दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:*⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕*

 *⭕राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ⭕*


मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे तब्बल १४,४९२ रुग्ण आढळले आहेत. याआधी २० ऑगस्टलाही एवढेच रुग्ण सापडले होते. आजच्या एका दिवसात कोरोनामुळे २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रामधली कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६,७१,९४२ एवढी झाली आहे, यापैकी १,६९,५१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४,८०,११४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजच्या एका दिवसात ९,२४१  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातला कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ७१.४५ टक्के एवढं आहे.

राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे २१,९९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत सर्वाधिक ७,३८८ जण दगावले आहेत. तर पुणे जिल्ह्यात ३,६७४ आणि ठाणे जिल्ह्यात ३,५३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 


आजच्या एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मिळाले. पुणे शहरात २४ तासात १,५८१ रुग्णांची नोंद झाली, तर ४० जणांचा मृत्यू झाला. पुणे मनपा क्षेत्रात आत्तापर्यंत २,२८९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर मुंबईमध्ये आजच्या दिवसात १,१३४ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. 


पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे १,४७,६७१ एवढे रुग्ण आहेत, यापैकी १,००,५०० रुग्ण बरे झाले आहेत, तर ४३,४९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात पुण्यामध्येच सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मुंबईत १,३५,३६२ कोरोनाबाधित आहेत, यापैकी १,०९,३६८ रुग्ण बरे झाले आहेत, तर १८,३०१ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....