परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे

 शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक-शिवाजीराव मव्हाळे

• *_कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे वसंतराव नाईक जयंती साजरी_* •


सोनपेठ (प्रतिनिधी).....
     कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे हरित क्रांतीचे प्रणेते   वसंतराव नाईक जयंती यांची जयंती साजरी करण्यात आली.
     हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, सरपंच रामप्रसाद यादव, पोलीस पाटील वैजनाथराव यादव, मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे,वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक   प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रातील खर्या अर्थाने क्रांती घडवून शेत,शिवार आणि शेतकरी यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी वसंतराव नाईक यांचे नाव अजरामर झाले आहे.त्यांच्या विचारांची कास धरून वाटचाल केली पाहिजे असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले.यावेळी शाळेचे  शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!