पोस्ट्स

इमेज
  पत्रकार  बालाजी जगतकर यांना पितृशोक  श्रावणराव जगतकर यांचे  निधन  परळी प्रतिनिधी  - परळी येथील सुपरिचित व्यक्तिमत्व श्रावणराव नामदेवराव जगतकर वय 75  यांचे अल्पशा आजाराने दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1, 30 दरम्यान निधन झाले.     श्रावणराव जगतकर मितभाषी मनमिळावू स्वभावाचे व पॅंथरचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी समाजकार्यात हिरीरीने सहभाग नोंदवला आहे. विद्युत निर्मिती थर्मल पावर स्टेशन येथे ते नोकरीला लागल्यानंतर  त्यांनी आपली समाज सेवा व कार्य चालूच ठेवले होते. त्यानंतर विद्युत वितरण कंपनीत त्यांनी आपली सेवा दिली व त्याच ठिकाणी सेवानिवृत्त झाले. त्यांनी धार्मिक कार्यात सतत पुढाकार घेतला होता. त्यांच्याजाने एक मोठी पोकळी परळी शहरात निर्माण झाली आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले पत्रकार बालाजी जगतकर व दुसरा  मुलगा राजू जगतकर बुलेट रेल्वे कतार येथे मॅनेजर आहे.एक मुलगी व सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी   अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

◾ चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिली भेट

इमेज
◾चार कलावंत आणि चार भिन्न कला माध्यम परळी तालुक्यातील साळुंकवाडी चे तुकाराम कर्वे आणि  दौंडवाडीचे हरिराम फड यांच्या कलाकृती परळी /प्रतिनिधी- तालुक्यातील दोन कलावंत भूमिपुत्र  आणि नाशिक व मुंबईचे दोन अशा चार मित्रांचे एकत्रित कला प्रदर्शन नेहरू सेंटर वरळी येथे सुरू झाले आहे. प्रदर्शनात तुकाराम कर्वे मूळचे साळुंकवाडी तालुका परळी हरिराम फड दौंडवाडी तालुका परळी, संजय पाटील, मुंबई आणि सुनील महामुनी, नाशिक अशा चार मित्रांच्या कलेचं प्रदर्शन चोखंदळ कला रसिकांसाठी हे १५ ऑक्टोबर पासून पहावयास खुले झाले आहे.    प्रदर्शनाचं  उदघाटन १४ ऑक्टोबर रोजी जेजे स्कूल ऑफ आर्ट चे डॉ. प्रा. गणेश तरतरे यांच्या हस्ते झाले.तर  डॉ.  गजानन शेपाळ यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार संजय पेठे व सैफ्रॉन आर्ट गैलरीच्या अलका सामंत यांनी फित कापून प्रदर्शनाचे उदघाटन केले.  डिनोडिया फोटो चे जगदीश अग्रवाल व दौंडवाडी चे माजी उपसरपंच  जग्गनाथ दौण्ड, आर्ट गैलरी चे संचालक संतोष पेडणेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. शिल्पकला, डिजिटल मिक्स मीडिया. लँड स्कॅप व ...
इमेज
  संभाजीनगर एनसीसी विभाग प्रमुखाची वैद्यनाथ  काॅलेजला तपासणी भेट आज परळी शहरातील वैद्यनाथ काॅलेजला. छत्रपती संभाजीनगर  एनसीसी 51 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. सुनील रेड्डी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.150/60मुलांची निवड  प्रशासकीय सेवेत दाखल झाले हे पाहून समाधान व्यक्त केले. भविष्य कुठल्या मार्गाने  सोपे होईल याचे मार्गदर्शन केले. एनसीसी विभाग प्रमुख, कर्नल रेड्डी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगतकर सर यांची भेट घेऊन चर्चा केली. कौतुक केले.आणि या प्रसंगी  भाषणात विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य जगततकर सर यांची  उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रस्तावना कॅप्टन चव्हाण सर यांनी केली सूत्रसंचालन सय्यद शाकेर यांनी केले, तर आभार  टी.एन गंगणेसर यांनी मानले. कार्यक्रमाला काॅलेजचे  प्राध्यापक, एनसीसी अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येन...

