अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...
उद्या(26मे)पासून परळीतील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु होणार पण...
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम उद्या दिनांक 26 मे पासून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी दोन दिवसापूर्वीच पत्र जारी करून माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने हे काम दिनांक 26 मे पासून पुढे एक महिना म्हणजेच 30 जून पर्यंत सुरू राहणार आहे. परंतु उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्याबाबतच्या निर्णयात अंशतः बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील सहा दिवस म्हणजेच 31 मे पर्यंत उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू राहणार आहे. एक जून नंतर मात्र संपूर्णतः उड्डाणपुलावरील वाहतूक बंद असणार आहे.
डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकतीच जारी केली होती.त्यानुसार काम सुरु होणार असले तरी 31 तारखेपर्यंत उड्डाणपुलावरुन वाहतूकही सुरु ठेवण्यात येणार आहे.परळी वैजनाथ शहरातील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची दुरुस्ती करण्याकरिता पुलावरील वाहतूक एक महिना चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग लातूर यांनी जा.क्र.रा.म.उ. बि.ला/तां. शा/२०२/२०२५ दि.२९/ ०४/२०२५पत्र निर्गमित केले आहे. संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब वरील डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची तांत्रिक दुरावस्था लक्षात घेता त्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामास अडथळा येऊ नये व वाहतुकीतील अपघाताचा धोका टाळण्यासाठी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.२६/०५/ २०२५ पासून दि. ३०/०६/२०२५ पर्यंत कालावधीत बंद ठेवावी लागणार आहे.असे पत्र निर्गमित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने उद्या दि.२६ मे पासून उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होणार आहे मात्र ३१ मे पर्यंत उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. रात्री उशीरा वाहतूक कमी असण्याच्या काळात ही कामे करण्यात येणार आहेत.३१ मे पर्यंत दिवसा ही कामे न करता रात्रीच्यावेळी करण्यात येतील.१ जुनपासून मात्र उड्डाणपुलावरुन होणारी वाहतूक संपूर्णत: बंद केली जाणार आहे. त्यामुळे आता परळीच्या उड्डाणपुलावरुन दि.१.२६/२०२५ पासून दि. ३०/०६/२०२५ पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांच्या सुत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा