मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

शेतकरी कीर्तन महोत्सव...

शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखा- कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांचे शेतकऱ्यांना आवाहन 

परळी / प्रतिनिधी

     रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेतीचा पोत खराब होत असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतील. हे टाळायचे असेल तर शेतकरी बांधवांनी शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखावा, असे आवाहन बीड जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांनी केले.


शेतकरी कीर्तन महोत्सवात 'शेतकरी योजना, शेती उद्योग आणि शेंद्रीय शेती ' या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रासायनिक खत, पवारण्या याच्या अती वापरामुळे शेतीमधील कीटकांची जीवन साखळी विस्कळीत झाली आहे. शेतीमध्ये काही जीव जंतू हे शेतीला लाभदायक असतात तर काही हानीकारक असतात. हानीकारक किकांना खाण्याचे काम काही किचकट करतात.  त्यातूनच शेतीचा समतोल राखला जाती. कधी कधी हानीकारक असणाऱ्या कीटकांची संख्या वाढते तेव्हा किटक नाशक फवारणीचा पर्याय असतो. पण अलिकडे किती गरज आहे याचा विचार न करता भरमसाठ किटक नाशक फवारले जातात. परिणाम उपयुक्त आणि हानीकारक दोन्ही तऱ्हेचे किटक संपत आहेत. त्यातून नैसर्गिक जीवन साखळी विस्कळीत होत आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेताचा पर्याय निवडला तर अधिक लाभ होऊ शकतो. रासायनिक खतांचा वापर टाळला तर कदाचित थोडे उत्पादन कमी होईल. पण त्याच वेळी खर्चही कमी होईल, असेही साळवे म्हणाले. 


यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठीची सर्व प्रक्रियाही त्यांनी समजावून सांगितली... यावेळी जिल्हा कृषी अधिकारी, धारूर तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासह बीड कृषी विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

●●●●●●●●●

खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी अडचणीत-एकनाथ महाराज माने यांचे अनुभवाचे बोल 

खत-बीयान्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. मजूर मिळत नाहीत. एकंदर शेतीचा खर्च वाढत आहेत. शेतमालाचे भाव मात्र त्या पटीत वाढत नाहीत. म्हणून शेतकरी अडचणीत आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने हे सर्व अनुभवतो आहे, असे वांगी संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. एकनाथ महाराज माने यांनी सागितले. शेतकरी कीर्तन महोत्सवातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


शेतकरी कीर्तन महोत्सवाचे तिसरे कीर्तन पुष्प  गुंफताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,  वारकरी जेवढे आहेत तेवढे शेतकरी आहेत. संकटात असताना शेतकरी भजन - कीर्तनातून आपले दु:ख हलके करतात. तोच या कीर्तनातून होत आहे. गावातून येणाऱ्या भाकरी आणि त्याची होणारी सामोहिक पंगत ही जातीय सलोखा बळकट करणारे उपक्रम आहेत, असेही माने महाराज म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....