कलावार्ता :गौरवास्पद!!!!
मराठवाड्याचा गौरव: भारंगम महोत्सवात 'ययाति' नाटकाचे विशेष सादरीकरण
प्रख्यात रंगकर्मी गिरीश कर्नाड यांचे प्रसिद्ध नाटक 'ययाति' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग आणि बागबान थिएटर ग्रुपच्या संयुक्त प्रयत्नातून 7 फेब्रुवारी 2025 रोजी बंगळूर येथे कलाग्राम सभागृहात सादर होणार आहे. हे नाटक राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्लीच्या दरवर्षी होणाऱ्या भारंगम (भारतीय रंग महोत्सव) या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सादर होणार असून, देशभर आणि परदेशातून येणाऱ्या नाट्यप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव देईल.
भारंगम महोत्सवाचे महत्त्व
भारंगम महोत्सव हा भारतातील सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवांपैकी एक मानला जातो. या महोत्सवात देशातील विविध भाषांमधील नाटके तसेच परदेशातील नाटक कंपन्यांची सादरीकरणे होत असतात. या वर्षी जर्मनी, तैवान, श्रीलंका, पोलंड, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक आणि रशिया सारख्या देशांतील कलाकारही भारंगममध्ये सहभागी होणार आहेत. हा महोत्सव भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून देण्यासोबतच देश-विदेशातील नाट्य कलाकारांना एकत्र आणून नाट्य क्षेत्रात नवीन संवाद निर्माण करतो.
'ययाति' हे गिरीश कर्नाड यांचे एक प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकात ययाति या पौराणिक पात्राच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्याच्या अनुभवांची चर्चा केली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन असलम शेख यांनी केले आहे. या नाटकातील सर्व कलाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे माजी विद्याार्थी आणि प्राध्यापक असल्याने हे नाटक मराठवाड्याच्या रंगभूमीसाठी एक अभिमानाची बाब आहे. या नाटकाद्वारे मराठवाड्यातील नाट्य कलाकारांची प्रतिभा देशभर प्रकट होणार आहे.
मराठवाडा हा प्रतिभावंत कलाकारांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. याच मराठवाड्यातून विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागातून अनेक प्रतिभावान नाट्य कलाकार, दिग्दर्शक आणि लेखक उदयास आले आहेत.प्रा. कमलाकर सोनटक्के, डॉ. लक्ष्मण देशपांडे,प्रा. त्र्यंबक महाजन,श्रीपाद बेंडे,डॉ. प्रभाकर मांडे,रा. रं. बोराडे, प्रा. फ. मु. शिंदे,अलोक चौधरी,प्रा. रंगनाथ तिवारी,डॉ. चंद्रकांत शिरोळे,प्रभाकर शिरोळे,विजया शिरोळे,लोटू पाटील, श्रीराम गोजमगुंडे, प्रा. कुमार देशमुख,प्रा. दत्ता भगत,प्रकाश त्रिभुवन,डॉ.रुस्तुम अचलखांब, प्रा. विजयकुमार गवई,प्रोफे.डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर,प्रा. केशव देशपांडे,प्रा. अजित दळवी,प्रा. रा. द. आरगडे, प्रा. यशवंत देशमुख, डॉ. दिलीप घारे,प्रा. शिवदास घोडके,डॉ. ऋषिकेश कांबळे,डॉ. जयंत शेवतेकर,प्रा. रवीशंकर झिंगरे, चंद्रकांत कुलकर्णी,बाळकृष्ण धायगुडे, दिलीप भोसले,डॉ. दासू वैद्य,डॉ. दिपाताई क्षीरसागर,डॉ. संजय पाटील देवळाणकर, डॉ. संपदा कुलकर्णी,मकरंद अनासपुरे, वर्षा उसगावकर,
डॉ ज्ञानेश्वर उंडणगावकर,डॉ.सतीश साळुंके,डॉ.गणेश चंदनशिवे,योगेश शिरसाठ,डॉ. जितेंद्र पानपाटील,डॉ. संभाजी भोसले,डॉ. मुस्तजीब खान,प्रा. दिलीप महालिंगे,डॉ. सतीश पावडे,डॉ. मंगेश बनसोड,प्रा. दीपक गरुड,शंतनू गंगणे, महेंद्र खिल्लारे,
दत्ता जाधव,सुजाता पाठक, पद्मनाभ पाठक, डॉ. किशोर शिरसाठ,राजकुमार तांगडे,
डॉ.अनिलकुमार साळवे,डॉ. सिद्धार्थ तायडे,डॉ. राजू सोनवणे,किशोर जांगडे,धनंजय सरदेशपांडे,
आश्विनकुमार देशपांडे,सुनीलदत्त कुलकर्णी, महेश सबनीस,मुकादम, अमोल आरगडे,अमृत महाजन,बालाजी सुतार, संभाजी तांगडे,शैलेश गोजमगुंडे,
मंगेश देसाई,सतीश बोरा,डॉ. उमेश राजहंस, योगेश इरतकर, चैतन्य सरदेशपांडे, डॉ. गणेश मुडेगावकर,डॉ. वैशाली बोदेले,प्रा.स्मिता साबळे,प्रा. गजानन दांडगे,डॉ. गणेश शिंदे,रमकांतभालेराव,किशोर पुराणिक,डॉ. दुष्यंता रामटेके,डॉ. उषा कांबळे, डॉ. चंद्रशेखर कणसे,डॉ. गहिनीनाथ वळेकर, प्रा.रमेश धोंडगे,प्रा. नितीन गरुड,शिवाजी मिस्त्री,शंभू विश्वासू,प्रा. कैलास पुपुलवार,डॉ. तुकाराम देवकर,फिरोज काझी,डॉ. संतोष गालफाडे,गौतम सोनवणे,प्रा. अमोल अढाऊ,अमोल पानबुडे,डॉ. सुधीर निकम,प्रदीप भोकरे, अनिल कांबळे,कल्याण वाघमारे,रणजित वाघमारे,प्रा. विनोद दळवी,कोमल सोमारे,प्रियांका उबाळे,अश्विनी भालेकर, प्रेरणा खरात,पूजा तायडे, वैशाली दाभाडे,प्रा. विशाखा शिरवाडकर, अरुण सरवदे,डॉ. चंद्रकांत जोगदंड, राजू वाघमारे, कैलास वाघमारे, किशोर उढाण,हरिदास घुंगासे,नंदू वाघमारे, डॉ. दिलीप वाघ,रुपेश परतवाघ,डॉ. हरी कोकरे,अमेय दक्षिणदास,कमलेश महाजन,डॉ. योगिता महाजन,महेश आचिंतलवार,अमर सोनवणे, रोहित देशमुख,सतीश लिंगडे,डॉ. अर्चना चिक्षे,सुनील कांबळे,डॉ.सय्यद अमजद,सिद्धेश्वर थोरात,प्रदिप कांबळे,आसिफ अन्सारी,अनिल मोरे, वाल्मिक जाधव,गिरीष बिडवे,पांडुरंग वाघमारे, दयानंद सरपाळे,रवी आघाव,सिद्धेश्वर इंगोले, गोपी मुंडे,रावबा गजमल,प्रवीण पाटेकर,शेख अस्लम बागवान आदी कलावंतांनी रंगभूमीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे व आजही काही रंगकर्मी सक्रियपणे आपले योगदान देत आहेत. यापूर्वीही मराठवाड्यातील काही नाटके भारंगम महोत्सवात सादर झाली आहेत. या नाटकांनी मराठवाड्याची ओळख देशभर पसरवली आहे.आजही आश्वासक लेखक, अभिनेते,दिग्दर्शक, तंत्रज्ञ देशभर आपला नावलौकिक करीत आहेत.
मराठवाड्यातील अनेक नाट्य संस्थांनी नाट्य कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी मदत केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)सह मराठवाड्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये नाट्यशास्त्राचे अभ्यासक्रम उपलब्ध असून, तेथे विद्यार्थी नाट्यकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतात. मराठवाड्यात दरवर्षी अनेक नाट्य स्पर्धा, उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे नाट्य कलाकारांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी मिळते.
भारंगम महोत्सवात
मराठवाड्यातील नाट्य कलाकारांनी नेहमीच आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. मराठवाड्यातील नाटके आपल्या विषयांच्या विविधते, कलात्मकते आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग आणि बागबान थिएटर ग्रुपचे 'ययाति' नाटक भारंगम महोत्सवात सहभागी होणे ही मराठवाड्याच्या रंगभूमीसाठी एक मोठी उपलब्धी आहे. हे नाटक मराठवाड्यातील नाट्य कलाकारांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. हे नाटक नक्कीच प्रेक्षकांना प्रेरणा देईल आणि त्यांच्या मनात एक छाप उमटवेल.
ययाति नाटकातील सहभागी कलावंत : सैनिक - ऋषिकेश कारके, पांडुरंग शिंगारे, किशोर थोरात, गाणार वाल्मीक ,पुरू - शुभम कोल्हे, चित्रलेखा - प्रेरणा खरात, स्वर्णलता - पूजा पवार,शर्मिष्ठा - विशाखा शिरवाडकर, देवयानी - उल्का कुलकर्णी,
ययाति - शेख असलम युनूस
या कलाकारांनी अभिनय केला आहे.तर तांत्रिक बाबी
नेपथ्य रामेश्वर देवरे, डॉ. गजानन दांडगे ,संगीत
विनोद आघाव, रोहिदास सोमवंशी व रोहन गहिरे
,प्रकाश योजना वाल्मीक जाधव ,रंगभूषा - वेशभूषा
भाग्यरवी कुलकर्णी, रुपाली अल्हाट यांनी सांभाळल्या आहेत.
आश्वासक रंगकर्मी अस्लम बागवान रंगभूमीवर काहीतरी विशेष करण्याची स्वप्नं डोळ्यांत घेऊन आलेला हा अवलिया. रंगभूमीचा अवकाश आपल्या सर्जनशील ऊर्जेने
समृद्ध करीत आहे.कठीण परिस्थितीवर मात करत कलाकार आपल्या कलेला जिवंत ठेवत असतात. स्वत:च्या कलेला समाजात एक वेगळा मान मिळवून देत असतात. अगदी त्याचप्रमाणे मराठवाड्यातील रंगभूमीचे नाव उज्वल करण्यासाठी रंगभूमीचा मळा फुलविणारा शेख अस्लम बागवान' हा आश्वासक रंगकर्मी आहे."कलाकारांचा बालेकिल्ला बीड जिल्हा" या घोषवाक्याला बळकटी देणाऱ्या शेख अस्लम बागवान या तरुण नाट्यकर्मीचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो!
नाटयनिर्मितीतल्या सातत्यामुळे त्यांना अनेक मानसन्मान,पुरस्कारही मिळाले आहेत.देशभरातील महत्वाच्या नाट्यमहोत्सवात त्यांनी नाट्यप्रयोग सादर केलेले आहेत.आजही नवनवीन प्रयोग ते करीत असतात.प्रामाणिकपणे केलेल्या नाटयकलेच्या जोपासनेमुळे त्यांना अवघा महाराष्ट्र सच्चे रंगकर्मी म्हणून ओळखतो. अस्लम बागवान या रंगकर्मीच्या हातून उत्तमोत्तम नाटयकृती निर्माण होवोत.भारत रंग महोत्सवासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावलौकिक होत राहो. या मंगलकामनेसह
प्रयोगास नाट्यगृहभरून शुभेच्छा!
✍🏻
प्रा.डॉ. सिध्दार्थ तायडे
नाट्यशास्त्र विभाग प्रमुख, संत रामदास महाविद्यालय,घनसावंगी जि. जालना
मो.9822836675
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा