दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

 कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून

 - अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना

 


अंबाजोगाई, प्रतिनिधी

कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून विवाहितेचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली आहे.याप्रकरणात सासऱ्याचा हात असल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त केला आहे.

 शीतल अजय लव्हारे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या गळ्यावर कु-हाडीने वार करण्यात आले असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित सासरा फरार झाला असून बर्दापूर पोलिसांचे पथक रात्रीपासून त्याचा कसून शोध घेत आहेत. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

 

*प्रेमविवाह केल्याच राग ?*

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय लव्हारे याने पाच वर्षापूर्वी शीतलसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना चार वर्षाची एक मुलगी देखील आहे. आपला विरोध झुगारून अजयने विवाह केल्याचा राग वडीलास होता.याच रागातून त्याने हे कृत्य केले असावा असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

लग्नापासून अजय बाहेरगावी राहत होता. लॉकडाऊन नंतर तो गावाकडे परतला होता. अशी प्राथमिक माहिती आहे.पोलीस तपासानंतरच खरे कारण उघड होऊ शकणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....