प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शेतकरी कीर्तन महोत्सव...

शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखा- कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांचे शेतकऱ्यांना आवाहन 

परळी / प्रतिनिधी

     रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेतीचा पोत खराब होत असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतील. हे टाळायचे असेल तर शेतकरी बांधवांनी शेंद्रीय आणि रासायनिक शेतीचा समतोल राखावा, असे आवाहन बीड जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे यांनी केले.


शेतकरी कीर्तन महोत्सवात 'शेतकरी योजना, शेती उद्योग आणि शेंद्रीय शेती ' या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रासायनिक खत, पवारण्या याच्या अती वापरामुळे शेतीमधील कीटकांची जीवन साखळी विस्कळीत झाली आहे. शेतीमध्ये काही जीव जंतू हे शेतीला लाभदायक असतात तर काही हानीकारक असतात. हानीकारक किकांना खाण्याचे काम काही किचकट करतात.  त्यातूनच शेतीचा समतोल राखला जाती. कधी कधी हानीकारक असणाऱ्या कीटकांची संख्या वाढते तेव्हा किटक नाशक फवारणीचा पर्याय असतो. पण अलिकडे किती गरज आहे याचा विचार न करता भरमसाठ किटक नाशक फवारले जातात. परिणाम उपयुक्त आणि हानीकारक दोन्ही तऱ्हेचे किटक संपत आहेत. त्यातून नैसर्गिक जीवन साखळी विस्कळीत होत आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेताचा पर्याय निवडला तर अधिक लाभ होऊ शकतो. रासायनिक खतांचा वापर टाळला तर कदाचित थोडे उत्पादन कमी होईल. पण त्याच वेळी खर्चही कमी होईल, असेही साळवे म्हणाले. 


यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठीची सर्व प्रक्रियाही त्यांनी समजावून सांगितली... यावेळी जिल्हा कृषी अधिकारी, धारूर तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासह बीड कृषी विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

●●●●●●●●●

खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी अडचणीत-एकनाथ महाराज माने यांचे अनुभवाचे बोल 

खत-बीयान्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. मजूर मिळत नाहीत. एकंदर शेतीचा खर्च वाढत आहेत. शेतमालाचे भाव मात्र त्या पटीत वाढत नाहीत. म्हणून शेतकरी अडचणीत आहे. मी स्वत: शेतकरी असल्याने हे सर्व अनुभवतो आहे, असे वांगी संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. एकनाथ महाराज माने यांनी सागितले. शेतकरी कीर्तन महोत्सवातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


शेतकरी कीर्तन महोत्सवाचे तिसरे कीर्तन पुष्प  गुंफताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,  वारकरी जेवढे आहेत तेवढे शेतकरी आहेत. संकटात असताना शेतकरी भजन - कीर्तनातून आपले दु:ख हलके करतात. तोच या कीर्तनातून होत आहे. गावातून येणाऱ्या भाकरी आणि त्याची होणारी सामोहिक पंगत ही जातीय सलोखा बळकट करणारे उपक्रम आहेत, असेही माने महाराज म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या