दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी*

*राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच त्या विद्यार्थ्यांवर अन्याय - धनंजय मुंडे*

*सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी*



मुंबई दि 4 ...... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. न्यायालयाने या विद्यार्थ्याच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने ही स्थगिती आली आहे. या नोकरभरतीत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सहाययक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून सध्या गोंधळ सुरू आहे... अनेक विद्यार्थ्यांनी तीन- तीन वर्षे अभ्यास करून ही परीक्षा दिली.. परीक्षेचा निकालही आला..परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्याच्या नियुक्तीची शिफारसही mpsc ने राज्य सरकारकडे केली. मात्र नियुक्ती होण्याआधीच  त्यावर न्यायालयाकडून स्थगिती आली. न्यायालयाच्या या स्थगितीचा. फटका बसलेली ही 24 वर्षीय वर्षा बराटे, उस्मानाबाद जिल्ह्यातील वर्षा पुण्यात नोकरीसाठी आली. नोकरी करत तिने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाची परीक्षा दिली. या परीक्षेत तिला यशही मिळालं.. पण आता नियुक्तीवर स्थगिती अाली... न्यायालयात राज्य सरकारने नीट भूमिका मांडली नाही, वेळेत प्रतिज्ञापत्र दिले नाही त्यामुळे आपल्यावर ही वेळ आल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.


या निर्णयामुळे 830 विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या नोकरभरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुखमंत्र्यांकडे केलीय.


 MPSC तर्फे सरकारी नोकर भरतीत वारंवार गोंधळ होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पण सरकार मात्र अजूनही याबाबत गंभीर दिसत नाही. या 830 विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करावे अशी मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....