प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:परळी आगारातून आजपासून विविध ठिकाणी प्रवाशांसाठी बस सेवा सुरू*

 

*परळी आगारातून आजपासून विविध ठिकाणी प्रवाशांसाठी बस सेवा सुरू*

 परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

        राज्य शासनाने आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परळी आगारातून नाही आज 22 पासून विविध ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा सुरू करणार असल्याचे परळी आगाराचे आगारप्रमुख आर बी राजपूत यांनी सांगितले आहे.     

            याबाबतचे परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक ही त्यांनी जाहीर केले असून यामध्ये बीड अंबाजोगाई सोनपेठ लातूर नागपूर औरंगाबाद भुसावळ याठिकाणी बसेस उपलब्ध असणार आहेत. नागपूर व भुसावळ सकाळी साडेसहा वाजता बस सुटेल औरंगाबाद ची बस सकाळी साडेपाच वाजता सुटेल लातूर साठी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दर दोन तासाला परळी बस स्थानकातून बस सुटणार आहे तसेच सोनपेठ साठी सकाळी नऊ वाजल्यापासून दर दोन तासाला पाच वाजेपर्यंत बसवण्यात येतील. बीड साठी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दर दोन तासांनी बस सुटेल. अंबाजोगाई साठी सकाळी सात ते सायंकाळी पाच या दरम्यान दर दोन तासांनी बस सोडण्यात येईल. कमीत कमी वीस प्रवाशी असल्याशिवाय बस सोडण्यात येणार नाही दिनांक 22 पासून नियमितपणे परळी आगारातून बस सेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन परळी आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या