दुर्देवी घटना.....

इमेज
अंत्यविधी दरम्यान पिकअप गर्दीत घुसला; एक ठार: दहा जण जखमी  बीड जवळच्या पाली गावात घडलेली घटना  बीड , एमबी न्यूज वृत्तसेवा: बीड जवळील पाली येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू असतानाच भरधाव वेगाने येणारा पिकअप अंत्यविधी कार्यक्रमात घुसल्याने संभाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर असून सात ते आठ जण जखमी झाले आहे. यातील जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णाला उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली. पाली परिसरातील स्मशान भूमीत स्वर्गीय आसराबाई किसनराव नवले यांचा अंत्यविधी सुरू होता. याच दरम्यान भरधाव वेगाने येणारा पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप अंत्यविधी मध्ये घुसला यात संभाजी विठ्ठलराव जाधव हे मयत झाले आणि इतर आठ ते दहा जण अपघातात जखमी आहेत. दरम्यान जखमीची संख्या वाढणार असल्याचे समजताच जिल्हा रुग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तत्काळ अलर्ट करण्यात आले होते.

बहूमान....

इमेज
पं.विजय पाठक आंतरराष्ट्रीय ज्योतिष-वास्तु महासंमेलनात  सन्मानित  वाराणसी, उत्तर प्रदेश. बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) संस्कृत विद्या धर्मविज्ञान शाखेच्या ज्योतिष विभागात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष आणि वास्तु महासंमेलनात भारत आणि परदेशातील ज्योतिषी, संशोधक आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या प्रसंगी *पं. विजय पाठक यांना सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले* आणि त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) आणि माँ शारदा ज्योतिषधाम संशोधन संस्था, इंदौर कडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बनारस हिंदू विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचा गौरवशाली इतिहास बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विद्या धर्मविज्ञान विद्याशाखेचा ज्योतिष विभाग १९१८ मध्ये स्थापन झाला आणि तो केवळ भारतातच नाही तर जगभरात वैदिक अभ्यास आणि ज्योतिषशास्त्राचे एक प्रामाणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. हा विभाग वेद, वेदांग, गणित, खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्रातील संशोधनात अग्रेसर आहे. *या विभागाकडून सन्मान मिळणे ही कोणत्याही विद्वानासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बाब समजली ज...
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा  परळी वैजनाथ दि.१५ (प्रतिनिधी)          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ एन.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.             राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा डॉ राजकुमार यल्लावाड, ग्रंथपाल सिध्देश्वर कोकाट यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व स्पष्ट केले. डॉ राजकुमार यल्लावाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करावी. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ विद्या देशपांडे यांनी केला. विद्यार्थ्यांनी वाच...
इमेज
वैद्यनाथ कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन’ साजरा वाचनामुळे मनाची आणि विचाराची प्रगल्भता वाढते --डॉ. डी. के. वीर परळी (प्रतिनिधी)....वैद्यनाथ कॉलेज मध्ये भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय व एन.एस.एस. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, माजी ग्रंथपाल डॉ. डी के वीर यांनी वाचनाचे महत्त्व सांगताना, “वाचनामुळे मनाचा विकास होतो, शब्दसंग्रह वाढतो आणि विचारांची क्षमता प्रगल्भ होते,” असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव,मा.श्री दत्ताप्पा इटके, प्रमुख वक्ते डॉ.डी के वीर, प्रमुख उपस्थिती प्राचार्य, डॉ जे व्ही जगतकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या परिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी डॉ पी एल कराड, उपप्राचार्य प्रा. डी के आंधळे, प्रा हरीश मुंडे, आयोजक ग्रंथपाल डॉ.एस ए धांडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  ग्रंथपा...