रा.से.यो. शिबीर!!!
युवकांनो , आजच्या वर्तमानातील वर्तन हेच आपले भविष्य असते- प्रा. डॉ. माधव रोडे
परळी : - दिं . २२ जानेवारी २०२५ तालूक्यातील सिरसाळ येथील श्री . पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करेवाडी आयोजित विशेष युवक - युवती शिबीराचा समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. माधव रोडे हे म्हणाले युवकांनो संपर्क नाही अन् त्यामुळे संवाद नाही भावना नाहीत त्यामुळे नाती नाहीत, नात्यामध्ये संवाद घडतो तेव्हा एकोप्याने निर्णय घेतले जातात . संवाद ही मनाची मुलभुत गरज आहे. युवकांनो हे लक्षात ठेवा सौंदर्य कपडयात नाही कामात आहे , नटण्यात नाही विचारांमध्ये आहे , भपक्यात नाही साधेपणात आहे , बाहेर कशात नाही , तर आता मनात आहे. आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्यची निर्मिती करता आली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे मौनातून अभिव्यक्तीच्या दिशेने प्रवास प्रगती करणे गरजेचे आहे. युवकांनी संवादातून नाती जापावी, थोर संत महात्म्याचे विचार आत्मसाथ करून स्वतःचा शोध द्यावा . आजच्या वर्तमानातील वर्तन हे आपले उद्याचे भविष्य आहे याची लक्षात ठेऊन जगण्यात आणावे असे प्रा. माधव रोडे म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव योगेश व्यंकटराव कदम तर म्हणुन प्रमुख उपस्थितित विद्यापीठचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ एम. बी. धोंडगे , करेवाडीचे सरपंच कमलबाई कावळे , उपसरपंच श्यामलताई घाटुळ , प्रा. एच. पी. कदम आदि होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ के एम नागरगोजे प्रा दयानंद झिंजुर्डे डॉ वाळके अरुणा यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप सोळंके यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक गावकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा