MB NEWS-भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस विशेष डिजिटल पेज.........
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वाढदिवस विशेष डिजिटल पेज.........
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
स्वाभिमानी नेतृत्व...........
✍️✍️✍️✍️
🕳️प्रदीप कुलकर्णी
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• गोपीनाथ मुंडे हे नांव जगाला विसरू देणार नाही ' अशी शपथ घेऊन राजकारणात दमदार वाटचाल करत समाजातील वंचित, पिडित घटकाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक धडपड करणारं स्वाभिमानी नेतृत्व म्हणून पंकजाताई मुंडे यांच्याकडे आज पाहिलं जातं. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सक्षम राजकीय वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात असताना राजकारणा सोबतच समाजकारणातही कायम आघाडीवर असलेलं हे व्यक्तिमत्व.. समाजातील वंचित, पिडित घटकांच्या सेवेसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले, त्या मुंडे साहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेत, येणा-या प्रत्येक संकटावर मात करत अविरतपणे वाटचाल करणारं हे धुरंधर नेतृत्व...
पंकजाताई मुंडे यांची राजकीय कारकिर्द सुरवातीपासून ते आतापर्यंत तशी संघर्षाचीच.. तरीही मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग त्यांनी लोकांच्या भल्यासाठीच केला. एक सरळमार्गी राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे. जनतेच्या अडी अडचणीला धाऊन जाणारं, त्यांच्या वेदना समजून घेणारं व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांचेकडं पाहिलं जातं. मंत्री म्हणून काम करताना जलसंधारण, ग्रामविकास,महिला व बालविकास, रोजगार हमी योजना अशी चार चार खाते यशस्वीपणे सांभाळून त्या खात्यांना त्यांनी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला, एवढेच काय, या खात्यांना आपल्या जनाभिमुख निर्णयांनी आणि स्वकर्तृत्वाने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून दिले. या खात्याच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ तर त्यांनी गोरगरिबांपर्यंत पोहोचविलाच परंतु त्याचबरोबर अनेक नव नवीन योजना अंमलात आणून लोक कल्याणाची एक अनोखी संकल्पना रूजविली.
सत्तेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवल्याने त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली, ज्यामुळं अनेकांची पोटं दुखली. कट कारस्थानांच्या राजकारणातुन त्यांची प्रतिमा हनन करण्याचा डाव पारंपारिक विरोधकांकडून रचला गेला.परंतु प्रत्येक 'विजयात संघर्ष' आणि प्रत्येक 'संघर्षात विजय' या लोकनेत्याच्या समीकरणाची शिकवण व संस्काराच्या शिदोरीवर त्यांनी इथेही विजय मिळवला. वंचित, शोषित, बहुजनांच्या हितासाठी मुंडे साहेबांचा वसा घेऊन सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास रोखण्याचा अनेक राजकीय महारथींनी निष्फळ प्रयत्न केला व आजही सुरू आहे, परंतु संघर्षाची शिकवण व जनसामान्यांचे असीम पाठबळ लाभल्याने त्यांना रोखणे कुणालाही शक्य झाले नाही व पुढेही होणार नाही.
तसे, पाहिले तर 'संघर्षकन्या ते विकासकन्या' या प्रवासात पंकजाताईंच्या राजकारणाचा आलेख हा नेहमीच चढता राहिला आहे. पहिल्यांदा आमदार आणि त्यानंतर दुस-यांदा पुन्हा आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी अतिशय यशस्वीपणे काम केले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्यप्रदेशच्या सह प्रभारी म्हणून आज पक्ष नेतृत्वाने त्यांचेवर जबाबदारी सोपवली आहे. मागील महिन्यात त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या प्रश्नांवर राज्यभरात रास्ता रोको आंदोलन झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. या भूमिकेमुळे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पाच जिल्हा परिषदा व काही पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित केल्या, ही त्यांच्या नेतृत्वाची चुणूकच म्हणावी लागेल.
मोठया माणसांचा वारसा चालवणं हे तसं एक आव्हानच असतं, ते पेलणं सर्वानाच शक्य होत असं नाही पण पंकजाताई मात्र याला अपवाद आहेत. मुंडे साहेबांचा वारसा होणं म्हणजे त्यांच्या सत्ता, संपतीचा वारसा होणं नाही, तर त्यांच्या आदर्श विचारांचा..वंचित, पिडित, शोषित, दीनदुबळ्यांची सेवा करण्याचा.. आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा वारसा चालवणं..जे काम पंकजाताई आपल्या राजकीय जीवनात सातत्याने करत आल्या आणि पुढेही अव्याहतपणे करतील. सामाजिक बांधिलकी जोपासताना 'उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही ' हे त्यांनी केवळ बोलून नव्हे तर आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असे एक व्यासपीठ आहे की त्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाज कार्याला वाहून घेतले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी केवळ रस्ते, इमारतीच बांधल्या नाहीत तर माणसं जोडण्याचे देखील काम केले. महा आरोग्य शिबीर, दिव्यांगांना साहित्य वाटप, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबियांना मदत, बेरोजगारांना नोक-या, गरजू रूग्णांची आरोग्य तपासणी व महागड्या शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून दिल्या. मराठवाडयातील पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर औरंगाबादेत उपोषण केले. लाॅकडाऊन काळात राज्यातील विविध साखर कारखान्यांवर अडकलेल्या ऊसतोड कामगारांना स्वगृही पाठविण्यासाठी सरकारला भाग पाडले. एवढेच नव्हे तर कोरोना संकटात गोरगरीब, गरजू नागरिकांना घरपोच रेशन व जीवनावश्यक साहित्य वाटप केले, केवळ परळीच नाही तर हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविला. एवढेच नाही तर कोरोना काळात परळी व शिरूर कासार येथे आयसोलेशन सेंटर सुरू करून रूग्णांसाठी सेवा यज्ञ उभारला. सत्ता असो वा नसो मुंडे साहेबांचा माणसं जोडण्याचा सक्षम वारसा त्यांनी कायम जपला. आपल्या कामांतून त्यांनी वंचित, उपेक्षित घटकांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. समाजातील जातीभेद झूगारून एक माणूस म्हणून विविध घटकांना आपुलकीने जोडण्याचे काम केले. सर्व सामान्य माणसासाठी अहोरात्र काम करण्याच्या स्वभावामुळे आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत लोकनेत्याचा खरा वारसा त्या आज पुढे नेत आहेत. लोकांना त्यांच्या रूपात मुंडे साहेबच दिसतात, त्यामुळेच हा वारसा जीवापाड जपण्याचे काम समाजातील अठरा पगड जातीचे लोक आज करत आहेत, त्यांच्यावर येणारा प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी कार्यकर्ते सदैव तयार असतात. लोकनेत्याचा हा वारसा आपणच आहोत असे सांगणा-यांना मात्र ही गोष्ट या जन्मात शक्य होणार नाही. हे स्वाभिमानी नेतृत्व संघर्षाच्या अग्नितून बाहेर पडून पुन्हा तितक्याच रूबाबात आत्मविश्वासाने वाटचाल करेल, यात तीळमात्र शंका नाही...आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा..!
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा