इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी शेतकऱ्याला 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ नुकसानभरपाई द्या- वसंत मुंडे

 सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी शेतकऱ्याला 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ नुकसानभरपाई द्या- वसंत मुंडे    



परळी(प्रतिनिधी) महाराष्ट्रात खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सोयाबीनची  बियाणे  अनेक कंपनीचे खरेदी करून पेरणी केली .यामध्ये 90% कंपनीची निकृष्ट बियाणे  निघाल्याचा  आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी शासनाकडे केला होता. त्यावर  तात्काळ लाखो शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे अर्ज केले. त्यामुळे शासनाला  सोयाबीन बियाणे निकृष्ट संदर्भात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन उगवले नाही यासंदर्भात  पंचनामे करण्यासाठी स्वतः कृषी विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

 त्यावेळेस शासनाच्या लक्षात आले की अनेक कंपन्यांनी सोयाबीन बियाणे मध्ये निकृष्ट दर्जाचे पुरवल्यामुळे उगवण झाली नाही त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी अनेक कंपन्या वर स्वतः गुन्हे नोंद करण्याची मागणी केली व स्वतः शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले . त्यानंतर  राज्यात 11 कंपन्यांवर 83 गुन्हे दाखल झाले व त्यांचे परवाने  रद्द केले   पण  कायमस्वरूपी  या बोगस कंपनीला  शासनाने  कायदेशीर कारवाई करण्याची मागणी  काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी  केली आहे .शेतकऱ्याकडून  अनेक तक्रारी मध्ये  बोगस बियाणे ,खते ,औषधे पुरवणाऱ्या  कंपन्या वर  चौकशी  करून  कलम 420 बोगस बियाणे भरून बियाणे कायदा 19 66 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील तरतुदीचा भंग केलेला आहे. हे चौकशीमध्ये सिद्ध झाले. त्यामुळे शासनाने तात्काळ सर्व शेतकऱ्यांची बोगस बियाणे संदर्भात दखल घेऊन रीतसर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले .त्यांचे परवाने कंपनीचे रद्द केले म्हणजे यावर शेतकऱ्याचे समाधान नाही. तर शेतकऱ्याचे जे नुकसान सोयाबीन पेरणी चे झालेले आहे. त्या शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्याची विनंती शेतकऱ्यांनी अनेक वेळेस शासनाला केली आहे. यास सर्व शी कृषी खात्याची गुणनियंत्रण विभाग हा जबाबदार आहे. कारण अनेक कंपनीशी साटेलोटे करून अपात्र सोयाबीनचे बोगस बियाणे पात्र करून घेतले व शेतकऱ्यांना ते बियाणे बाजारपेठेत चढ्या भावाने विकत घेऊन पेरणी केली परंतु यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने आर्थिक संकटात सापडला कृषी खात्याची यंत्रणा जबाबदार आहे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी दि.19/ 3 /2019 व दि.20 ऑगस्ट 2019 तसेच दि.23/ 6/ 2020 ला कृषी विभागाकडे शासनस्तरावर खते ,बी-बियाणे ,औषधी, बोगस पुरवणारी टोळकं कंपनीचा आहे अशी तक्रार काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे त्यामध्ये चौकशी मध्ये सिद्ध झाले असून  खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावर अनेक कंपन्या जीवाशी खेळत आहेत अनेक खते, औषधे ,बियाणे 90% अप्रमाणित आहेत हे विविध चौकशीमध्ये सिद्ध झालेले आहे .तरीही कृषी विभाग  व शासन त्यांची पाठराखण करीत आहे असा आरोप वसंत मुंडे यांनी केला. शेतकऱ्यावर नुकसान भरपाई तात्काळ वाटप करण्यात यावी कारण अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जन्य परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे .अशा वेळेस पिक विमा ,बोगस बियाणे ,अतिवृष्टी चे नुकसान शेतकऱ्याला तात्काळ वाटप केले तर खरीप  हंगामास पेरणीसाठी मदत होईल अशी विनंती शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या