इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

✍️ ज्ञानेश्वर खंदारे , औरंगाबाद यांनी लिहलेला विशेष श्रद्धांजलीपर लेख

परिवर्तनवादी, समतेच्या विचारांनी चालणारा चारठाणकरांचा वाडा पोरका!

मरावे परी, कीर्ती रुपी उरावे I

आपण आयुष्य किती जगलो, यापेक्षा कसे जगलो. कुणासाठी जगलो, याला जीवनात अत्यंत महत्त्व असते. नानासाहेब देशपांडे चारठाणकर हे जुन्या पिढीतील एक नामांकित नाव. त्यांचं निधन 19 मार्च 2025 रोजी झाले. त्यांच्या निधनामुळे चारठाणा परिसरातील, पंचक्रोशीत तर दुःख झालेच, पण अख्खा परभणी जिल्हा हळहळला. अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्याची अनेक कारणे आहेत. ते ब्राह्मण समाजातील उच्च वर्णीय होते. पण मी ब्राह्मण आहे. उच्चवर्णीय आहे. असं त्यांनी कधीच मनात आणलं नाही. ब्राह्मण समाजापेक्षा त्यांच्या वाड्यावर महार , मांग,  चांभार , कुंभार , सुतार या समाजाचा वावर जास्त असायचा. त्यांच्या वाड्याच्या दारापासून ते देवघरापर्यंत अस्पृश्य समाजाची लोक बिनधास्तपणे वावर करीत असत. गावात कोणत्याही जातीचे, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही समाजाचे तंटे असो की भांडणे असो त की अन्यवाद-विवाद असो त नानासाहेबांच्या वाड्यावर च मिटत असत. त्यांच्या विचाराची गावात किंमत होती. त्यांच्या शब्दाला मान होता. म्हणून त्यांनी जो निर्णय दिला, न्याय दिला तो अंतिम असायचा. चारठाणा गावात आज पोलीस ठाणे झाले आहे. औरंगाबाद हैदराबाद हायवेवर चारठाणा फाट्यावर आज पोलीस ठाण्याची दिव्य आणि भव्य पांढऱ्या शुभ रंगाची इमारत उभी आहे. एक जमाना होता . एक काळ होता. नानासाहेबांची बैठक रुम हे पोलीस ठाणेच होते. दलित शोषित कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार यांची कोणतेही प्रश्न असो त , ते नानासाहेबांच्या वाड्यावर सुटायचे. शासकीय निमशासकीय खात्यात त्यांचा आदरयुक्त दरारा होता. सन्मान होता. परभणी जिल्ह्यातील अनेक खात्यात काम करणारे अधिकारी त्यांना खूप मानायचे. त्यांचे कोणतेही काम असो, शब्द खाली पडू देत नसत. एवढी त्यांची गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात किंमत होती. आज आमदार खासदार यांचे कोणी ऐकत नाही. त्यांच्या चिठ्ठीला अधिकारी केराची टोपली दाखवतात. अशावेळी नानासाहेबांची आवर्जून आठवण होते. त्यांचे स्मरण होते. माझा जन्म चारठांनचा. पण त्यांचा आणि माझा कधी संपर्क आला नाही. येण्याचं कारण नाही. पण त्यांच्याविषयी मला बरीच माहिती होती. मी अनेकदा त्यांना जवळून पाहिल होत. पण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचे कधी संधी मिळाली नाही. कारण त्यावेळी मी अत्यंत लहान होतो. शशिकांत देशपांडे हे माझे वर्गमित्र. लहानपणी शशिकांत हे माझ्या घरी नेहमी यायचे. ते ब्राह्मण आणि मी दलित. पण मन शशिकांत यांनी दलित आणि ब्राह्मण असा भेद कधीच मानला नाही. ते आजही मानत नाहीत. कारण त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले होते. परिवर्तनवादी, समतेच्या विचारांनी चालणारा हा वाडा होता. म्हणून या वाड्याची, वाड्याच्या प्रमुखाची, वाड्यातील प्रत्येक माणसाची सर्वत्र इज्जत होती. ती आजही आहे. ज्यांना वडील नाहीत, त्यांना वडिलांची किंमत काय असते हे जरा विचारून बघा i 

शशिकांत यांचे आज वडिलांचे छाया छत्र हरवले आहे. त्यांच्यावर प्रचंड असा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तथागत भगवान बुद्ध त्यांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो, अशी बुद्धाच्या चरणी वंदना करतो. 

✍️ ज्ञानेश्वर खंदारे , औरंगाबाद.                       9049592005

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या