प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बाजीराव भैय्या धर्माधिकारी  ‘माऊली सेवा समर्पण’ पुरस्काराने सन्मानित !

हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी,दि. २५  –

      संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘माऊली सेवा समर्पण’ या प्रतिष्ठित आशिर्वादरुपी पुरस्काराने बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना आज मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

      आषाढी वारीनिमित्त संत शिरोमणी नामदेव महाराज दिंडीचे श्रीक्षेत्र नर्सी येथून वैद्यनाथ नगरीत आगमन झाले. यावेळी पार पडलेल्या पारंपरिक ‘रिंगण सोहळा’ कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारताना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे केवळ सन्मान नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे. माऊली महाराजांच्या नावाने मिळालेला हा गौरव माझ्या आयुष्यात सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा आणि दिशा देईल. पुढील काळात अधिक जोमाने समाजासाठी कार्य करेन, हे माझे अभिवचन आहे.”


       या विशेष सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभाननाना मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊलीमामा फड, ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे, प्रसिद्ध व्यापारी संदीपसेठ लाहोटी, सुरेशराव मुंडे, नाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप खाडे, शिक्षणतज्ञ कैलासजी तांदळे, नंदकिशोर बियाणी, गणेश महाराज स्वामी, गुरुवर्य सुभाष नाणेकर, सौ. चेतनाताई गौरशेटे, सौ. राधिकाताई जायभाये, महागायक सुभाषजी शेप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बलवीर रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते.


         संपूर्ण वैद्यनाथ नगरी भक्तिमय आणि पवित्र वातावरणाने न्हालेली असताना हा पुरस्कार प्रदान सोहळा एक संस्मरणीय क्षण ठरला. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या