इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS:पत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू कराप पत्रकार संघाचे राज्य सरकारला निवेदन

 पत्रकारांसाठी 50 लाखांचे विमा कवच लागू कराप

पत्रकार संघाचे राज्य सरकारला निवेदन




परळी l प्रतिनिधी


कोरोनाच्या काळात जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्यातील पत्रकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता मात्र सुरक्षित नसल्याचे सध्या दिसते आहे. गेल्या पाच महिन्यांत कोरोनाने अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागल्याने त्यांचे कुटुंब संकटात सापडले आहेत. या बाबीची दाखल घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना राज्य सरकारने 50 लाखांचे विमा कवच लागू करावे अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली. याबाबतचे निवेदन बुधवारी तहसीलदार परळी यांना देण्यात आले आहे.


कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील काळात अनेक पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे. पत्रकारिता हा व्यवसाय नसून तो पेशा आहे. समाजाच्या भल्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाची कुठलीही योजना अस्तित्वात नाही. जीव गमावल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट ओढवते. राज्यात कोरोनाने 50 पेक्षा जास्त पत्रकारांनी आपला जीव गमावला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांनाही विमा योजना लागू करू अशी घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली होती, मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शासनाने सदरील गोष्टीला गांभीर्याने घेऊन पत्रकारांना तात्काळ विमा कवच लागू करावे अशी मागणी परळी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदन नायब तहसीलदार बी.एल.रूपनर यांनी स्वीकारले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धीरज जंगले, दत्तात्रय काळे, महादेव गित्ते आदी उपस्थित होते. या निवेदनावर परळीतील सर्व पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....