इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS: *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*

 *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*



नवी दिल्ली :  वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'NEET' तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'JEE' परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.४) नकार दिला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. JEE परीक्षेचे चार दिवसांचे पेपर संपले असून येत्या ६ तारखेपर्यंत ही परीक्षा होणार आहे.


कोरोना संसर्गामुळे JEE व NEET परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी विनंती करीत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिकाही फेटाळली गेल्याने JEE आणि NEET परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला.


गैर भाजपशासित सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या मंत्र्यामध्ये महाराष्ट्राचे उदय सामंत, प. बंगालचे मोलाय घताक, झारखंडचे रामेश्वर ओरान, राजस्थानचे रघु शर्मा, छत्तीसगडचे अमरजित भगत आणि पंजाबचे बी. एस. सिद्धू यांचा समावेश होता. या सर्वांची पुनर्विचार याचिका न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या