इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:कामगार कल्याण मंडळाकडून ४३ हजार कामगारांना मास्कचे वाटप कोरोना संसर्गापासून बचावासाठी कामगारांना झाली मदत

कामगार कल्याण मंडळाकडून ४३ हजार कामगारांना मास्कचे वाटप 

कोरोना संसर्गापासून बचावासाठी कामगारांना झाली मदत 




 परळी दि. ३१ ऑगस्ट २०

 कोरोना संसर्गाची लागण कामगारांना होऊ नये व कामगार सुरक्षित राहावेत म्हणून कामगार कल्याण मंडळाने  राज्यातील ४३ हजार कामगारांना विनामूल्य मास्कचे वाटप केले आहे. 

कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने व  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने  राज्यातील मुंबई, ठाणे,  पुणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला व नागपूर या विभागांतर्गत चालणाऱ्या २३० कामगार कल्याण केंद्रातून ४३ हजार कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.


 गेल्या तीन  महिन्यापासून कामगारांना मास्कचे वाटप होत आहे. यामुळे कोरोना संसर्गापासून कामगारांना संरक्षण मिळण्यास मदत झाली.  बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कामगारांनाही मास्कचे  वितरण करण्यात  आले आहे.


 विशेष म्हणजे हे सर्व मास्क  कामगार कल्याण केंद्राच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः तयार केलेले आहे.  कामगार मंडळातर्फे दरवर्षी कामगार कुटुंबातील महिला सदस्यांना शिवण कलेचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु यंदा लॉकडाऊनच्या काळात प्रशिक्षण देता आले नाही. म्हणून प्रशिक्षण देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी हे मास्क तयार केले आहे. या सर्व महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी केले आहे.


 कामगार मंडळाने यापूर्वीही कोरोना  संसर्गापासून बचाव होण्यासाठी कोवीड-१९ ही  डिजिटल मोहीम राबवून कामगारांमध्ये जनजागृती केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या