युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

एकही मंडळ सोयाबीन विम्यापासून वंचित राहणार नाही

 धनंजय मुंडे यांचा यशस्वी समन्वय; उर्वरित 13 सह बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना सोयाबीन अग्रीम पीकविमा लागू




कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, उपग्रह आदी यांनी केलेला अभ्यास व अहवाल याआधारे सोयाबीन उत्पादकांना दिलासा


एकही मंडळ सोयाबीन विम्यापासून वंचित राहणार नाही


बीड (दि. 08) - पावसाने ओढ दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील सोयाबीन या पिकाच्या अग्रीम पीक विम्याचा निर्माण झालेला प्रश्न अखेर पूर्णपणे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या समन्वयामुळे मार्गी लागला असून आता उर्वरित राहिलेल्या 13 मंडळांसह जिल्ह्यातील संपूर्ण 86 मंडळांमध्ये सोयाबीन पिकास अग्रीम 25% पीक विमा लागू करण्यात आला आहे. 


ज्याठिकाणी पावसाच्या खंडामध्ये सदोष किंवा नियमात न बसणारे खंड दाखवण्यात आले होते, त्या मंडळांचाही समावेश आता करण्यात आला आहे. पूर्वी मंजूर 73 व नव्याने करण्यात येत असलेले 13 अशा सर्वच मंडळांमध्ये आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रीम 25% पिकविम्याचा आधार मिळणार आहे. 


कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्या वेत्ता तसेच वेगवेगळ्या उपग्रहांच्या पावसाची नोंदणी केलेल्या अहवालांच्या आधारे केवळ खंड यावर अवलंबून न राहता विविध निकषांचा सुयोग्य वापर करून हा अग्रीम पीकविमा मंजूर करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून जिल्हा प्रशासनाने ही त्यास पूरक प्रतिसाद दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून आजही याबाबत बैठकांचे सत्र पार पडले.


या बैठकीत शास्त्रज्ञ डॉ. डाखोरे यांनी अल्प काळात उपग्रह डेटा आधारित विविध निर्देशांक, जमीन ओलावा निर्देशांक, पीक वाढ निर्देशांक, तापमान फरक, बाष्पीभवन आदी परिपूर्ण माहिती सादर केली. डॉ. सुर्यवंशी, डॉ. गरुड यांनी कायिक वाढ ही उत्पादक वाढ नसल्याचे निदर्शनास आणले. शेतकरी प्रतिनिधी श्री, काकडे, चौरे यांनी शेतातील परिस्थिती, उत्पादन घट कथन केली. श्री. गोंदकर यांनी हलक्या जमिनीच्या समस्या मांडल्या. उपविभागीय कृषी अधिकारी बीड व अंबाजोगाई श्री. गर्जे व शिनगारे यांनी कृषी विद्यापीठ, क्षेत्रिय सर्व्हे व तपासण्या या आधारे त्याचे अधीन असलेले अनुक्रमे 9 व 4 महसूल मंडळांबाबत लिखित अहवाल देऊन उत्तम सादरीकरण केले. उपसंचालक श्री. निटनवरे यांनीही याबाबतचे पूरक मुद्दे मांडले तर तंत्र अधिकारी श्री. खेडकर यांनी बैठकीचे नियोजन केले. 


जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांसह सर्वच जिल्हा प्रशासनाने अग्रीम बाबत पाठपुरावा केल्याने हा निर्णय तातडीने होऊ शकला आहे. ना.धनंजय मुंडे यांनी प्रथमच उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणारे कृषी विद्यापिठातील उच्च पदस्थ अधिकारी व जिल्हा प्रशासनाचा समन्वय घडवून आणला. या प्रयत्न आगामी काळात पीकविम्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या