परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-⬛ *' पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली '.......!* ● *परळी सकाळच्या थंडीने गारठली; दाट धुक्याने दृष्यमानता कमी* ●

  ⬛  *' पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली '.......!*


● *परळी सकाळच्या थंडीने गारठली; दाट धुक्याने दृष्यमानता कमी* ●


छायाचित्रे: अनुपकुमार कुसुमकर


परळी वैजनाथ / प्रतिनिधी .......

        गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आज (दि.१६)  शहरासह सर्वत्र थंडीचा जोर आणखीनच वाढला होता. पहाटेच्या वेळी शहरावर धुके पसरलेले होते. उजेडता उजेडता नागरीकांना गडद धुक्याचा अनुभव आला. दाट धुक्याने रस्त्यावर  दृष्यमानता कमी होती.एक प्रकारे " पहाटेच्या थंड वेळी , वाट धुक्यात हरवून गेली " असा कवितेतील प्रत्यक्ष अनुभव परळीकरांनी अनुभवला.

         गेल्या चार पाच दिवसापासून  थंडीच्या लाटेने जनजीवन गारठले आहे. तापमानाचा पारा सरासरीने निच्चांकी येत खाली आला आहे. यासोबतच आज रविवारी सकाळच्या दाट धुक्यात परळी शहर हरवले. धुक्यामुळे मार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. दाट धुक्यामुळे रस्त्यावर  दृश्यमानता कमी झाली. पहाटे पासूनच थंडीचा जोर सुरू झाला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अंगातील थंडी गेलेली नव्हती.कालही गारवा होता. आज तर पहाटेच्या वेळी धुक्यात शहर हरवल्या सारखे दिसत होते.धुक्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या कमी होती. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या दिसून आल्या.थंडीत कुडकुडत बसावे लागत असल्याने अनेकांनी आपल्या रस्त्यालगत  शेकोट्या पेटविल्या होत्या.वैद्यनाथ मंदिर रोड,बस स्टँड , रेल्वे स्टेशन, अंबाजोगाई रोड, थर्मल काॅलनी, नेहरू चौक,टॉवर जवळील हॉटेलमध्ये दाट धुके, गुलाबी थंडीत गरमागरम  चहा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

@@@

 बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर होउ शकतो. परिणाम  .....!

    पहाटेच्या सुमारास नागरिकांना गारव्याचा अनुभव आला. पहाटेच्या सुमारास शहरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी आठपर्यंत हे धुके शहरावर कायम होते. या धुक्याच्या गारव्यामुळे नागरिकांना हिवाळ्यातील वातावरण अनुभवण्यास मिळाले. तसेच निसर्गाचा हा चमत्कारही अनुभवता आला. पण वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आरोग्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे.

@@@

निराश वातावरणाची जाणीव....!

          अल्हाददायक वातावरण हे निसर्गाच्या बदलाने बदलते. आपल्याकडे नेहमी धुके पडत नाही त्यामुळे धुके पडल्याचे वेगळेपण अनुभवावयास मिळाले. परंतु सूर्यप्रकाशामुळे शरीराला डी जीवनसत्त्व मिळते. सूर्यप्रकाश हा मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक असतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जेव्हा सूर्यदर्शन कमी होते आणि धुके पडते तेव्हा नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या नैराश्यात वाढ होते. एवढेच नाही तर वातावरणही थोडे निराश असते. त्यामुळे सामान्य व्यक्‍तीही थोडी निराशच असते असे मानसशास्त्रीय कारण प्रत्यक्ष स्वरुपात आजच्या दिवशी पहायला मिळाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!