MB NEWS: *अखेर राज्यातील ई-पासची जाचक अट रद्द!* महाराष्ट्रात आता ई-पासशिवाय प्रवास करता येणार*
*अखेर राज्यातील ई-पासची जाचक अट रद्द!*
महाराष्ट्रात आता ई-पासशिवाय प्रवास करता येणार*

मुंबई : महाराष्ट्रात अनलॉक-४ संदर्भात नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या नियमावलीनुसार आता जिल्हांतर्गंत प्रवास करताना ई-पासची अट्ट हद्दपार करण्यात आली आहे. आता ई-पासशिवाय राज्यात प्रवास करता येणार आहे. केंद्रानं परवानगी दिल्यानंतरही राज्यात ई-पासची अट कायम ठेवण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारनं ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा