दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS: *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*

 *JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*



नवी दिल्ली :  वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'NEET' तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची 'JEE' परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.४) नकार दिला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. JEE परीक्षेचे चार दिवसांचे पेपर संपले असून येत्या ६ तारखेपर्यंत ही परीक्षा होणार आहे.


कोरोना संसर्गामुळे JEE व NEET परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी विनंती करीत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात असंख्य याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सहा राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिकाही फेटाळली गेल्याने JEE आणि NEET परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला.


गैर भाजपशासित सहा राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या मंत्र्यामध्ये महाराष्ट्राचे उदय सामंत, प. बंगालचे मोलाय घताक, झारखंडचे रामेश्वर ओरान, राजस्थानचे रघु शर्मा, छत्तीसगडचे अमरजित भगत आणि पंजाबचे बी. एस. सिद्धू यांचा समावेश होता. या सर्वांची पुनर्विचार याचिका न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....