इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण

 *⭕राज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागात वाढतायत कोरोनाचे रूग्ण⭕*



      मुंबई : ग्रामीण महाराष्ट्रीत कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. लॉकडाऊन उघडल्यानंतर काळजी घेतली जात नसल्याने ग्रामीण तसेच निमशहरी भागात कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. काही तालुक्यांमध्ये दिवसाला सरासरी १० ते ६० असे कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात उघडल्यानंतर ग्रामीण भागातील व्यवहार सामान्य झाल्यासारखं वातावरण आहे. पण काळजी घेतली जात नसल्याने उतार वयातील लोकांना कोरोनाची अधिक लागण होत आहे.

       

             सुरूवातीला दिसणाऱ्या लक्षणांकडे दूर्लक्ष होत असल्याचंही सांगण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर सरासरी हात धुण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखण्याकडेही लक्ष दिलं जात नसल्याचं सांगण्यात येत आहे.

     

          मात्र सार्वजनिक वाहतुकीला ग्रामीण भागात अजूनही वेग आलेला नाही. कारण एसटी सुरू होवूनही प्रवासी वाहनांकडे फिरकत नसल्याचं चित्र आहे.

   

          ग्रामीण आणि निमशहरी भागाला लागून असलेली खासगी रूग्णालयं देखील अव्वाच्या सव्वा फी आकारत असल्याचं रूग्ण सांगतात. काही रूग्णांचं ७ दिवसांचं बिल हे १ लाख ते ५० हजाराच्या आत आकारले जात आहे.

   

         एकंदरीत कोरोना होण्यापेक्षा कोरोनाचे उपचार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची दहशतच लोकांमध्ये जास्त दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या