दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-हभप बंडामहाराज कराडकर स्थानबद्ध

हभप बंडामहाराज कराडकर स्थानबद्ध


कराड , प्रतिनिधी : गेली चार दिवसांपासून पंढरपूर आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी व वारी करणारच असा आग्रह धरून बंडातात्या कराडकर व वारकर्‍यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी तात्यांनी आळंदी येथे पोहोचून पायी वारीला सुरुवात केली होती. परंतु पोलिसांनी शनिवारी सकाळी आळंदी जवळील तापेकरवाडी येथून बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रामध्ये आणून स्थानबद्ध केले. 
 
दरम्यान याबाबत पत्रकारांशी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी सांगितले की, पंढरपूर आषाढी पायीवारी व्हावी यासाठी आमचा आग्रह होता. याच मागणीसाठी चार दिवसांपासून आमचे शांतता व संयमाच्या मार्गाने आणि वारकरी संप्रदायाच्या चाकोरीत राहून आंदोलन सुरू होते. परंतु पोलिसांनी वारकर्‍यांचे हे आंदोलन आपल्या खाक्याप्रमाणे निपटून काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला.त्यानंतर पोलिसांनी पांडुरंग तात्या घुले व मला स्थानबद्ध केले आहे. आषाढी वारी व कोरोनाचा विचार करता वारकऱ्यांचे आक्रमक आंदोलन न करता पोलिसांचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. समस्त वारकऱ्यांचा विचार करून आम्ही सध्या वारकऱ्यांना शांततेचे आवाहन करत आहे. याबाबत नंतर आंदोलन केले जाईल. परंतु आता वारकऱ्यांनी संयम ठेवावा, असेही बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.

टिप्पण्या

  1. कृपया वारकरी बांधव नी संयम बाळगावा करण हा काळ संकट चा आहे पांडुरंग सर्व काही ठीक करेल साध्या तरी वारी चा आग्रह धरू नये

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....