इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ●



*देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया - शिवाजी मव्हाळे* 


● _कै.राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी मा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात_ ●

सोनपेठ / प्रतिनिधी. .......
        देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया असतात. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या प्रवाहात सामील झाले पाहिजे.शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असुन देशनिष्ठ विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी स्वातंत्र्य दिन समारंभात केले. 

     खडका येथील कै. राजीवगांधी अनु.जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्याचप्रमाणे देशभक्तीपर मनोगते व गीते सादर केली. प्रारंभी कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.सामुहिक राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.  शाळेच्या भव्य दिव्य परिसराला देशभक्तीपर प्रतिकांनी विविध प्रकारे सजविण्यात आले होते. या वेळी झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभात व्यासपीठावर कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी  संस्थेचे अध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांच्यासह संस्थेचे कोषाध्यक्ष ज्ञानोबा मव्हाळे, शाळेचे मुख्याध्यापक डि.एस.सोनकांबळे, वस्तीगृह अधिक्षक डी. एम. माने, महिला वस्तीगृह अधिक्षिका सौ.आम्रपाली मव्हाळे आदी उपस्थित होते.
        पुढे बोलताना शिवाजी मव्हाळे यांनी सांगितले की, देश पारतंत्र्यात होता तेंव्हा अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावून प्रसंगी बलिदान देउन स्वातंत्र्य मिळवले. आज आपण सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहोत. आपला देश अधिकाधिक विकासाच्या मार्गाने पुढे जात असताना येणाऱ्या पिढ्या देशभक्तीने प्रेरीत निर्माण होणे गरजेचे आहे. देशभक्तीने प्रेरीत शालेय विद्यार्थीच देशाच्या जडणघडणीचा पाया असतात त्यामुळे शालेय विद्यार्थी सर्वांगीण घडला पाहिजे असे त्यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत  शाळेचे मुख्याध्यापक डि.एस.सोनकांबळे यांनी केले.सुत्रसंचलन सहशिक्षक जालमिले यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक जोशी यांनी केले. कार्यक्रमाला पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!