दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:देशमुख टाकळी येथील शेतकऱ्यांनी सुरू केले आमरण उपोषण(Video News)

 देशमुख टाकळी येथील शेतकऱ्यांनी सुरू केले आमरण उपोषण



परळी (प्रतिनिधी) 

 तालुक्यातील देशमुख टाकळी येथील नंबर बांधावरील रस्ता मोकळा करण्याच्या नादात नंबर बांधावरील नालीच बुजविल्याने आजुबाजुच्या शेतात पाणी साचल्याने शेतकर्यांच्या उभ्या पिकासह सोयाबिनच्या गंजी व ज्वारीचा कडबा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. 

    देशमुख टाकळी येथील गट नंबर 19,32,31,20,22, 23,24,25,14,08,09 व 07 या बारा गटनंबरच्या शेतातील पाणी वाहुन जाण्यासाठी नंबर बांधारुन मोठी नाली होती.यामुळे आजुबाजुच्या शेतातील पावसाचे पाणी या नालीद्वारे वाहुन जात होते. पावसाचे पाणी वाहुन नेणारी नाली बुजविली.नाली बुजविल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ता मोकळा करण्याच्या नादात संपुर्ण नालीच बुजुन टाकल्यामुळे आजुबाजुच्या शेतामध्ये तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे.नुकसान भरपाई द्यावी व नाली बुजवणे, वृक्षतोडकरणे यासंदर्भात दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी उपोषण करीत आहेत.उपोसणकर्ते शेतकरी जगन्नाथ किशनराव शिंदे,व बन्सी ज्ञानोबा शिंदे यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.



       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....