इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:*⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕*

 *⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕*


मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे तब्बल १४,४९२ रुग्ण आढळले आहेत. याआधी २० ऑगस्टलाही एवढेच रुग्ण सापडले होते. आजच्या एका दिवसात कोरोनामुळे २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रामधली कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६,७१,९४२ एवढी झाली आहे, यापैकी १,६९,५१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४,८०,११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजच्या एका दिवसात ९,२४१  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातला कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ७१.४५ टक्के एवढं आहे.

राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे २१,९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत सर्वाधिक ७,३८८ जण दगावले आहेत. तर पुणे जिल्ह्यात ३,६७४ आणि ठाणे जिल्ह्यात ३,५३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 


आजच्या एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मिळाले. पुणे शहरात २४ तासात १,५८१ रुग्णांची नोंद झाली, तर ४० जणांचा मृत्यू झाला. पुणे मनपा क्षेत्रात आत्तापर्यंत २,२८९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर मुंबईमध्ये आजच्या दिवसात १,१३४ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. 


पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १,४७,६७१ एवढे रुग्ण आहेत, यापैकी १,००,५०० रुग्ण बरे झाले आहेत, तर ४३,४९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात पुण्यामध्येच सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबईत १,३५,३६२ कोरोनाबाधित आहेत, यापैकी १,०९,३६८ रुग्ण बरे झाले आहेत, तर १८,३०१ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या