प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

लढा न्यायाचा...आश्रमशाळांतील शिक्षकांच्या जीवनाचा संघर्ष

पगाराच्या विवंचनेत जीव गमावलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंचे वयोवृद्ध वडील आश्रमशाळांतील शिक्षकांच्या न्यायासाठी उपोषणस्थळी !

मी कुटुंबातील कर्ता लेक गमावलाय,इतरांवर ती वेळ नको: शासनाकडे न्यायाची मागणी

बीड, प्रतिनिधी...

    शाहु-फुले-आंबेडकर आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे बीड येथे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या २५ -३० वर्षांपासून सुरु असलेल्या शाळेतील शिक्षक विनापगारी आहेत. यातच पगाराच्या विवंचनेत जीव गमावलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजेंचे वयोवृद्ध वडील आश्रमशाळांतील शिक्षकांच्या न्यायासाठी आज उपोषणस्थळी दाखल झाले.आपण या उपोषणकर्त्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

    यावेळी मी कुटुंबातील कर्ता लेक गमावलाय, इतरांवर ती वेळ यायला नको अशा शब्दांत अतिशय दु:खी अंतःकरणाने त्यांनी शासनाकडे आश्रमशाळांतील शिक्षकांच्या न्यायाची मागणी केली. अतिशय भावनिक व गंभीर भावना त्यांनी व्यक्त केल्या. स्व.धनंजय नागरगोजे यांच्या वडिलांनी आहेत शिक्षकांची वास्तविक कैफियतच मांडली.त्यांनी सांगितले की, माझा मुलगा धनंजय 17 ते 18 वर्षापासून शाळेवर काम करत होता. आज अनुदान मिळेल उद्या पडताळणी होईल ,वेतन मिळेल या आशेवर आतापर्यंत काम केलं. परंतु पगार नसल्याने तो विवंचनेत होता हे मी  बिमार पडल्यानंतर स्पष्ट दिसुन आले पण त्याने तो तणाव आम्हाला जाणवू दिला नाही. मी माझ्या मुलाला गमावले आहे मात्र ही सगळी माझीच मुले आहेत. या शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी आता आम्ही मागे हटणार नाही.

     शासनाने अनुदानाचा वेळीच निर्णय घेतला असता तर  माझं लेकरू आम्हाला सोडून गेलं नसतं. आमचं कुटुंब आज उघड्यावर पडले आहे. त्यामुळे स्व. धनंजयची पत्नी राजकन्या हिला नोकरीत सामावून घ्यावे, माझा एक मुलगा कामाला घ्यावा तसेच आज धनंजयप्रमाणेच हे सगळे शिक्षक आहेत. ही माझी मुलेच आहेत. एका मुलाला तर मी गमावलं आहे.निदान इतरांवर ही वेळ येऊ नये यासाठी शासनाने वेतनश्रेणी लागू करून शंभर टक्के अनुदान द्यावे अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत.

दिला.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या