इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

 कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून

 - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

 


अंबाजोगाई, प्रतिनिधी

कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून विवाहितेचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणात सासऱ्याचा हात असल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त केला आहे.

 शीतल अजय लव्हारे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या गळ्यावर कु-हाडीने वार करण्यात आले असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित सासरा फरार झाला असून बर्दापूर पोलिसांचे पथक रात्रीपासून त्याचा कसून शोध घेत आहेत. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

 

*प्रेमविवाह केल्याच राग ?*

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय लव्हारे याने पाच वर्षापूर्वी शीतलसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना चार वर्षाची एक मुलगी देखील आहे. आपला विरोध झुगारून अजयने विवाह केल्याचा राग वडीलास होता.याच रागातून त्याने हे कृत्य केले असावा असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

लग्नापासून अजय बाहेरगावी राहत होता. लॉकडाऊन नंतर तो गावाकडे परतला होता. अशी प्राथमिक माहिती आहे.पोलीस तपासानंतरच खरे कारण उघड होऊ शकणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या