमेज
  माती विना शेती       ✍️ प्रा . अभिषेक पी . धुमाळ वाढते शहरीकरण व औद्योगिकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे अशा परिस्थितीत पिकाचे कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे गरजेचे आहे. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेले पोषक द्रव्य पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक्स असे म्हणतात. हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे अशी शेती जिला मातीची गरज नसते वनस्पतीला व पिकाला आवश्यक खनिजे आणि खते पाण्याद्वारे दिली जातात. हायड्रोफोन शेतीत पीक उत्पादनासाठी फक्त तीन गोष्टी आवश्यक असतात पाणी, पोषक आणि प्रकाश जर आपण मातीशिवाय या तीन गोष्टी दिल्या तर झाडे फुलू शकतात, अशा तंत्रनास हायड्रोपोनिक्स तंत्र असे म्हणतात हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे घेतली जाणारी पिके यामध्ये जागेचा कमीत कमी वापर करणाऱ्या पिकांची लागवड केली जाते. जसे की गाजर, मुळा, शिमला मिरची, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, अननस, टोमॅटो, भेंडी, पालक, काकडी, औषधी वनस्पती चांगल्या प्रकारे वाढवता येतात....